Friday, 3 June 2022

 बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु


राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दीष्ट.

            मुंबई दि, 2 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने विविध योजना घोषितकेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय, मुंबई विभागामार्फत बोईसर जि. पालघर येथेठक्कर सिटी, एस. टी. स्टॅन्ड जवळ विमा कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी, याकरीता गुरुवार दि. 26 मे रोजी सेवा दवाखाना सुरु करण्यात आला. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.

            भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखाने सुरु केले जाणारआहेत. तारापूर औद्योगिकवसाहतीचे सदस्य महेंद्र सिंग यांनी विमाधारकांकरीता वैद्यकीयसेवा उपलब्ध करुन दिल्याबाबत समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमास प्रशासनअधिकारी डी. एस. भगत, रा. का. वि. महामंडळाचे डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, पालघर स्थानिक कार्यालयातील पी. कुमार, डॉ. हार्दीक हलपत्ती, अभिजीत मोकल, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक उपस्थित होते. मुंबई विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. कश्यप द्विवेदी यांनी आभार मानले.

00



 

 निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,

मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

दीड महिन्यात सात पटीने रुग्ण वाढले

            मुंबई, दि. 2 : कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

            मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

            वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

            प्रारंभी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

            १६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

             कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

            कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

            यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

· ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या

· गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

· बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

· ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

· आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

· ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

· येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.


००००



 



 उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

            मुंबई, दि. 2 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

            मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समूह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

*



 बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु.

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दीष्ट.

            मुंबई दि, 2 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने विविध योजना घोषितकेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय, मुंबई विभागामार्फत बोईसर जि. पालघर येथेठक्कर सिटी, एस. टी. स्टॅन्ड जवळ विमा कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी, याकरीता गुरुवार दि. 26 मे रोजी सेवा दवाखाना सुरु करण्यात आला. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.

            भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखाने सुरु केले जाणारआहेत. तारापूर औद्योगिकवसाहतीचे सदस्य महेंद्र सिंग यांनी विमाधारकांकरीता वैद्यकीयसेवा उपलब्ध करुन दिल्याबाबत समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमास प्रशासनअधिकारी डी. एस. भगत, रा. का. वि. महामंडळाचे डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, पालघर स्थानिक कार्यालयातील पी. कुमार, डॉ. हार्दीक हलपत्ती, अभिजीत मोकल, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक उपस्थित होते. मुंबई विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. कश्यप द्विवेदी यांनी आभार मानले.

 आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष

अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल

            मुंबई, दि. 2 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.


            मुंबईतील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक डॉ. प्रमोद नाईक, विद्यालंकार तंत्रनिकेतनचे प्राचार्य आशिष उकिडवे, उपप्राचार्य वर्षा भोसले, तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते आहे. दि. १ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदविका प्रवेशाच्या नियामावलीस मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता १० वी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आज दि. २ जून २०२२ रोजी सुरु करण्यात आली आहे.


            पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

पदविका प्रवेशात प्रतीवर्षी १० टक्क्यांनी वाढ

            पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम इत्यादी कार्यक्रमांद्वारे पदविका अभ्यासक्रमांच्या अध्यापकांनी व संस्थांनी सकारात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मागील तीन वर्षात पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात प्रतीवर्षी सलग १० टक्के याप्रमाणे वाढ होत आहे.

केंद्रीभूत प्रवेशाच्या ३ फेऱ्या होणार

            कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या २ फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या घेण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी २ जागा राखीव

            कोविड- १९ महामारीदरम्यान आई व वडील गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर्स योजना सुरू केली आहे. राज्य शासनाने पदविका अभ्यासक्रमाकरिता या योजनेअंतर्गत कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संस्थेतील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोन या प्रमाणात अधिसंख्य जागा उपलब्ध राहणार आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या स्वनाथ योजनेअंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे लोकार्पण

तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ वर्ष २०१५ पासून dtemaharashtra.gov.in या URL वर कार्यरत होते. इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार यांच्या धोरणानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ dte.maharashtra.gov.in वा URL वर उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन व अद्ययावत संकेतस्थळाचे पुनः लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

            मराठी भाषांतरण (Marathi Version): संचालनालयाच्या संकेतस्थळावर माहिती इंग्रजी व मराठी भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला /पालकांना व विद्यार्थ्यांना संचालनालयाची व त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती सहजतेने मराठीमध्येही उपलब्ध होईल. संचालनालयाची माहिती अधिक विद्याकेंद्रित, उपयोगी आणि सर्वासाठी वापरण्याकरिता सहज करण्यात आली आहे.

            विभाग निहाय संस्थांची यादी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व जनतेसाठी संचालनालयाच्या विविध विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या संस्थांची यादी दर्शवण्यात आली आहे. विद्यार्थी ही माहिती सहजरित्या बघू शकतील व याचा फायदा त्यांना प्रवेशाच्यावेळी संस्था निवड करण्यासाठी होईल.

            शिष्यवृत्ती योजनांची, प्रवेशासंबंधीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता पदविका प्रवेशाच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत.प्रथम वर्ष पदविका (१०वी नंतर)-http://poly22.dte.maharashtra.gov.in प्रथम वर्ष पदविका (१२वी नंतर)- https://phd22.dte.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आले आहे.




            

Cycle day

 


गुंतवणूक

 


Featured post

Lakshvedhi