Wednesday, 28 July 2021

 शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता हरपला!

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

 

मुंबई, 27 जुलै

डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या निधनाने शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा एक खंदा कार्यकर्ता हरपला असल्याची शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 

लाखोळीची डाळ असो की सोयाबीनची उत्पादनंत्यांचे संपूर्ण आयुष्यच संशोधन आणि संघर्षाचे राहिले. कोणत्याही विषयाचा गाढा अभ्यास करून त्यासाठी संपूर्ण समर्पण भावनेने ते लढा देत असत. संघर्ष करताना त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखणण्यासारखी होती. एकदा एखादा विषय त्यांनी हाती घेतला की मग त्यातून ते माघार घेणार नाहीतहे सर्वांना ठावूक असायचे. नागपूरकरांसाठी ते सोयामिल्कचे संशोधक म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध होते. विविध फ्लेवरयुक्त सोयामिल्क पिण्याची सवय त्यांनी नागरिकांना लावली. हे दूध आरोग्यदायी आहेअसे ते तास न् तास समजावून सांगत असत. मोहफुलांच्या पावडरचा चहा त्यांनी शोधून काढला. शेतकर्‍यांच्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्यातून अधिकचा पैसा शेतकर्‍यांना मिळावाहाच त्यांचा सदोदित प्रयत्न असायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोतअसे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

*********

 


 *सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”* 


या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,


काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी चार वाजता उठायला सुरुवात केली,


 *आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलून गेलं!* 


 *पहाट आणि सूर्योदय इतके जादुई असतात का?* 


 *इतक्या सकाळी उठून काय करावं?* 


ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.


*‘SAVERS’*


ह्या आयुष्य बदलून टाकणार्‍या सहा सवयी आहेत.


१) *Silence – (ध्यान)*


- शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!


- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!


- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करून व्हायरस रिमूव्ह करणे म्हणजे ध्यान!


- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!


- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!


- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवून घेण्याची कृती म्हणजे ध्यान!


----------------------------------


२) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)*


- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!


- स्वतः स्वतःला सूचना देणं,


- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!


- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!


- स्वयंसूचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाट्यमयरित्या सत्यातही उतरतात.


- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.


- आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलू तसेच घडते, जिभेवरच्या देवता तथास्तु म्हणतात, वगैरे वगैरे


- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.


- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली, तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?


- वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!...


-----------------------------------


३) *Visualize – (चांगल्या कल्पना घोळवणे.)*


तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटलावर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिजुअलायझेशन!


- कल्पनाशक्ती ही भगवंताने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.


- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.


- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.


- पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.


- ऑलंपीक विजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.


- मायकेल स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.


- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”


-----------------------------------


४) *Exercise – (व्यायाम)*


- शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!


- शरीर आळसावलं की, मन भ्रष्ट झालंच समजा!


- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.


- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.


- तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.


- ह्या सगळ्या दुष्ट श्रृंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,


- शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.


----------------------------------


५) *Reading – (वाचन)*


- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.


- पुढच्याच ठेच, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.


- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क झुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.


------------------------------------


६) *Scribing – (लिहिणे.)*


- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.


- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.


- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.


- लिहिल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.


- म्हणून संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.


- लिहिणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.


- लिहिल्याने विचार पक्के होतात.


- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं.


- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.


- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.


- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,


- आणि रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की, स्वतःला विजयी घोषित करावं.


- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!


- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.


- अशाने अंतरंग फुलून येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.


ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे.


वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत?

 *ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .* 


 *तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील. वापरून पहा.*

 Salutes to chandrashekhar Azad 


'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'

गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या  एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.! 


"नाही, हो.! माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.! 


त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.! 

आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.! 


भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.! 

स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही संपून गेलं होतं.! चंद्रशेखर आझाद ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता


निर्धनावस्थेत पतीच्या मृत्यू नंतर ही निर्धन, निराश्रित, वृद्ध आई त्या वृद्धावस्थेत कोणासमोर हात पसरण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं, 

शेण्या गोळा करून आणि त्या विकून स्वतःची गुजराण करत होती.! 


शरमेची गोष्ट अशी होती की देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्यांची ही अशी अवस्था दोन वर्षे सुरू होती.! १९४९ पर्यन्त.!


चंद्रशेखर आझाद ह्यांना दिलेल्या एक वचनाची आठवण देऊन सदाशिवराव हे जगरानी देवींना आपल्यासोबत झाशीला घेऊन आले.! पण त्यांची स्वतः ची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खराब असल्याकारणाने त्यांनी आझादांचे अजून एक मित्र भगवान दास माहोर ह्यांच्या घरी त्या आईंच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मनापासून सेवा केली.!


आनंद कुलकर्णी


मार्च १९५१ मध्ये जेंव्हा श्रीमती जगरानीदेवी ह्यांचा स्वर्गवास झाला तेंव्हा सदाशिवराव ह्यांनी स्वतःच्या आईप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार केले.!


त्यांच्या निधनानंतर झाशी च्या जनतेने त्यांच्या स्मृतीमध्ये सार्वजनिक जागेवर त्यांच्या नावाने एका स्मृतिकेंद्राची स्थापना केली.! 


त्यावेळच्या राज्यसरकारने (त्यावेळी सरकार काँग्रेस चे होते, आणि मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत.!).! त्यांनी ह्या स्मृतिकेंद्राला त्यावेळच्या पंतप्रधानांच्या म्हणजे नेहरूंच्या सांगण्यावरून बेकायदा घोषित केलं.! 


तरीपण ह्या शासनाच्या आदेशाला न जुमानता झाशीच्या नागरिकांनी चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा त्या जागेवर बसवण्याचा निर्णय घेतला.! 


तो पुतळा आझादांचे निकटवर्तीय सहकारी श्री रुद्र नारायण सिंह ह्यांनी तयार केली होता.!


जेंव्हा सरकारला हे समजलं की ही क्रांतिकारी मंडळी काहीही झालं तरी ह्या पुतळ्याची स्थापना झाशीच्या जनतेच्या मदतीने करणार आहेत, तेंव्हा सरकारने हा समारंभ देश, समाज, आणि न्यायव्यवस्था ह्यासाठी धोका उत्पन्न करेल म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रतिबंध करून सगळ्या झाशीत कर्फ्यू जाहीर केला.! 


जनतेला आणि ह्या मंडळींना आझादांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापन करता येऊ नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त होता.!.


पण ह्या सरकारी आदेशाला, कर्फ्यूला आणि पोलीस बंदोबस्ताला धाब्यावर बसवून सदाशिवराव, भगवानदास माहोर आणि इतर सर्व जनता पुतळा घेऊन स्थापन करण्यासाठी उत्साहाने निघाली.! 


आपल्या आदेशाच्या चिंधड्या उडवून जनता निघालेली बघून सरकार खवळले आणि सरकारने  पोलिसांना पुतळा हातात घेतलेल्या श्री सदाशिवराव ह्यांना गोळी घालायचा आदेश दिला.! 


पण मूर्ती हातात घेतलेल्या सदाशिवराव ह्यांना जनतेनी सर्व बाजूने वेढून घेतलं, आणि पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचू नाही दिलं.! 

मग खवळलेल्या पोलिसांनी अंदाधुंद लाठीचार्ज केला.! शेकडो लोक जखमी झाले.! बरेच जन्मभराचे अपंग झाले त्या लाठीमारात.! तीन जणांचा मृत्यू झाला.! 


देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण ओवाळून टाकणाऱ्या हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापित नाही होऊ शकला.!


कोणत्या तोंडाने आपण आझादांना श्रद्धांजली द्यायची ? कोणत्या तोंडाने आपण त्यांना एक हुतात्मा म्हणून आठवायचं ?


आझादजी, आम्ही तुमच्या मातोश्रींच्या तीन फुटाच्या पुतळ्याला ह्या देशात पाच फूट जागा पण नाही देऊ शकलो.!


ज्या देशासाठी तुम्ही तुमच्या प्राणाचे बलिदान केले, त्याच देशाच्या काँग्रेसी पंतप्रधानाने तुम्ही ज्या बागेत शेवटी लपला होता त्या बागेचा पत्ता ब्रिटिश सरकारला सांगितलाच, पण तुम्ही हुतात्मा झाल्यावर सुद्धा त्या काँग्रेसी सरकारने तुमच्या मातोश्रींच्या पुतळ्याला सुद्धा जागा नाही मिळू दिली.! 


आणि फक्त तुमचाच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अश्या अनेक वीरांचा ह्या काँग्रेसी सरकारने अपमान केलाय.! त्यांना देशाच्या जनतेच्या स्मृती मधून ओरबाडून फेकून दिलंय.!.


तरीपण आज वीर हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांना मी झुकल्या मानेने नतमस्तक होऊन नमन करतो, त्यांच्या जयंतीनिमित्य.! 

🙏🙏🙏🙏🙏


वंदे मातरम.! 


©️ आनंद कुलकर्णी


संदर्भ : Indian Revolutionaries : A comprehensive Study 1757 - 1961

Tuesday, 27 July 2021

 ✍  *प्रारब्धवशात जे आहे तेच होते....१) लग्न  (२) पैसा  (३)  मरण  (४)  अन्न  (५)  जन्म... हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...१)  रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. *रावणाची कन्या उपवर झाली.* बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलाविले. *रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून. पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात...२)  पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.... *३) -* ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते.... *कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ?  आई म्हणाली,  *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का ?" यमराज म्हणाले,  "आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो."  त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती... तात्पर्य -* काहींचा मृत्यू एस् टी त, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे..     🙏🌹  *संकलन - ह.भ.प. बळीराम (दादा) आळंदीकर*  🚩🚩🚩🇹🇯

 मराठाकुणबी विद्यार्थ्यांना न्यायालयीन पदांसाठी

विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

 

          मुंबई, दि. 27 - मराठा,कुणबीकुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी  ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे मार्फत प्रायोजित केले आहे. विद्यार्थ्यांना दरमाह 8,000 विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपुर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार असूनप्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत 18 ऑगस्ट 2021 आहे. अशी माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायीक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  यांची निवड केली जाते. त्यातील काही अधिका-यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती सुध्दा मिळते. या प्रशिक्षणाची संपुर्ण माहिती https://sarthi-maharashtragov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यातआले आहे.

            मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना माहे रु.8,000/ मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन देण्याबाबत व त्याचे प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देणेबाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. साधारणत: 400 विद्यार्थ्यांना या मार्फत दरवर्षी लाभ देण्यात येणार आहे.

            या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारथी मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी विधी पदवीधर किंवा वकीलऑटोर्नी अधिवक्ता असावा. पात्र उमेदवारांना मुंबईपुणेऔरंगाबाद व नागपूर याठिकाणी नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम पूर्वपरीक्षामुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश चाचणी (CET) द्वारे     गुणवत्तेनुसार करण्यात  येईल.            

            महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात परंतु योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणा अभावी निश्चित असे ध्येय प्राप्त करु शकत नाहीत. त्यासाठी सारथी ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

0000

 🛑 माझी आडाणी आई 🛑



मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!


 आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!


 इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...

 "बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!" 


भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.


ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...! 


आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.. मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. पण तुझी आई ठामपणे *"नाही"* म्हणाली.. नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... आणि तुझा जन्म झाला... *अशिक्षित होती ना...*


तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती... 

*अशिक्षित होती ना...*


तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची..... 

*अशिक्षित होती ना...*


तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...

*अशिक्षित होती ना...*


तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....

*अशिक्षित होती ना...*

 

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.

*अशिक्षित होती ना....*


बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.

*अशिक्षित आहे ना ती...*


ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*


हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.

आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे Phd  च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!


*बोध:*.... प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी काय काय सोसलय... आईवडिलांनी.🙏🏼

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

 [27/07, 09:25] Baby: 🌹 *सुप्रभात* 🌹                        


*यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणी हास्य ....* *कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही ... तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही*



👏 🙏🏻🌹*शुभसकाळ🌹🙏🏻* 👏

[27/07, 09:29] Baby: पावसात कार बुडाली तर इन्श्युरन्स क्लेम मिळणार का ?🤔 नक्की पूर्ण वाचा!

बंधू भगिनींनो,

गेले दोन-तीन दिवस पडणार्‍या पावसाने अनेक गावात -शहरात  पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्‍याचजणांना  एका अनपेक्षीत संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी 'सेफ पार्कींग लॉट' , 'ओपन गॅरेज' किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. 

या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे या नुकसानाची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का ?


आज या समस्येचे निराकरण आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत.


जर तुमची गाडी नवीन असेल तर तुमच्या गाडीची जोखीम सर्वसमावेशक म्हणजे 'काँप्रेहेन्सीव्ह रिस्क कव्हर' (Comprehensive Cover) इन्शुरन्स कंपनीने घेतलेली असेल. जर कर्ज घेऊन गाडी घेतलेली असेल तर गाडीचा विमा ''काँप्रेहेन्सीव्ह' असेलच याची खात्री बाळगा कारण कर्ज देणार्‍या अर्थसंस्थांची ही अनिवार्य अट असते आणि तसे केलेत नाही तर गाडीचा हफ्ता पण भरावा लागेल आणि गाडी दुरुस्त पण स्वतःच्या खर्चात करावी लागेल। 


पण.... पण ... 

पहिल्या काही वाहनमालक 1-2 वर्षांनंतर केवळ विम्याचा हप्ता (प्रिमियम) कमी भरायच्या हेतूने फक्त 'थर्ड पार्टी इन्शुरन्स' काढतात। 

असे असेल तर पाण्यात बुडालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनीभरून देणार नाही. 🚫


आता समजा, 

तुमच्या गाडीचा विमा सर्वसमावेशक म्हणजेच 1st Party (Comprehensive) आहे तर काय कराल ? 


गाडी जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवा. जर वाहून दुसर्‍या जागेवर गेली असेल तर धक्का मारून बाजूला उभी करा. तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या हेल्प लाइनवर फोन करून तुमचे नाव , पॉलीसी नंबर आणि गाडीचे लोकेशन कळवा. कंपनीकडून  सर्व्हेअर येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेईल. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून गाडी इन्शुरन्स कंपनीच्या खर्चात  दुरुस्त होईल.


आता या सगळ्या धावपळीत एक मोठी घोडचूक तुमच्या हातून होण्याची शक्यता आहे ती म्हणजे सर्व्हेअरला बोलावण्याच्या आधीच इग्नीशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करणे. हे जर तुम्ही केलेत तर गाडीचे इंजीन 'हायड्रोलॉक' होईल. हायड्रोलॉक म्हणजे गाडी सुरु होताना इंजीनमध्ये पाणी घुसेल आणि इंजीन 'सिझ' होईल. इंजीन 'सिझ' झाले की ते कामातून जाईल.


इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरु करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजीनचे नुकसान 'कॉन्सिक्वेंशिअल लॉस ' म्हणजे तुमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे 'मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान' या सदरात जाईल. परीणामी तुम्हाला इंजीनचा येणारा खर्च कंपनी देणार नाही. एकूण नुकसानीत इंजीन हाच मोठा खर्च असतो तोच मिळाला नाही तर इतर नुकसान भरपाई मिळूनही काहीच फायदा नाही.


तेव्हा लक्षात ठेवा, 

पाण्यात बुडलेली गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करू नका !!!🚫

आता हाच हायड्रोलॉकींगचा धोका जास्त साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्यात उद्भवू शकतो, अशा परीस्थितीतही इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही हे पण लक्षात ठेवा.

जर 'अ‍ॅड ऑन ' म्हणून इंजीनचा स्वतंत्र विमा (Engine Cover) त्याच पॉलीसीत घेतला असेल तर ही  'कॉन्सिक्वेंशिअल लॉस ' अट लागू पडत नाही.


थोडक्यात गाडी कितीही पाण्यात बुडाली आणि तुम्ही चुकून स्टार्ट करून अजून खराब झाली तरी 1st Party (Comprehensive + Engine Cover ) इन्शुरन्स असल्यास तुमचाच फायदा होतो। 🚘🚖🚗

Featured post

Lakshvedhi