Sunday, 26 January 2025

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील मुख्य फरक ...

 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील  मुख्य फरक ...

                                     


1)  15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात    तर ...   26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात 

कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

************                                                                      


2) 15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

************   


3)15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.         तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                              ***************    


4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहणहोते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.             *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणजेच हा संविधान गौरव दिन आहे, हा संविधान गौरव दिन भारतातील कोणत्याही सण आणि उत्सवापेक्षा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले घटनेची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.

   

 *संविधान गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi