Friday, 30 July 2021

 कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू

- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

·       नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

·       पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी

 

            कोल्हापूर दि 30 (जि.मा.का) : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावायेथील पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावूपूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईलअसे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिले.

            मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपालकमंत्री सतेज पाटीलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेमुख्य सचिव सिताराम कुंटेराज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरजिल्हाधिकारी राहूल रेखावरमनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणपोलीस अधिक्षक शैलेश बलकवडेशिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,  माजी आमदार उल्हास पाटीलमाजी आमदार डॉ. सुजित मिणचेकरमाजी आमदार सत्यजित पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.

            नृसिंहवाडी तिर्थ क्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी सन 2019 चा पूरसध्या सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावीअशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिकव्यापारीदेवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi