मुंबई गोवा अजून बाकी पण टोल ऑफिस बांधून तयार !
कोकणी माणसा जागा हो!
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
-मी कोण ?-
सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?
®️ महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.
®️ विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.
®️ व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.
®️ सुरदासही आंधळे होते.
®️ मुक्तेश्वर मुके होते.
®️ कुर्मदास पांगळे होते.
®️ चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.
®️ तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.
®️ ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.
®️ जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.
®️ पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.
®️ महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.
®️ श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.
®️ प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.
®️ विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.
®️ पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचे काय महत्त्व
🔰 "मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे आपण विचार करण्यापेक्षा वरील उदाहरणे वाचून निरंतर प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.
देवाचिया द्वारी ऊभा क्षण भरी
पुण्याची गणना कोण करी.___
🙏 राम कृष्ण हरी 🙏🌹
संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार :-
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
- संत ज्ञानेश्वर
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
- संत ज्ञानेश्वर
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
- संत ज्ञानेश्वर
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
- संत ज्ञानेश्वर
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
- संत ज्ञानेश्वर
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
- संत ज्ञानेश्वर
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
- संत ज्ञानेश्वर
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
- संत ज्ञानेश्वर
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
- संत ज्ञानेश्वर
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
- संत ज्ञानेश्वर
🙏🏻 सात्वीक जीवनसारांश आपणांस समर्पीत 🙏🏻
कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल..._
"देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्यासारखं दिलंय,
फक्त एक अट घातलीये
जो झिजेल तोच चमकेल...!"
देवाला आपण घाबरले नाही तरीही
चालेल पण आपण आपल्या कर्मा
पासून घाबरून रहा,
कारण ,
शिव्या किंवा ओव्या,
शाप किंवा आशिर्वाद,
निंदा किंवा स्तुती,
सुख किंवा दुःख ,
यापैकी ,जे आपण दुस-याला देऊ ते
न चुकता परत आपल्याकडे येणार
हा चैतन्यशक्तीचा स्वभावधर्म म्हणजेच
निसर्गाचा नियम आहे व या नियमाला
देव पण चुकलेला नाही..