Wednesday, 29 November 2023

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करावे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार-

 अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार

सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करावे

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

--------------------------

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांचे

प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

----------------------

            मुंबई, दि. 29 : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईलयासाठी महसूलकृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

            आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले.  पंचनामे  प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावीअसे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

            ठाणे जिल्ह्यातील शहापूरमुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.पालघर जिल्ह्यातील पालघरवसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहेनाशिक जिल्ह्यातील कळवणनांदगावनाशिकनिफाडत्र्यंबकेश्वरसटाणादिंडोरीपेठसुरगाणाइगतपुरीसिन्नरचांदवडयेवला तालुक्यातील  ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदाद्राक्षसोयाबीनमकागहूऊस व फळपिकेधुळे जिल्ह्यातील साक्रीशिरपूरशिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळीपपईकापूसहरभरानंदुरबार जिल्ह्यातील नवापूरअक्कलकुवानंदुरबारशहादातळोदाअक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भातकापूसतूरमिरचीमकाकांदा पिकांचेजळगाव जिल्ह्यातील जळगावभुसावळयावलरावेरमुक्ताईनगरअमळनेरचोपडाएरंडोलपारोळाचाळीसगावजामनेरपाचोराधरणगावबोदवडभडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदाहरभरागहूमकाज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

            अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरअकोलेकोपरगावपारनेरराहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळीपपईमक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेडआंबेगावशिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्षकांदा पिकांचे नुकसान झाले आहेसातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगरपैठणगंगापूरवैजापूरकन्नडखुलताबादसिल्लोडसोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळीपपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

            जालना जिल्ह्यातील बदनापूरजालनाजाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षकेळीकांदाखरीप ज्वारीगहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीबीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदाज्वारीभाजीपाल्याचे नुकसान झाले आहेहिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणीगंगाखेडजिंतूरपाथरीपूर्णापालम, मानवत, सोनपेठसेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारीकापूससीताफळपेरूभाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहेनांदेड जिल्ह्यातील नांदेडमुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहेबुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणानांदुरालोणारसिंदखेडराजादेऊळगाव राजासंग्रामपूरमेहकरजळगाव जामोदमलकापूरखामगावशेगावमोताळानांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi