खुशाली कळवत होतं
अर्धं लिहिलेलं कार्ड
रडायला लावत होतं....
एक रुपया सुट्टा घेऊन
एसटीडीच्या लाईनमध्ये उभा रहात होतो
फोन लागला की...
मन भरुन येत होतं.
whatsapp वर आता
२४ तास संपर्कात राहातोय.
ना कोणाला ती ओढ आहे....
ना कोणाला ती हुरहुर आहे.
काळ बदलला बदलली साधने
मी अजूनही जिव्हाळा शोधतच आहे.
१५ हजाराच्या मोबाईलला
१५ पैशाची सर नाही...
नात्याची तर नाहीच नाही,
अजून काय काय बदलेल..
पण
ते दिवस.. ती माया...ती आपुलकी
पुन्हा कधीच मिळणार नाही....
पुन्हा कधीच मिळणार नाही.
No comments:
Post a Comment