मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा
भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळखीच्या प्रणालीचा वापर करत आहे. १.४ अब्ज नागरिकांचे आधार कार्ड, दररोज ८९ मिलियन बायोमेट्रिक ओळखीचे व्यवहार, आणि दरमहा ४० अब्ज यूपीआय व्यवहार हेच सांगतात की, भारत डेटा एक्सचेंज, ओळख व्यवस्थापन आणि डिजिटल व्यवहारांमध्ये अग्रेसर आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सहा आधारस्तंभ आहेत. त्यातील चौथा स्तंभ म्हणजे डिजिटल परिवर्तन आहे. ज्यात एआयचा महत्त्वाचा वाटा आहे. आज आपण या चौथ्या स्तंभाच्या विकासाचे साक्षीदार आहोत. आपला देश स्वतःला “एआय युज कॅपिटल” म्हणून उभे करत आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, शासन, आणि उद्योजकता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) वापर करून एक प्रगत, समावेशक आणि सक्षम भारत घडवण्याचा संकल्प केला जात आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment