Wednesday, 7 September 2022

जल जीवन मिशन

 जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या

योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता

314 कोटी रुपयांच्या एकूण 255 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजूरी.

            मुंबई, दि. 6 : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 2 व जिल्हा परिषदेच्या 253 अशा सुमारे 314 कोटी रुपयांच्या 255 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना आज मान्यता देण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


            बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणेचे आयुक्त सी. डी. जोशी उपस्थित होते.

            जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असून त्यांतर्गत 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई 55 लिटर मानकाप्रमाणे शाश्वत व गुणवत्तापूर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या दि.29.06.2022 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दरडोई खर्चाचे सुधारीत निकष निश्चित करण्यात आले आहे.


००००



Tuesday, 6 September 2022

पाणी रे पाणी


राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार

- मंत्री गुलाबराव पाटील.

            मुंबई, दि. ६ : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, यापूर्वीही पाणीपुरवठा विभागात काम केल्याचा अनुभव असल्याने ‘हर घर जल, हर घर नल’ हे उद्द‍िष्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्याला अपेक्षित असलेले काम पूर्ण करणार असून, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस पुरेसे पाणी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, विभागाचे उपसचिव प्रविण पुरी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, जलजीवन मिशन अभियान संचालक यशवंत ऋषिकेश, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे, आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


                                                                           ०००


 

जादुटोणा विरोधी

 जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवरअशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ६ : समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे. या कायद्याच्या जनजागृती - प्रचार कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या समितीवर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दोन महिलांसह एकूण सात अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

संस्कारातून रूजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरूष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यामुळे लाखो माणसांचा होणारा छळ, शोषण व त्यांचे जीव वाचणार आहेत. समाजात प्रबोधन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीवर सात अशासकीय सदस्यांचा नव्याने समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्तींनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग., चेंबूर, मुंबई ७१ या पत्त्यावर किंवा ०२२-२५२२२०२३, spldswo_mumsub@yahoo.co.in  या मेलवर संपर्क साधावा.


भेटी लागे ;जीवा लागलीस आस


 आमदार भातखळकर यांच्या विविध गणेश मंडळाना भेटी

          कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध गणेश मंडळांना आमदार अतुल भातखळकर यांनी भेटी दिल्या. ठिकठिकाणी तरुण मंडळांनी उभारलेले देखावे पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आमदार भातखळकर यांनी कौतुक केले.

           कांदिवली पूर्व मधील हनुमान नगर, पोईसर, अशोक नगर, स्टेशन रस्ता, म्हाडा लोखंडवाला तसेच मालाड पूर्व मधील दत्त मंदिर रोड, राणीसती रोड, पुष्पा पार्क, धनजीवाडी यासह विविध ठिकाणच्या गणेश मंडळांना आमदार भातखळकर यांनी भेट दिली. श्री गणरायाची आरती करून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. अनेक घरगुती गणेशाचेही दर्शन घेतले. गणेश मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

       श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील ठाकूर कॉम्प्लेक्स, पायोनियर शाळेजवळ तसेच लोखंडवाला येथील कृत्रिम विसर्जन तलावाची पाहणी करून आढावा घेतला. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील कोकण वासियांसाठी केवळ दोनशे रुपयांमध्ये गावी जाण्यासाठी दहा एसटी बसेसची सोय करून देण्यात आली. याचा लाभ कोकणवासीयांनी घेतला.


    

वाह गणेशजी, देखिये टेक्नॉलॉजी

 बघा देश किती प्रगती करतोय. 😆😆

इथे कोल्हापूरकरांनी गणपती विसर्जनाची मशीन पण आणली.


कोल्हापूर येथील स्वयंचलित गणेश विसर्जन यंत्रणा.

बदल गया इंसान




 

प्रथम तुज पाहता


 

Featured post

Lakshvedhi