सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 2 February 2025
नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-*
*नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-*
देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?
हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते. रात्री झोपताना देशी तुपाचे फक्त 2 थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात...
*नाकात तूप सोडण्याचे फायदे:-*
*👉🏽त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी*
वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो. यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.
*👉🏽डोळ्यांसाठी उत्तम आरोग्यासाठी*
जेव्हा तुम्ही गाईचे तूप नाकात घालता तेव्हा ते डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात घाला.
*👉🏽केस गळणे थांबवण्यासाठी*
तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात. तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घाला.
*👉🏽स्मरणशक्ती साठी*
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नाकातील तूप फायदेशीर आहे. तुपाचे दोन थेंब नाकात घाला.
*👉🏽डोकेदुखीमध्ये*
जर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनने त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.
*इतर फायदे -*
- रात्री झोपण्यापूर्वी तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने निद्रानाशाची समस्या संपते.
- तूप ओतल्याने नाकाचा कोरडेपणा संपतो.
- नाकात तूप सोडल्याने एखाद्या व्यक्तीला कोमामधून उठवण्यास मदत होते.
- कफाची समस्या दूर होते.
- नाकात तूप टाकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.
- यामुळे कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.
*नाकात तूप सोडण्याचे तोटे-*
गायीच्या तुपाचे काही थेंब(प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही गंभीर नुकसान होत नाही. यासाठी तुम्ही फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे. जर तुम्हाला तुपाच्या वासाने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर ते वापरू नये.
टीप- वरील कुठलाही प्रयोग करण्याआधी वैद्यांचा सल्ला घ्या.
*टीप - आपल्या कडील देशी गिरगाईचे (A2) अस्सल गावरान चुलीवर बनवलेले तूप ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा*
*)
**
आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*
*आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*
1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी
अनुलोमीलम 15 मी
कपालभाती 15 मी
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा
आरोग्य संवाद
स्वतः साठी एवढं तरी करा
१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.
२) भरपूर टाळ्या वाजवा.
३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.
https://chat.whatsapp.com/JLhphNEF1JuCbKGAZ0RQ3p
४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )
५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.
६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )
७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.
८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.
९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.
१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.
११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.
१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.
१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.
१४) चौरस आहार घ्या.
१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.
१६) Black Tea च प्या.
१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.
१८) ध्यानधारणा करा.
१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.
२०) सत्य बोला. समाजसेवा करा.
२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.
२२) *नैसर्गिक जीवन जगा.*
२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.
२४) पोट साफ ठेवणे.
२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.
*आरोग्य संदेश*
सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,
हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक
केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
*उपाय*
कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर दुखी
*उपाय*
१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.
२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) हलका मसाज करा.
५) बर्फाने शेकवा.
६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.
७) नियमित प्राणायाम करा.
८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.
९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.
११) पोट साफ राहू द्या.
१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.
आरोग्य संदेश
व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,
माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.
मान दुखी - - - - -
कारणे -----
जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.
*उपाय -----*
१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )
२) हळद + चंदन लेप द्या.
३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.
४) कोमटच पाणी प्या.
५) सुंठ उगाळून लेप द्या.
६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.
७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.
८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.
९) वरील योग्य तेच उपाय करा.
आरोग्य संदेश
निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.
गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*
ध्यान म्हणजे काय?
ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.
डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.
ध्यानाचे फायदे
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.
स्मरणशक्ती वाढते
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते.
🧘♀️🧘♂️🧎♀️🧎♂️
*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️ *🔸माघी गणेश जयंती-३🔸* *---------------------------------------------* *🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.* *---------------------------------------------* *🟣०१/०२/२०२५- गणेश जयंती...🙏* *गणेश जयंती (शब्दशः "गणेशाचा वाढदिवस"), ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी, आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात... हा एक हिंदू सण आहे. या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषत: भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यात ग्रेगोरियन कॅलेंडरशी संबंधित असलेल्या हिंदू कॅलेंडरनुसार माघा महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी (उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र ) साजरा केला जातो.....* *गणेशाचा जन्मदिवस...* *गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय, जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट/सप्टेंबर ( भाद्रपद हिंदू महिना) मध्ये साजरा केला जातो... एका परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते.....* *उत्सवाच्या दिवशी, गणेशाची प्रतिमा, प्रतिकात्मक शंकूच्या स्वरूपात हळद किंवा सिंधूर पावडर किंवा काही वेळा गोबरापासून बनविली जाते आणि पूजा केली जाते... नंतर उत्सवानंतर चौथ्या दिवशी पाण्यात विसर्जित केले जाते. तिळ ( तीळ ) बनवलेली विशेष तयारी गणेशाला अर्पण केली जाते आणि नंतर भक्तांना खाण्यासाठी प्रसाद म्हणून वाटली जाते. दिवसा उपासनेदरम्यान उपवास पाळला जातो आणि त्यानंतर रात्री विधींचा एक भाग म्हणून मेजवानी केली जाते.....* *या दिवशी उपवास करण्याव्यतिरिक्त, गणेशाच्या ("विनायक" म्हणून ओळखले जाणारे) पूजाविधी पाळण्यापूर्वी, भक्त त्यांच्या अंगावर तिळ (तीळ) ची पेस्ट लावल्यानंतर तिळमिश्रित पाण्याने स्नान करतात... व्यक्तीचे नाव आणि कीर्ती वाढवण्यासाठी या दिवशी व्रत केले जाते.....* *जरी गणेशाला उत्तर प्रदेशात ब्रह्मचारी देव मानले जाते (इतर ठिकाणी त्याला "विवाहित" मानले जाते), परंतु गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने, जोडपे पुत्रप्राप्तीसाठी त्याची पूजा करतात.....* *गणेश जयंतीला, मोरगाव , पुणे जिल्हा, महाराष्ट्रातील मोरेश्वर मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात... हे मंदिर अष्टविनायक नावाच्या आठ पूज्य गणेश मंदिरांच्या यात्रेचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू आहे. अशी आख्यायिका आहे की गणेशाने या ठिकाणी मोरावर स्वार होऊन कमलासुर या राक्षसाचा वध केला (संस्कृतमध्ये मयुरा, मराठीत - मोरा ) आणि म्हणून त्याला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर ("मोराचा देव") म्हणून ओळखले जाते.....* *अष्टविनायक सर्किटवरील आणखी एक मंदिर म्हणजे सिद्धटेक... अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र येथील सिद्धिविनायक मंदिर. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात मोठी गर्दी होते. भीमा नदीच्या पूर्वेला असलेल्या या प्राचीन मंदिरात - गणेशाची मूर्ती आहे, ज्यामध्ये त्यांची पत्नी सिद्धी यांच्या बाजूने ओलांडलेल्या पायात बसलेली आहे. गणेशाची प्रतिमा भगव्या पेस्टने सुशोभित केलेली आहे आणि तिची सोंड उजवीकडे वळलेली आहे, जे दुर्मिळ चित्रण मानले जाते. अशाप्रकारे, हे अत्यंत श्रद्धेने आयोजित केले जाते आणि देवतेला संतुष्ट करण्यासाठी धार्मिक नवसांचा कडक संच पाळला जातो. गणेशाची कृपा मिळविण्यासाठी भाविक खडबडीत डोंगराळ प्रदेशात सात वेळा टेकडीची प्रदक्षिणा (प्रदक्षिणा) करतात . पौराणिक कथा सांगते की देव विष्णूने मधु-कैतभ या राक्षसांना मारण्याआधी या ठिकाणी गणेशाचे आशीर्वाद घेतले आणि त्यांची निराशा दूर केली.....* *कोकण किनाऱ्यावर गणपतीपुळे येथे
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*🔸माघी गणेश जयंती-३🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*🟣०१/०२/२०२५- गणेश जयंती...🙏*
*गणेश जयंती (शब्दशः "गणेशाचा वाढदिवस"), ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी, आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात... हा एक हिंदू सण आहे. या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषत: भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यात ग्रेगोरियन कॅलेंडरशी संबंधित असलेल्या हिंदू कॅलेंडरनुसार माघा महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी (उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र ) साजरा केला जातो.....*
*गणेशाचा जन्मदिवस...*
*गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय, जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट/सप्टेंबर ( भाद्रपद हिंदू महिना) मध्ये साजरा केला जातो... एका परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते.....*
*उत्सवाच्या दिवशी, गणेशाची प्रतिमा, प्रतिकात्मक शंकूच्या स्वरूपात हळद किंवा सिंधूर पावडर किंवा काही वेळा गोबरापासून बनविली जाते आणि पूजा केली जाते... नंतर उत्सवानंतर चौथ्या दिवशी पाण्यात विसर्जित केले जाते. तिळ ( तीळ ) बनवलेली विशेष तयारी गणेशाला अर्पण केली जाते आणि नंतर भक्तांना खाण्यासाठी प्रसाद म्हणून वाटली जाते. दिवसा उपासनेदरम्यान उपवास पाळला जातो आणि त्यानंतर रात्री विधींचा एक भाग म्हणून मेजवानी केली जाते.....*
*या दिवशी उपवास करण्याव्यतिरिक्त, गणेशाच्या ("विनायक" म्हणून ओळखले जाणारे) पूजाविधी पाळण्यापूर्वी, भक्त त्यांच्या अंगावर तिळ (तीळ) ची पेस्ट लावल्यानंतर तिळमिश्रित पाण्याने स्नान करतात... व्यक्तीचे नाव आणि कीर्ती वाढवण्यासाठी या दिवशी व्रत केले जाते.....*
*जरी गणेशाला उत्तर प्रदेशात ब्रह्मचारी देव मानले जाते (इतर ठिकाणी त्याला "विवाहित" मानले जाते), परंतु गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने, जोडपे पुत्रप्राप्तीसाठी त्याची पूजा करतात.....*
*गणेश जयंतीला, मोरगाव , पुणे जिल्हा, महाराष्ट्रातील मोरेश्वर मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात... हे मंदिर अष्टविनायक नावाच्या आठ पूज्य गणेश मंदिरांच्या यात्रेचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू आहे. अशी आख्यायिका आहे की गणेशाने या ठिकाणी मोरावर स्वार होऊन कमलासुर या राक्षसाचा वध केला (संस्कृतमध्ये मयुरा, मराठीत - मोरा ) आणि म्हणून त्याला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर ("मोराचा देव") म्हणून ओळखले जाते.....*
*अष्टविनायक सर्किटवरील आणखी एक मंदिर म्हणजे सिद्धटेक... अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र येथील सिद्धिविनायक मंदिर. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात मोठी गर्दी होते. भीमा नदीच्या पूर्वेला असलेल्या या प्राचीन मंदिरात - गणेशाची मूर्ती आहे, ज्यामध्ये त्यांची पत्नी सिद्धी यांच्या बाजूने ओलांडलेल्या पायात बसलेली आहे. गणेशाची प्रतिमा भगव्या पेस्टने सुशोभित केलेली आहे आणि तिची सोंड उजवीकडे वळलेली आहे, जे दुर्मिळ चित्रण मानले जाते. अशाप्रकारे, हे अत्यंत श्रद्धेने आयोजित केले जाते आणि देवतेला संतुष्ट करण्यासाठी धार्मिक नवसांचा कडक संच पाळला जातो. गणेशाची कृपा मिळविण्यासाठी भाविक खडबडीत डोंगराळ प्रदेशात सात वेळा टेकडीची प्रदक्षिणा (प्रदक्षिणा) करतात . पौराणिक कथा सांगते की देव विष्णूने मधु-कैतभ या राक्षसांना मारण्याआधी या ठिकाणी गणेशाचे आशीर्वाद घेतले आणि त्यांची निराशा दूर केली.....*
*कोकण किनाऱ्यावर गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावरील मंदिरात गणेशाची स्वयंभू (स्वयं-प्रकट) मूर्ती आहे, जी दरवर्षी हजारो भक्तांद्वारे पुजली जाते आणि भेट दिली जाते... या मंदिरातील गणेशाला पश्चिम द्वारदेवता ("भारताचा पाश्चात्य देवता") म्हणून ओळखले जाते. या कोकण किनारी मंदिरात गणेश जयंतीही साजरी केली जाते.....*
*स्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
जय श्रीराम..... सत्यकथा....
🥀जय श्रीराम.....
