Saturday, 16 November 2024

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

 विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत

आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

 

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची ही दुसरी तिसरीचौथीवेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभे पर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांना ही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायस मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ लढा द्यावा लागलेला आहे. ब्रिटनअमेरीकाव इतर अनेक देशांत महिला मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी शंभर ,दिडेश वर्ष लढा देऊन मग तो अधिकार प्राप्त झालेला आहे.

सर्व सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र

 सर्व सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र

         मतदान प्रक्रियेला मतदारांना आकर्षित करणारी असावी यासाठीही राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात वन्यजैवविविधतासांस्कृतिक - सामाजिक वारशाचं दर्शनस्तनदा - गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्रयुवा - दिव्यांग - महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पव्हीलचेअरसहकार्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्थामतदारांसाठी शेड - पिण्याचं पाणीस्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असतील हे पाहिलं जातंय. अभिनव पद्धतीनं मतदारांचं स्वागत करून त्यांचा मतदानाचा अनुभव संस्मरणीय करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी केला जातोय.

    अशा या विविधांगी प्रयत्नांच्या माध्यमातून ९ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मतदारांपर्यंत ज्यात२ कोटी पेक्षा जास्त युवा म्हणजे १८ ते २९ वयोगटातलेही मतदार आहेत आणि वयाची शंभर पूर्ण केलेले ४७ हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्या सर्वांपर्यंत पोहचून सजगजाणकारआणि शिक्षित मतदार घडवण्याचा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा मतदानाच्या दिवसासाठी सज्ज झाली असून आता प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्याची.                                   

एक जिल्हा - एक व्हाट्सअप नंबर

 एक जिल्हा - एक व्हाट्सअप नंबर

            अहिल्यानगर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी एक जिल्हा - एक व्हाट्सअप नंबर हा अभिनव उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमासोबतचजिल्ह्यातील मतदारांसाठी ई-शपथविधीचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहेज्यामध्ये मतदारांना शपथ घेतल्यानंतर क्यू आर कोडच्या माध्यमातून ई-प्रमाणपत्रही दिलं जातंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मध्ये आमची स्वीपची टीम थेट शेतमजुरांपर्यंत पोहचलीसर्व शेतमजुरांनी काम तर बारा महिने चालतंपण मतदानाच्या दिवशी आम्ही नक्की मतदान करणार असा संकल्प व्यक्त केला आहे. या अशा प्रयत्नांसोबतच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरूनही मतदार जागृती केली जातेमतदार जागृतीच्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जातेय. समाजमाध्यमांवरून सेलिब्रिटीसमाजातील प्रभावी व्यक्तिमत्वांची आवाहनं प्रसिद्ध केली जात आहेत.

जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणाकडूनही मतदार जनजागृतीसाठी उपक्रम

 जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणाकडूनही मतदार जनजागृतीसाठी उपक्रम

      राज्यात प्रत्येक जिल्ह्याची निवडणूक यंत्रणाही स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्रपणे मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवते आहे. घरोघरी भेटीरांगोळ्यामानवी साखळ्याप्रभात फेऱ्यापथनाट्यसायकल - बाईक रॅलीमॅरेथॉनमतदारांना शपथसंकल्पपत्रविविध स्पर्धासण साजरे करण्याच्या निमित्तानं मतदारजागृतीपर उपक्रम सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मतदारांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमार्फत अभिरुप मतदान केंद्रांची तालीम आयोजित करण्यात आली. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला.

           लातूर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अभंगगवळणीभारुडगोंधळगीतपोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जातोय. तिथे १२१ शाळांच्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारापेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलंय. सांगलीत शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी दस्तऐवजांवरबँकांच्या व्यवहार पावत्यांवर मदानाच्या तारखेचं स्मरण करून देणारा शिक्का वापरून मतदार जनजागृती केली जातेय. जळगाव जिल्ह्यातएकाच वेळी तब्बल १३३३ ग्रामपंचायतींमध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सव्वा लाखापेक्षा अधिक मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली तर दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी संकल्पपत्र भरले.

राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम

 राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम                                 

       मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं भारत निवडणूक आयोगाच्या 'स्वीपकार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मतदारजागृती उपक्रमांचा प्रारंभही झाला. मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाचं सादरीकरणनिवडणूक गीताचं सादरीकरण - त्यावरचं नृत्यटपाल विभागाकडून विशेष पाकीट - शिक्क्याचं अनावरणमतदारांना प्रतिज्ञाअसे उपक्रम राबवले. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छादूत निलेश सिंगीतराज्याच्या निवडणूक गीताचे संगितकार गायक मिलिंद इंगळेगायक राहुल सक्सेनारॅपर सुबोध जाधवक्रिकेटपटू अजिंक्य रहाणेअभिनेत्री वर्षा उसगांवकर,  दिग्दर्शक रोहित शेट्टीअभिनेत्री अनन्या पांडेहास्य कलाकार भारती सिंगहर्ष लिंबाचियाअभिनेते मनोज जोशीअभिनेता बजाज आनंदअभिनेत्री सोनाली खरेअभिनेता अली असगर यांच्यासह सामाजिक आणि कला क्षेत्रातल्या अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदारांना आपला मताधिकार बजावण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमातच, केंद्रीय संचार ब्यूरोच्या प्रादेशिक कार्यालयाच्या फिरत्या मतदार जनजागृती वाहनालाही हिरवा झेंडा दाखवला गेला. हे फिरत वाहन राज्यातील मतदानाचं अल्प प्रमाण असलेल्या १५ जिल्हे आणि १३३ मतदारसंघांमध्ये जनजागृती करत आहे. या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियामतदान केंद्राचं ठिकाण समजून घेणंआदर्श आचारसंहिताआचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीउमेदवारांविषयी जाणून घेणं याविषयी मतदार जागृती केली जातेय.

मल्टिमिडीयाचा वापर

 मल्टिमिडीयाचा वापर

        स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला जात आहे. यात मल्टिमीडियाचा प्रभावी वापर आणि थेट जनसंपर्क अशा दोन्ही पद्धतींचा समावेश आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अठरावं वरीस मोक्याचंइथे सगळी बोटे सारखी आहेतमधाच्या बोटाला बळी पडू नकानिर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा, अशा आकर्षक संदेशांचा वापर केला जातोय. हे संदेश शासकीय आणि नागरी सेवांच्या सहकार्यानं राज्यभर पोहोचवले जात आहेत. राज्यातली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाची ८०० होर्डिंगवाहतूक कार्यालयाच्या राज्यभरातील शाखांमधील होर्डिंगराज्यभरातील महानगरपालिकांचे ३ हजारांपेक्षा जास्त डिजीटल डिस्प्लेसार्वजनिक बस सेवा पुरवणाऱ्या १००० पेक्षा जास्त बस आणि १५०० पेक्षा जास्त इतर वाहने११०० पेक्षा जास्त बस स्थानकं, सुमारे ५ हजार स्वच्छता वाहनांवरून होत असलेल्या घोषणामध्य आणि पश्चिम रेल्वे तसंच मेट्रो रेल्वे सेवेद्वारा रेल्वेगाड्यांमधल्या घोषणा - फलाटांवरील जाहिरातींचे डिस्प्ले इतकी याची व्याप्ती मोठी आहे. इतकंच नाही तर महानगर - टाटा पॉवर - बेस्ट वीज सेवा यांच्याद्वारे २० लाखांपेक्षा जास्त देयकांवर तसंच राज्य भरातील महानगर पालिकांनी पाठवलेल्या ८ लाख मालमत्ता करांच्या देयकांवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात स्वरुप संदेशांमधून, राज्यभरातील लाखो कुटुंब म्हणजे कोट्यवधी मतदारांपर्यंत मतदान करण्याचं आवाहन थेट पोहचत आहे.

मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर

 मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद

निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर

        राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

           लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या निवडणुकांत राज्याची मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. यावेळी नंदूरबार जिल्ह्यात ७२.९४ टक्केकोल्हापूर मध्ये ७१.७८ टक्के  गडचिरोली मध्ये ७०.५५ टक्के मतदान झाले तर मुंबई शहर राज्यात सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा असून या जिल्ह्यात ५१ टक्के इतके कमी मतदान झाले होते. राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघमुंबई उपनगर जिल्ह्यातील कलिना मतदारसंघठाणे जिल्ह्यातील अंबरनाथपुणे येथील पुणे  छावणी (कंटोनमेंट) येथे सर्वात कमी मतदान झाले होते. मतदान कमी असलेल्या जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी प्रशासन विविध जनजागृतीवर भर देत आहे.

स्वीप उपक्रमामुळे मतदानात वाढ

              'स्वीपया उपक्रमामुळे तृतीय पंथीय मतदारांची २०१९ मध्ये २५९३ इतक्या संख्येवरून ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ५९४४ इतकी नोंद झाली आहे. त्याचबरोबर युवा मतदारांची निवडणूक प्रक्रियेत अधिक सक्रिय होण्यासाठी निवडणूक प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे त्यामुळे युवा मतदारांचीही मोठ्या संख्येतही वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यात विविध स्वीपच्या उपक्रमांमुळे  २०१९ च्या विधानसभा निवडणुकात ६०.३६ टक्के, सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत ६३.५८ टक्के इतके मतदान झाले. नाशिक जिल्ह्यात देखील मतदान जनजागृतीमुळे ६१.७४ टक्केवरून गेल्या लोकसभेत ६४.२१ टक्के इतके मतदान झाले आहे.                                                         

Featured post

Lakshvedhi