Monday, 12 May 2025

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

 अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणेबंधारे आणि तलावांमधील गाळ काढून त्या परिसरातील जमिनीवर टाकला जातो.शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढते आणि पाणी साठवण क्षमता देखील सुधारते. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे मर्यादित संसाधने असतातत्यामुळे त्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीच्या योग्य वापरामुळे थेट फायदा होतो. शासनाचा उद्देशही शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हाच आहे. त्यामुळे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त ठरत आहे.

१ एप्रिल २०२४ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १२७४ एकूण ६६.९१ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होतेत्यापैकी ४२.२९ कोटी घनमीटर गाळाचे उत्खनन पूर्ण झाले असूनहे लक्ष्याच्या ६३ टक्के इतके आहे. ही भरघोस कामगिरी प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाली आहे.

राज्य शासनाकडून २७८१.८ कोटी रुपये निधीची तरतूद

योजनेसाठी राज्य शासनाकडून २७८१.८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असूनआतापर्यंत १५४९.९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये ३५,२०५ शेतकऱ्यांपैकी ३१,७१९ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असूनत्यांनी ३४.१७ कोटी घनमीटर गाळ काढला आहे. यासाठी १२२१.६ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित असूनआतापर्यंत ५१२.४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ४६ टक्के वाढ

 बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ४६ टक्के वाढ

   सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसा 

            मुंबईदि१० डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी संस्थेत  मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहेअसे सामाजिक न्याय  मंत्री संजय शिरसा यांनी सांगितले.

            मंत्री शिरसा म्हणाले, वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही वाढ अत्यंत आवश्यक होती. या निर्णयामुळे जात पडताळणी कार्यालयेबार्टी मुख्यालयउपकेंद्रे तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ या मागणीवर  समाधानकारक तोडगा निघाला आहेकर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी असल्याच भावना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त करुन सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसा यांचे आभार मानले आहेत. 

0000


निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

 निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

 

मुंबई दि. ११ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय - एम) महासचिव एम.ए. बेबी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे संवाद साधला. हा संवाद आयोगाद्वारे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या चर्चेच्या मालिकेचा एक भाग असून या संवादाद्वारे पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहचविण्याची ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

निवडणूक प्रक्रियेचे बळकटीकरण अधिक प्रभावीपणे करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून सर्व संबंधित घटकांच्या सहभागाने विद्यमान कायदेशीर चौकटीत निवडणूक प्रक्रिया अधिक मजबूत बनवण्याचा हा प्रयत्न आहे. याआधीआयोगाने बहुजन समाज पार्टीच्या (बसप) नेत्या कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 6 मे 2025 रोजी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजप) अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 8 मे 2025 रोजी भेट घेतली होती. आतापर्यंत एकूण 4 हजार 719 सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 40 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 800 आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी 3 हजार 879 बैठकांचे आयोजन केले असून या माध्यमातून 28 हजारांहून अधिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

 

कार्यालयीन सुधारणा मोहीम व प्रशासकीय गुणांकनात प्रथम प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस उपक्रमाचा यशस्वी टप्पा पूर्ण

 प्रशासनात  लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस उपक्रमाचा यशस्वी टप्पा पूर्ण

 

महिला व बालविकास विभाग

कार्यालयीन सुधारणा मोहीम व प्रशासकीय गुणांकनात प्रथम  

मुंबई दि ११ शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देऊन शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून १०० दिवसांची कार्यालयीन मोहीम मंत्रालय स्तरावर राबविण्यात आली होतीया मोहिमेत महिला व बालविकास विभागाने केलेल्या कार्यालयीन सुधारणा अंतर्गत सर्व विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकत्याच मंत्रालयात झालेल्या समारंभात मंत्री आदिती तटकरे व सचिव डॉअनुपकुमार यादव यांचा सत्कार करण्यात आला.

विविध विभागांत पहिल्यांदाच राबविण्यात आलेला शंभर दिवसांच कार्यालयीन सुधारणा मोहीम आणि शासन लोकाभिमुख करण्याचा हा उपक्रम आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहेप्रशासनात लोकाभिमुखताकामकाजात सुलभता आणि जबाबदारी (अकाउंटेबिलिटीया तीन आधारांवर पुढे जाणे अत्यावश्यक असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहेया कार्यक्रमांर्तगत राज्यातील 12 हजार 500 कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आल्याने यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे.

सर्वच विभागाने स्तुत्य कार्य केले असूनमहिला व बालविकास विभागाच्या विविध योजना महिला व बालकापंर्यत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविली. विभागाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी विभागाचे संकेतस्थळ युजर फ्रेंडली केले आहे. http://womenchild.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ मराठी तसेच इंग्रजी भाषेत कार्यान्वित करण्यात आलेमहाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम  आणि आरटीएस कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये, प्रधानमंत्री जन जाती महान्याय अभियान अंतर्गत १४५ अंगणवाडी कार्यान्वित करण्यात आल्यानऊ हजार ६६४ अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे३४५ अंगणवाडीमध्ये पाळणाघर सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही३३ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न व पोषण मापदंड प्रशिक्षण तसेच १० वन स्टॉप सेंटरला मान्यता देण्यात आलीएकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत सुमारे 64 लाख 5 हजार 998 लाभार्थ्यांना किमान 300 दिवस पुरक पोषण आहार देण्याचे उद्दीष्ट साध्य केले आहे. त्याचप्रमाणे 37 हजार अंगणवाडी ‘पोषण भी पढाई भी’ कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत गृह भेटी देऊन 9 लाख 33 हजार 542 लाभार्थ्यांचे समुपदेशन करण्याबाबतचे उद्दीष्ट 100 टक्के साध्य करण्यात आलेअंगणवाडी केंद्रांमधील सर्व 48 लाख 59 हजार 346 लाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरिंग करण्यात आले असून १०० टक्के ग्रोथ मॉनिटरिंगची नोंद पोषण ट्रॅकर प्रणालीवर करण्यात आली.

प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा दोन समुदाय विकास कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्दिष्ट पर्ण करण्यात आले असून ६ लाख ६२ हजार ९१६  समुदाय विकास कार्यक्रम घेण्यात आले आहेतपोषण अभियानमध्ये पोषण माह व पोषण पखवाडा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून (उपक्रमांची संख्या 2 कोटी 45 लाख 81 हजार 093) राज्याचा देशात प्रथम क्रमांक आला आहे.  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत १ लाख २१ हजार १३० अंणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रिमियमची रक्कम एकण रूपये २.७६ कोटी खात्यावर जमा करण्यात आली आहेप्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत सर्व पात्र 1 लाख 82 हजार 641 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रिमियमची रक्कम एकण रूपये ३६.५२ लाख त्यांच्या खात्यावर जमा केली आहेतसेच १७ हजार २५४ अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून १३ हजार ५९५ अंगणवाडी केंद्रांचे श्रेणीवर्धन करून सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले आहे.  

राज्यात एकूण ५३७ बालकांना दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचे कुटुंब मिळाले असून यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच बालविवाह रोखण्यासाठी जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेतंर्गत 331 बालविवाह रोखण्यात आले असून२७ प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला.

मुदत बाह्य अभिलेखांचे पुनर्विलोकनजुन्या व निरूपयोगी जड वस्तूंचे निर्लेखन करण्यात आले. आपले सरकार पोर्टलवरील मार्च २०२५ मध्ये 96.70 टक्के तक्रार अर्जांचे निराकरण विभागाचे सचिव डॉअनुपकुमार यादव यांच्यामार्फत करण्यात आले.

विभागामार्फत दरमाह क्षेत्रीयस्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतोकार्यालयात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ प्रसाधनगृहाची सुविधाकार्यालयात स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्षअभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालयकार्यालयामध्ये सुव्यवस्थित नामफलकदिशादर्शक फलक लावणे व कार्यालयाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

तसेच कार्यालयीन कामकाजासाठी ई-ऑफिसप्रसार माध्यमांमध्ये शासना विषयी नकारात्मक प्रसिद्ध होणाऱ्या बातम्याबाबत आवश्यक ते स्पष्टीकरण तातडीने देणेअधिकारी कर्मचारी प्रशिक्षणसेवा विषयकन्यायालयीन बाबी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोविभागामध्ये न्यायालयीन प्रकरणांचा वेळेत निपटारा होण्यासाठी उपसचिव (विधी) यांच्या अध्यक्षतेखाली विधी कक्ष निर्माण करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत डाटा ॲनालीसेस कार्याकरिता पावर बी डॅशबोर्डचा वापर करण्यात आला आहेमहिला आर्थिक विकास महामंडळ हे १.५० लाख बचतगटाच्या माध्यमातून राज्यातील २० लाख महिलांकरिता काम करीत आहेसाधारण ३० टक्के महिला या उद्योजक या नात्याने विकसित होत आहेतयाचबरोबर व्यापारीकामगार वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडविणेमाविमने भागीदारी केलेल्या ॲमेझॉनओएनडीसी ऑनलाईन प्लॅटफॉर्म बचतगटांची उत्पादने अपलोड करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेणेअशा विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि जास्तीत जास्त योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला व बालविकास विभाग अव्वल ठरला आहे.

 

०००

 

Darshan and Worship of Chhatrapati’s Statue at Rajkot A Grand Statue of Shivaji Maharaj Will Inspire Future Generations

 Darshan and Worship of Chhatrapati’s Statue at Rajkot

A Grand Statue of Shivaji Maharaj Will Inspire Future Generations

                                                           – Chief Minister Devendra Fadnavis

• Attractive statue erected in record time • *Development of the surrounding area to boost tourism

Sindhudurgnagari, 11: Chhatrapati Shivaji Maharaj was a great warrior whose thoughts are inspirational to all. The Public Works Department has constructed a grand statue befitting Shivaji Maharaj’s legacy in record time, which will serve as a source of inspiration for future generations, said Chief Minister Devendra Fadnavis.

The unveiling and worship ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue, erected at Rajkot fort in Malvan, was conducted at the hands of Chief Minister Devendra Fadnavis.

On this occasion, Deputy Chief Minister Eknath Shinde, Guardian Minister Nitesh Rane, Public Works Minister Shivrendra Sinhraje Bhosale, MP Narayan Rane, MLC Niranjan Davkhare, MLAs Deepak Kesarkar, Ravindra Chavan, Nilesh Rane, District Collector Anil Patil, CEO Dr. Manik Dive, Acting Police Superintendent Krishikesh Rawale, and PWD Executive Engineer Kini were present.

The Chief Minister said that under the guidance of PWD Minister Shivrendraraje Bhosale, all departments worked swiftly to complete the project. Renowned sculptor Ram Sutar has created this magnificent statue in a short time. Institutions like IIT and J. J. School of Arts also made significant contributions to the statue’s construction. A detailed study of Konkan’s high winds and storms was done during the planning. Given its height, this is likely the tallest statue of Shivaji Maharaj in the country. Considering its grandeur, efforts will be made to develop the area around the statue to promote tourism. The Chief Minister emphasized that Konkan’s development has always been a priority.

Deputy Chief Minister Eknath Shinde stated that this land has been sanctified by the footsteps of Shivaji Maharaj. The grand statue here is a symbol of pride, self-respect, and valor, and will serve as a respectful monument for tourists and Shiv devotees.

Initially, the ceremony began with ‘Shiv Aarti’ by the dignitaries, followed by worship of a symbolic idol of Shivaji Maharaj. A grand firework display in vibrant colors was also held. Senior sculptor Anil Sutar and officials from the PWD were felicitated during the event.

About the Statue:

The statue was built at a cost of ₹31.75 crores by the Public Works Department. The work was completed by the company of senior sculptor Ram Sutar on an EPC basis. The sword-bearing statue stands 60 feet tall and is made entirely of bronze. A stainless steel framework has been used to support the statue, and high-grade M50 concrete and stainless steel bars were used for the pedestal. The concept and design were verified by IIT Mumbai.


राजकोट में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का दर्शन व पूजन भव्य शिवाजी महाराज की प्रतिमा आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणास्रोत बनेगी

 राजकोट में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का दर्शन व पूजन

भव्य शिवाजी महाराज की प्रतिमा आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणास्रोत बनेगी

                                                                                       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• रिकॉर्ड समय में आकर्षक प्रतिमा का निर्माण

• क्षेत्र का विकास कर पर्यटन को मिलेगा बढ़ावा

सिंधुदुर्गनगरीदि 11 : छत्रपति शिवाजी महाराज एक महान योद्धा थे। उनके विचार सभी के लिए प्रेरणादायक हैं। सार्वजनिक निर्माण विभाग ने रिकॉर्ड समय में शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा का निर्माण किया हैजो आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणास्रोत बनेगीऐसा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया।

            मालवण स्थित राजकोट किले पर निर्मित शिवाजी महाराज की प्रतिमा का दर्शन व पूजन समारोह मुख्यमंत्री फडणवीस के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपालक मंत्री नितेश राणेसार्वजनिक निर्माण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेसांसद नारायण राणेविधान परिषद सदस्य निरंजन डावखरेविधायक दीपक केसरकररविंद्र चव्हाणनिलेश राणेजिलाधिकारी अनिल पाटिलमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवेप्रभारी पुलिस अधीक्षक रुषिकेश रावलेऔर सार्वजनिक निर्माण विभाग के कार्यकारी अभियंता किणी उपस्थित थे।

            मुख्यमंत्री ने आगे कहा कि सार्वजनिक निर्माण मंत्री शिवेंद्रराजे भोसले के मार्गदर्शन में सभी विभागों ने तेज़ी से काम कर यह कार्य पूर्ण किया है। वरिष्ठ मूर्तिकार राम सुतार ने कम समय में सुंदर और भव्य प्रतिमा गढ़ी है। आईआईटी और जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स ने भी इस कार्य में महत्त्वपूर्ण योगदान दिया। कोकण के तेज़ हवाओं और तूफानों का गहन अध्ययन कर प्रतिमा का निर्माण किया गया है। प्रतिमा की ऊँचाई देखते हुए यह देश की सबसे ऊँची शिवाजी प्रतिमा मानी जा सकती है। इस भव्य प्रतिमा के आसपास का परिसर विकसित कर पर्यटन को बढ़ावा देने के लिए प्रयास किए जाएंगे। कोकण के विकास को हमेशा प्राथमिकता दी गई हैऐसा भी मुख्यमंत्री ने कहा।

            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि यह भूमि शिवप्रभु के चरणस्पर्श से पावन हुई है। यह भव्य प्रतिमा गौरवस्वाभिमान और शौर्य का प्रतीक बनेगी और यहाँ आने वाले पर्यटकों व शिवभक्तों के लिए श्रद्धा का स्मारक होगी।

            कार्यक्रम की शुरुआत मुख्यमंत्री व अन्य मान्यवरों द्वारा शिवआरती से हुई। छत्रपति शिवाजी महाराज की प्रतीकात्मक मूर्ति का पूजन किया गया। इस अवसर पर रंगबिरंगे पटाखों से आकर्षक आतिशबाज़ी की गई। वरिष्ठ मूर्तिकार अनिल सुतार और सार्वजनिक निर्माण विभाग के अधिकारियों का सत्कार किया गया।

प्रतिमा निर्माण के बारे में:

यह प्रतिमा सार्वजनिक निर्माण विभाग द्वारा ₹31.75 करोड़ की लागत से बनाई गई है। वरिष्ठ मूर्तिकार राम सुतार की कंपनी द्वारा इसे ईपीसी आधार पर निर्मित किया गया। तलवारधारी प्रतिमा की ऊँचाई 60 फीट है और यह पूरी तरह से कांस्य धातु से बनाई गई है। प्रतिमा को सहारा देने के लिए स्टेनलेस स्टील का फ्रेमवर्क और चबूतरे के लिए उच्च गुणवत्ता वाला M50 कंक्रीट तथा स्टेनलेस स्टील की रॉड का उपयोग किया गया है। इसकी संकल्पना को आईआईटी मुंबई द्वारा प्रमाणित किया गया है।

000

छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन; शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फुर्तीदायक

 छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन;

शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फुर्तीदायक

                                                                                   :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी

परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना देणार

सिंधुदुर्गनगरीदि. 11 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज हे महान योध्दा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फुर्तीदायक ठरणार असल्याचेप्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

            मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपालकमंत्री नितेश राणेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेखासदार नारायण राणेविधान परिषद सदस्य निरंजन डावखरेविधानसभा सदस्य दीपक केसरकररविंद्र चव्हाणनिलेश राणेजिल्हाधिकारी अनिल पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवेप्रभारी पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावलेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी आदी उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री पुढे म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत ह्या पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे. आय.आय.टी.जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो. पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे व वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची पाहता हा महाराजांचा बहुदा देशातील सर्वात उंच पुतळा ठरेल. या पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेशिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा अभिमानस्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे. हा पुतळा इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरणार असल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मुर्तीचे पूजन देखील करण्यात आले. यावेळी आकर्षक रंगांमध्ये फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. ज्येष्ठ मूर्तीकार अनिल सुतारबांधकाम विभागाचे अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Featured post

Lakshvedhi