Monday, 24 January 2022

 PLEASE SEND THIS MSG TWICE TO ANY GROUP. ONCE TODAY AND ONCE TOMORROW. 

*कृपया किसी भी ग्रुप में इस मेसेज को दो बार भेजें। एक बार आज एक बार कल।*

FROM DR.N.N.KANNAPPAN. MADURAI. 

*डॉक्टर एन. एन. कन्नपन.मदुरै से*


Important Message for all


*सभी के लिए महत्वपूर्ण मेसेज।*


The hot water you  

drink is good for your throat. 

*गर्म पानी जो आप पीते हैं वह आपके गले के लिए अच्छा है।*

But this Corona virus is hidden behind the Paranasal sinus of your nose for 3 to 4 days. 

*लेकिन यह कोरोना वायरस आपकी नाक के परानासल साइनस के पीछे 3 से 4 दिनों तक छिपा रहता है।*

The hot water we 

drink does not reach there. 

*गर्म पानी जो हम पीते हैं वहां तक नहीं पहुंचता है।*

After 4 to 5 days this virus that was hidden behind the  

paranasal sinus reaches your lungs.

*4 से 5 दिनों के बाद यह वायरस जो परानासल साइनस के पीछे छिपा हुआ था आपके फेफड़ों तक पहुंचता है।*

Then you have trouble breathing.

*तब आपको सांस लेने में परेशानी होगी।*

That's why it is very important to take steam, 

*इसलिए भाप लेना बहुत जरूरी है।*

Which reaches the back of your Paranasal sinus.

*जो आपके परानासल साइनस के पीछे पहुंचता है।*

You have to kill this virus in the nose with steam.

*आपको इस वायरस को भाप से नाक में मारना है।*

At 50°C, this virus becomes disabled i.e. paralyzed. 

*50° C पर, यह वायरस निष्क्रिय हो जाता है यानी लकवाग्रस्त हो जाता है।*

At 60°C this virus becomes so weak that any human immunity system can fight against it.

*60°C पर यह वायरस इतना कमजोर हो जाता है कि कोई भी मानव प्रतिरक्षा सिस्टम इसके खिलाफ लड़ सकता है।*

At 70°C this virus dies completely.

*70 ° C पर यह वायरस पूरी तरह से मर जाता है।*

This is what steam does. 

*यही है जो भाप करता है।*

The entire Public Health Department knows this.

*पूरा जनता स्वास्थ्य विभाग यह जानता है।*

But everyone wants to take advantage of this Pandemic. 

*लेकिन हर कोई इस महामारी का लाभ लेना चाहता है।*

So they don't share this information openly.

*इसलिए वे इस जानकारी को खुले तौर पर साझा नहीं करते हैं।*

One who stays at home should take steam once a day. 

*जो घर पर रहता है उसे दिन में एक बार भाप लेनी चाहिए।*

If you go to the market to buy Groceries vegetables etc. take it twice a day.

*अगर आप किराने का सामान, सब्जियां आदि खरीदने के लिए बाजार जाते हैं तो इसे दिन में दो बार लें।*

Anyone who meets some people or goes to office should take steam 3 times a day.  

*जो लोग किसी से मिलते हैं या कार्यालय जाते हैं उन्हें दिन में 3 बार भाप लेनी चाहिए।* 

                   

 Steam week


*भाप लेने का हफ्ता।*

According to doctors, 

Covid -19 can be killed by inhaling steam from the nose and mouth, eliminating the Coronavirus.  

*डॉक्टरों के अनुसार, कोविड -19 भाप लेने के द्वारा नाक और मुंह से मारा जा सकता है, कोरोनावायरस को खत्म किया जा सकता है।*

If all the people started a steam drive campaign for a week, 

*अगर सभी लोग एक सप्ताह के लिए स्टीम ड्राइव अभियान शुरू किया।*

the pandemic will soon end. 

*जल्द ही महामारी खत्म हो जाएगी।*

So here is a suggestion: 

*तो यहाँ एक सुझाव है:-*

Start the process for a week from morning and evening, for just 5 minutes each time, to inhale steam.  

*एक सप्ताह के लिए प्रक्रिया शुरू करें सुबह और शाम, सिर्फ 5 मिनट के लिए हर बार, भाप सांस लें।*

If we all adopt this practice for a week the deadly 

*यदि हम सभी एक सप्ताह के लिए इस अभ्यास को अपनाते हैं।*

Covid-19 will be erased.

*तो घातक कॉविड–19 साफ हो जाएगी।*

This practice has no side effects & doesn't cost anything either.

*इस अभ्यास का कोई साइड इफेक्ट नहीं है और इसमें कुछ भी खर्च नहीं होता है।*

So please send this message to all your Loved Ones, relatives, friends and neighbours, 

*इसलिए कृपया इस संदेश को अपने सभी प्रियजनों को भेजें लोगों, रिश्तेदारों, दोस्तों और पड़ोसियों, सब को भेजे।*

So that we all can kill this Corona virus together and live and walk freely in this beautiful world.

*ताकि हम सभी एक साथ इस कोरोना वायरस को मार सकें और इस खूबसूरत दुनिया में स्वतंत्र रूप से जी और चल सके।...........*


👍👍👍👍👍👍👍

Saturday, 22 January 2022

 महाविद्यालयीन विद्यार्थींनींच्या सुरक्षितेबाबत नियमांचे कठोर पालन करावे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

            मुंबई, दि. 20 : महाविद्यालयीन विद्यार्थींनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांतील विद्यार्थींनींची सुरक्षा ही संबंधित शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. शैक्षणिक परिसर, वसतीगृह, ग्रंथालय, उपहारगृहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना करुन सुरक्षितेबाबत नियमांचे कठोर पालन करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            विधानभवनात राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थींनींच्या छेडछाडीच्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

            उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ज्ञान, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग महाविद्यालयांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी करावा. विद्यार्थींनींच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. अनेकवेळा तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचे विपरित परिणाम होतात. अनेकवेळा महिला तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी संवाद समिती सुद्धा गठीत करावी. त्यामुळे महिला आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगतील. या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबर संबंधातील प्रतिनिधी अशी सर्वसमावेश समिती असावी, अशा सूचनाही श्रीमती गोऱ्हे यांनी केल्या.

            महाविद्यालयांना गेल्या दोन वर्षांपूर्वी किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, प्रलंबित किती आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईनचे प्रमाण याचा अहवाल तयार करावा. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करुन हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा हे एक साधन आहे. या कायद्याच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेची हमी मिळणार आहे. पिडीत महिलांच्या बाबतीत तत्काळ दखल घेत सक्षम तपास आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

              सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनींची सुरक्षितता महत्वाची असून छेडछाडमुक्त, सायबरमुक्त परिसर राहिण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्यासंदर्भात सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            विद्यार्थींनीच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांचे, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. 90 दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करावी. ही नियमावली खासगी महाविद्यालये, विद्यापीठांनासुद्धा लागू राहील. तसेच विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे. संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थींनी, त्यांचे पालक यांचा समावेश असेल यामुळे या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

            यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितिन करमळकर, कुलसचिव अनघा तांबे,नागपूर विद्यापीठाचे संचालक डॅा.सोपानदेव पिसे, अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॅा.भाले, डॅा.तुषार देशमुख नांदेड विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.भिसे, कुलसचिव डॅा.खंदारे, सोलापूर विद्यापीठाचे संचालक डॅा.वसंत कोरे,मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॅा. सुधीर पुराणिक, कोल्हापूर विद्यापीठ कुलसचिव डॅा. वि.एन शिंदे, कुलगुरू डॅा.डि.टी शिर्के, संचालक डॅा. आर.वी. गुरव, गडचिरोली विद्यापीठाचे डॅा.प्रशांत बोकाडे, जळगाव विद्यापीठाचे संचालक डॅा.पंकज ननावरे उपस्थित होते तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ सुधारणा समिती सदस्य शितल देवरुखकर-शेठ, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे, मुंबई विद्यापीठ WDC चे पंड्या मॅडम, युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे, युवासेना कार्यकारणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे याबैठकीत उपस्थित होते.

            बैठकीमध्ये कुलसचिव, महिला सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संघटनांचे महिला प्रतिनिधी यांनी विद्यार्थींनींच्या अडचणी, तक्रारींनंतर मिळणारा प्रतिसाद, महाविद्यालयांची कार्यवाही, महाविद्यालयीन परिसरात सीसीटीव्ही, स्थानिक पोलीस प्रशासनाचा प्रतिसाद, महाविद्यालयांमध्ये सुरक्षिततेबाबत केलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली.

००००



 


वृत्त क्र. 191


दादासाहेब फाळके चित्रनगरीत


आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा


- अमित देशमुख


 


            मुंबई, दि. 20 ​: गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन

 येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी

 

कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 20 : राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळा सोमवार दि. 24 जानेवारीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना कोविड-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

            राज्यात कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तथापि कोणाचेही शिक्षण थांबू नये हा प्रयत्न असल्याचे प्रा.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

            शाळा सुरू करताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावेयासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेतअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.

०००००


 उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत

- शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

·       गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर

 

            मुंबईदि. 18 :अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहेअशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधीशैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसमवेत चर्चा करून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

            बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकीराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंगउपसचिव समीर सावंतशिक्षण संचालक महेश पालकरबालभारतीचे संचालक के.बी.पाटीलविवेक गोसावी आदी उपस्थित होते.

            मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होतीत्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीतअसे निर्देश प्रा.गायकवाड यांनी दिले. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरतीशिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 विभागीयजिल्हा क्रीडा संकुलांसाठी

अनुदानाची मर्यादा वाढविली

 

            राज्यातील क्रीडा सुविधा वाढविण्यासाठी विभागीय क्रीडा संकुलजिल्हा क्रीडा संकुल तसेच तालुका क्रीडा संकुलांसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            सध्या विभागीय क्रीडा संकुलांसाठी आर्थिक मर्यादा 24 कोटी असून ती वाढवून 50 कोटीजिल्हा क्रीडा संकुलांसाठी 8 कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून 25 कोटी रुपये आणि तालुका क्रीडा संकुलांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून 5 कोटी रुपये या प्रमाणे वाढविण्यास मान्यता दिली.  ही सुधारित अनुदान मर्यादायापूढे प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या व बांधकाम सुरू करण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलांसाठी लागू राहील.

            ज्या क्रीडा संकुलांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून बांधकाम पूर्ण झाले आहे अथवा बांधकाम सुरू आहे अशा संकुलांबाबत तालुका क्रीडा संकुल 3 कोटीजिल्हा क्रीडा संकुल 15 कोटी व विभागीय क्रीडा संकुल 30 कोटी रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येईल.  हे सुधारित अनुदान अशा क्रीडा संकुलामध्ये अतिरिक्त क्रीडा / मुलभुत सुविधा याचे बांधकामनवीन क्रीडा उपकरणे व साहित्य तसेच उपलब्ध क्रीडा सुविधांचे अद्ययावतीकरणबळकटीकरण याकरिता वापरता येईल.

            क्रीडा संकुलांचा वापर खेळाडूसर्वसामान्य नागरिक इत्यादींना जास्तीत जास्त करता यावा व क्रीडासंस्कृती वाढीस लागावी यासाठी पुढील निर्देशही लागू राहतील ते असे- क्रीडा संकुलेखेळाडूसर्व संबंधित व सामान्य जनतेसाठी उपलब्ध/खूली राहतील. क्रीडा संकुलांचा वापर क्लबहाऊस सारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर क्रीडा संकुलांचे व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे सोपवू नये. क्रीडा संकुलाचा वापर करताना अधिकृत राज्य/राष्ट्रीय क्रीडा संघटना यांना प्राधान्य देण्यात यावे. क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे/व्यक्तींकडे सोपविण्याचा निर्णय घ्यावयाचा असल्यास अशा प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता घेणे आवश्यक राहील.

            हे अनुदान मंजूरीसाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात येणार असून क्रीडा संकुलांच्या देखभाल दुरूस्ती धोरणक्रीडा संकुल पालकत्व धोरण याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे.

-----०-----

 

 तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी

जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा

                              - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

            मुंबईदि. 18 :- एकवीरालेण्याद्री तसेच पंढरपूर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित आराखड्यानुसार कामांना गती द्यावी. ही कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावाअसे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            एकवीरालेण्याद्री व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांचा तसेच वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखसोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्यादेवस्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून तीर्थक्षेत्र आणि परिसराचा उत्तम रितीने विकास होणे अपेक्षित आहे. विश्वस्त आणि प्रशासनात चांगला समन्वय साधून देवस्थान विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. एकवीरा देवस्थान परिसरात वनपर्यटन राबविणे शक्य असून त्यादृष्टीने वनविभागाने आराखडा करावा. तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वनपर्यटन आणि कृषीपर्यटनावर अधिक भर दिल्यास परिसरात रोजगाराच्या संधी वाढण्यासह विकासाला चालना मिळेल.

            एकवीरा देवस्थान येथे पायऱ्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांना त्रास होतो. याच्या दुरूस्तीला प्राधान्य देण्यात यावे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची संख्या वाढविणेत्यांच्यासाठी निवारासीसीटीव्हीची निगराणी आदींबाबत दक्षता घेण्यात यावीअसे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. जेजुरी देवस्थानच्या धर्तीवर येथील काम राज्य पुरातत्व विभागाने करण्याबाबत तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

            लेण्याद्री देवस्थान येथे सुरू असलेल्या कामाबाबत संबंधित विभागांनी वेळोवेळी स्थानिक नागरीकलोकप्रतिनिधीदेवस्थान समिती यांना अवगत करावेयेथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणीपथदिवे आदी कामांना गती द्यावी. ठराविक अंतरावर स्वच्छतागृहे असावीत. तसेच सीसीटीव्ही आणि मंदिरातील चांगली प्रकाश योजना याबाबतही समन्वयाने आराखडा करावाअशा सूचना उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या. परिसरातील वनांचे संरक्षण करून येथे देखील वनपर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेतअसेही त्यांनी सांगितले.

            पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबत पुरातत्व विभागाने चांगले काम केल्याचे नमूद करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्यावारकऱ्यांसाठी शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर योजना आखावी. भक्त निवास विकासाला चालना द्यावी. येथील पद्मावती उद्यानाचा सुयोग्य विकास करावा. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची देखभाल आणि उपयोगिता यांचाही सातत्याने आढावा घ्यावा. वयोवृद्ध भाविकांसाठी दर्शन रांगेत विशेष व्यवस्था करण्यात यावीअसे सांगून त्यांनी नगरपालिका क्षेत्र तसेच मंदिर परिसरातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

            या बैठकीत डॉ.गोऱ्हे यांनी एकवीरा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना अनेक दिवस पगार मिळाला नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्हा न्यायाधीशांशी संपर्क साधून आजच पगाराबाबत आदेश दिल्याची खात्री केली. याचे उपसभापतींनी डॉ.गोऱ्हे विशेष कौतुक केले.

            या बैठकीत पुणे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीपोलीस अधिकारीनगरपालिकेचे मुख्याधिकारीकेंद्र तसेच राज्य पुरातत्व विभागांचे अधिकारी यांनी देवस्थान आणि परिसरात  सद्यस्थितीत सुरू असलेली कामे तसेच प्रस्तावित कामे आदींबाबत माहिती दिली.

०००००


Friday, 21 January 2022

 राज्यातील वाळूरेती उत्खननाबाबत नवीन धोरण

 

            राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळूरेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करूनजनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळूरेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळूरेती निष्कासनासाठी शासन निर्णय दि. 03/09/2019 व दि. 21/05/2015 अशा या दोन शासन निर्णयांद्वारे धोरण निश्चित करण्यात आले होते. हे धोरण रद्द करण्यात आले आहे.

            जनतेस माफक दरात वाळू मिळावी म्हणून हातची किंमत स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दराने करण्यासवाळू उत्खननाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढविण्यास आणि यशस्वी लिलावधारकास हेतूपत्र मिळाल्यानंतर पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यास त्याचप्रमाणे खाडीपात्रात हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायाकरिता स्वामित्वधनाच्या दराने परवाने देण्याचा समावेश करून हे एकत्रित सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.

-----०-----

Featured post

Lakshvedhi