सत्यकथा....
अयोध्येतील गोष्ट. एक संत अयोध्येत श्री रामायण कथा करीत होते. दररोज एक तास असं यांचं प्रवचन होत असे. यासाठी मोठी गर्दी जमत असे. लोकं अगदी आनंदाने तल्लीन होत ही रामकथा ऐकत असत.
या संत महोदयांचा एक नियम होता. दररोज कथा सुरू करण्याआधी ते, "या हनुमंत जी स्थानापन्न व्हा" असं म्हणून हनुमानाचं आवाहन करीत आणि मग एक तास प्रवचन करीत असत.
ही श्री रामकथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा. हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंगती शिरजोर झाली. त्याला वाटलं की हे महाराज रोज "या हनुमानजी स्थानापन्न व्हा" असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील ! हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच, "महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का ?"
यावर ते साधुमहाराज म्हणाले, नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार.
यावर तो वकील म्हणाला, महाराज, हे असं नुसतंच म्हणून चालणार नाही. हनुमानजी इथे येतात, याचं कुठलंतरी प्रमाण द्या. तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहात, चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुमच्यासमोर स्वतः हनुमानजी उपस्थित आहेत हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करीत आहात. तुम्हाला हे सिद्ध करावेच लागेल की हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात.
वकिलाला या महाराजांनी खूप समजावलं. *आस्था हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. हा भक्त आणि भगवान यातील प्रेमरस आहे. यात साक्ष, प्रमाण देणे या गोष्टी आणणं चुकीचं आहे*. यावर ते महाराज हे ही म्हणाले की, जर तुम्ही म्हणत असाल तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा.
महाराज समजावत राहिले पण वकिलाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. तो म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करीत आहात. तुम्ही हीच गोष्ट बाकी ठिकाणी पण करीत असणार. त्यामुळे हनुमानजी कथा ऐकायला येतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावेच लागेल.
दोघांमधला हा वाद खूप वाढला, अगदी विकोपाला गेला. शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि म्हणाले, हनुमानजी इथे येतात की नाही, हे उद्या मी सिद्ध करून दाखवीन. उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग करीन. ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो, ती गादी तुम्ही आज तुमच्या घरी घेऊन जा. उद्या येताना गादी बरोबर घेऊन या. मग मी तुमच्यासमोरच गादी आसनावर ठेवीन आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलावीन. मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा. जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली, तर समजा की हनुमानजी इथे नाहीयेत.
यासाठी वकील तयार झाला. महाराज पुढे म्हणाले की, दोघांपैकी जो पराजित होईल तो काय करणार ? हे ही ठरवा. कारण ही शेवटी सत्याची परीक्षा आहे.
यावर वकील म्हणाला की मी जर गादी उंचावू शकलो नाही तर मी माझी वकिली सोडून देईन आणि तुमच्याकडून दीक्षा घेईन.
पण जर तुम्ही पराजित झालात तर तुम्ही काय कराल ?
यावर तो साधू म्हणाला, मी कथावाचन सोडून तुझ्या कार्यालयाचा शिपाई होईन.
दुसर्या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली. जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते ते ही भगवंताची भक्ती, विश्वास, प्रेम याची परीक्षा बघायला तिथे आले. प्रवचनाची जागा तुडुंब भरली. साधू महाराज आणि वकील दोघेही श्री रामकथेच्या ठिकाणी आले. वकिलाने आपल्याबरोबर गादी आणली होती. ती आसनावर ठेवली गेली. त्या महात्म्याने भरल्या डोळ्यांनी मंगलाचरण म्हटले आणि मग म्हणाले, "या हनुमंत जी स्थानापन्न व्हा." हे असं म्हणताच साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते मनातल्या मनात म्हणाले, प्रभू, हा माझा नाही तर रघुकुलाच्या रितीचा, परंपरेचा प्रश्न आहे. मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे, माझ्या भक्तीची, आस्थेची लाज राखा.
मग त्यांनी वकिलाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि गादी उचलून वर धरा. तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले.
वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला पण वकिलाला गादीला हातही लावता आला नाही. त्याने तीन वेळा प्रयत्नपूर्वक हात पुढे केला पण तिन्ही वेळा त्याला अपयश आलं.
हे दृश्य ते महात्मा बघत होते. वकिलाला गादी धरणं तर दूरची गोष्ट पण ते गादीला स्पर्शही करू शकत नाहीयेत.
वकिलाने तीन वेळा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा त्याला भयंकर थकवा आला. तो घामाने भिजला आणि शेवटी त्या वकिलाने साधू महाराजांच्या चरणांवर लोटांगण घातलं. वकील म्हणाला, महाराज, गादी उचलणं तर दूरची गोष्ट, कसं काय ते माहीत नाही, प्रयत्न करूनही साधा माझा हातही गादीपर्यंत पोहोचू शकत नाहीये. तेव्हा मी माझा पराभव मान्य करीत आहे.
*त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती, आणि त्याबरोबरच केलेल्या साधनेत किती शक्ती असते हे सिद्ध झालं. देवाची मूर्ती ही पाषाणाचीच असते पण भक्ताचे भाव त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीत वास करायला येतात. भक्तीची ही शक्ती आहे आणि ही सामान्य बुद्धीच्या पलिकडची गोष्ट आहे.*
जय श्रीराम
जय हनुमान
🙏🏻🙏🙏🙏🙏🙏
आनंदे वंदावा गणनायक* *तो मंगलदायकबुध्दीदात्याला वंदन करणारी* *श्रीगणेश जयंतीच्या आनंदाची* *🔆ॐ गं गणपतये नमः🔆*
⚜🌹⚜🚩🕉🚩⚜🌹⚜
🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻
*बुध्दीदात्याला वंदन करणारी*
*श्रीगणेश जयंतीच्या आनंदाची*
*🔆ॐ गं गणपतये नमः🔆*
⚜🌺🔆🌸🙏🌸🔆🌺⚜
*ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।*
*भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः।*
*स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागँसस्तनूभिः।*
*व्यशेम देवहितं यदायूः।*
*...... अथर्वशीर्ष*
*जीवन आनंदी तेव्हाच होते जेव्हा दशदिशांनी सतत केवळ सकारात्मक आनंद वार्ताच ऐकू येतात. हे गणराया, या कानांना सतत आनंदी.. कल्याणकारी अशीच वचने ऐकू येवोत. या आमच्या डोळ्यांना सदैव शुभ अशीच दृश्य दिसोत.*
*जगात सर्व क्षेत्रात.. शास्त्रात सतत भ्रमीत करणारे वातावरण असते. अगदी विज्ञानातही. ज्ञानींमध्येही एकमत.. एकवाक्यता नसते. प्रत्येकच जण आपल्या मतीने सोईस्कर अर्थ लावतो. त्यासाठी दुराग्रही असतो. भ्रमीत समाज जीवनात अशावेळी तूच आमचा रक्षणकर्ता आहेस. तू सर्वांना सद्बुद्धी दे.. जगातील वातावरण निर्मळ राहू दे.*
*हे गणराया, तुम्ही पुज्यनीय आहात. जीवनात मांगल्य निर्माण करणारे आहात. हे आयुष्य उत्तम प्रकृतीने भोगून आमच्याकडून तुमची स्तुती होत राहो.*
*आज माघ विनायक चतुर्थी. तिलकुंद चतुर्थी. आज बप्पाला तिळगुळाच्या मोदक.. लाडूचा नैवेद्य अर्पण केला जाणार. विश्व देवता गणेशाची जयंती. श्रीगणेशाची महतीच अशी की या विश्व देवतेचे अनेक देशात त्याचे पूजन होते. श्री गणरायाची विशालकाय मूर्ती ही भारतात नाही तर थायलंडमध्ये असून ती चक्क ३९ मिटर उंचीची आहे. इंडोनेशीयाच्या चलनावरही गणेशाला स्थान दिले होते.*
*आज गणेश जयंतीला भक्त मन आनंदलेय. मंदिरे ही रंगीबेरंगी हारफुलांच्या माळांनी.. रोषणाईने सजलीत. आज भक्त श्री गणेशाच्या आराधनेत दंग होणार. मंदिरासमोर गोमयाचा सडासमार्जन होत मोठमोठया रंगीबेरंगी रांगोळीचे रेखाटन होणार. श्री मूर्तीला जास्वंद.. लालफुले.. दुर्वा अर्पण होणार. भक्तीभावाने कुठे गणेश याग, कुठे होमहवन. श्री गणेशाच्या स्तुती स्त्तोत्र पठन.. श्रीसुक्त, अथर्वशीर्ष पठनाचे सहस्त्रावर्तन, महाआरती होणार.*
*मनुष्याला आपला पुर्वजन्म आठवत नाही. पण देवतांच्या अवतारांचे स्मरण सदैव राहते. कारण त्यांनी भक्तांवरील विघ्ने दूर करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतला. मनुष्यातील दोष निवारण करुन.. सुबुद्धी देत कल्याण केलेय. आजही करताहेत.*
*राक्षसांचा.. मनामनील राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी श्री गणेशाने जे ३२ अवतार घेतलेत. श्री गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला. यामुळे या चतुर्थीला विनायकी चतुर्थी पण म्हणतात.. जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी पण म्हणतात.*
*श्री गणेश अवतार कथाभागात राक्षसांची असलेली नावे वेगवेगळी आहेत. त्या राक्षसात दडलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार तसेच अज्ञानाचा नाश करणारे.. त्यांना सद्बुद्धी देत उद्धार करणारे हे श्री गणरायाचे सर्व अवतार आहेत. जे आजही मनुष्यातील दोषांचा नाश करतात.*
*सर्वच मंगलकार्यात प्रथम पूजनाचा मान असलेल्या श्री गणेशाला निर्मळ अंतःकरणाने शरण जात जीवनात विकास, सुखसमृद्धी, शांती, समाधान, आनंद, सुबुद्धीचे वरदान मागण्यासाठी साद घालू या. आपणांस श्रीगणेश जयंतीच्या शुभेच्छा !!.*
🌺🥀🌸🔆🛕🔆🌸🥀🌺
*ॐ आनंदे वंदावा गणनायक*
*तो मंगलदायक*
*रुंड मथन करि जननि जनक*
*निज रुंड मालधर*
*अमल कुंड तो तृतिय नयन*
*परि तनय विनय*
*विभु वक्रतुंड निज धुंडिराज*
*करि शुंड सरळ मुनि*
*धुंडिति जनि वनि झुंड*
*निकाबहु विकट तुंड गण*
*पुंडरीक मणि हार प्रलंबित*
*कुंडलीश कटिबंध तनुद्भव पुंड*
*दमन मणि कुंडल*
*श्रुति युगि गंडस्थळि अळि*
*चंद्रखंडधर गुणगण*
*कीर्ति अखंडित खंड दुरित*
*चय पंडित गामिनि*
*तांडव करि जो पद्म भवांडी*
*मंडलाकृति चंड पराक्रम*
*विदण्ड खंडन विपक्ष दंडन*
*स्वभक्त मंडन सुरवर मुनिवर*
*सकल चराचर पावनकरि निज*
*प्रसाद देवुनि पुरवि मनोरथ*
*विघ्नविनाशक तो..*
*परम कृपालय भालविलस दलि*
*मालदान रसपान करिति कलि*
*काल कापती परनिर्दाळण*
*करित समरि जो*
*पालन करि सुर चालक त्रिभुवनि*
*शंभुबाल भवजाल तेच जंजाळ*
*कटन कर सप्तस्वर*
*मुखी भेद आलापित*
*स्वर वर्तुनिया वेष्टन संगित*
*तननम् तननम् राग रागिणी*
*ध्रुपद त्रिवट गति*
*गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि*
*प्रबंध निबंध जगतल लगबग*
*विसरुनि तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी*
*सादर समुदायसवे आयकतो..*
*आनंदे वंदावा गणनायक*
*तो मंगलदायक*
🌹🥀🔆🌸🙏🌸🔆🥀🌹
*रचना : संतकवी अमृतराय* ✍️
*संगीत आणि निरूपण :*
*डॉ. अशोक दा. रानडे*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*!! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ !!*
*!! निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा !!*
‼ *गणपती बाप्पा मोरया* ‼
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*०१.०२.२०२५*
🌻🌺🌿🔆🌺🔆🌿🌺🌻
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...