Sunday, 11 May 2025

रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करावी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह 

निधी वापराबाबत नियमावली करावी

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 5 :-  रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावीअसे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबतऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणेमोटार वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवारसहसचिव राजेंद्र  होळकरएस. टी. महामंडळाचे अधिकारी श्री. देशमुख यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणालेयासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसिडरची नियुक्ती करावी. सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबरोबरच रस्त्यावर झेब्रा क्रॉस यासह आवश्यक मार्किंग चिन्हे करण्यात यावीत.

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करावा. जाहिरात व पार्सल सेवेतून एस. टी. महामंडळास अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे. उत्पन्न वाढीसाठी कोल्ड स्टोरेज सारखा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाने विचार करावा. तसेच प्रवाशांना ऊनवारा पाऊस याचा त्रास होऊ नये म्हणून या पुढील काळात नवीन एस.टी निवारे बांधतांना ते बंदिस्त पद्धतीचे  बांधावेत तसेच एस.टी निवारे पी.पी.पी. तत्वावर करण्याबाबतचाही अभ्यास करण्यात यावा.

सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना परिवहन प्राधिकरणाला दिल्या जातील तसेच बाईक टॅक्सी मधून रोजगार निर्माण होणार असल्याने या योजनेमध्ये काही सुधारणांबाबत आवश्यक मार्ग काढला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मोटार वाहन विभागात राबविण्यात येणारे ऑनलाईन बदली धोरण सर्वसमावेशक असावे. राज्य शासनाच्या अन्य विभागात ऑनलाइन बदली धोरण कशा प्रकारे राबवले जाते याची माहिती घेण्यात यावीअसे निर्देश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

०००००

सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

 सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

– कृषि आयुक्त सूरज मांढरे

 

मुंबई6 मई : सरकारी कार्यों में सूचना प्रबंधनसमय नियोजनकार्य की निगरानी और रिपोर्टिंग के लिए नवाचार तकनीक के कई टूल्स उपलब्ध हैं। इन टूल्स का उपयोग करने से निश्चित ही शासकीय कामकाज में गति आएगीऐसा मत कृषि आयुक्त सूरज मांढरे ने व्यक्त किया।

"टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" के अंतर्गत प्रशासनिक अधिकारियों और कर्मचारियों के कौशल विकास हेतु मंत्रालय के परिषद सभागृह6वीं मंजिल पर प्रभावी तकनीकी उपयोग’ विषय पर कृषि आयुक्त सूरज मांढरे और महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक द्वारा व्याख्यान आयोजित किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र सदननई दिल्ली की निवासी आयुक्त आर. विमला समेत प्रशिक्षणार्थी उपस्थित थे।

कृषि आयुक्त मांढरे ने कहा कि गूगल कीपएवरनोटमाइक्रोसॉफ्ट वन नोटगूगल ड्राइवड्रॉपबॉक्सक्लिकअपमाइक्रोसॉफ्ट टू डूगूगल कैलेंडरगूगल शीट्स और टेलीग्राम जैसे टूल्स का उपयोग कर कार्य को अधिक गतिशील बनाया जा सकता है। टेक्नोलॉजी एक ऐसी चीज है जो बिना किसी भेदभाव के सभी को एक समान स्तर पर लाती है। यह शारीरिक स्थितिरंगजाति या धर्म की परवाह किए बिना सभी के लिए उपयोगी होती है।

उन्होंने यह भी कहा कि अगर माइक्रोसॉफ्ट वन नोट जैसे टूल्स का सही उपयोग किया जाए तो शासन के कई मुद्दे हल हो सकते हैं। पेंसिल के साथ टैबलेट प्रशासनिक कार्यों में बेहद उपयोगी हैं। अब मेहनत से अधिक स्मार्ट कार्य प्रणाली पर जोर देना चाहिए। शासन के लिए कार्य करते हुए स्वयं को भी तकनीकी रूप से दक्ष बनाना आवश्यक हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के डॉ. विकास नाईक ने बताया कि तकनीक का सही उपयोग करने से शासकीय कार्य अधिक प्रभावी और समयबद्ध हो सकते हैं। टास्क मैनेजमेंट के लिए 'Any.do' जैसे एप्लिकेशन का उपयोग कर कार्य की जानकारी रखी जा सकती है और एक्सेल का उपयोग क्षेत्रीय स्तर पर डेटा प्रबंधन के लिए उपयुक्त होता है।

महाराष्ट्र सिविल सर्विस’ पोर्टल की जानकारी देते हुए श्री. नाईक ने कहा कि इस प्लेटफॉर्म पर नागरिक किसी भी विभाग से संबंधित प्रश्न पूछ सकते हैं और अधिकारियों से सीधे उत्तर प्राप्त कर सकते हैं। साथ ही, 'महासंपर्कएप्लिकेशन के माध्यम से भारतीय प्रशासनिक सेवा के अधिकारियों और जनप्रतिनिधियों की जानकारी सरलता से प्राप्त की जा सकती हैयह जानकारी भी उन्होंने दी। प्रशासनिक व्यवस्था में समस्याओं के समाधान हेतु तकनीक आधारित उपायों की आवश्यकता है और इसके लिए तकनीक प्रभावी साधन प्रदान करती हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी की विभिन्न योजनाओं की जानकारी देते हुए उन्होंने नवाचार पहल और तकनीकी साधनों के समन्वय का महत्व रेखांकित किया

Many Tools Available for Using Innovative Technology in Government Work

 Many Tools Available for Using Innovative Technology in Government Work

– Agriculture Commissioner Suraj Mandhare

 

Mumbai, May 6: Several tools are available for using innovative technology in government work for managing information, time planning, monitoring tasks, and reporting. Using such tools will certainly enhance efficiency in official operations, said Agriculture Commissioner Suraj Mandhare.

As part of the skill development of administrative officers and staff under the "Tech Wari: Maharashtra Tech Learning Week," a lecture on “Effective Use of Technology” was delivered by Agriculture Commissioner Suraj Mandhare and Dr. Vikas Naik, Joint CEO of the Maharashtra State Innovation Society, at the Conference Hall, 6th Floor, Mantralaya. Resident Commissioner R. Vimala from Maharashtra Sadan, New Delhi, along with trainees, was present at the session.

Commissioner Mandhare stated that tools like Google Keep, Evernote, Microsoft OneNote, Google Drive, Dropbox, ClickUp, Microsoft To Do, Google Calendar, Google Sheets, and Telegram can help speed up work. Technology is something that brings everyone to the same level without any discrimination. It benefits everyone regardless of physical ability, color, caste, or religion.

He added that using tools like Microsoft OneNote can help resolve many governance-related challenges. Tablets with stylus pens are extremely useful in administrative tasks. The focus should be on smart work rather than hard work. While working for the government, one is also expected to be technologically proficient, he emphasized.

Dr. Vikas Naik, Joint CEO of the Maharashtra State Innovation Society, said that if technology is used properly, government functioning can be more effective and timely. Applications like "Any.do" can be used for task management and Excel can be useful for managing data at the field level.

      While giving information about the ‘Maharashtra Civil Service’ website, Mr. Naik stated that citizens can ask questions related to any department on this platform and receive direct responses from officials.

He also provided information about the "Mahasampark" application, which helps in easily accessing information about officers in the Indian Administrative Service and public representatives. He emphasized that there is a need for problem-solving technologies in the administrative system, and technology provides powerful tools for that purpose.

Highlighting the importance of combining innovative initiatives with technology, he gave details of various schemes of the Maharashtra State Innovation Society.

0000

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध

 शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर

करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध

- कृषी आयुक्त सुरज मांढरे

 

              मुंबई, दि. ६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापनवेळेचे नियोजनकामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण  तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान झाले. यावेळी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील निवासी आयुक्त आर. विमला यांसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की, गुगल कीपएव्हरनोटमायक्रोसॉफ्ट वन नोटगुगल ड्राइव्हड्रॉपबॉक्सक्लिकअपमायक्रोसॉफ्ट टू डूगुगल कॅलेंडरगुगल शीट्सटेलिग्राम याचा वापर करून आपले काम अधिक गतिमान करता येईल. टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे जी कोणताही भेदभाव न करता सर्वांना एका समान पातळीवर आणते. शरीररंगजातधर्म यांचा फरक न बघता ती सर्वांना उपयुक्त ठरते.

मायक्रोसॉफ्ट वन नोट या टूल्सचा जर वापर केला तर शासनाचे अनेक प्रश्न सुटतील. पेन्सिल असलेले टॅबलेट कामकाजात खूप उपयुक्त आहेत. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क वर भर दिला पाहिजे. शासनाचे काम करत असताना स्वतः देखील तंत्रज्ञान अवगत करणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांनी सांगितले कीतंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शासकीय कामकाज अधिक परिणामकारक व वेळेत पूर्ण होऊ शकते. टास्क मॅनेजमेंटसाठी ऐनी डू (Any Do) सारख्या अ‍ॅप्लिकेशन्सचा उपयोग करून कामाची नोंद ठेवता येते व एक्सल (Excel) चा उपयोग क्षेत्रीय स्तरावर डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

महाराष्ट्र सिव्हिल सर्विस’ संकेतस्थळाची माहिती देताना श्री. नाईक यांनी सांगितले कीया प्लॅटफॉर्मवर नागरिक कोणत्याही विभागासंदर्भात प्रश्न विचारू शकतात व अधिकाऱ्यांकडून थेट उत्तर मिळवू शकतात.

त्याचबरोबर, ‘महासंपर्क’ अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारीलोकप्रतिनिधी यांची माहिती सुलभपणे मिळू शकतेयाबाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रशासकीय यंत्रणेत एखाद्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या तंत्राची गरज आहे आणि यासाठी तंत्रज्ञान ही प्रभावी साधने उपलब्ध करून देतेअसेही श्री. नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देत त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

भाषिणी' च्या माध्यमातून आता विविध भाषातील संवाद सुलभ होणार

 भाषिणीच्या माध्यमातून आता विविध भाषातील संवाद सुलभ होणार

- अमिताभ नाग

मुंबईदि. ६ :-  आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित भाषिणी’ हा संवादाचा नवीन सेतू ठरत आहे. भाषिणी’ च्या माध्यमातून संवादासाठी भाषा-भाषांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा अन्य भाषेतील संवाद अधिक सुलभ होईलअसे प्रतिपादन डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी भाषिणी- भाषेचा अडसर दूर करणे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमलामराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

'भाषा इंटरफेस फॉर इंडिया’ या संकल्पनेवर आधारित भाषिणी’ प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याचे सांगून श्री. नाग म्हणाले, ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एक सर्वंकष संवादव्यवस्था उभी केली जात आहे. भाषिणीच्या माध्यमातून नागरिक संवादासाठी केवळ मजकूर नव्हे तर थेट आवाजातून आवाजात भाषांतर करू शकतील असेही त्यांनी सांगितले.

'भाषिणीमध्ये ऑडिओ-टू-टेक्स्टटेक्स्ट-टू-ऑडिओटेक्स्ट ट्रान्सलेशन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. केवळ मजकुराचे नाही तर आवाजावरून थेट आवाजात भाषांतरही शक्य झाले असल्याने एक व्यक्ती एका भाषेत बोलल्याससमोरची व्यक्ती तो संवाद दुसऱ्या भाषेत सहज समजू शकतोअसे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नाग यांनी सांगितले.

शासकीय योजनांची माहितीहेल्पलाईन सेवाशिक्षणविषयक साहित्य हे सर्व भाषिणीच्या मदतीने प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याने योजनांचा लाभ मिळण्यास निश्चित उपयोग होईलअसेही त्यांनी सांगितले.

०००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

 

अहिल्यानगरदि. ६ :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्रीपरिषदेच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांनी यातील पहिला अल्बम मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

 

टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

 

मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 

अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्रीहत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi