Saturday, 3 May 2025

ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

 ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरणतंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य

नेटफ्लिक्ससोनीजिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

 

मुंबईदि. ३ : ओटीटी विश्वात तंत्रज्ञानवैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहेअसे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद - २०२५ मध्ये 'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआयपर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप'  या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लायनस्गेट प्ले एशियाचे अध्यक्ष रोहित जैन यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या चर्चेत जिओ हॉटस्टारचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर भरत रामसोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जीनेटफ्लिएक्स इंडियाचे उपाध्यक्ष (कन्टेन्ट) मोनिका शेरगिलएशिया पॅसिफिक आणि मिनी प्राइम व्हिडिओचे उपाध्यक्ष गौरव गांधीहंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय यांनी सहभाग घेतला.

प्रेक्षकासाठी योग्य कंटेंट

गौरव बॅनर्जी यांनी सांगितले कीग्राहक काय पाहतोकाय शोधतोत्याच्या आवडीवरुनच आम्ही पुढील कंटेंट सुचवतो. प्राईम व्हिडिओमिनी टीव्ही यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांचा प्रवास एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. भाषेच्या विविधतेतून प्रेक्षकांची रुची वाढवण्यासाठी सबटायटल्सडब्स महत्त्वाच्या ठरतात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेटफ्लिक्सचार आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यावर भर

नेटफ्लिक्सवरील प्रत्येक वापरकर्त्याचा अनुभव वेगळा असतोकारण आमचे उत्पादन सतत प्रेक्षकांच्या वर्तनावर अवलंबून असते. वैयक्तिकीकरण आणि कंटेंट डिस्कवरी यामध्ये समतोल राखतनवीन शैली आणि ट्रेंड्स प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम अल्गोरिदम करत असते. हे एक सर्जनशील माध्यम आहेअसे मत नेटफ्लिक्सच्या कंटेंट उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी मांडले.

जिओहॉटस्टारचा अनोखा क्रिकेट टू कंटेंट’ फॉर्म्युला

जिओहॉटस्टारचे भरत राम यांनी आयपीएलसारख्या मोठ्या इव्हेंटनंतर प्रेक्षकांना इतर कंटेंटकडे वळवण्याची रणनीती मांडली. जर कोणी तमिळ कमेंट्री निवडलीतर त्याच्या होमपेजवर तमिळ कंटेंट जास्त दिसतेअसे त्यांनी सांगितले. वापरकर्त्याचे डिवाइसभाषा आणि लोकेशन यावरून वैयक्तिक शिफारसी केल्या जातात. यामागे प्रेक्षक वर्षभर टिकून राहावाहेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनीचा भर कथांवर

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांनी सांगितले कीवैयक्तिकरणाबरोबरच कथांवर आपला सहज विश्वास बसतो. आपण कथा सांगणाऱ्या संस्कृतीतून आलो आहोत. ज्या भाषावेळ आणि प्रदेश यांच्या सीमा पार करतात. पुष्पा २ आणि छावा सारख्या यशस्वी चित्रपटांचा दाखला देतत्यांनी हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरवून बनवत नाहीतती वेळभावना आणि सर्जनशील दृष्टी ठरवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नव्या ओटीटी पर्वाची सुरुवात

या चर्चेतून स्पष्ट झाले कीओटीटी क्षेत्र आता केवळ कंटेंट तयार करणारे राहिलेले नाहीतर एक स्मार्टगुंतवणूक करणारेआणि सांस्कृतिकदृष्ट्या सजग माध्यम बनले आहे. वैयक्तिक अनुभवभाषिक विविधता आणि कथांची सार्वत्रिक शक्ती हाच या नव्या ओटीटी पर्वाचा मूलमंत्र ठरत आहेत.

स्पर्धात्मक युगात ‘ए.आय.’चा वापर गरजेचा चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

 स्पर्धात्मक युगात ‘ए.आय.’चा वापर गरजेचा

चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

 

मुंबईदि. ३ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) टूल्सचा आता प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. ए.आय. टूल्स शिकण्यास अतिशय सोपे असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात ‘ए.आय.’चा वापर केल्यास आपल्या क्षेत्रात काम करणे सोपे जाईलअसे मत चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या निर्मात्यांच्या चर्चासत्रामधे व्यक्त करण्यात आले.

 

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित वेव्हज् परिषदेमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये ए.आय. कसे परिवर्तन घडवित आहे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकरन्यूरल गॅरेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नाटेकरचित्रपट निर्माता राघवेंद्र नाईक यांनी सहभाग घेतला.

 

या चर्चासत्रात ‘ए.आय.’चा चित्रपट निर्मितीतील वापराबाबत चर्चा करण्यात आली. ‘ए.आय.’च्या सहाय्याने पटकथासंवाद लिहिणे अधिक वेगवान बनले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक वास्तवदर्शी आणि कमी खर्चात तयार करता येतात. ‘ए.आय.’ च्या मदतीने संपादन प्रक्रियाऑडिओ आणि व्हिज्युअल डबिंग अतिशय सुलभ झाले असून अधिक भाषांमध्ये डबिंग करणे सुद्धा सहज शक्य झाले असल्याचे सहभागी निर्मात्यांनी सांगितले.

 

‘ए.आय.’च्या कोणत्या टूलचा वापर करावायाबाबत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री.चिंचलीकर यांनी अनेक टूल्स उपलब्ध असून ‘ए.आय.’चा वापर करताना सुरुवातीला मोफत उपलब्ध असलेल्या विविध टूल्सचा वापर करावा त्यातून आपल्याला सुलभ असणारी टूल्स विकत घ्यावेअसा सल्ला दिला.

 

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

 आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर

उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज

‘लाईट्सकॅमेराएक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

 

मुंबई, दि ३ : जागतिक स्तरावर आशय निर्मितीच्या क्षेत्रात भारत एक उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार म्हणून सज्ज असल्याचे प्रतिपादन  एव्हीजीसी-एक्सआर मंचफिक्कीचे माजी अध्यक्ष,  अशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित "वेव्हज २०२५दृकश्राव्य मनोरंजन समिट" मध्ये ‘लाईट्सकॅमेराएक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’  (Lights, camera,xr how virtual production is reshaping global cinema ) या विषयावर आयोजित परिसंवादात श्री.कुलकर्णी बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक सिनेमा  कशा पद्धतीने बदलत आहे या विषयावर  चित्रपट दिग्दर्शक केतन मेहताअशिष कुलकर्णी माजी अध्यक्षएव्हीजीसी-एक्सआर मंचफिक्की यांच्या सह  लायटस स्टुडिओ आणि ओटीटी अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रागीव खेऱोर आणि ब्रायन निट्झकिन – सह-संस्थापकऑर्बिटल स्टुडिओज या तज्ञांनी आपली मते मांडली. सत्राचे सूत्रसंचालन मीडिया तंत्रज्ञान नवोपक्रमक,  लोनाकोचे संस्थापक सायमन इंग्रॅम यांनी केले.

सिनेसृष्टीत तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा वापर सिनेमा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याला नवे वळण देत आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन ही केवळ एक संकल्पना राहिली नसूनती आता सर्जनशीलताकार्यक्षमता आणि जागतिक सहकार्याचा नवा मार्ग ठरत असल्याचा सूर व्यक्त करत या विशेष सत्रातजगभरातील तंत्रज्ञान आणि सिनेसृष्टीतील अग्रणी तज्ज्ञ रागीव खेऱोरब्रायन निट्झकिनआणि सायमन इंग्रॅम  या वक्त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला . यावेळी हे  तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे कार्य करते आणि ते सिनेमा निर्मितीला कशी दिशा देत आहे  यादृष्टीने व्हर्च्युअल प्रॉडक्शनच्या भविष्याच्या अनुषंगाने वक्त्यांनी आपले म्हणणे मांडले.

आशिष कुलकर्णीम्हणाले की चित्रपट आणि इतर सर्व प्रकारच्या आशय निर्मितीसाठी भारत सर्वार्थाने सुयोग्य ठिकाण आहे. भारतीय हवामानामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात  विविध सिनेमा व संलग्न क्षेत्रात निर्मिती साठी उत्कृष्ट संधी आहे. भविष्यात येत्या पाच दहा वर्षांत भारत  व्हर्चुअल निर्मिती मधील एक महासत्ता बनेल. केंद्र सरकार यासाठी पाठिंबा देत आवश्यक सहकार्य करत आहेत, त्यामुळे गेल्या दहा वर्षांत भारतात निर्मिती प्रकल्पाच्या प्रमाणात वाढ होत आहे.

चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता म्हणाले कीगोष्ट, कथा सांगण्याची समृद्ध परंपरा भारतात आहे. सकस आशय हा भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य राहिला आहे. त्यामुळे बदल्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सृजनशीलतेला मोठे अवकाश प्राप्त होईल. त्याचा लाभ भारतीय कलाकारतंत्रज्ञ यांनी अवश्य घेतला पाहिजे. हा आपल्या क्षमता सिद्ध करून त्या जागतिक पातळीवर पोहचवण्याचा काळ आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता सर्वाधिक प्रभावी ठरत आहे.

 सृजनशीलतावास्तव आणि कल्पना शक्ती यामध्ये खूप सूक्ष्म फरक आहे. त्या खूप सुंदर पद्धतीने एकत्रितपणे आशय निर्मितीसाठी सक्रिय आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान निश्चितच मोठा प्रभाव टाकत असल्याचे मत श्री. पाठक यांनी व्यक्त केले.

सामजिक भावना आणि विचार मांडण्याचे लघुपट हे प्रभावी माध्यम

 सामजिक भावना आणि विचार मांडण्याचे 

लघुपट हे प्रभावी माध्यम

- दिग्दर्शक वयाचेच्लाव गुज़

‘Connecting Creators, Connecting Countries’ चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : लघुपट हे मनोरंजनाचे माध्यम नाही तर सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना आणि विचार प्रभावी मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे,असे मत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक वयाचेच्लाव गुज़ यांनी व्यक्त केले.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ‘Connecting Creators, Connecting Countries’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

 

श्री. गुज़ म्हणालेसामजिक जीवनात आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवातून प्रत्येकाच्या मनात एक लघुपट (शॉर्ट फिल्म) तयार असतोफक्त त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज असते. डिजिटल माध्यमामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली  आहे.आजच्या तरुण कलावंतांमध्ये लघुपट निर्मितीकडे अधिक कल वाढला आहे. लघुपटाचे यश विषयापेक्षा त्यामागील भावना आणि आशय प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात असते असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर लघुपट दाखविण्यात आले.

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम

 कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून

समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम

-  माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन

 

मुंबईदि. ३ : समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओ यांनी करावेअसे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले.

 

मुंबईत सुरू असलेल्या 'वेव्हज २०२५या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मुरुगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूसहसचिव पृथुल कुमारइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या कुलगुरु डॉ. अनुपमा भटनागर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ यांना इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशनप्रमोटिंग लोकल कल्चरसस्टेनेबिलिटी मॉडेल अवॉर्ड्स यासारखे विविध पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

 

माहिती व प्रसारण राज्यमंत्री श्री मुरुगन म्हणालेकम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक समाजाच्या भावनातेथील संस्कृतीकलासाहित्यखानपान यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. वेव्हजच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून माहिती व मनोरंजनाबरोबरच महिला सक्षमीकरणसंस्कृतीवर्धनग्रामीण विकासासाठी काम होत आहे याचे समाधान वाटते. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेतअसे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

 

उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यानंतर कम्युनिटी रेडिओशी संबंधित विविध विषयांवर दिवसभर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रांमध्ये कम्युनिटी रेडिओच्या आर्थिकदृष्ट्या विकासाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये देशातील विविध विद्यापीठातील विषयतज्ज्ञांनी तसेच विविध कम्युनिटी रेडिओच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

किरण मजूमदार शॉ ने वेव्स 2025 में भारत के सृजनशील भविष्य की रूपरेखा प्रस्तुत की स्टार्टअप्स से फिल्मों के परे सोचने और वैश्विक ब्रांड, परिसंस्थाएँ व बौद्धिक संपदा निर्माण करने का आह्वान "परंपरा और तकनीक के संगम से नई कहानियाँ रचने का यही समय है" – शॉ

 किरण मजूमदार शॉ ने वेव्स 2025 में भारत के

सृजनशील भविष्य की रूपरेखा प्रस्तुत की

स्टार्टअप्स से फिल्मों के परे सोचने और वैश्विक ब्रांडपरिसंस्थाएँ व बौद्धिक संपदा निर्माण करने का आह्वान

"परंपरा और तकनीक के संगम से नई कहानियाँ रचने का यही समय है" – शॉ

 

मुंबई3 मई – भारत में रचनात्मक कंटेंट निर्माण के क्षेत्र में कार्यरत स्टार्टअप्स को केवल फिल्मों तक सीमित न रहते हुए वैश्विक प्रभाव उत्पन्न करने वाले ब्रांड्सपरिसंस्थाएँ और बौद्धिक संपदा तैयार करनी चाहिएऐसा आवाहन बायोकॉन की संस्थापक और वैश्विक व्यवसाय की अग्रणी किरण मजूमदार शॉ ने किया। वे मुंबई के जिओ वर्ल्ड सेंटर में आयोजित पहले वैश्विक दृश्य-श्रव्य मनोरंजन शिखर सम्मेलन वेव्स 2025 के दूसरे दिन के संवाद सत्र में बोल रही थीं।

 

भारत का नवाचार पुनर्जागरण: वैश्विक स्टार्टअप्स का अगला दशक विषय पर फोर्ब्स एडिटर-एट-लार्ज मनीत आहुजा के साथ चर्चा की शुरुआत करते हुए शॉ ने भारतीय कहानियों की वैश्विक क्षमता पर प्रकाश डाला। उन्होंने रामायण का उदाहरण देते हुए कहाअब वह समय है जब हमें परंपरा और तकनीक के संगम से नई कहानियाँ रचनी चाहिए। जिस तरह जॉर्ज लुकास ने स्टार वॉर्स’ के लिए भारतीय महाकाव्यों से प्रेरणा लीउसी तरह हम भी अपनी सांस्कृतिक विरासत को वैश्विक फ्रैंचाइज़ी में बदलने के लिए तकनीक का उपयोग कर सकते हैं।

 

भारत की जनसंख्या संबंधी और डिजिटल क्षमता की बात करते हुए उन्होंने कहाअरबों स्मार्टफोन और तकनीक-प्रवीण जनरेशन के साथ भारत वैश्विक नवाचार के लिए तैयार है। लेकिन हर ब्लॉकबस्टर की शुरुआत एक छोटी सी कल्पना और निरंतर केंद्रित प्रयास से होती है। उन्होंने बायोकॉन को गेराज से शुरू कर वैश्विक बायोटेक पॉवरहाउस बनाने के अपने सफर की तुलना भी की।

 

भारत की रचनात्मक अर्थव्यवस्था पर फोकस

शॉ ने कहा कि रचनात्मक क्षेत्र से जुड़े लोगों को ऑरेंज इकॉनमी यानी सृजनशील अर्थव्यवस्था के विकास पर ध्यान केंद्रित करना चाहिएजिसमें अपार संभावनाएँ हैं। वर्तमान में मीडिया और मनोरंजन क्षेत्र भारत की जीडीपी में 20 अरब डॉलर का योगदान देता है। हमें 2047 तक इसे 100 अरब डॉलर और अंततः 1 ट्रिलियन डॉलर तक ले जाने का लक्ष्य रखना चाहिएजो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सपनों के अनुरूप है, उन्होंने कहा।

 

रचनात्मक निर्माताओं और स्टार्टअप्स का सशक्तिकरण

भारत की रचनात्मक क्षमता पर पूछे गए प्रश्न का उत्तर देते हुए शॉ ने कहा कि AR (ऑगमेंटेड रिएलिटी), VR (वर्चुअल रिएलिटी) और इमर्सिव अनुभवों का समावेश एक प्रमुख क्षेत्र होगा। उन्होंने कहाआगामी यूनिकॉर्न केवल ऐप्स नहीं होंगेबल्कि वे रचनात्मक निर्माता होंगे जो बौद्धिक संपदातकनीक और इमर्सिव स्टोरीटेलिंग को समझते हैं।

 

उन्होंने फिल्म RRR के प्रसिद्ध गीत नाटू नाटू’ का उदाहरण देते हुए कहा कि भारतीय सृजनशीलता को केवल समुदाय से भावनात्मक रूप से जुड़ने तक सीमित नहीं रहना चाहिएबल्कि उसे वैश्विक स्तर पर भी प्रासंगिक होना चाहिए। हर महान विचार एक छोटे स्तर से शुरू होता है। आप उसे कितनी दूर तक ले जाते हैंयही सबसे महत्वपूर्ण होता है। उन्होंने यह भी कहा कि विफलता इस यात्रा का एक हिस्सा है।

0000


Kiran Mazumdar Shaw Outlines India's Creative Future at WAVES 2025 Startups Urged to Think Beyond Films and Build Global IP, Brands, and Ecosystems “

 Kiran Mazumdar Shaw Outlines India's Creative Future at WAVES 2025

Startups Urged to Think Beyond Films and Build Global IP, Brands, and Ecosystems

“This is the Time to Create New Stories Blending Tradition and Technology”: Shaw

 

Mumbai, May 3 – Indian startups in the creative content space must think beyond films and focus on building globally impactful brands, ecosystems, and intellectual property, said Kiran Mazumdar Shaw, a global business leader and founder of Biocon. She was speaking during a dialogue session on the second day of the inaugural global audiovisual entertainment summit, WAVES 2025, held at the Jio World Centre in Mumbai.

 

Kicking off the conversation with Forbes Editor-at-Large Maneet Ahuja on the theme “India’s Innovation Renaissance: The Next Decade of Global Startups”, Shaw spoke about the global potential of Indian narratives. Referring to the Ramayana, she said, “This is the right time to create new stories that blend tradition and technology. Just as George Lucas took inspiration from timeless Indian epics for ‘Star Wars,’ we too can use technology to transform our cultural heritage into global franchises.”

 

Speaking about India’s demographic and digital strengths, Shaw remarked, “With billions of smartphones and a tech-savvy Gen Z population, India is poised for global innovation. But just like every blockbuster begins with a single idea and relentless focus, success starts small.” She drew a parallel with her own journey of starting Biocon in a garage and transforming it into a global biotech powerhouse.

 

On India’s creative economy, Shaw emphasized the need to focus on the growth of the "Orange Economy", which holds massive potential. “Currently, the media and entertainment sector contributes $20 billion to India’s GDP. We must aim for a $100 billion creative economy by 2047 and ultimately reach $1 trillion, in alignment with Prime Minister Narendra Modi’s vision,” she stated.

 

Empowering Creative Makers and Startups

When asked about India’s creative potential, Shaw pointed to the integration of AR, VR, and immersive experiences as key frontiers. “The next unicorns won’t just be apps, but creative creators who understand intellectual property, technology, and immersive storytelling,” she said.

 

Quoting the song ‘Naatu Naatu’ from the film RRR as an example, she stressed that Indian creativity must go beyond merely connecting with communities emotionally — it must also be globally relevant. “Every great idea begins small. How far you take it is what truly matters,” she said, noting that failure is a part of this journey

Featured post

Lakshvedhi