Friday, 30 June 2023

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार

 ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· उसाला 315 रुपये प्रती क्विंटल हा आतापर्यंतचा सर्वाधिक रास्त आणि किफायतशीर भाव


· 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर


· युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार


            मुंबई, दि. 30 : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याच्या घेतलेल्या या निर्णयांबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कर आणि निमलेपनाचे शुल्क वगळून 45 किलोच्या पिशवीला 242 रुपये हाच दर कायम राहणार आहे. हे अनुदान खरीप हंगाम 2023-24 साठी नुकत्याच मंजूर झालेल्या 38,000 कोटी रुपयांच्या पोषण आधारित अनुदानाव्यतिरिक्त आहे. शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्या प्रति 45 किलो युरियाच्या पिशवीसाठी 242 रुपये आहे (निमलेपनाचे शुल्क आणि लागू असलेले कर वगळून), तर पिशवीची वास्तविक किंमत सुमारे 2200 रुपये आहे. या योजनेसाठी पूर्णपणे केंद्र सरकार वित्तपुरवठा करते. युरिया अनुदान योजना सुरू ठेवल्याने आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने जात असून युरियाचे स्वदेशी उत्पादनही वाढणार आहे.


            ऊसाला मिळालेल्या एफआरपीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2023-24 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी ऊसाला 10.25%च्या मूलभूत वसूली दरासह 315 रुपये प्रती क्विंटल रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) देण्यास मंजुरी दिली आहे. वसुलीमध्ये 10.25% पुढील प्रत्येक 0.1% वाढीला 3.07 रुपये प्रती क्विंटलचा प्रीमियम देण्यास तर वसुलीमधील घसरणीसाठी प्रत्येक 0.1% घसरणीला रास्त आणि किफायतशीर भावात 3.07 रुपये प्रती क्विंटलची कपात करण्याला देखील मंजुरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% हून कमी असेल तेथे कोणतीही कपात करण्यात येणार नाही, असा देखील निर्णय घेतला आहे.


            युरियावर देण्यात आलेल्या सबसीडीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे खतांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर अनेक पटींनी वाढत आहेत. परंतु केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतीपासून वाचवले आहे. केंद्र सरकारने, शेतकऱ्यांचे हितरक्षण करत, खत अनुदान 2014-15 मधील 73,067 कोटी रुपयांवरुन 2022-23 मध्ये 2,54,799 कोटी रुपये इतके वाढवले आहे.


            सन 2025-26 पर्यंत, पारंपरिक युरियाच्या 195 LMT च्या 44 कोटी बाटल्यांची उत्पादन क्षमता असलेले आठ नॅनो युरिया संयंत्र कार्यान्वित केले जाणार आहेत. नॅनो कण असलेली खते नियंत्रित रीतीने पोषक तत्वे बाहेर सोडणे, ज्यामुळे पोषक तत्वांचा वापर अधिक कार्यक्षमतेत होतो आणि शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. नॅनो युरिया वापरल्याने पीक उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.


            कोटा (राजस्थान), येथे चंबल फर्टीलायझर लिमिटेड, मॅटिक्स लि. पानगढ (पश्चिम बंगाल), रामागुंडम (तेलंगणा), गोरखपूर (उत्तरप्रदेश), सिंद्री (झारखंड) आणि बरौनी (बिहार) येथे झालेल्या 6 युरिया उत्पादन युनिट्सची स्थापना आणि पुनरुज्जीवन यामुळे 2018 पासून युरिया उत्पादन आणि उपलब्धतेच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यात मदत होत आहे. 2014-15 मध्ये युरियाचे स्वदेशी उत्पादन 225 LMT वरून 2021-22 मध्ये 250 LMT पर्यंत वाढले आहे. 2022-23 मध्ये उत्पादन क्षमता 284 LMT इतकी वाढली आहे. हे नॅनो युरिया प्लांट्ससह युरियावरील आपले सध्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करतील आणि अखेर 2025-26 पर्यंत आपण नक्कीच स्वयंपूर्ण होऊ, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


***

हरित उद्योगासाठी चळवळ उभारावी

 हरित उद्योगासाठी चळवळ उभारावी


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई दि. ३० : एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची आहे. यापुढील काळात शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीसाठी चळवळ उभी करावी. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


             ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’ या विषयावर रासायनिक परिषदेचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत भविष्यातील उद्योगासाठी ‘नाविण्यपूर्ण हरित उद्योग, शोध आणि विकास’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री श्री.सामंत बोलत होते. स्पाईस जेटचे चेअरमन आणि ‘असोचेम’ (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया) चे अध्यक्ष अजय सिंग, ‘असोचेम’ चे चेअरमन शंतनू भटकमकर, उद्योजक समीर सोमय्या, उमेश कांबळे यांच्यासह विविध उद्योग संस्था आणि समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.               


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, राज्यात अधिक रासायनिक उद्योग उभारायचे असल्यास, प्रदूषण विरहित उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांनी चळवळ उभी करावी. उद्योगामुळे आपल्याला हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त उद्योग राज्यात उभारता येतील. अर्थव्यवस्था वाढीसाठी रासायनिक उद्योग महत्वाचे आहेत. जे उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.              


            कोरोना काळात बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू केल्यास राज्यात क्रांती येईल. उद्योग जगताला पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात विदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य अव्वल ठरले आहे. कोणतेही उद्योग राज्याबाहेर गेले नसून, आयटी पॉलिसी पुन्हा सुरू केल्याने उद्योगांनी नव्याने गुंतवणूक केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने राज्य शासन कार्य करीत असल्याचे सांगून या परिषदेस मंत्री श्री. सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक विकास पाटील यांची मुलाखत

 शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

‘दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक विकास पाटील यांची मुलाखत


            मुंबई, दि. 30: राज्यात खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा माफक दरात उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे कृषी आयुक्तालय, पुणे येथील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून सांगितले.


            खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीसाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे, बियाण्यांबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती श्री.पाटील यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि. 3, मंगळवार दि. 4 आणि बुधवार दि. 5 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक महेश जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन15 सप्टेंबर पर्यंत मुदत

 पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन15 सप्टेंबर पर्यंत मुदत


            नवी दिल्ली, 30: केंद्र सरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षी पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2023 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in ) वर ऑनलाइन स्वीकारल्या जात आहेत.


             पद्म पुरस्कार, अर्थात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये प्रारंभ झालेल्या या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होते. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील ‘असामान्य कर्तृत्वाचा’ सन्मान करण्यासाठी दिला जातो.


कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारखी सर्व क्षेत्रे/ विषयांमध्ये विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरीसाठी/ सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानले जातात.


            पद्म पुरस्कारांचे स्वरूप ‘लोकांचे पद्म’ मध्ये रुपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. यास्तव, सर्व नागरिकांना स्वतःच्या नामांकनासह इतरांचे नामांकन/ शिफारशी पाठवण्याचे आवाहनही केले जात आहे. नामांकन /शिफारशींमध्ये उपरोक्तप्रमाणे निर्देशित केलेल्या पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील दिले असून, यामध्ये शिफारस केलेल्या व्यक्तिबद्दल संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी/ सेवा ठळकपणे मांडणाऱ्या वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) उद्धरण समाविष्ट केलेले असावे.


            या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in ) देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.


000

पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

 पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार,

एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा दि. ३० : राज्य शासन हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देणारे शासन आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाने लोकाभिमुख विविध निर्णय घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावांतील १२२ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे ई - भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

            यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.

            भूमिपूजन होणाऱ्या कामामुळे १२८ गावांतील लोकांना लाभ होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाने प्रलंबित विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. ३२ नव्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेची व्याप्ती वाढवून आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू केली आहे. त्यासाठी पिवळे, केशरी शिधा पत्रिका अशी कोणतीही अट नाही. या योजनेत आता ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय सहाय्य मिळणार आहे. सिंचनाच्या सुविधा वाढवण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार, गाळ मुक्त धरण-गाळ युक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून आज प्रशासन लोकांच्या घरी पोहोचले आहे.


            लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. महिलांना एस. टी. प्रवासात ५० टक्के सवलत, केंद्राच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनातर्फे आणखी ६ हजार रुपयांची भर घालून आता १२ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी मदत करण्यात येईल. राज्य शासनाची वर्षपूर्ती आपण विकास कामांच्या माध्यमातून साजरी करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

             यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्याच्या तिजोरीत भर घालणारा महत्वाचा विभाग म्हणजे उत्पादन शुल्क विभाग होय. या विभागाने २१ हजार ५०० कोटींचा महसूल जमा केला आहे. ही महसुलातील २५ टक्के वाढ आहे. डोंगरी विकासासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आराखडा बनवला जात आहे. कोयना, बामणोली, तापोळा, कास या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. या ठिकाणी पर्यटन विकास निश्चित केला जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून ई-भूमिपूजन कार्यक्रमास तसेच वर्षपूर्ती निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

            यावेळी विकास कामे होणाऱ्या गावामधील सरपंच, सदस्य व पाटण विधानसभा मतदार सं

घातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशी अप्रतिम कलाकृती.👌👌👌

 तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशी अप्रतिम कलाकृती.👌👌👌


रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टरकेंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

 रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टरकेंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार


 


            मुंबई, दि. ३० :- केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.


            केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.


            केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवड औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत.


            राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकतीच ४० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली

 आहे.


००००


दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?*

 दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*




नळाचे पाणी कधी कधी खूपच खराब दिसते. गढूळ पाणी पिण्यास अयोग्य असते, हे कोणीही सांगेल: पण वरून स्वच्छ दिसणारे पाणीही पिण्यास योग्य असेलच असे नाही. साध्या डोळ्यांनी न दिसणारे असंख्य जिवाणू व विषाणू तसेच परजीवी त्यात असू शकतात. काही रासायनिक पदार्थ असल्यामुळे किंवा किरणोत्सर्गी पदार्थामुळेही पाणी दूषित होऊ शकते. 




रासायनिक पदार्थ कोणता आहे, यावर रोगाची लक्षणे अवलंबून राहतील. पाण्यात जिवाणू असतील तर ते पाणी पिण्याने टायफॉईड, कॉलरा, हगवण असे रोग होऊ शकतात. विषाणूंमुळे कावीळ, पोलिओ यांसारखे रोग होतात. परजीवी जंतूंमुळे अमिवा व जिआर्डीया यांची लागण होते. गोल कृमी, अंकुश कृमी, तंतू कृमी इत्यादींची लागण त्या जंतूंची अंडी पाण्यात असतील तर होते. 




पाण्यात सायक्लोप्स नावाचे किटक असल्यास नारू हा रोग होऊ शकेल, तर गोगलगायीमुळे शिस्टोसोमीयासीस हा रोग होईल. दूषित पाण्यामुळे असे अनेक रोग होतात. 




नुसते पाहून पाणी चांगले की वाईट ते कळत नाही. त्यामुळे पिण्याच्या आधी ते शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी हेच चांगले. पाण्यात तुरटी फिरवणे, गाळणे, उकडून गार करणे या उपायांनी जतूंचा नाश होतो. क्लोरीनच्या गोळ्या वा द्रावण वापरून गुद्धा पाणी शुद्ध करता येते. ही पाण्याच्या शुद्धिकरणाची स्वस्त व परिणामकारक अशी पद्धत आहे. पाण्याच्या बाबतीत दिसते तसे नसते. म्हणून जग त्याला फसते ही म्हण अगदी सार्थ ठरते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास प्रदूषित पाण्यापासून होणाऱ्या रोगांना आपण सहजपणे प्रतिबंध करू शकतो.




*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*   


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺




श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर - उडुपी येथील उत्थान द्वादशी काकड आरती

 *🌹🙏👆श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर - उडुपी येथील उत्थान द्वादशी काकड आरती - विश्वरूप दर्शन सोहोळा आणि दीपोत्सव - एक अप्रतिम संग्रही ठेवावा असा व्हिडिओ आणि त्यासाठी वापरलेलं "उठ पंढरीच्या राया... फार वेळ झाला... थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला...." एक अप्रतिम समयोचित भक्तीगीत प्रत्यक्ष अनुभवा... ..!!! 👌👌👌🙏🌹*


ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार

 ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठीप्रधानमंत्र्यांचे आभार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· उसाला 315 रुपये प्रती क्विंटल हा आतापर्यंतचा सर्वाधिक रास्त आणि किफायतशीर भाव


· 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर


· युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार


            मुंबई, दि. 30 : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याच्या घेतलेल्या या निर्णयांबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने 3.68 लाख कोटींची युरिया सबसिडी 3 वर्षांसाठी जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कर आणि निमलेपनाचे शुल्क वगळून 45 किलोच्या पिशवीला 242 रुपये हाच दर कायम राहणार आहे. हे अनुदान खरीप हंगाम 2023-24 साठी नुकत्याच मंजूर झालेल्या 38,000 कोटी रुपयांच्या पोषण आधारित अनुदानाव्यतिरिक्त आहे. शेतकऱ्यांना युरिया खरेदीसाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्या प्रति 45 किलो युरियाच्या पिशवीसाठी 242 रुपये आहे (निमलेपनाचे शुल्क आणि लागू असलेले कर वगळून), तर पिशवीची वास्तविक किंमत सुमारे 2200 रुपये आहे. या योजनेसाठी पूर्णपणे केंद्र सरकार वित्तपुरवठा करते. युरिया अनुदान योजना सुरू ठेवल्याने आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने जात असून युरियाचे स्वदेशी उत्पादनही वाढणार आहे.


            ऊसाला मिळालेल्या एफआरपीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2023-24 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी ऊसाला 10.25%च्या मूलभूत वसूली दरासह 315 रुपये प्रती क्विंटल रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) देण्यास मंजुरी दिली आहे. वसुलीमध्ये 10.25% पुढील प्रत्येक 0.1% वाढीला 3.07 रुपये प्रती क्विंटलचा प्रीमियम देण्यास तर वसुलीमधील घसरणीसाठी प्रत्येक 0.1% घसरणीला रास्त आणि किफायतशीर भावात 3.07 रुपये प्रती क्विंटलची कपात करण्याला देखील मंजुरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% हून कमी असेल तेथे कोणतीही कपात करण्यात येणार नाही, असा देखील निर्णय घेतला आहे.


            युरियावर देण्यात आलेल्या सबसीडीबाबात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे खतांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर अनेक पटींनी वाढत आहेत. परंतु केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतीपासून वाचवले आहे. केंद्र सरकारने, शेतकऱ्यांचे हितरक्षण करत, खत अनुदान 2014-15 मधील 73,067 कोटी रुपयांवरुन 2022-23 मध्ये 2,54,799 कोटी रुपये इतके वाढवले आहे.


            सन 2025-26 पर्यंत, पारंपरिक युरियाच्या 195 LMT च्या 44 कोटी बाटल्यांची उत्पादन क्षमता असलेले आठ नॅनो युरिया संयंत्र कार्यान्वित केले जाणार आहेत. नॅनो कण असलेली खते नियंत्रित रीतीने पोषक तत्वे बाहेर सोडणे, ज्यामुळे पोषक तत्वांचा वापर अधिक कार्यक्षमतेत होतो आणि शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. नॅनो युरिया वापरल्याने पीक उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.


            कोटा (राजस्थान), येथे चंबल फर्टीलायझर लिमिटेड, मॅटिक्स लि. पानगढ (पश्चिम बंगाल), रामागुंडम (तेलंगणा), गोरखपूर (उत्तरप्रदेश), सिंद्री (झारखंड) आणि बरौनी (बिहार) येथे झालेल्या 6 युरिया उत्पादन युनिट्सची स्थापना आणि पुनरुज्जीवन यामुळे 2018 पासून युरिया उत्पादन आणि उपलब्धतेच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यात मदत होत आहे. 2014-15 मध्ये युरियाचे स्वदेशी उत्पादन 225 LMT वरून 2021-22 मध्ये 250 LMT पर्यंत वाढले आहे. 2022-23 मध्ये उत्पादन क्षमता 284 LMT इतकी वाढली आहे. हे नॅनो युरिया प्लांट्ससह युरियावरील आपले सध्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करतील आणि अखेर 2025-26 पर्यंत आपण नक्कीच स्वयंपूर्ण होऊ, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.



***


काही घरगुती उपाय*

 *👉काही घरगुती उपाय*


*डोकेदुखी :*


डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.


*अर्धशिशी (मायग्रेन) :*


रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.

*पूर्ण डोके दुखणे :*


निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.


*सायनस :*


सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.


*केसगळती :*


घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.

*डोळ्यांसाठी :*


नागवेलीचे(विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.

*नाकातील हाड वाढल्यास :*


५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.

*सर्दीचा त्रास झाल्यास :*


दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

*वजन कमी करण्यासाठी :*


ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.


*हृदय मजबूत होण्यासाठी :*


रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.

*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :*


कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.


*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :*


अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.


*अपचनाचा त्रास :*


रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.

बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.


*हार्ट ॲटॅक आल्यास :*


लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.


*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :*


रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल) चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.

*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :*


पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते. 

*मूळव्याध :*


अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.

*मूतखडा (किडनी स्टोन) :*


दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.

*कोठा साफ होण्यासाठी :*


सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.


*दातांच्या बळकटीसाठी :*


पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.

*हिरड्या फुगल्यास :*


मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी. 


*गालगुंड :*


उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.

*चेहरा धुण्यासाठी :*


४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.


*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :*


लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.

*संधिवात व हाडांचे दुखणे :*


पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.


*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :*


काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.


*टकलावर केस येण्यासाठी :*


सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.


कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.


*झोपेत घोरण्याची समस्या :* 


तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.

*माथा उठणे :*


गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे. 


*त्वचेला खाज येत असल्यास :*

दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी

*मधुमेह (शुगर) :*


 सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.


जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत नाही.


दुपारी बाहेरुन आल्यानंतर गुळाचा एक खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे साखर वाढत नाही.

*लूज मोशन :*

 चमचाभर मेथीचे दाणे न चावता गिळून टाकावेत व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे.

*लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास:*

वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळून व गाळून घ्यावे आणि ते पाणी मुलांना चमच्याने पाजावे.

आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन ठेवावे. त्यामुळे थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप याचा त्रास होत नाही.

स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही.

स्त्रियांनी एक मिनिटभर दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने (करंगळीच्या शेजारच्या बोटाने)कुंकू लावतात तसे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा,


पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, वैचारिक पातळी चांगली राहाते, डोकेदुखीचा त्रास होत नाही,चष्मा लागत नाही.

गरोदरपणात एक दिवसाआड शहाळ्याचे पाणी नियमितपणे प्यावे. यामुळे बाळंतपण सुखरुपपणे पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.l

कोणताही पदार्थ (अन्न व पेय) गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.

*रोज शक्य होईल तितके चालावे.*

*स्मरणशक्ती :*


 वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.


*कॅन्सर :*


वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.


*शरीरशुद्धीसाठी :*


ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक रोज किमान ७ लिटर प्यावे. सलग ३ दिवस हा प्रयोग केल्यास शरीरशुद्धी होते. आयुर्वेदातील पंचकर्म उपचाराचा लाभ या प्रयोगामुळे होतो.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणार

 पूर रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणार


            राज्यात पुरामुळे मोठे नुकसान टाळण्यासाठी नद्यांमधील गाळ व वाळू तसेच राडा-रोडा बाहेर काढण्याबाबत स्वतंत्र धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            पूर प्रवण क्षेत्रात शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांमुळे पुराचा तडाखा बसतो. यापुर्वी २००५, २००६ व २०११, २०१९ व २०२२ मध्ये विविध शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराला रोखण्यासाठी नदी पात्रात गाळामुळे निर्माण झालेली बेटे, राडा-रोडा, वाळू मिश्रीत गाळ काढण्यासाठी आता जलसंपदा विभाग, नगरविकास आणि महसूल विभाग कार्यवाही करेल. यासाठी राज्यातील १ हजार ६४८ किमी लांबीच्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यात आली असून, त्या नुसार कार्यवाही केली जाणार आहे. या कामासाठी ६ हजार ३४ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.


-----०-----

अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

 अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट


            राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे "सिट्रस इस्टेट" तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादने घेणे व त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र या भागातील शेतकऱ्यांना कमी उत्पादकता, जुने तंत्रज्ञान, पारंपरिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा अभाव अशा अडचणींना तोंड द्यावे लागते. सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून निर्यातक्षम नवीन वाणांचे उत्पादन शक्य होऊ शकेल. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने फळबागा विकसित होऊ शकती

ल.



संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

 संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ


            संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दिड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३०० रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून ४० लाख ९९ हजार २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.


-----०-----

Thursday, 29 June 2023

कंटोला.. कर्कोटकि, करटोलि,,( Spine gourd)...*

 *कंटोला.. कर्कोटकि, करटोलि,,( Spine gourd)...*


     उन्हाळा संपला, आणि आता पावसाळा चालू होईल, पावसाचि सततधार चालू होईल, , मग बाजारात या सर्व पावसाळि भाज्यांचि वर्दि लागेल, त्यात प्रमूख आहे.."" करटोलि''.. कारल्यासारखि दिसणारि, आणि सर्वात प्रचंड पौष्टिकतेने युक्त अशि मौसमि , आगळि वेगळि भाजि आहे.. अहो लोक मोठ्या आतूरतेने वाट बघत असतात हिचि, , कारण मग क् ही ,, पाहुणि,, भाजि वर्षभर गायब असते.. हिच्यावर ताव मारून छान वर्षभराचि उत्तम स्वास्थाचि बेगमि करून ठेवायचि असते

 सगळ्यांना....


🌱🌱.. मधुमेहासारख्या क्लिष्ट व्याधिवर करटोलि रामबाण औषध आहे, याच्या सेवनाने रक्तशर्करा नियंत्रित होते..(२).. हि भाजि वाळवून चूर्ण करावे, डांग्या खोकला समूळ बराहोतो, चूर्ण घेतल्राने,..(३) मूळव्याध, बवासिर, या व्याधित, याचे चूर्ण व साखर एकत्रित घेतल्यास बरे वाटते,(३) मूत्र खडा वितळवण्याचि क्षमता आहे. . एक ग्लास दूधात ५ ग्रँ कंटोला पावडर घेतल्यास युरीन स्टोन विरघळतो,


🌱🌱.. ( हाईपरहिड्रोसिस) म्हणजेच ज्यांना सतत , मोठ्या प्रमाणात घाम येतो, त्यांनि याचि पावडर आंघोळिच्या पाण्यात टाकून, स्नान करावे, घाम येण्याचे थांबते,(५).. तिव्र ज्वर, मुदतिचा ताप यावर कंटोल्याचि पाने उकळवून हा काढा, रूग्णास तिन वेळा द्यावा, ज्वर उतरून हुशारि येते,(६).. करटोलित एंटि आँक्सीडेंट व विटँमिन , सी, मुबलक असल्याने, कँसरच्या पेशि नष्ट करते, व प्रतिकार शक्ति वाढवते,


(७).. गर्भवति स्रियांनि करटोलिचे सेवन अवश्य करावे

 बाळाचि उत्तम वाढ होते, १०० ग्रँम कंटोल्यात ७५ ग्रँम फोलेट असते , जे गर्भावस्थेत उपयोगि ठरते,(८).। करटोलिच्या नियमित सेवनाने उच्च रक्तदाब, नियंत्रित राहतो, यांत भरपुर विटँमिन ए असल्याने डोळे निरोगि, व सशक्त राहतात,(८) कंटोलामद्दे फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचन निट होते, व बद्धकोष्ठ दूर होते,.


 🌱🌱. करटोलिचे चूर्ण व आवळा चूर्ण , दह्यात कालवून केसांना लावल्यास केसगळति, कोंडा, अकालि केस पिकणे , या समस्या दूर होतात,(१०).. करटोलि च्या मूळाला उगाळून मस्तकाला लेप दिल्यास डोकेदूखि थांबते, याचि पाने रूचिकारक, त्रिदोषनाशक, अर्शनाशक, व श्वसनाचे सर्व विकार दुर करणारे असतात,.


🌱🌱.. करटोलि च्या मूळाला, उगाळुन काहि थेंब कानात टाकल्यास कर्णदूखि, बंद होते,(१२). करटोलिचे मूळ भाजावे व चूर्ण खरून मधात दिल्यास सर्व उदर विकार,.. अपचन, अरूचि, पोट फुगणे, बंद होते,

  (१३).. काविळित कंटोल्याच्या मूळाला उगाळून त्याचे काहि थेंब नाकात टाकावे, तसेच सोबत गूळवेल सत्व द्यावे, (१४).. करटोलिचि पाने वाटुन हा रस शुध्द खोबरेल तेलात शिजवून हे सिद्ध तेल , खाज, खरूज , दाद, आदि चर्म रोगावर लावल्यास संपूर्ण बरा होतो आजार,.(१५) अपस्मार, मिरगि, फिट व लकवा यावर करटोलिच्या मूळाचे चूर्ण द्यावे व मूळ तूपात उगाळून काहि थेंब नाकात सोडावे


.. कंटोला हि भाजि रोजच्या जेवणात जरूर ठेवावि, अतिशय मौल्यवान गुणाने भरलेलि, व स्वादिष्ट सुद्धा आहे,, फार कमि मसाल्यात हि भाजि रूचकर होते..

    🌱🌱🌱🌱..




वैभव सोलापूरचे’ कॉफी टेबल बुकचे

 वैभव सोलापूरचे’ कॉफी टेबल बुकचे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन


 


            पंढरपूर, दि. 29, (उ. मा. का.) :- सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती घेण्याबरोबरच पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


            शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या कार्यक्रमाला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, समाधान आवताडे आणि शहाजीबापू पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.


            जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधीतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके आणि लक्ष्मण आवारे यांचे सहकार्य लाभले.


            या कॉफी टेबल बुकमध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन काळातील शिल्प कलेचा यादव कालिन अर्धनारी नटेश्वर, माचणूर, पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, हेमाडपंथी भगवंत मंदिर, वडवळचे नागनाथ मंदिर, दहिगाव येथील जैन मंदिर, अक्कलकोट मधील खाजा सैफुल मलिक दर्गाह, सोलापुरातील फस्ट चर्च आदी धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे.


            प्राचीन वारसा असलेला सोलापूर येथील भुईकोट किल्ला, मंगळवेढा, माढा, माचणूर, करमाळा, पिलीव येथील भुईकोट किल्ला, अक्कलकोट येथील राजवाडा, चार हुतात्मा स्मारक, सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन, डॉ. कोटणीस स्मारक, वारकरी संप्रदायाची वारी परंपरा, महालिंगरायाची हुलजंती यात्रा, सिद्धरामेश्वराची गड्डा यात्रा, वडवळ नागनाथ यात्रा, उद्योग, कृषि पर्यटन केंद्र चिंचणी, कला व क्रीडा क्षेत्रातील सोलापूरचे योगदान, निसर्ग संपदा, जैवविविधता, सोलापूर शहराच्या मधोमध असलेले 200 हेक्टर क्षेत्रातील सिद्धेश्वर वनविहार, नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य यांचाही समावेश पुस्तकात आहे. याशिवाय या ठिकाणी आढळणारे विविध प्रकारचे शिकारी पक्षी, तृणभक्षक पक्षी, स्थलांतरीत होणारे पक्षी, फ्लेमिंगो (रोहित पक्षी), विविध सर्प प्रजाती, फुलपाखरे प्रजाती, विविध कोळी प्रजाती यांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.


0000



 

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला

 *एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार* 

*मकरंद करंदीकर*


विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे :-) ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे. 


🙏🏻 *विठ्ठल* 🙏🏻  

     (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी

आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी

एक मुलगा कुट्ट काळा ॥

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या करण्यात आहे

अट्टल

मास्तर म्हणतात करणार काय?

न जाणो असेल विठ्ठल ॥

✍️ *©️विंदा करंदीकर*

================

      🎯 *इट्टल*

(नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी

हाये येक छुटी साळा

सर्वी पोरं हायेत गुरी

योक मुल्गा कुट्ट काळा

दंगा कर्तो मस्ती कर्तो

खोड्या कर्ण्यात बी आट्टल !

मास्तर म्हंती करनार काय ?

न जानू ह्यो आसन इट्टल !!! 

🖊 *काकासाहेब वाळुंजकर*

     - अहमदनगर

=================

    🎯 *इट्टल*

(मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी

हाय बारकी साळा एक

सगळी पोरं हायत गोरी

कुट्ट काळं त्येच्यात एक

आगावपणा करतंय पोराटगी करतंय

आवचिंदपणाबी करण्यात हाय 

आट्टल...

गुरजी मनत्यात करावं काय?

एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

🖊 *डॉ.बालाजी मदन इंगळे*

        - उमरगा

=================

 🎯 *इठ्ठल*

(लेवा गणबोली)

पंढरीच्या येशीपाशी

आहे एक छोटुशी शाया

सर्वे पोऱ्हय गोरे

एक पोऱ्या कुट्ट काया 

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या कऱ्यात आहे अट्टल

मास्तर म्हने करे काय

न जानो अशीन इठ्ठल

🖊 *प्रशांत धांडे*

       - फैजपूर

=================

   🎯 *ईठ्ठल* 

(अहिराणी रुपांतर)

पंढरपूरना शीवजोगे

एक शे धाकली शाया;

सम्दा पोरे शेतस गोरा

एक पोर्‍या किट्ट काया ||

दांगडो करस, मस्त्या करस

खोड्या कराम्हा शे अट्टल;

मास्तर म्हने काय करो ?

ना जानो हुई ईठ्ठल ||

  ✍️ *नितीन खंडाळे* 

            चाळीसगाव

=================

🎯 *इठ्ठल*

 (तावडी अनुवाद)

 पंढरपूरच्या येसजोय

 आहे एक छोटी शाया

 सम्दे पोरं आहेती गोरे

  एक पो-या कुट्ट काया ll

 दंगा करतो मस्ती करतो

 खोड्या क-यामधी आहे अट्टल

 मास्तर म्हनता करनार काय?

ना जानो असीन इठ्ठल ll

 ✍️ *प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे*

        - जळगाव

=================


🙏🏻 *विट्टल* 🙏🏻  


(आदिवासी बोली. केळवे, पालघर.)

     

पंढरपूरचं येशीपाय

हाय एक बारकुशी शाला

सगली पोरं हाईत गोरी

एक पोर तं काला कुट ॥

दंगा करं मस्ती करं

खोड्या कराया तं अट्टल

मास्तर सांगं करशी काय..?

कलंssहू नाय आसल विट्टल ॥


विकास पाटील.

कृषिन, केळवे.


======((((======


     🎯 *इठ्ठल*

(बागलाणी अहिराणी) 

पंढरपूर नी येसपन

शे एक उलशी शाळा

सर्वा पोऱ्या गोरापान

येकच पोरगा कुट्ट काळा!

दंगा करस मस्ती करस

खोड्या काढा मा शे अट्टल

मास्तर म्हणतस करवा काय

न जाणो व्हयी इठ्ठल!

  🖊 *वैभव तुपे*

        - इगतपुरी 

=================

🎯 *इठ्ठल*

(आदिवासी तडवीभिल

बोली)

पंढरपूरची शिवंजवळं

ह एक लहानी शायी

सबन पोऱ्हा हती गोऱ्या

एक पोऱ्या ह कायाकुच

गोंदय करतो मस्ती करतो

खोळ्या करवात ह अट्टल

मास्तर म्हणतंहती करशान काय ?

कोणाल माहित हुईन इठ्ठल

🖊 *रमजान गुलाब तडवी*

- बोरखेडा खुर्द ता. यावल

=================

  🎯 *विठ्ठल*

( वऱ्हाडी बोली )

पंढरपूरच्या येशीजोळ

लहानचुकली शाळा हाये;

सबन लेकरं हायेत उजय

यक पोरगं कायंशार॥

दांगळो करते, मस्त्या करते

खोळ्या कर्‍याले अट्टल.

गुर्जी म्हंतात कराव काय?

न जानो अशीन विठ्ठल ॥

✍️ *अरविंद शिंगाडे*

           - खामगाव

=================

 🎯 *इठ्ठल*

 (वऱ्हाडी अनुवाद)

पंढरपूरच्या वेसीजोळ

आहे एक लायनी शाळा

सारी पोर आहेत गोरी

एकच पोरगा डोमळा ॥

दंगा करते, दांगळो करते

खोळ्या करण्यात आहेत

पटाईत...

मास्तर म्हणते कराव काय

न जाणो अशीन इठ्ठल ।।

✍️ *लोकमित्र संजय*

            -नागपूर

=================

     🎯 *इठ्ठल*

      (आगरी अनुवाद)

पंढरपूरचे येशीजरी

यक हाय बारकीशी शाला

सगली पोरा हायीत गोरी

यक पोऱ्या कुट काला।।

दंगा करतंय मस्ती करतंय

खोऱ्या करन्यान हाय

अट्टल...

मास्तर बोलतान कराचा काय?

नायतं तो हासाचा इठ्ठल!

✍️ *तुषार म्हात्रे*

     पिरकोन (उरण)

=================

    🎯 *इट्टल*

(मालवणी अनुवाद)

पंडरपूराच्या येशीर 

एक शाळा आसा बारकी।

एकच पोरगो लय काळो:

बाकीची पोरां पिटासारकी।।

दंगो करता धुमशान घालता;

खोड्ये काडण्यात लय अट्टल।

मास्तर म्हणतंत करतंलास काय?

हयतोच निगाक शकता इट्टल।।

✍️ *मेघना जोशी*

         - मालवण

=================

  🎯 *इठ्ठल*

(पारधी अनुवाद)

पंढरपूरना आगंमांग

छ येक धाकली शाया ;

आख्खा छोकरा छं गोरा

यकजच छोकरो कुट्ट कायो!!

वचक्यो छं मस्त्या करस 

खोड करामं छं अट्टल 

मास्तर कवस करानू काय ? 

कतानै आवस व्हसो तेवतो इठ्ठल !!

✍️ *प्रविण पवार* 

             धुळे

=================

   🎯 *इठ्ठल*

(बंजारा अनुवाद)

पंढरपूरेर सिमेकन,

एक हालकी शाळा छ!

सारी पोरपोऱ्या गोरे,

एक छोरा कालोभुर छ!

दंगो करचं मस्ती करचं!

खोडी करेम छ अट्टल!!

मास्तर कचं कांयी करू?

काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!

✍️ *दिनेश राठोड*

 *चाळीसगाव*

=================

    🎯 *विठ्ठल*

(वंजारी अनुवाद)

पंढरपुरना हुदफर 

हे एक बारकुली शाळ

हंदा पाेयरा हे गाेरा 

एक पाेयराे निववळ काळाे

केकाटत ,मसती करत

खाेडयाे करवामा हे अटट्ल

 मासतर केत करवानाे काय

 न जाणाे हिवानाे विठठ्ल

✍️ *सायली पिंपळे*

            - पालघर

=================

  🎯 *विठ्ठल*

      (हिंदी अनुवाद)

पंढरपूर नगरमें द्वारसमीप

है एक अनोखी पाठशाला

सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के

एक बच्चा भी हैं काला...।

उधम मचाये मस्तीमे मगन

है थोड़ा सा नटखटपन

गुरुजन कहे क्या करे जो

हो सकता हैं विट्ठल...।

✍️ *सुनिल खंडेलवाल*

       पिंपरी चिंचवड़, पुणे

=================

  🎯 *विट्टल*

      (कोळी अनुवाद)

पंढरपूरश्या वेहीवर , 

एक हाय बारकी शाळा।                           

 जखली पोरा गोरी गोरी।     

त्या मनी एक हाय जाम काळा।      

दन्गो करता न मस्तीव करता        

खोडी करनार अट्टल।    

न मास्तर हानता काय करु            

न जाणो यो हयेन विट्टल।   

✍️ *सुनंदा मेहेर*

   माहीम कोळीवाडा मुंबई

=================

  🎯 *इठ्ठल* 

   (आगरी अनुवाद)

 पंढरपुरचे हाद्दीव,

 हाय येक बारकीच शाला.

 सगली पोरा हान गोरी,

 येक पोर जामुच काला.

 उन्नार मस्ती करतय जाम,

 खोऱ्या करन्यान वस्ताद हाय.

 गुरूजी सांगतान करनार काय,

 नयत त आसल तो इठ्ठल.

 ✍️ *निलम पाटील* बिलालपाडा,नालासोपारा

=================

     🎯 *विट्टल*

(झाडीबोली)

पंढरपूराच्या सीवेपासी

आहे एक नआनसी स्याळा

सर्वी पोरे आहेत भुरे

एक पोरगा भलता कारा 

दंगा करतो मस्ती करतो

गदुल्या करण्यात अव्वल

मास्तर म्हणत्ये करणार काय ?

न जानो असल विट्टल !

✍️ *रणदीप बिसने*

       - नागपूर

=================

       🎯 *इठ्ठल*

(परदेशी बोली)

पंढरपुरका येशीपास

हय एक छोटी शाळा

सब पोर्ह्यान हय गोरा 

एक पोऱ्यो कुट्ट काळो

दंगा करं मस्ती करं

खोड्या करबामं हय अट्टल

मास्तर कहे कई करू ?

कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल 

🖊 *विजयराज सातगावकर*

         - पाचोरा

=================

🎯 *विठ्ठल*

(पोवारी बोली )

पंढरपूरक् सिवजवर

से एक नहानसी शाळा

सप्पाई टुरा सेती गोरा

एक टुरा से भलतो कारा

दिंगा करसे मस्ती करसे

चेंगडी करनो मा से अव्वल

मास्तर कव्हसे का आब् करू?

नही त् रहे वु विठ्ठल !!

✍️ *रणदीप बिसने*

     - नागपूर

=================

🎯 *विठ्ठल*

(कोकणी सामवेदी बोली)

पंढरपूरश्या वेहीपा

एक बारकी शाळा हाय

आख्ये पोरे गोरेपान

पान एकूस काळोमस

खूप दंगोमस्ती करत्ये

खोडयो काडण्यात अट्टल

मास्तर हांगात्ये,

का कऱ्यासा,

कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल ??

🖊 *जोसेफ तुस्कानो*

           - वसई


=================

(झाडीपट्टी)

पंढरपूरच्या शिवं जवडं

यक छोटी शाडा

सर्वे पोट्टे हायेत भुरे

यक पोट्टा कुट्ट काडा

धिंगाने करते,मस्ती करते

खोड्या कराले हाये अट्टल

मास्तर म्हनतेत का करू बाप्पा

कोन जानं असन विट्टल।।

-माधवी

≠===================

पंढरपुराच्यें बाहांर आहें

बारकी एकुस साला

आखुटच पोयरें पांडरे-गोरे

एकुस होता काला

भरां करं मस्ती हों तों

भरां करं दंगल

गुर्ज्या म्हन् करांस काय?

आसंल जर्का विठ्ठल

 (वारली)

...मुग्धा कर्णिक

=======================

विठ्ठल

(चित्पावनी)


पंढरपुराचे शीमालागी

से एक इवळीशी शाळा

सगळीं भुरगीं सत गोरीं

एक बोड्यो काळीकुद्र कळा


बोव्वाळ करसे, धुमशाणा घालसे

किजबिट्यो काढसे हो अव्वल

मास्तर म्हणसे कितां करनार?

देव जाणे, सएल विठ्ठल


- स्मिता मोने अय्या (गोवा)

======================


पंढरपुरश्या येहीवर 

हाय एक बारकी हाळा

तटे हात जकली पोरं गोरी

एक पोरं घणा काळा

दंगा करते मस्तीव करते

खोड्या करव्या हाय अट्टल

मास्तर बोलते करव्याह का?

कोणला माहीत अहेल इठ्ठल।।


-वाडवळी बोली 

-केळवे माहीम

-- गौरव राऊत.

======================


ही दखनीत : (जिला बागवानी म्हणूनही ओळखतात इथे.)


पंढरपूरके हदकने

हय एक न्हन्नी इस्कूल

सब छोरदा हय गोरे

एक हय काला ठिक्कर

दंगा कर्ता मस्ती कर्ता

खोड्या कर्नेमें हय आट्टल

मास्तर बोल्ता कर्ना क्या

भौतेक इनेच आचिंगा इठ्ठल 


--इर्शाद बागवान

 आदिलनिजामकुतुबशहा जेथे होते तेथे ही भाषा तेथील मुस्लिम समाजात बोलली जाते.

यातील पेठी वर्जन म्हणजे हैदराबादेतले मुसलमान आपसात बोलतात ती भाषा (धर्माचा उल्लेख केवळ भाषा कुणाच्यात बोलली जाते याकरता) असं म्हणतात. दखनीभाषेत साहित्यनिर्मितीही झालेय. 

====================

आदिवासी पावरी बोली..

(नंदूरबार जिल्हा, धड़गाव तालुका 

आदिवासी पावरी बोली)

पंढरपूरन हिवारोपर,

एक आयतली शाला से 

अख्खा पुऱ्या 

काकडा से 

एक सुरू से 

जास्ती (जारखो) काल्लो 

कपाली करतलो, 

मस्ती करतलो 

चाड्या करण्याम

 से आगाडी पे !

काय करजे ?,

मास्तर कोयतलो,

काय मूंदु ,

ओहे इटलो ? (विठ्ठल)

- योगिनी खानोलकर

≠====================


आऊटसाइड पंढरपुर

देर इजे स्मॉल स्कूल

ऑल द किड्स आर व्हेरी फेअर

एक्सेप्ट फॉर वन ब्लॕक डुड

फनी अँड ट्रबल मेकर

ही इजे ब्रॕट ऑफ हायेस्ट ऑर्डर 

टीचर सेज व्हॉट टु डु?

माइट बी अवर ओन विठु


भाषांतरकार समीर आठल्ये

+91 98926 73624: 


कन्नड ( ग्रामीण ) मध्ये


पंढरापूरद अगसी हत्तीर

ऐतेव्वा वंद सण्ण सालीमठा

एल्ल हुड्रू बेळाग सुद्द

वब्बन हुडगा कर्रगंद्र कर्रग ||

गद्दला माडतान,धुम्डी हाकतान

तुंटतना माडोद्राग मुंद भाळ

मास्तर अंतार एन माड्ली ?

इवनं इद्रू इरभौद इटूमावली ?


- डॉ प्रेमा मेणशी

 बेळगावी

कर्नाटक

+91 98926 73624: 


विठ्ठल 


आगरी बोलीभाषा

============

पंढरपूरशे हद्दीन

हाय एक बारकी शाला

बिजी पोरा गोरी

त्यामन एकस यो काला


दंगा करतं नावटीगिरी करतं

खोड्या कर्णेन जाम अट्टल

गुरजी हांगतं काय करणार

काय माहीत आहेल विठ्ठल


●श्री अनंत पांडुरंग पाटील

   उमरोळी पालघर

शासन आपल्या दारी'अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेअनुकंपा नियुक्ती आदेश वाटप

 'शासन आपल्या दारी'अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेअनुकंपा नियुक्ती आदेश वाटप


            पंढरपूर, दि. 29 : 'शासन आपल्या दारी' योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आज अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात योजनेचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक लाभाचे वितरण करण्यात आले आहे.


            शासकीय विश्रामगृह येथील आयोजित या कार्यक्रमास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे. शासनाने ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मंत्रीमंडळ बैठकीत नियमितपणे याचा आढावा घेण्यात येतो. 'शासन आपल्या दारी'' योजनेच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध दाखले देण्याचे काम होत आहे. योजना सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखलेही एकाच छताखाली मिळतात. सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत आहे. या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्व सामान्य जनतेचे आहे. सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे आहे. वारी कालावधीत 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.


            एक जानेवारी २०२३ पासून आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीतील गट क व गट ड संवर्गातील एकूण ५९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन अनुकंपा तत्त्वावरील उपलब्ध रिक्त जागांवर या नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.


            कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तलाठी पदासाठी आठ उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग येथील कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर दोन शिपाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवर पाच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व तीन शिपायांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.

भवताल कातालशिल्प

 

भवताल कट्टा ५८

 

कोकणात अनेक सड्यांवर असंख्य कातळशिल्पं कोरलेली आहेत. नवनवी शिल्पं उजेडात येत आहेत, तसे त्यांच्याबद्दलचे गूढ वाढतच आहे. त्यांचे निर्माते, त्यांचा काळ, त्यांचा अर्थ, त्यांचे नेमके प्रयोजन असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा उलगडा करणारा भवताल कट्टा, शुक्रवार ३० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.

  

विषय :

कातळशिल्पांचे गूढ विश्व

 

सहभाग :

सतीश लळित

(कातळशिल्प अभ्यासक / ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे संस्थापक)

साईली पलांडे-दातार

(इतिहास, पुरातत्त्व आणि पर्यावरण विषयांच्या अभ्यासक)

 

शुक्रवार, ३० जून २०२३

सायं. ७ ते ८.३०

 

सहभागासाठी:

झूम लिंक -

http://bitly.ws/JIAM

Meeting ID: 893 9400 5438
Passcode: 273379

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal

 

संपर्कासाठी:

bhavatal@gmail.com


(आपल्या संपर्कातही शेअर करावा, ही विनंती.)


- भवताल टीम


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi