Friday, 1 November 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 2062 तक्रारी प्राप्त; यापैकी 2059 निकाली 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 2062 तक्रारी प्राप्त;

यापैकी 2059 निकाली

 

234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

            मुंबईदि. 1 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15  ऑक्टोबर ते  1 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2062 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2059 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

 

            सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

 

 

0

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi