Saturday, 12 February 2022

 सर्व बांधवांना नम्र व आग्रहाची विनंती की यंदाच्या शिवजयंतीपासून एक प्रथा पाडून घेऊ... ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतोत्याचप्रमाणे या वर्षापासून शिवजयंतीला आपन आपल्या घरी दिवे लावावे... 🎐🏮व घरावर 🚩भगवा झेंडा लावावा.घराबाहेर रांगोळी काढावी,जेणेकरुन शिवजयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पीढीस कळेल तसेच १९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता महाराष्ट्रातील एक सण व्हावा ... हा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना पाठवा तसेच गावात व परिवारात ही प्रथा पाडा... ही आपणास आग्रहाची विनंती... जय जिजाऊ जय शिवराय ..🚩🚩🚩🚩 

एक शिवभक्त....🙏🚩

संस्कृती

 


Friday, 11 February 2022

 जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल -

मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार


मधुकर भावे - माहितीपूर्ण लेख

आॕगस्ट-सप्टेंबर २०२० च्या २ महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ. पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा १ विपरीत परिणाम माझ्या कंबरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझं दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालणं असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता, मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, MRI झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखणं थांबेना. वेदना असह्य झाल्यावर दुखणं बर होत नाही असं जाणवल्यावर निराशा येत गेली. 

त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते. डॉक्टरांनी मणक्याचे ऑपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे?‌ काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे २ मित्र श्री.किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री.अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझं दुखणं पाहून त्यांनी सुचवलं की, "जोधपुरला चला" असं सांगायलाच आलो आहोत. 

दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी १० मिनीटांची त्यांची जादू करुन तर बघा.

४ डॉक्टर झाले होते, ४ प्रयोग झाले होते. ५ वा प्रयोग करूया असं म्हणून जोधपूरला निघालो. सोबत माझी सुविद्य कन्या डॉ.मृदूला (एम.एस. एफ.आर.सी.एस) ही सुध्दा होती. विमानात बसताना पायऱ्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअर वरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली. पुढे काय होणार माहित नव्हते. ४० मिनिटात

डॉ. पराशर यांच्या ‘आॕस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. 

त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदू, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ. महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाच वाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात. ज्या रुग्णांना कंबरेला विळखा घालून उचलून आणलेले असते. अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळ पास रडत रडतच येतात आणि १० मिनिटांच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात. ते सर्व मी बघत होतो. 

डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले, "आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।" मी ऐकत होतो. पाचवा प्रयोग आहे असंच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करून कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते. मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या ५ मिनिटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या ५ मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, "चलो उठो. आप खुद चल के जा सकते हो।" मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालंय मलाच समजेना. आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला. नियती काय घडवतं असते त्याचा अनुभव करत होतो. डॉक्टर साहेबांजवळ येऊन बसलो. "कैसा महसूस कर रहे हो?", त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, "विश्वास बसत नाही असं काहीतरी घडलं आहे." 

पुराणामध्ये एक कथा आहे की, भगवान श्रीकृष्णांनी एका करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता... मोठी रोचक कथा आहे. त्याचे मित्र असलेले पेंदे काठ्या टेकून उभे होते, पर्वत उचलला होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर, ते बघायला कुणीच गेल नाही. पण माझ्यासमोरच्या डॉक्टरांनी हाताच्या २ अंगठयावर हजारो रुग्णांची व्यथा, पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठ्याची कमाल आहे. सेवेची आणि ऑस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.

डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोटऱ्या एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टर साहेबांकडे कोण कोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळं वाचून थक्क झाले. 

या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव... लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग चक्क ६ दिवस दाखलच झाले होते.या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८-५ संध्याकाळी जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेह-यावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-.

आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली,सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली,५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात मग नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, "मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या." 

मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं? "मुकेशभाई,आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेल से भी उपर के लेवल का होगा। जाहीर है की ऐसे संस्थान मे मैं गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मैं विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी जहा गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे मेरी विद्या किस काम की?"

डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा, सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो. ६ दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे २ अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की, "डॉक्टरसाहब, आपका तहे दिलसे ऋणी हूँ। आज मुंबई जा रहा हूँ। जोधपूर के २ अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्ट्र मे बजाने की मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा."

मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्ट्र भर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे,नागपूर या २-३ ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे.नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया.

Jodhpur Dr. Gowardhanlal Parashar

Osteopathy Center, Shree Sonwarlal Osteopathy Chartable

कार्यालय : +91 84260 72222

Phone : +91 291 297 2777

घर : +91 291 262 2888

Personal drparashar@rediffmail.com


घर

18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan, 342008. From my brilliant friend Shri Lakman Dhoot.. Fabulous, affordable treatment, so circulate among all known and Earn blessings 👍👌🙏

 ‘दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे

- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

          मुंबई, दि. 11 : आपल्या संविधानानुसार, 'आम्ही भारताचे लोक' हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्‍गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

  या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, व इतर मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद म्हणाले, राजभवनात कोणतीही वैयक्तिक किंवा कोणतीही गोपनीय बाब नाही. जे काही घडते ते सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांसोबत, सार्वजनिकपणे पारदर्शकपणे, लोकसेवकांकडून जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा प्रकारे हे नवे दरबार हॉल नव्या संदर्भातील आपल्या नव्या भारताचे, नव्या महाराष्ट्राचे आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे नवे प्रतीक आहे.

राजभवनाच्या या दरबार हॉलमध्ये मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोरारजी देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता अशी आठवण यावेळी राष्ट्रपतींनी जागविली. भारताचे माजी पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांच्याकडे मला त्यांचे स्वीय सचिव म्हणुन काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान राज्य असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या महानतेला अनेक परिमाण आहेत. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांचीच नावे मोजली तरी यादी संपणार नाही. शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराष्ट्राच्या महानतेचा असा अफाट प्रवाह दिसतो.

यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली, मात्र यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय. असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. त्याच्यासारखी महान प्रतिभावान गायिका शतकात एकदाच जन्माला येतात. लताजींचे संगीत अमर आहे, जे सर्व संगीत प्रेमींना नेहमीच मंत्रमुग्ध करेल. यासोबतच त्यांच्या साधेपणाची आणि सौम्य स्वभावाची आठवणही लोकांच्या मनावर उमटणार आहे. मला व्यक्तिश: त्यांचा स्नेह मिळाला. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे श्री कोविंद म्हणाले.

राजभवन हे जनता भवन व्हावे

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

तिन्ही बाजूनी समुद्रानी वेढलेल्या या राजभवनवर बाणगंगेचे, मुंबादेवीचे आणि सिद्धीविनायकाचे आशिर्वाद आहेत. राजभवन हे जनता भवन व्हावे. अशी इच्छा व्यक्त करुन राज्यपाल म्हणाले, राजभवन उभे रहावे यासाठी रात्रं दिवस कार्य करणाऱ्या मजूरांचे विशेष योगदान आहे. राज्यपाल म्हणून मला मिळालेल्या अधिकारात राहून मी जनतेच्या भल्याचे कार्य करण्याचा प्रयत्न करित आहे. वनजमिनीसंदर्भातील अपील करण्यासाठीचा अधिकार आधी जिल्हाधिकारी यांनाच होता आता तो अधिकार आयुक्तांकडे देण्यात आला. यामुळे हजारो लोकांना न्याय देता आला.

कोविड काळात उत्तम कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा राजभवनमध्ये सत्कार करण्याचे सौभाग्य मला लाभले. सुमारे पाच हजार लोकांचा या दरम्यान सत्कार करण्यात आला. यात विद्यार्थी, नर्स, अधिकारी, अभिनेते, स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करता आले हा मी माझा सन्मान समजतो.

मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

       एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. देशातील हे सर्वोत्तम राजभवन आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले<s

 मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे


प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीm

             मुंबई, दि. ११: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीमार्फत जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

            ज्या अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी शैक्षणिक व सेवा विषयक प्रस्ताव सादर केलेला आहे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीकडे ज्या अर्जदारांचे जात प्रस्ताव अद्यापही कागदपत्रे, पुराव्या अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व अर्जदारांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत समितीकडून कळविण्यात आलेले आहे.ज्या अर्जदारांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता न केल्याने प्रकरणे प्रलंबित आहेत.अशा प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

            प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत त्रुटीपूर्तता करण्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत त्रुटींची पूर्तता केली जाणार नाही अशी सर्व प्रकरणे फेब्रुवारी २०२२ अखेर बंद करण्यात येतील. तसेच संबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने प्रस्ताव सादर करावा लागेल.तरी विहित कालावधीमध्ये संबंधित अर्जदारांनी त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.        

                            *अलिबाग*

रायगडमध्ये समुद्रकिनारी वसलेले एक ऐतिहासिक व निसर्गरम्य शहर म्हणजे *अलिबाग*....जिथला इतिहास व निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी दर आठवड्याला हजारो पर्यटक भेट देतात.

ज्या शहरात.... *हिरकोट किल्ला* व *कुलाबा किल्ला* आहे.

शिवराज्याभिषेकासाठी महाराजांची हिंदवी स्वराजची राजधानी असलेल्या रायगडची राजधानी *अलिबाग* आहे.

शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख असलेले *कान्होजी आंग्रे*,सुप्रसिद्ध मूर्तिकार *पद्मभूषण विनायक करमरकर*,*महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी*,थोर समाज सुधारक *पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी*, भारताचे माजी *सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य* भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे वडील *रमेश तेंडुलकरांसारखे* दिगज्ज ज्या मातीने दिले ते *अलिबाग*.

    *कान्होजी आंग्रे* आमची शान आहेत 

    *शिवकालीन बालाजी मंदिर* आमचे देवस्थान आहे.

    *बैलांची व घोड्यांची शर्यत* आमचा नाद आहे.

     *कबड्डी* आमच्या रक्तात आहे

    जिल्ह्यात *पहिल्या रिक्षा आल्या* ते शहर *अलिबाग* आहे.

    जिल्ह्यातील पहिला *छापखाना* आला ते शहर *अलिबाग* आहे

ब्रिटिशांनी बांधलेले *लाइटहाऊस* ज्या समुद्रात आहे ते शहर *अलिबाग* आहे.

*पापा भाई पठाण* या मुस्लिम बांधवाने *सार्वजनिक गणपतीची* स्थापना करून *हिंदू-मुस्लिम एकतेचा* धडा शिकवला ते शहर *अलिबाग* आहे.

जिथे एकही *दंगलीची* नोंद नाही ते शहर *अलिबाग* आहे.

जगाला इंटरनेटने जोडण्यासाठी जगातील २६ वेधशाळांचा वापर केला गेला त्यातील एक वेधशाळा *अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा* व मुंबईची कुलाबा वेधशाळा होती. त्यामुळे भारतातील पहिले इंटरनेट आले ते शहर मुंबईसोबतच *अलिबाग* आहे.

*कुलाबा*, *हिरकोट*, *सागरगड*, *खान्देरी*, *उंदेरी* आणि *आगरकोट* असे सहा किल्ले असणारा तालुका *अलिबाग* आहे.

*लोकमान्य टिळक*, *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*, *साने गुरुजी*, *महात्मा गांधी* यांच्या *पदस्पर्शाने* पावन झालेली भूमी *अलिबाग* आहे.

 ज्यावेळी रोहा, उरण, मुरुड आणि कर्जत ला एसटी नव्हत्या त्यावेळी त्यांना एसटी सेवा पुरवणारा डेपो *अलिबाग* आहे.

जिल्ह्यातली सर्वात जुनी *153 वर्षाची* 1864 साली स्थापन झालेली *नगरपालिका अलिबाग* आहे.

ज्या *कनकेश्वर* डोंगरावरून मुंबई दिसते त्या कनकेश्वर डोंगराचा तालुका *अलिबाग* आहे.

तुम्ही तर म्हणाल *अलिबाग* हे फक्त *ऐतिहासीक शहर* आहे पण अस नाही पण *अलिबाग* आजही *इतिहास* रचत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणारे व *उद्याची मुंबई* म्हणून ओळखले जाणारे शहर हे *अलिबाग* आहे.

*आदेश बांदेकर*, जय मल्हार मधील खंडोबाची भूमिका साकारणारे *देवदत्त नागे*, सारेगमप लिटील चॅम्पस मधील *मुग्धा वैशंपायन*, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज मधील *सई कांबळे* अश्या कित्येक कलाकारांचे शहर *अलिबाग* आहे.

*सचिन तेंडुलकर*, *रवी शास्त्री* व बॉलीवूड किंग *शाहरूख खान* अश्या कित्येक दिग्गजांचे बंगले असणारे शहर *अलिबाग* आहे.

जिथून मुंबई ला बोटनी जायला 45:00 मिनिटे लागतात त्या मांडवा जेट्टीचा तालुका *अलिबाग* आहे.

जिथल्या *नारळी-पोफळ्यांची झाडं*, *समुद्रकिनारा* याची भुरळ पर्यटकांना पडते व जिथल्या *ताज्या मच्छिवर* पर्यटक ताव मारतात ते शहर *अलिबाग* आहे.

इथे *सर्व जाती धर्माचे* लोक गुण्या गोविंदाने राहतात. 

इथे *हुंडा* घेत नाही व देत नाही.

इथे शेतकरी *आत्महत्या* करत नही.

इथली लोक *परिपूर्ण व समाधानी* आहेत.

म्हणून *आमचा अलिबाग तालुका* खास आहे

आणि *अलिबागकर* असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

ज्याप्रमाणे समुद्रातील शंख किनाऱ्यापासून कितीही लांब नेला तरी त्यात लाटांचा आवाज राहतो।

त्याच प्रमाणे पर्यटक *अलिबाग* पासून कितीही दूर गेले तरी *अलिबागची* निसर्गरम्यता त्यांच्या हृदयात साठून राहते।

वेलकम, क्षणभर विश्रांती, अशा अनेक चित्रपटांची शूटिंग केली गेली व आज हि केली जात आहे ते शहर *अलिबाग* आहे.

इतकं सगळं असूनही जर कोणी *अलिबाग से आया क्या* बोलणार असेल तर मी अभिमानाने सांगतो... *होय मी अलिबागहुन आलो आहे*.

       "आम्ही बागेत घरे उभी केली व

         शहर वसविले...

         इतरांना तर शहरात बाग

         लागते. हीच आमची खासियत."

Samarth

 एक व्यक्ती नेहमी 'श्री स्वामी समर्थ' नामाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्यास शौच, स्नानासाठी जावे लागे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे.

हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे जर आला तर फार उशीरा. त्यामुळे कधी कधी अंथरुन घाण होई, त्यावरच दिवस घालवावा लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. 

एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौच-स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरूणावर आणून झोपवले. असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यास संशय येतो की, आधी जेव्हा मी अनेकवेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता. पण आता एका अावाजात मुलगा कसा येतो.? आणि मला शौच-स्नानास घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की, "खरे सांग तु कोण आहेस ? कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही." तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रुप दाखवले. तेंव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली, "हे स्वामीराया, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता.... स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या.!"

तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की, "तू जे भोगत आहे ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस. नित्य माझे नाम जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे." 

स्वामीराया स्वतः म्हणतात, "माझी कृपा सर्वोपरि आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. हाच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म-मरणातून तुला मुक्ती द्यायची आहे."

स्वामी महाराज म्हणतात, "प्रारब्ध तीन प्रकारचे आहेत...

१)मंद

२)तीव्र

३)तीव्रतम

* 'मंद प्रारब्ध' माझे नाम जपल्याने संपवता येते.

* 'तीव्र प्रारब्ध' हे खऱ्या संताच्या सान्निध्यात राहून श्रद्धा

आणि विश्वासाने माझे नामाचा जप करुन संपवता येते.

* 'तीव्रतम प्रारब्ध' मात्र भोगावेच लागते.

पण जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः बरोबर राहून त्याचे प्रारब्ध मी संपवतो, त्याला याचा त्रास होऊ देत नाही. प्रारब्ध आधी रचले काय नंतर रचले काय ? मी कशाला चिंता करु, फक्त 'श्री स्वामी समर्थ' नाम जपत राहायचे.....

🙏।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🙏

Featured post

Lakshvedhi