Tuesday, 1 August 2023

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधानभवनात आदरांजली

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधानभवनात आदरांजली


            मुंबई, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.


            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, सुरेश मोगल व संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.


00000

काय पण वेळ आली


 आणखी काय मोटिवेशन हवंय तुम्हाला श्रावण पाळण्यासाठी? 😱😃🫣.....✌️

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


            पुणे दि-1: लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


               यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भीमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते.


              यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.


            तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


0000

दररोज 200 - 400 टाळ्या वाजवा आणि कायम स्वरुपी स्वास्थ्य मिळवा.....*

 *दररोज 200 - 400 टाळ्या वाजवा आणि कायम स्वरुपी स्वास्थ्य मिळवा.....*


रोज ४०० टाळ्या वाजवल्याने संधिवात, गाउट, आमवात, बरा होतो. टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होतो.


Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने ५ - ६ महिन्यातच बरा होतो.


internal organs ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, रोज सकाळ, संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने बरे होतात.


immune system/रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो.


टाळ्या वाजवल्याने डोकेदुखी, अस्थमा, मधुमेह, नियंत्रणात राहतो, clapping सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.


Hair fall व सर्व प्रकारच्या केसांसंबंधित विकार बरे होतात. कारण, हाताचा अंगठा, व बोटांच्या शिरा, नसा, या डोक्याशी जोडलेल्या असतात.


रोज जेवणानंतर ४०० टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होतात. फालतू चर्बी, मेद झडतो, Obesity दूर होते. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.


शरिराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशी जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने Healthy body, fit mind शरीर स्वस्थ, निरोगी राहते.


*टाळ्या कशा व कधी वाजवाव्यात...*

टाळ्या वाजवणाच्या आधी हाताला बदामाचे, देशी गाईचे तूप, किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्या.


२०० टाळ्या हात वर करून वाजवा आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.


आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते, त्यांना माहित होते की मनुष्य हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो, म्हणून मग देवपुजेनंतर आरती करतांना टाळ्या वाजवण्याची प्रथा सुरू झाली.

 

*👏👏 मग करा चालू आत्ताच*


*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


एनसीएचयु विद्यापिठात निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी

 नोबेल हजारे यांची तैवानमधील आणखी एका विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड


* पत्रकार उत्तम हजारे यांच्या मुलाचे घवघवीत यश

* एनसीएचयु विद्यापिठात निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी

बीड, दि. ३१ (लोकाशा न्यूज) : बीड येथील पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल उत्तम हजारे हा विदेशात शास्त्रज्ञ बनणार असून, तैवानमधील एनडीएचयु विद्यापिठानंतर तैवानमधील आणखी एका ताईचुंग येथील एनसीएचयु विद्यापिठात त्याची उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे .नोबेल हजारे यांच्या या यशाबद्दल बीड जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा विद्यार्थी असलेला नोबेल हजारे यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालयात झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण बलभीम महाविद्यालयात झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर, पीएचडीसाठी झालेल्या पुर्व परिक्षेत नोबेल हजारे हा मुंबई विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठ व नांदेड विद्यापीठासाठी पात्र झाला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रो. बी.एन. डोळे सर, एम. डी. सिरसाट सर ,प्रो. अनिता मुरुगकर मॅडम, मेंटार विजयकिरण नरवडे सर ,प्रो. भरत मडावी सर , प्रो. ताटे बी. टी.सर तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यानंतर, नोबेल हजारे यांची तैवान देशातील नॅशनल डाँग युनीव्हरसिटी (एनडीएचयु) विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली होती, त्यानंतर ताईचुंग येथील एनसीएचयु या नामांकित विद्यापिठात त्याची निवड झाली आहे. याबाबतचे पत्र त्यास नुकतेच प्राप्त झाले आहे.

    या महिन्यात जाणार तैवानला

नोबेल हजारे यांनी विद्यापिठातील प्रवेश निश्चित केला असून, या महिन्यात पंधरा ऑगस्टनंतर तो विदेशात जाणार आहे. एनसीएचयु विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी आहे .

सिरसमार्गचा नावलौकिक

सिरसमार्ग येथील भूमीपूत्र असलेले ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांच्या मुलाने शैक्षणीक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केले असून, सिरसमार्गचा नावलौकिक वाढवला आहे, सिरसमार्ग व परिसरातुन विदेशात शिक्षणासाठी जाणारा नोबेल हजारे हा पहिला वि

द्यार्थी आहे .

राज्यात मंगळवारपासून (दि.1 ऑगस्ट) महसूल सप्ताहाचे आयोजन

 राज्यात मंगळवारपासून (दि.1 ऑगस्ट) महसूल सप्ताहाचे आयोजन

डिजिटल युगात सुलभ आणि जलद सेवा देण्यावर भर !

 

            दरवर्षी राज्यभरात  1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

            महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणेवसुलीच्या नोटीस पाठवणेमोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येईल.

            शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. 1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिनापासून सर्वसामान्यांना सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्यानागरिकरणऔद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील कामकाजामध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. पण या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास नक्कीच मदत होईल. सर्वसामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन कामकाजासाठी संबंध येत असतो. येणाऱ्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुखपारदर्शक आणि गतिमान होण्याबरोबरच प्रशासनातील सर्व घटकांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महसूल विभागभूमी अभिलेख विभाग तसेच मुद्रांक व नोंदणी विभाग यांनी एकत्रितपणे नियोजन करुन गावतालुका आणि जिल्हा पातळीवर कसे कामकाज करावे याचे या सप्ताहात नियोजन असणार आहे.

            महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीमकार्यक्रमउपक्रमशिबिरेमहसूल अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम4 ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’5 ऑगस्ट रोजी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा संवाद आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ होईल.

            या कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतची प्रचार व प्रसिध्दी करण्याबरोबरच महसूल विभागभूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करुन देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारीउपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्कहेल्पलाईन तयार करुन मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्वाचे कायदेविकास योजनाउपक्रमधोरणांना प्रसिद्धी देण्यासाठी सखोल माहिती असलेल्या तज्ञाच्या मुलाखती तसचे व्याख्यानांचे प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर करण्यात येईल. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रेत्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करुन नागरिकांना देण्यात येतील.

            महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. राज्यातील महसूल गोळा करण्याबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी या विभागावर असते. महसूल दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुधारीत नमुन्यातील 7/12 चे वितरण सुविधाडिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवहीची वितरण सुविधाई - मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्तनोंदणीशी संलग्न करणे या सुविधा आता देण्यात येत आहे. सर्वसामान्यांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या प्रश्नांची/अडचणींची सोडवणूक करण्याला प्राधान्य देण्यात येते. याशिवाय सलोखा योजनासुधारित वाळू धोरणमहाराजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणीई पीक पाहणीदस्तनोंदणीचे अद्ययावतीकरण असे अनेक निर्णय गेल्या वर्षभरात महसूल विभागने घेतले. विशेष म्हणजे या सर्व निर्णयांचा लाभ शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना होणार आहे.

महसूल विभाग प्रशासनाचा कणा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत महसूल या विभागाने महत्वाचे योगदान दिले आहे. यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात अग्रेसर राहील. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडीत असल्याने हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्यांना सहज आणि जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करताना काही कायदे रद्दही करावे लागतात. नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहजपारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहीलअसा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान !*

 *अळूची पाने आरोग्यासाठी वरदान !* 

*‘हे’ फायदे जाणून घ्या.* 


अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात.


हे आहेत फायदे -


*ब्लड प्रेशर* 

ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही.


*वजन* 

यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.


*पोटाच्या समस्या* 

पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते.


*पूरळ* 

अळूची पाने जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्यास पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.


*दृष्टी* 

यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.


*सांधेदुखी* 

सांधेदुखीत दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्यास आराम मिळेल


डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(

Featured post

Lakshvedhi