Saturday, 1 March 2025

मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहर करार व्हावे

 मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहर करार व्हावे

- इजिप्तचे राजदूत गलाल

 

मुंबई, दि. 28 : इजिप्त आणि भारत यांच्यात हजारो वर्षांपासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध असून सहकार्याच्या आजच्या नव्या युगात मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहरांप्रमाणे परस्पर सहकार्य प्रस्थापित केले जावे अशी अपेक्षा इजिप्तचे भारतातील नवनियुक्त राजदूत कामिल झाएद गलाल यांनी आज येथे व्यक्त केली.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचा उल्लेख करूनभारतातील आपल्या राजदूत पदाच्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांनी स्वाक्षरी केलेला भारत-इजिप्त भागीदारी करार प्रत्यक्षात आणण्याचा आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.

इजिप्तच्या राजदूतांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनमुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला इजिप्तच्या मुंबईतील नवनियुक्त कॉन्सुल जनरल दहलीया तवाकोल या देखील उपस्थित होत्या.

भारताप्रती इजिप्तचे हृदय आणि मन सदैव मोकळे असल्याचे सांगताना राजदूत गलाल यांनी सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्यासाठी इजिप्तमधील सर्वात मोठे अलेक्झांड्रिया ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्याबाबत उत्सुकता दाखवली.

आगामी काळात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढावे असे सांगताना भारतीय कंपन्यांनी इजिप्तमध्ये कार्यालये आणि गोदामे स्थापन करावी असे त्यांनी सांगितले.

सन २०१४ या वर्षी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमध्ये परिवर्तनकारी बदल झाले असून आज इजिप्त-भारत संबंध वाढवण्याच्या बाबतीत अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

इजिप्तचे युरोपियन युनियनअरब राष्ट्रे आणि लॅटिन अमेरिका यातील देशांसह ११० देशांसोबत मुक्त व्यापार करार आहेत. त्यामुळे भारत आणि इजिप्तमधील व्यापार संबंधांमुळे भारतीय व्यवसायांसाठी जागतिक बाजारपेठ खुली होईल असे त्यांनी सांगितले.

राजदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करतानाराज्यपालांनी इजिप्त आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक बंधाची आठवण करून दिली. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी अलिप्त राष्ट्र चळवळ उभारली होती याचे राजदूतांनी स्मरण केले. आगामी काळात नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईजवळील वाढवण बंदराच्या कार्यान्वयनानंतर भारत-इजिप्त व्यापाराला मोठी चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.


गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार pl share

 गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन 

जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 28 : राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारयशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू यावेळी उपस्थित होते. तर जमाबंदी आयुक्त सुहास दिवसेनगर रचना संचालक श्री.पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेपहिल्या टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन त्याच्या नोंदी तयार केल्या जातील. यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळू शकेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या क्षेत्राच्या विकासाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल. यासाठी सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प स्वरुपात काही गावठाणांचा विस्तार करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

 पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २८ : राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहेअसे सांगून महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले कीराज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. एका अहवालानुसार ३० हजारांवर रोजगानिर्मिती होऊ शकेल. पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाने तयार करावी. विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात.

दोन हजार पेट्रोल पंपांचे नियोजन

राज्यात दोन हजार पेट्रोल पंप वाढविण्याचे नियोजन असून पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनएसह पोलीससार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ‘ना हरकत’ परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १६६० पंप मंजूर केले. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्यानेएक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी इंधन कंपन्यांच्या अडचणीसमस्यांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारसह सचिव अजित देशमुखबीपीसीएल चे सुंदर राघवनराज्य प्रमुख राकेश सिन्हामुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.आनंद बंगसमन्वयक संतोष निरेंदकरएचपीसीएल चे बी.अच्युत कुमारमुकूंद जवंजाळ आदी उपस्थित होते.

-----

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा

 विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 

सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा

 

मुंबईदि. २८ :  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी  सुरक्षा व्यवस्थापार्किंगवैद्यकीय  सुविधा आणि अधिवेशन पूर्व तयारीचा आढाव घेतला.

विधानभवनमध्ये झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिकविधान मंडळाचे सचिव (१) जितेंद्र भोळेसचिव (२) विलास आठवले यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरपोलिस उपायुक्त  अविनाश देशमुख संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीत विधान भवन परिसरात गर्दी होणार नाही याची  पोलिस  विभागाने दक्षता घ्यावी. या काळात वाहतूक व  पार्किंग व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करावे. अधिवेशन कालावधीत मंत्रालय  अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवेशस्वच्छता, पाणीपुरवठा यासंदर्भात चर्चा झाली. अधिवेशन कालावधीत प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावीअसे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस गृहसामान्य प्रशासनमहापालिकाआरोग्यवाहतूकटेलिफोन निगमसार्वजनिक बांधकामअग्निशमनरेल्वे यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

 अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 

 

मुंबई, दि. 28 : अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.

मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणा-या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेच्या इष्टांक अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाईन माध्यमाद्वारे जिल्हानिहाय आढावा बैठक श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सर्व संबंधित अधिकारी, ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हयाला  इष्टांक निर्धारित करुन देण्यात आलेले आहे. ज्या जिल्ह्याने निर्धारित इष्टांक पूर्तता केली आहेत्यांची अतिरिक्त  मागणी असल्यास वाढीव इष्टांक देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांची  इष्टांक पूर्तता झालेली नाहीत्यांचा उर्वरित इष्टांक इतर इच्छुक जिल्ह्यांना हस्तातंरित करण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय मागणीइष्टांक पूर्तता याची माहिती सादर करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.  

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला प्राप्त इष्टांक आणि त्याची आतापर्यंत झालेली अमंलबजावणी याची माहिती घेऊन जिल्ह्यांकडून असलेली वाढीव मागणी याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

 जागतिक महिला दिनानिमित्त’

'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

 

मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्तमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

 

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  तर दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 6शुक्रवार दि. 7शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

महासंचालनालय समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांना समान हक्क मिळणे तसेच त्यांच्या अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिवसजगभरात साजरा केला जातो. याअनुषंगानेच महिला सबलीकरणत्यांच्या हक्कांचे संरक्षणलहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाया आणि अशा अनेक योजनाधोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजना आणि निर्णयांबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.


नवी मुंबईतील एज्युसिटीला केनेडीकट राज्याची मदत गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

 नवी मुंबईतील एज्युसिटीला केनेडीकट राज्याची मदत

गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

 

मुंबईदि. 28 : नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता नवी मुंबईत नवीन 'एज्युसिटीनिर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमांट व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एज्यूसिटीउभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 'पॉवर हाऊस'सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुक क्षेत्राचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात देशाच्या ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. राज्याला २०३० पर्यंत १ हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.

 नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी-सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोनवीन विमानतळआंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शिष्टमंडळात गव्हर्नर यांच्यासमवेत केनेडीकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कॅथी कान्गारेल्लाकेनेडीकट विद्यापीठाचे अध्यक्ष राडेन्का मॅरीकयाले विद्यापीठाचे व्हाईस प्रोवोव्ह फॉर रिसर्च मायकल क्रेअरपेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयीकौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi