Tuesday, 4 February 2025

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठायोजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण

 जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामाच्या प्रगतीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

·         योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण

·         मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली उपक्रमाची प्रशंसा

मुंबईदि. : जल जीवन मिशनच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण भागात प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यात येते. पूर्ण झालेल्या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्याची योजना पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. याची प्रशंसा करुन इतर विभागांनी देखील त्यांच्या मालमत्तांची देखभाल दुरुस्ती स्थानिकरित्या उपलब्ध कारागिरांकडून करुन घेण्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करण्याबाबत विचार करावाअसे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियानाच्या शिखर समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत त्यांनी जल जीवन मिशन कामाच्या व्याप्ती घटकाचा त्यांनी आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयजल जीवन मिशनचे अभियान संचालक ई.रविंद्रनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय जल जीवन अभियान संचालक अरुण केंभवी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जल जीवन मिशन प्रगतीचा आढावा

राज्यात एकूण 40,297 गावे असून 1,00,404 वस्त्या आहेत. यातील एकूण 1.46 कोटी लक्ष्यित घरांपैकी 1.29 कोटी घरांना कार्यात्मक नळ जोडणी (एफएचटीसी) पुरविण्यात आली आहे. महाराष्ट्राने नळ जोडणी देण्याच्या बाबतीत 88.08 टक्के यश मिळवले आहेजे राष्ट्रीय सरासरी 79.71 टक्के पेक्षा जास्त आहे. 43,241 योजनांपैकी (यामध्ये पीव्हीटीजी जनमान योजना समाविष्ट आहेत आणि शाळा व अंगणवाड्या वगळल्या आहेत) 43,182 योजनांसाठी (99.86 टक्के) कामाचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी 28,110 योजनांमध्ये (65.21 टक्के) काम प्रगतीपथावर असून 15,010 योजनांची (34.82 टक्के) कामे पूर्ण झाली आहेत.

राज्यातील 81,522 शाळांपैकी 80,876 शाळांना (99.20 टक्के) नळ जोडणी प्रदान करण्यात आली आहे. तर, 90,664 अंगणवाड्यांपैकी 89,386 अंगणवाड्यांना (98.59 टक्के) नळ जोडणी देण्यात आली आहे. वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 26 जानेवारी 2025 पर्यंत जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी एकूण 4,925.24 कोटी रुपये खर्च झाले असून वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये एकूण 17,296.02 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती यावेळी विभागामार्फत देण्यात आली.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

 महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 

२३ हजार ७७८ कोटींची तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी,

 केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

·         २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

मुंबईदि. ३ :- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापुर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.

महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या  'डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसीचार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वित केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वित आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्गभुयारी मार्ग (आरएफओबीआरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज, सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

Monday, 3 February 2025

काही जण गायींना पोळी खाऊ घालतात खास त्यांचेसाठी* पौर्णिमा असो किंवा अन्य कोणताही दिवस पोळी देऊ नका.

 *काही जण गायींना पोळी खाऊ घालतात खास त्यांचेसाठी*

पौर्णिमा असो किंवा अन्य कोणताही दिवस पोळी देऊ नका.



🐂🐄 *गो मातेचे अन्न*  🎋🌾


आपल्या घरी गाय आली की आपण तिला प्रेमाने पोळी-भाकरी खाऊ घालतो, असे चित्र सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसून येते. गायी सुद्धा प्रेमाने पोळी खातात! पण वास्तव काही वेगळेच आहे, ते असे की पोळी गायीसाठी *जंक फूड* आहे. गायीला कृपया पोळी देऊ नका, *निसर्गाने गायीला शिजवलेले अन्न खायला बनवलेलेच नाही.*


आपण घरात आणलेल्या पालक, मेथी वगैरे भाज्यांमधून आपण आपल्यासाठी पाने ठेवतो आणि बाकी राहिलेले देठ, मुळे फेकून देतो. तुम्हाला जर गाईला, खायला काही द्यायचेच असेल तर उरलेल्या भाज्यांची देठ द्यावीत, तसेच गवत विकत घ्या आणि खायला द्या. दुसरा पर्याय म्हणजे एक रात्र भिजवलेले हरभरे, गहू, तांदूळ, मूग, मटकी द्यावी.


त्यांना पोळी, भाकरी खायला दिली तर त्यांच्या शेणाचा वास माणसाच्या विष्ठेसारखा येतो आणि गाईची पचनसंस्था बिघडते. त्यांच्या पचनसंस्थेमध्ये असलेले बॅक्टेरिया असे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त नसतात किंवा मदत करत नाहीत. आगीवर स्वयंपाक केल्याने अन्नामध्ये रासायनिक बदल होतो, जो गवत खाणाऱ्या प्राण्यांना पचन संस्थेला मान्य होत नाही.


*निष्पाप प्राण्यांची सेवा करताना, कळत नकळत, त्यांचे आरोग्य बिघडण्याचे कारण बनू नका.*


आपण शिजवलेले अन्न खातो, त्यामुळे विष्ठेला दुर्गंधी येते. जर आपण कच्च्या भाज्या, फळे, म्हणजे सर्व काही कच्च खाल्ल्यास विष्ठेचा वास वेगळा असेल. देवाने ज्या स्वरूपात अन्न दिले आहे, त्याच रुपात  गायीला द्यावे, त्यात छेडछाड करू नका.


मी नुकताच शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गोरक्षण संस्थेला भेट दिली. संस्था चालकांनी मला सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी कुठलेही गोग्रास स्विकारण्यास बंदी घातली आहे. ज्यांना गाईला खाद्य द्यायचे आहे, त्यांना केवळ गवत देता येते. संस्था चालकांनी सांगितले; गोग्रास दिल्याने पूर्वी गाई वारंवार आजारी होत, त्यांच्या पोटात गॅस होई, त्यामुळे त्या अस्वस्थ असत.  आता गोग्रस ( वरण, भात, भाजी, पोळी, तळलेले पदार्थ वगैरे केळीच्या पानावर ठेवून गाईला दिलेले अन्न) बंद केल्याने, गाई तंदुरुस्त असतात, आणि औषध कमी लागतात.


*शक्य असल्यास गायीला मका, ज्वारी, बाजरीचा भरडा द्यावा सोबत गूळ द्यावा हे तिचे अत्यंत आवडते आणि तिच्या साठी आरोग्यदायी खाद्य आहे*

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

 मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;

वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

 

मुंबईदि. ३ : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयदादर (पू.) येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर "लेखक तुमच्या भेटीला" आणि "एका संगीतकाराची मुशाफिरी" या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनव्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच "शब्दव्रती" या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवायग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिकग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारीमुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.

0000

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

 

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथाकविता लिहितातज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे अशा साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ या बालमहोत्सवात उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिलास्तनदा माताबालके यांना घरपोच आहारलाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींगलाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शनपोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रमग्राम बाल विकास केंद्रनागरी बाल विकास केंद्रअंगणवाडी केंद्रांना शौचालयपिण्याच्या पाण्याची सोयजीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाभिक्षेकरींच्या कामाचा मोबदलापिंक रिक्षालाडकी बहीण योजनाफिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला

ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला.

 ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिलास्तनदा माताबालके यांना घरपोच आहारलाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींगलाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शनपोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रमग्राम बाल विकास केंद्रनागरी बाल विकास केंद्रअंगणवाडी केंद्रांना शौचालयपिण्याच्या पाण्याची सोयजीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाभिक्षेकरींच्या कामाचा मोबदलापिंक रिक्षालाडकी बहीण योजनाफिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.

महिलांसाठी तालुकास्तरावर,रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचेश्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्टअस्मिता भवन उभारावे

 महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर

 

मुंबई दि. ३ : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असूनयामध्ये माविमच्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालय येथील दालनात रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणेतालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणेमहिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाजराज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारे, ‘माविमच्या कार्यकारी संचालक वर्षा लटाराज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहाविभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूरअवर सचिव सुनिल सरदारउपसचिव आनंद भोंडवे आदिंसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या कीश्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेतीशेतीसंलग्न व बिगर शेती आधारित उद्योगांना व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

याचबरोबर रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावेतसेच माविमचे कार्य ग्रामीण भागातही पोहोचावे यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री कू. तटकरे यांनी दिले.

बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामधील रिक्त पदे कायम स्वरुपासह बाह्यस्त्रोत व कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आल्याची माहिती सचिव अनुपकुमार यादव यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi