Monday, 27 June 2022

मोकळी

 तिला काय??..ती मोकळीच आहे.!!

सख्यांनो,

तुम्ही असलं काहीतरी बऱ्याचदा ऐकलं असणार...कधी एखादी बहीण बहिणीला तर कधी एखादी नणंद वहिनीला...कधी एखादी सखी आपल्याच एखाद्या सखीला, तर कधी एखादी सासू सुनेला असं बोलत असते...कधी तुम्ही बोलू लागत असणार तर कधी ऐकत असाल...एकूणच काय तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते या विधानाला आपणच असं बोलून दुजोराचं देत असतो...माझ्याबद्दल किंवा इतर कुणाबद्दल असं कुणी काही बोललं तर बोलणाऱ्याचा राग यावा की त्याच्या अल्प बुद्धीची कीव करावी??...विचारशक्तीच्या पलीकडचा विचार..!!

पण मुळात आपण विचारचं का करायचा या सगळ्याचा??...

मुलं मोठी झाली, शिक्षणासाठी बाहेर पडली, मुलीचं लग्न झालं की तिला काय ती मोकळीच आहे म्हणायचं...एखादीचा नवरा अर्ध्यातून तिची साथ सोडून गेला की तिला मोकळी सुटली म्हणायचं...पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी घर सोडून बाहेर पडली की मोकळी झाली म्हणायचं...नवीन सून घरात आली की आता काय मोकळी झाली म्हणायचं...एखाद्या दुःखातून, संकटातून सावरून न डगमगता खंबीरपणे उभी राहिली की तीच डोळ्यात खुपणारं सुखं बघून तिला मोकळी झाली म्हणायचं...सख्यांनो हे कितपत योग्य आहे ग??..."उचलली जीभ लावली टाळ्याला"...असं नसतं गं...प्रत्येकीचं प्रारब्ध वेगळं...प्रत्येकीचं जगणं वेगळं...!!

आणि 

मोकळी म्हणजे काय ग??...चाळिशीनंतर थोडी निवांत होऊन स्वतःसाठी जगते म्हणजे ती मोकळी सुटते का??...मुळात एखादी स्त्री आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मोकळी असते असं म्हणणंच मला मान्य नाही...आयुष्याच्या आणि वयाच्या प्रत्येक वळणावर ती वेगवेगळी जबाबदारी घेऊन जगत असते...हा, जबाबदारीचं ओझं कधी कमी जास्त असू शकतं पण ते ती कधीच झटकत नाही...तीच जगणं सगळं निभावून नेणं हे तिचं कौशल्य आहे त्याची कदर कर...तू नाही तर कोण करणार? एक स्त्री म्हणून तुझ्याइतकं कोणाला हे सगळं समजणार??...एखाद्या सखीला आपण आपल्या मनातील हेवा, मत्सर, द्वेष यापाई 'मोकळी' म्हणणाऱ्यांनी विचार करावा...बाई ग आज तू जात्यात आहेस काल ती होती...आज ती सुपात आहे उद्या तू असशील...जबाबदारीचं ओझं कमी झालं की जगशील की स्वतःसाठी...तोपर्यंत कर मोठ्या मनाने तीच कौतुक...देऊन तिला प्रेरणा वाढवं तिचं बळ...तिच्या जगण्याचा आदर कर...बघ कर प्रयत्न, नक्की जमेल 🙏🏻🙏🏻

 सुप्रभात 🌞

माझ्या एका साधक मित्राने पोस्ट केलेला मेसेज नक्कीच तुमच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न करेल 

श्रीकांत पाटणकर, आनंदाश्रम, खोपोली-

THE ULTIMATE AND PRACTICAL TEACHINGS OF OUR MAULI 🙏🙏🙏

*संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार 😗

*१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.* 

              - *संत ज्ञानेश्वर*

*२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.*

                - *संत ज्ञानेश्वर*

*३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.* 

                 - *संत ज्ञानेश्वर*

*४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.*

                 - *संत ज्ञानेश्वर*

*५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.*

                - *संत ज्ञानेश्वर*

*६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.*

                 - *संत ज्ञानेश्वर*

*७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !*

                 - *संत ज्ञानेश्वर*

*८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.* 

                 - *संत ज्ञानेश्वर*

*९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.*

                - *संत ज्ञानेश्वर*

*१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.*

                 - *संत ज्ञानेश्वर*

    *🙏🏻 जीवनसारांश आपणांस समर्पीत 🙏🏻*

 जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप.

            मुंबई, दि. 27 : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

            महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

            संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

            एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

             शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

            राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

            अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

            ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

0000

देव आहे अंतरी

 *परमेश्वराची योजना.....बोधकथा.*


एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली.

    आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही.

     तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच ते तुझ्या हातातून पाडलं होत.दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत यासाठी उभं राहू दिलं कारण सफरचंद तेव्हा झाडाला होते ते यायला वेळ होता.म्हणून तुला जास्त वेळ वाट पाहावी लागली हे सफरचंद जास्त लाल सुंदर आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे.देवाच बोलणं ऐकून मुलगी आनंदी झाली.

    याचप्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहावी लागत असेलतर देवाची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो,त्याचप्रमाणे देवसुद्धा त्याच्या मुलांना तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे .


मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे

पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी *त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो* आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहिल.


🙏🙏🙏🙏🙏

पाऊले चालती

 पालखी सोहळा लाईव्ह चोरी

पालखी सोहळ्यातील पांढरी टोपी पांढरा शर्ट घातलेला मुलगा निळ्या शर्ट वाल्याची  चैन कशी चोरतो बघा


आरोग्संपन्न

 


यशस्वी

 *✍ज्या पायरीचा सहारा घेऊन*

*आपण पुढची पायरी गाठली आहे*,

*त्या पायरीला कधीच विसरू नये*.

*कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर*

*आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो*…

🙏 *शुभ सकाळ*🙏 lakshvedhimm: लांब उडी , उंच उडी, यशस्वी माणूस मारु शकतो, आपण आपले पाऊले चालती पंढरीची वाट.👏👌

Featured post

Lakshvedhi