Saturday, 1 July 2023

प्रत्येकालाच अगदी घराच्या सज्जातही लावता येतील,

 १. प्रत्येकालाच अगदी घराच्या सज्जातही लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे सविस्तर उपयोग


शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये रहात असल्याने त्यांना औषधी वनस्पतींची लागवड करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील. यांपैकी गुळवेल, जाई, विड्याच्या पानांची वेल आणि कांडवेल या वनस्पतींना वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते. यासाठी या वेली कुंडीमध्ये लावून सज्जाच्या गजांवर सोडाव्यात. या १० वनस्पती मिळून बहुतेक रोगांवर उपयुक्त असल्याने प्रत्येकानेच या वनस्पती आपल्या भोवताली लावाव्यात. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी अशा वनस्पती घरात न लावता घराभोवती लावाव्यात. यांतील वेली परसातील मोठ्या झाडाच्या (शक्यतो कडुनिंबाच्या) मुळाशी किंवा कुंपणावर लावाव्यात.


https://chat.whatsapp.com/I6W84EZJA7H3SAJCBRREk5


१ अ. तुळस


लॅटिन नाव : Ocimum tenuiflorum


१ अ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पंचांग (टीप)


टीप – पंच म्हणजे पाच आणि अंग म्हणजे वनस्पतीचा भाग. वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल आणि फळ या पाचही भागांना एकत्रितपणे पंचांग असे म्हणतात. औषधी वनस्पतींच्या संदर्भात पंचांग म्हणजे मुळासकट संपूर्ण वनस्पती.


१ अ २ . लागवडीसाठी उपयुक्त अंग : बी किंवा खोडाचे छाट


१ अ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. सर्दी : तुळशीची पाने सावलीत वाळवून त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे. यातील चिमूटभर चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाने ओढावे. सर्दी लगेच न्यून होते.


२. व्रण (जखम) किंवा रक्तस्राव : तुळशीच्या पानांचा रस लावावा.


३. कान दुखणे : तुळस आणि माका यांची पाने एकत्र वाटून त्याचे २ – २ थेंब कानात घालावेत किंवा केवळ तुळशीचा २ थेंब रस कानात घालावा.


४. दमा : प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची ४ पाने चावून खावीत.


५. भूक न लागणे : तुळशीची ४ पाने आणि खडीसाखर एकत्र करून जेवणाच्या अर्ध्या घंट्याआधी चावून खावीत.


१ आ. दूर्वा


लॅटिन नाव : Cynodon dactylon


१ आ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पंचांग


१ आ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : मूळ असलेला तुकडा


१ आ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. डोकेदुखी : दूर्वांच्या रसात कापराची पूड घालून त्याचा कपाळावर लेप लावावा.


२. नाकाचा घुळणा फुटणे (नाकातून रक्त येणे) : २ – २ थेंब दूर्वांचा रस नाकाच्या मधल्या पडद्यावर दोन्ही बाजूंनी घालावा.


३. वाईट स्वप्ने पडणे : रात्री झोपतेवेळी १ वाटी दूर्वांचा रस प्यावा.


१ इ. झेंडू


१ इ १. लॅटिन नाव : Tagetes erecta


१ इ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान आणि फूल


१ इ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : बी (वाळलेल्या फुलाच्या पाकळ्या)


१ इ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. व्रण (जखम) :व्रण लवकर भरून येत नसल्यास त्यावर झेंडूच्या पाल्याचा रस लावावा किंवा दूर्वांच्या तेलाप्रमाणेच झेंडूच्या पानाचे तेल करून त्या तेलामध्ये कापूस बुडवून तो व्रणावर ठेवावा आणि पट्टी बांधावी.


२. शीतपित्त (त्वचेवर पित्त उठणे) : झेंडूची फुले आणि पाने यांचा रस अंगाला चोळावा.


१ ई. कालमेघ


लॅटिन नाव : Andrographis paniculata


१ ई १. औषधासाठी उपयुक्त अंग : पंचांग


१ ई २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : बी


१ ई ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. ताप : कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये मूठभर कालमेघ आणि पाव चमचा सुंठीची पूड २ पेले पाण्यात घालून एक पेला पाणी राहीपर्यंत उकळून काढा करावा. हा काढा अर्धा – अर्धा पेला सकाळ – संध्याकाळ घ्यावा.


२. आम्लपित्त : वाळलेल्या कालमेघाची पूड करून ठेवावी. घशात किंवा छातीत जळजळ होत असल्यास अर्धा चमचा कालमेघाची पूड अर्धा चमचा साखरेसह चघळून खावी.


१ उ. पानफुटी (पाणपोय)


लॅटिन नाव : Bryophyllum pinnatum


१ उ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान


१ उ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : पान किंवा खोडाचे छाट


१ उ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. मूतखडा : सकाळ – संध्याकाळ पाव कप पानफुटीच्या पानांचा रस घ्यावा.


२. आग होणे (दाह) : पानफुटीची पाने ठेचून आग होत असलेल्या भागावर बांधावीत.


१ ऊ. कोरफड


लॅटिन नाव : Aloe vera


१ ऊ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पानांतील गर


१ ऊ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : मुळाशी येणारे मुनवे (सकर्स)


१ ऊ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. दमा (अस्थमा) : श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास २ – २ घंट्यांनी चमचाभर कोरफडीचा रस चमचाभर मध आणि अर्धा चमचा तूप घालून द्यावा. यामुळे शौचास साफ होते आणि दम लागणे थांबते.


२. आम्लपित्त : २ चमचे कोरफडीचा रस चवीपुरती खडीसाखर घालून घ्यावा.


३. भाजणे-पोळणे : कोरफडीच्या गरात हळद घालून भाजलेल्या ठिकाणी लावावे. यामुळे भाजलेल्या ठिकाणी जंतूसंसर्ग होत नाही, तसेच थोडेसे भाजले असल्यास त्याचा डागही रहात नाही.


१ ए. गुळवेल


लॅटिन नाव : Tinospora cordifolia


१ ए १. औषधासाठी उपयुक्त अंग : कांड (वेलीचा तुकडा)


१ ए २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट


१ ए ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. ताप : कोणत्याही प्रकारच्या तापात गुळवेलीचा बोटभर लांबीचा तुकडा ठेचून त्याचा काढा करून घ्यावा.


२. कावीळ : आठवडाभर अर्धी वाटी गुळवेलीचा रस अर्धा चमचा खडीसाखर घालून प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.


१ ऐ. जाई


लॅटिन नाव : Jasminum officinale


१ ऐ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान


१ ऐ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट


१ ऐ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. तोंड येणे : जाईची पाने वरचेवर चावून थुंकावीत.


२. व्रण : कोणत्याही प्रकारच्या व्रणावर जाईचा पाला वाटून व्रणाची जागा भरेल असा बसवावा किंवा दूर्वांच्या तेलाप्रमाणेच जाईच्या पानांचे तेल करून त्या तेलामध्ये कापूस बुडवून तो व्रणावर ठेवावा आणि पट्टी बांधावी. व्रण लगेच भरून येतो.


१ ओ. पानवेल (विड्याच्या पानांची वेल)


लॅटिन नाव : Piper betle


१ ओ १. औषधासाठी उपयुक्त अंग : पान


१ ओ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट


१ ओ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. घशामध्ये कफ दाटणे : विडा खावा.


२. भूक न लागणे, सर्दी, कॉलेस्टेरॉल वाढणे, कॅल्शिमची न्यूनता असणे : प्रतिदिन विडा खावा.


१ औ. कांडवेल (हाडसांधी)


लॅटिन नाव : Cissus quadrangularis


१ औ १. औषधासाठी उपयुक्त अंग : कांड (वेलीचा तुकडा)


१ औ २. लागवडीसाठी उपयुक्त अंग : खोडाचे छाट


१ औ ३. विविध विकारांमध्ये उपयोग :


१. अस्थिभंग (फ्रॅक्चर) : हाड मोडले असता ते नीट बसवल्यावर २१ दिवस सकाळ – संध्याकाळ अर्धी वाटी कांडवेलीच्या कांडाचा रस घ्यावा. यासाठी कांडवेलीचे कांड कुटून ते शिजवावे आणि वाटून त्याचा रस काढावा. शिजलेला चोथा हाड मोडलेल्या जागी बाहेरून बांधावा. (हाताला प्लास्टर घातलेले असल्यास केवळ पोटात रस घ्यावा.)


वरील १० वनस्पतींचे १०० हून अधिक रोगांमध्ये सविस्तर उपयोग

 जाणून घेण्यासाठी वाचा सनातन प्रकाशित ग्रंथ औषधी वनस्पतींची लागवड करा !


संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


श्रीविठ्ठलाची शासकीय पूजा* पुढारी यांची

 *श्रीविठ्ठलाची शासकीय पूजा*


१९७३ पासून पुन्हा चालू झाली, ती आजतागायत चालू आहे. त्यासंबंधीच्या या काही मनोरंजक आठवणी आणि किस्से..


श्रीक्षेत्र पंढरपूर हे विजापूरच्या आदिलशाहीत होते. थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरी दर्शनास येऊन गेल्याचे पुरावे आहेत. पुढे पंढरपूर पेशवाईत आले, तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपुरी वास्तव्यास असत. देवस्थान समितीचे सदस्य आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा करत. १८३९ मध्ये ही पूजा करण्याचा मान सातारच्या गादीकडे होता. इंग्रजांच्या काळात, हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षांला दोन हजार रुपयांचे अनुदान देत असे. स्वातंत्र्योत्तर काळातही पहिली काही वर्षे हे शासकीय अधिकारीच पांडुरंगाची पूजा करीत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील, महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपुरी आले होते. त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.

१९७० मध्ये, समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ साली शासकीय पूजा झाली नाही. १९७२ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. लोक आपली शेतीवाडी, गुरेढोरे सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे जाऊ लागले. वारकरी म्हणू लागले, सरकारने पूजा बंद केली, म्हणून विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडे घातले. त्यांनीच ही बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू केली, ती आजतागायत चालू आहे.


मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आषाढी यात्रेच्या पूजेला पंढरपुरी आले होते. तेव्हा पांडुरंगासमोर दक्षिणेच्या रूपांत त्यांना मागणं मागितलं. ‘गरीब भाविक यात्रेकरूंना द्यावा लागणारा, जिझिया कर (यात्रा कर) रद्द करा.’ त्याप्रमाणे दादांनी नुसता पंढरपूरचाच नाही तर देहू-आळंदी येथीलही कर रद्द केला. ञही पांडुरंगाच्या महापूजेची किमया!

महाराष्ट्राचे एक माजी गृहमंत्री आषाढी एकादशीच्या महापूजेस पहाटे अडीच वाजता आले. खाली सोवळे वर खादीचा सदरा! रात्रीची बहुधा उतरली नव्हती, जीभ अडखळत होती. दक्षिणेसाठी खिशांत हात घातला तर खिसा रिकामा! त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दम देऊन दक्षिणा देण्यास लावली. रुक्मिणी मातेच्या पूजेस आल्यावर पुन्हा दक्षिणेचा प्रश्न आला. आता जिल्हाधिकाऱ्याकडेही पैसे नव्हते. त्यांनी ‘उत्पात’ समितीच्या कार्यालयातून पैसे घेऊन देवीसमोर ठेवले.

शरद पवार मूळचे समाजवादी असल्याने नास्तिक होते. पंढरपूरच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला येत, पण देवळात येत नसत. पत्नीने फारच आग्रह केल्यावर केवळ तिच्या आग्रहासाठी ते एकदा विठ्ठल मंदिरात आले. पत्नी मनोभावे पूजा करत होती. बाहेरच्या हत्ती दरवाजातील कट्टय़ावर बसून शरदराव कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते. पत्रकारांनी खवचटपणे विचारले, तुम्ही देव मानीत नाहीत, तर मग पांडुरंगाच्या पूजेला कसे काय आलात? राजकारणात मुरलेल्या पवारांनी लगेच, हजरजबाबी उत्तर दिले, ‘माझ्या महाराष्ट्राची कोटय़वधी जनता पांडुरंगास देव मानते, त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे.’


 इंदिरा गांधी सत्तेतून पायउतार झाल्यावर साधारण १९७९-८० च्या दरम्यान पहाटे चार वाजता पंढरपूरला आल्या. अंबाबाईच्या पटांगणातील पहाटेची भव्य सभा उरकली आणि पहाटे स्नान करून विठ्ठल मंदिरात पूजेला बसल्या. दर्शन, पूजाअर्चा करून डाक बंगल्यावर आल्या. णटेबलावरती नाश्त्याची जय्यत तयारी होती. त्यात नेहमीचे पदार्थ आणि उकडलेली अंडी होती. पांडुरंगराव डिंगरे, पंढरपूरचे माजी आमदार आणि इंदिराजींचे भक्त, त्यांनी विनंती केली, मॅडम, आज एकादशी आहे आणि हे पांडुरंगाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा आजच्या दिवशी तरी हे अन्न तुम्ही घेऊ नका. त्या लगेच होय म्हणाल्या आणि फक्त दूध घेऊन तडक पुढच्या दौऱ्याला निघाल्या.


मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून पूजेस आले, तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती होती. जुलै महिना अर्धा झाला तरी पाऊस पडला नव्हता. त्यांनी पांडुरंगासमोर हात जोडून विनवणी केली. ‘बा पाडुरंगा, महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे.’ देवस्थान समितीला विनंती केली, ‘शासकीय महापूजेचा कालावधी कमी करा, वारक ऱ्यांना रां तिष्ठत उभे रहावे लागते याची जाणीव ठेवा.’ आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, ही प्रथा मनोहर जोशी यांच्या काळातच चालू झाली.


शालिनीताई पाटील एकदा पंढरपुरी पूजेला आल्या होत्या, तेव्हा, मनोभावे त्यांनी रुक्मिणी मातेला नवस केला. ‘आमच्या भोळ्या दादांना पक्षातील लोकांनीच दगाफटका केला, पण दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, मी तुला पाच तोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन!’ चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा, दादा खरंच परत मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताईंनी तो नवस फेडला. पण त्यानंतर नवस करूनही त्या स्वत: मात्र कधी मुख्यमंत्री झाल्या नाहीत.


१९५३ मध्ये पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू पंढरपुरला आले होते. दर्शनाला जाताना, विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या दगडी उंबरठय़ावर ते जोरात ठेचकाळले. एक अशुभ घटना म्हणून पुढील काळांत तो दगडी उंबरठाच काढून टाकण्यात आला. रुक्मिणी मातेच्या मंदिरात मात्र तो दगडी उंबरठा अजूनही आहे.


राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद सवरेदय संमेलनासाठी १९५५ च्या दरम्यान पंढरपूरला आले होते. गावात प्रवेश केल्यावर, डाक बंगल्यावर न जाता, सरळ स्नानासाठी ते चंद्रभागा नदीच्या तीरावर गेले. सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली. ते चंद्रभागेच्या पात्रातून अनवाणी चालत, वाळवंट, महाद्वार घाट, नामदेव पायरी ओलांडून विठ्ठल मंदिराच्या मंडपात आले. एका दमात चालत आल्यामुळे त्यांना किंचित धाप लागली म्हणून एखाद्या वारकऱ्यासारखे तिथल्या दगडी कट्टय़ावर बसले. काहीक्षण विश्रांती घेऊन, तिथून पूजेकरता देवाच्या गाभाऱ्यात गेले. पूजा चालू असताना तेथील ब्राह्मणांच्या बरोबरीने ते स्वत: मंत्र म्हणू लागले. पूजा झाल्यावर ते इतके संतुष्ट झाले की तेथील बडव्यांना त्यांनी विनंती केली, की माझी पत्नी पंढरपूरला येईल तेव्हा तिच्या हातूनही अशीच पूजा करा. त्याप्रमाणे महिनाभरांत त्यांच्या पत्नी पूजा करून गेल्या.


राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे संत नामदेव जन्मसप्तशताब्दीनिमित्त पंढरपूरला आले. ते प्रथम चंद्रभागेच्या काठावरील नामदेव मंदिरात गेले. तेथील नामदास महाराज हे संत नामदेवांचे वंशज आहेत हे सांगितल्यावर ते नामदास महाराजांच्या पाया पडले. नंतर महाद्वारातून संत नामदेव पायरीशी आल्यावर त्यांनी देवळाच्या दरवाजात, नामदेव पायरीला साष्टांग दंडवत घातला. पंजाबी आणि शीख बांधवांना संत नामदेव यांच्याविषयी किती आदर आहे, याचे त्याक्षणी प्रत्यंतर आले. त्यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. तेव्हा विठ्ठलासमोर दक्षिणा म्हणून तात्यासाहेब डिंगरे यांनी त्यांच्याकडे एकच मागणे मागितले, ‘बार्शीलाईट रेल्वे ब्रॉडगेज करा व अमृतसर-पंढरपूर अशी नानक-नामदेव एक्सप्रेस चालू करा.’ त्यावर ते प्रसन्नपणे हसले.


राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा हे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती असताना किमान तीनचार वेळा पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले. त्यांच्यामुळे पंढरपूरची रेल्वे ब्रॉडगेज झाली.


 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री असताना पंढरपुरी येऊन महापूजा करून गेले होते.

१९८५ साली, शिवसेनेचे महाडचे अधिवेशन झाल्यावर, सोलापूर जिल्हा, शिवसेना संपर्कप्रमुख राम भंकाळ यांना घेऊन शिवसेना प्रमुखांना पंढरपूर भेटीचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. तेव्हा देशात घातपाताचे प्रकार चालू होते. शिवसेना प्रमुख उद्वेगाने म्हणाले, ‘तुझ्या त्या पांडुरंगाला माझा निरोप दे’ डोळे मिटून कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस? हाती जोडा घे आणि धर्माध शक्तींना पार चिरडून टाक!’ नंतर तेही पंढरपुरी येऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन आले.


चंद्रशेखर सरस्वती आणि कांची कामकोटी पीठाचे परम आचार्य आणि श्री सत्य साईबाबाही विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरी आले होते. आचार्य विनोबा भावे सर्वधर्मीयांना घेऊन झविठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून ते ओक्साबोक्शी रडू लागले. क्षणभर तिथे स्तब्धता पसरली. लोकांनी विचारले, आचार्य, तुम्ही असे का रडता? रडवेल्या आवाजातच ते म्हणाले, ‘ज्या पायांवर संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत नामदेव, एकनाथ, तुकारामांनी डोके टेकविले, त्या पायांवर मी आज डोके टेकवित आहे. हे माझे किती जन्मांचे भाग्य आहे याची तुम्हाला कल्पना नाही! हे माझे आनंदाश्रू आहेत.’

पूर्वी बाळासाहेब भारदे, शशिकांत पागे यासारखी वारकरी संप्रदायाची, आध्यात्मिक क्षेत्राची जाण असलेली मंडळी मंदिर समितीवर होती. आजकाल राजकीय नेमणुका केल्या जातात. आषाढी कार्तिकीला पूजेला येणे भावनेपेक्षा प्रतिष्ठेचे लक्षण बनत चालले आहे. नैतिक मूल्ये जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांची ही अतिशय बोलकी दोन उदाहरणे-


शंकरराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री असताना, आषाढीवारीच्या पौर्णिमेनंतर विठ्ठलाच्या दर्शनास आले. त्यांना पूजा करायची होती, पण प्रशाळ पूजा झाल्याशिवाय मंदिरात महापूजा करता येत नाही ही येथील परंपरा आहे. हे त्यांना सांगितल्यावर ‘माझ्यासाठी तुम्ही नियम मोडू नका, मी फक्त दर्शन घेऊन परत जातो’ म्हणाले व त्याप्रमाणे ते नुसते दर्शन घेऊन परत गेले.


पं. लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असताना बार्शीलाईट रेल्वेने पंढरपुरी आले. त्यांना पांडुरंगाचे दर्शन घेण्याची इच्छा होती, पण वारी असल्याने रेल्वे स्टेशनवर कॉलऱ्याची लस टोचून घेतल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नव्हता. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यास ते म्हणाले, माझ्या आयुष्यात मी कोणतीही लस टोचून घेतलेली नाही. तेव्ही मी हे इंजेक्शन घेणार नाही. तेव्हा अधिकारी म्हणाले, ‘तुम्ही केंद्रीय मंत्री! तुम्हाला इथे कोण अडविणार?’ तेव्हा शास्त्री म्हणाले, ‘मी इंजेक्शन घेणार नाही आणि मंत्री असलो तरी इथला नियम मोडणार नाही.’ ते पांडुरंगाचे दर्शन न घेता चक्क पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून परत गेले.

आषाढीवारीच्या निमित्ताने, पांडुरंगाच्या साक्षीने, आपण सर्वानीच यातून नैतिकतेचा बोध घेण्याची गरज आहे, असे मला प्रकर्षांने वाटते!


साभार - दै.लोकसत्ता सोमवार, ११ जुलै २०११ - अरुण पुराणिक 


#अक्षयवारी - ८४५१८२२७७२

कोबीच्या रसाचे फायदे !!*

 *कोबीच्या रसाचे फायदे !!* 


अनेकदा प्रत्येकजण जेवणात हिरव्या भाज्यांचे सेवन करण्यास सांगतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात असलेले पोषक घटक. कोबी यापैकी एक आहे, विशेषतः आजकाल सॅलड्स आणि भाज्यांमध्ये आणि चायनीज फूडमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. कोबी खाण्यात जितका फायदेशीर आहे तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे.

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, के, बी6, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, मॅंगनीज, कोलीन, रिबोफ्लेविन आणि थायामिनसह अनेक पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासोबतच हा रस बीपी नियंत्रित करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. 


*चला तर मग कोबीच्या रसाचे फायदे जाणून घेऊयात -


*1. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे :-* 


जर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोबीचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी या रसाचे सेवन केले तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येतो.


*2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते प्रभावी आहे :-* 


कोबीचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. व्हिटॅमिन सी पासून ते कोबीमध्ये आढळणारे इतर पोषक घटक देखील खूप फायदेशीर आहेत. जर तुम्ही याचे रोज नियमित सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


*3. रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो :-* 


कोबीमध्ये आढळणारे पोटॅशियम आपल्या शरीरातील वाढलेले सोडियम कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.


*4. हार्मोन्स संतुलित करते :-* 


कोबीचा रस शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम करतो. हे थायरॉईड ग्रंथीसह हार्मोन्सचे उत्पादन वाढवते. हा रस शरीरातील आयोडीनची कमतरता देखील पूर्ण करतो आणि हायपोथायरॉईडीझमच्या शक्यतेवर देखील काम करतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी

 रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी


-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील


 


मुंबई, दि. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री श्री.पाटील यांनी रत्नागिरीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित कामांविषयी आज आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ व्हावे अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्याअनुषंगाने आज मंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेत रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा निश्चित करून शासनाला प्रस्ताव सादर करावा. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात सागरी विद्यापीठ कायदा विधिमंडळात आणला जाईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.


जिल्ह्यातील इतर विषयांबाबत आढावा घेताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा विधी व न्याय विभागाला सादर करण्यात येईल. यासंदर्भात विधी व न्याय मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विधी महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मुख्य इमारत व हायड्रोलिक वर्कशॉप इमारतीचे बळकटीकरण, मुला-मुलींच्या वसतिगृहाचे बळकटीकरण आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या तसेच रत्नागिरी येथे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देखील मंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.


0000

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकारआढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदवावी

 वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकारआढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदवावी  


 


            मुंबई, दि. ३० : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.


            वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी जाहीरात देवून निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती, अपप्रचार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिस यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. तसेच जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही महसूल व वन विभागाने म्हटले आहे.


०००००

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

 समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात


मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त


मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर


 


        मुंबई, दि. 1 - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.


             या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.


            अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तत्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्या

त आले.


000


ऍग्रो+डॉक्टर्स डे

 


Featured post

Lakshvedhi