Friday, 4 November 2022

सामाजिक न्याय विभागाच्या ‘नावीन्याची संकल्पपूर्ती’ या पुस्तक

 सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा


नागपूर एनआयटीची २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्याचे निर्देsh.

            मुंबई, दि. 3 : नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले. सामाजिक न्याय विभागाने नागपूरच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांना घरे देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यापुढे मैला उपसण्यासाठी नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात रोबोटचा वापर करता येईल का यादृष्टीने चाचणी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, नागरी हक्क संरक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            नागपूरमध्ये एनआयटीने २५२ घरे बांधली असून या घरांची किंमत ९ लाख रुपये निश्चित केली आहे. या घरांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अंदाजपत्रकातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या धोरणाप्रमाणे अडीच लाखांची सबसिडी प्रस्तावित करण्यात आली आहे. या घरांसाठी वित्त विभागाने तातडीने ६ कोटी ३० लाख रुपये सामाजिक न्याय विभागाला द्यावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून दिल्या. त्यानंतर ही २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. देशात प्रथमच तृतीयपंथीयांसाठी घरांचा प्रयोग नागपुरात राबविण्यात येणार असून त्याधर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रातदेखील सिडको, म्हाडाच्या सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी ५०० घरे बांधण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


सफाई करताना कामगारांचा बळी जाणार नाही याची दक्षता घ्या


            मैला साफ करण्यासाठी कामगारांना खोल टाकीत उतरावे लागते, ही पद्धत बंद करुन सर्व नागरी स्वराज्य संस्थांना मैला उपसण्यासाठी जेटिंग तसेच सक्शन पंप्स पुरविण्यात यावेत, त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देतानाच सफाई करताना कोणत्याही कामगाराचा बळी जाणार नाही, याची दक्षता घ्या, या कामासाठी रोबोटचा वापर करता येईल का याची देखील चाचणी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.


विभागाच्या कामकाजाला गती देण्याच्या सूचना


            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे २२ हजार ५७ कोटी रुपयांचे बजेट असून आतापर्यंत वितरित निधीच्या अनुषंगाने ६२% खर्च करण्यात आला आहे. विभागाच्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागाच्या कार्याचे कौतुक केले. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी विभागाने कामकाजाला अधिक गती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


पासपोर्टच्या धर्तीवर होणार जात प्रमाणपत्रांची पडताळणी


            जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम अधिक वेगाने करण्याची आवश्यकता असून ही प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जात प्रमाणपत्र पडताळणीत अवैध प्रमाणपत्र ठरलेल्यांना उच्च न्यायालयात जावे लागते, त्यांच्यासाठी विभागीय स्तरावर अपील करण्याची यंत्रणा तयार करता येणे शक्य असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.


            महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्यौगिकी अर्थात ‘महाप्रित’ च्या माध्यमातून सुरु असलेल्या कामकाजाचे कौतुक करुन जांभुळ येथे स्टेट डेटा सेंटर उभारतानाच शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धित पूरक उद्योग सुरु करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


            बार्टी, दिव्यांग आयुक्तालय, विशेष सहाय्य विभाग, ज्येष्ठ नागरिक, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक आदी विभागांच्या कामकाजाची माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतली.


            सामाजिक न्याय विभागाच्या ‘नावीन्याची संकल्पपूर्ती’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


00000



 



सुप्रभात

 *अपने खराब मूड के समय बुरे शब्द ना बोलें, क्योंकि.. खराब मूड को बदलने के बहुत मौके मिलेंगें, पर शब्दों को बदलने के मोके नहीं...मिलेंगे*.!!!!

              

🌞 सुप्रभात🌞


आपका दिन शुभ एवं मंगलमय हो!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा

 *#कार्तिक_वारी 2022 निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई मुळे रात्रीच्या वेळी दिसणारे मंदिराचे नयनरम्य दृश्य ...*


सुप्रभात

 *क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते . नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावी लागते . माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच . नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात* .

           *सुप्रभात*💐💐💐

Thursday, 3 November 2022

Jag manava jag

 केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?😳 

    नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?😳

     केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊

सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? 

सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 

काय उपयोग सांग मानवा

अशा या दान धर्माचा ??😳

कधी शेतक-याला बियाणं

दान देऊन बघ... 😊

कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... 😊

कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊

कधी एखाद्या उपाश्याला घlस भरवुन बघ...😊

कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...😊

कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...😊

कधी एखाद्या वृध्दाश्रमास

दान करून बघ....😊

कधी एखाद्या आश्रमातील

निराधारांवर प्रेम करून बघ...😊

एकदा दान धर्माच्या व्याख्या

बदलून तर बघ !!😊

जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...😇

पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇

सशक्त झालेलं मस्तक

कुणाच हस्तक होत नसत...😇

आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇

शाळेचे छत गळके आणि

मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳

शाळेत आज मुलांना बसायला

साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ?😳

शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...😔

आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳

पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि

भाजीपाला फूटपाथवर...😔

म्हणे आमचा देश कृषी प्रधान

आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔

शेकडो मैल चालतो वारकरी...😳

अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो .......! 😊


वाचा,

विचार करा,

(एका ग्रुप वरून आलेली हि माहिती,प्रबोधन करणारी वाटली म्हणून आपल्या ग्रुप वर टाकली.)

आपले लाईट बील कमी करून घ्या*!

 *आपले लाईट बील कमी करून घ्या*!


सामान्य ग्राहक, मंदिर ट्रस्ट मधील सभासद जागृत व्हा!


औद्योगिक ग्राहक, DCCC व्यावसायिक ग्राहक, व्यापारी ग्राहक, असे सर्व वीज ग्राहकांनी वीज दरवाढ बाबत हरकती नोंदवा!


सध्या एक मेसेज फिरतो आहे की मंदिराला 7.85 रुपये प्रती युनिट दर तर मशीद आणि चर्चला मात्र 1.85 रुपये प्रति युनिट दर लागू आहे.


सर्व धार्मिक स्थळावरील मीटर रीडिंग हे तीनशे युनिट पेक्षा जास्त होते त्यामुळे रुपये 7.85 असा दर निश्चितच त्यांना पडतो परंतु MERC ने मागे मंजुरी दिल्यामुळे मशीद आणि चर्चना वीज दर वाढीमध्ये सवलती मिळत आहेत पण मंदिरांना मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 


मंदिर, मस्जिद, चर्च यांचे इलेक्ट्रिसिटीचे दर मधील तफावत दूर करणे साठी आपण ग्राहक म्हणून खालील गोष्टी केल्या पाहिजेत.


तीनही धार्मिक स्थळे ही ग्राहक आहेत आणि प्रत्येक ग्राहकांना तोच दर लावला पाहिजे परंतु Maharastra Electricity Regulatory Authority 

(MERC) दर rivision साठी नोटिफिकेशन काढते तेव्हा एकूणच सर्व ग्राहक त्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. 


परंतु ग्राहक म्हणून आपण सर्व गोष्टी पहात नाही आणि त्यातील ज्या तरतुदी असतात त्यावर वेळीच ऑब्जेक्शन/आक्षेप घेत नाही. 


त्यामुळे सदर आक्षेप घेतला नाहीतर नंतर कितीही तक्रारी केल्या तरी त्यावर काहीही होणार नाही.


MERC ने २९ ऑक्टो २०२२ रोजी वीज ग्राहकांना पुढील साधारण ५-६ वर्षासाठी होणारी वीज दर वाढ, सवलती, गळती इत्यादी बाबत सर्व ग्राहकांकडून हरकती मागवल्या आहेत.


आपण याबाबत www.MERC.gov.in या संकेत स्थळावर सदर दर वाढ बाबतचे प्रारूप प्रसिद्ध केले आहे ते नक्की वाचा. हातातील मोबाईलचा चांगला वापर करा.


सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी याबाबत आपल्या हरकती, सूचना या इमेलने पाठवा. त्यासाठी खालील ईमेल आयडी आहे.

 suggessions@merc.gov.in 


आपणास पोस्टाने पाठवायच्या असतील तर त्या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, 13 वां मजला, केंद्र क्र १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई ४००००५ इथे पाठवा.


2016 नंतर आता ६ वर्षांनी हे दर बदल होत आहेत आणि ते पुढील ५-६ वर्षासाठी लागू होतील.


सर्व मंदिर प्रशासनातील सदस्यांनी याबाबत जास्त लक्ष द्यावे आणि सर्व धार्मिक स्थळांना सारखे दर हवेत ही मागणी करावी.


बऱ्याच हिंदू धार्मिक स्थळांवरील ट्रस्ट मध्ये कलेक्टर हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे ते याबाबत कदाचित पुढाकार घेणार नाहीत परंतु सेक्रेटरी आणि इतर सभासद यांनी याबाबत आपली बाजू मांडून वीज बिलातील ही तफावत दूर करणे साठी प्रयत्न करावेत.


नकारात्मक पोस्ट फॉरवर्ड करणे पेक्षा सकारात्मक काम करू आणि ग्राहक म्हणून आपण सर्वजण एकत्रित रित्या MERC कडे हरकती नोंदवू.


आपण प्रत्येक वीज ग्राहकाने हरकती नोंदवल्या पाहिजेत. ग्राहक संघटना हरकती घेतील आपण कशाला हरकती नोंदवायच्या असा विचार करू नका.


सर्व ग्राहक मित्रानो, चला संघटित होऊ आणि वेळीच हरकती घेऊ आणि पुढील ५-६ वर्षे अकारण वीज दरवाढ होणार नाही याची काळजी घेऊ.


विजय सागर,

अखिल भारतीय ग्राहक पंचायत,

६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.


आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा. 


आमची वेबसाईट :

www.abgpindia.com


विजय सागर

अखिल भारतीय ग्राहक पंचायत

६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.


मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: 

*दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*


विजय सागर

9422502315

श्री विलास लेले

9823132172

सौ अंजली देशमुख

9823135803

श्रीमती विजया वाघ

9075132920

श्री रवींद्र वाटवे

9422383785

श्रीमती राजश्री दीक्षित

9422318909

श्री रवींद्र सिन्हा, बाणेर

7774001188

श्री विश्वास चव्हाण,धानोरी

7769978484

श्री अरुण नायर,विश्रांतवाडी

9890652675


*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,


श्री दिपक सावंत 9833398012


*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 

*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892

*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551

*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999

*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881

*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103

*पंढरपूर*- 

शशी कांत हरीदास 

9423536395

*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243

*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979

*नंदुरबार* - वदंना तोरवणे

9421526777.

टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे

 टेलिमेडिसिन सुविधा केंद्रांचे

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन.

                 मुंबई, दि. 3 :- राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे.


                 पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” उपलब्ध करुन देणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आरोग्य केंद्रामध्ये हे अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स उपलब्ध होणार आहेत. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.३० वा. कुडाळ येथील माणगावं प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तसेच ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता सावंतवाडी मधील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुविधा केंद्र येथे होणार आहे.


                 सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड येथे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील गरजू जनतेला वैद्यकीय चाचण्यांची सुविधा मोफत व तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरुन गरजू रुग्णांना मिळणारे उपचार अधिक जलदगतीने होण्यास त्याची मदत होईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


                 न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक सीईओ समीर सावरकर व संस्थापक सीओओ राजीव कुमार असून दोघेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे माजी विद्यार्थी आहेत. श्री समीर हे अशोका फेलो देखील आहेत. न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ISO13485-2016 आणि CE प्रमाणित, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादनांसह स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी डिजिटल हेल्थकेअर कंपनी असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) मान्यताप्राप्त अशी न्यूरोसिनॅप्टिकची R&D लॅब आहे. कंपनीने “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे उपकरण तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग ( BIRAC ) ह्यांच्या सहकार्याने आविष्कृत केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने 'मेक इन इंडिया' अंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” विकसित केले आहे.


                 न्यूरोसिनॅप्टीक गेली अनेक वर्षे ई-हेल्थ व एम-हेल्थ टेक्नोलॉजी सोल्युशन्स या क्षेत्रात काम करत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखून खाजगी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच परदेशातही टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कंपनी तर्फे याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध असून आजतागायत देशभरातील सुमारे २७०० ग्रामीण केंद्रात सदर सुविधा स्थापन करुन दिलेली आहे.


                 न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्सला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता प्राप्त आहेत ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा "टेक्नॉलॉजी पायोनियर", नॅसकॉम फाउंडेशनचा "ज्यूरीज स्पेशल चॉईस" आणि नुकताच मिळालेला " रेड हॅरींग ग्लोबल टॉप १०० कंपनीज" असे प्रतिष्ठित पुरस्कार समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ह्या क्षेत्रातील न्यूरोसिनॅप्टीक ही एकमेव भारतीय कंपनी आहे जीचा गौरव “टाईम मॅगझिन”ने केला आहे.


                 माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी उदघाटन करून राष्ट्राला समर्पित केलेले हे “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” आता महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अतिशय सोयीचे आणि लाभदायक ठरणार आहे असे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


0000

Featured post

Lakshvedhi