Friday, 15 November 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या

मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी)गट-क या संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९१० व ११ ऑक्टोबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदेअनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पदअनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पदआर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पदइतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या वर्गवारीकरिता त्या - त्या वर्गवारीचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी दिव्यांगाकरिता राखीव ०२ पदांपैकी ०१ पदाकरिता (कर्णबधीर) दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार अराखीव (सर्वसाधारण) वर्गवारीचे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

 जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अनाथांकरिता ०१ पद राखीव होते. त्याकरिता अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार या अराखीव वर्गवारीचे ०१ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.


आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली; ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली;

५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 मलबार हिल विधानसभा मतदारसंघात

८५ वर्षावरील २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

            मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर२०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र ‘१२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मलबार हिल विधानसभा मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले.

            लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे', असा महत्वपूर्ण संदेश या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान करून कृतीद्वारे इतर मतदारांना दिला आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी २६८ मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२ ड’ भरून जमा केले होते. अशा एकूण २७८ मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे. 

            ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी घरून मतदान करण्याच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करीत निवडणूक पथकाचे आभार मानले.             

मुंबई शहर जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

 मुंबई शहर जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ

पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

 

मुंबईदि. १४ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडाशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला.

            राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी,  सैन्यदलातील अधिकारी,  दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोग यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेव्दारे (postal ballot Paper) मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२’ किंवा १२ अ’ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संबधित निवडणूक अधिकारी यांनी पडताळणी करून टपाली मतपत्रिका दिली. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडाशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या सात मतदारसंघात आज निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहात टपाली मतदान केले.

            सायन कोळीवाडाशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या मतदारसंघात १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. धारावी मतदारसंघात केवळ आजच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वडाळा मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबरवरळी मतदारसंघात १६ ते १७ नोव्हेंबरमाहीम मतदारसंघात १६  नोव्हेंबर रोजी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी टपाली मतदान केल्याचे समाधान पोलिस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. टपाली मतदानानंतर अनेक पोलीस कर्मचारी अतिशय उत्साहानेअभिमानाने मतदान केल्याची निशाणी असलेले आपले बोट अभिमानाने उंचावत सेल्फी काढताना दिसून येत होते

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील

११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

            मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर२०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेअंतर्गत शिवडी विधानसभा मतदारसंघात ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.  

             मुंबई शहर जिल्ह्यातील शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी ११५  मतदारांनी तर ३४ पैकी १५ दिव्यांग मतदारांनी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या एकूण १३० अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.           

****

Thursday, 14 November 2024

लक्षात ठेवा की भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.

 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

   *🍁🍁🌷!! शुभ सकाळ !!🌷🍁🍁* 

       *!! आवर्जून वाचावे व पुढे पाठवावे!!*


*अत्यंत महत्वाची बातमी*

 *शेअर करा आणि सर्वांना पाठवा*

 

 लक्षात ठेवा की भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.

 तुमच्या घरातील अशा अनेक लोकांना तुम्ही ओळखत असाल ज्यांचे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढले आहे.

 अनेक बड्या अमेरिकन कंपन्या भारतातील हृदयरुग्णांना अब्जावधी रुपयांची औषधे विकत आहेत.

 पण तुम्हाला काही त्रास झाला तर डॉक्टर तुम्हाला अँजिओप्लास्टी करायला सांगतील.

 या ऑपरेशनमध्ये, डॉक्टर हृदयाच्या नळीमध्ये स्टेंट नावाचा स्प्रिंग घालतात.

 हा स्टेंट यूएसमध्ये बनवला जातो आणि त्याची उत्पादन किंमत फक्त 3 डॉलर (150-180 रुपये) आहे.

 हे स्टेंट भारतात आणून तीन ते पाच लाख रुपयांना विकले जातात आणि तुम्हाला लुटले जाते.

 डॉक्टरांना लाखो रुपयांचे कमिशन मिळते म्हणून त्यांना अनेकदा अँजिओप्लास्टी करण्यास सांगितले जाते.

 कोलेस्ट्रॉल, बीपी किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण अँजिओप्लास्टी ऑपरेशन आहे.

 ते कधीही कोणासाठी यशस्वी होत नाही.

 कारण डॉक्टर हृदयाच्या नळीत जो स्प्रिंग टाकतात तो पेनच्या स्प्रिंगसारखा असतो.

 काही महिन्यांत, स्प्रिंगच्या दोन्ही बाजूंना ब्लॉकेज (कोलेस्टेरॉल आणि चरबी) जमा होऊ लागतात.

 यानंतर दुसरा हृदयविकाराचा झटका येतो.

 डॉक्टरांनी पुन्हा अँजिओप्लास्टी करा असे सांगितले आहे.

 लाखो रुपये लुटले जातात आणि त्यात आपला जीव जातो.

 

                आता वाचा

        त्याचे आयुर्वेदिक उपचार

 

 आल्याचा रस -

 👇

 ते रक्त पातळ करते.

 हे नैसर्गिकरित्या 90% वेदना कमी करते.

 

 लसूण रस

 👇

 यामध्ये असलेले एलिसिन तत्व कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी करते.

 जे हार्ट ब्लॉकेज उघडते.

 

 *लिंबू सरबत*

 👇

 *त्यातील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम रक्त शुद्ध करतात.*

 *यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*

 

 *सफरचंद व्हिनेगर*

 👇

 *यामध्ये 90 प्रकारचे तत्व असतात जे शरीराच्या सर्व नसा उघडतात, पोट साफ करतात आणि थकवा दूर करतात.*

 

          *ही देशी औषधे*

        *अशा प्रकारे वापरा*

 

 *1- एक कप लिंबाचा रस घ्या;*

*२- एक कप आल्याचा रस घ्या;*

*3- एक कप लसणाचा रस घ्या;*

 *4-एक कप सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या;*

 

 *चारही मिक्स करा आणि मंद आचेवर गरम करा,*

*3 कप राहिल्यावर ते थंड करा*

 *आणि आता त्यात*

 *3 कप मध घाला. आणि औषध काचेच्या बाटलीत  ठेवा.*

 

 हे औषध 3 चमचे रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या.

 सर्व ब्लॉक काढले जातील.

 

 मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की हा संदेश जास्तीत जास्त पसरवा जेणेकरून प्रत्येकजण या घरातील देशी औषधाने स्वतःला बरे करू शकेल; धन्यवाद

 

 फक्त संध्याकाळचा विचार करा

 संध्याकाळचे ७:२५ वाजले आहेत आणि तू एकटीच घरी जात आहेस.

 अशा परिस्थितीत, छातीत तीव्र अचानक तीक्ष्ण वेदना होते, जी तुमच्या खांद्यावरून हातातून जाते.

 वरील जबड्यापर्यंत पोहोचते.


 तुम्ही तुमच्या घरापर्यंत सर्वात जवळच्या हॉस्पिटलपासून 5 मैल अंतरावर आहात आणि दुर्दैवाने तुम्ही तिथे पोहोचू शकाल की नाही हे ही तुम्हाला माहीत नाही.


 तुम्ही  ह्याCPR मध्ये प्रशिक्षित आहात पण ते कसे वापरायचे हे तुम्हाला शिकवले जात नाही..(CPR=छातीवर दोन्ही तळहात ठेवून 10 मिनिटे सतत दाब देणे.) 

 

      हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा

        त्या साठी हा उपाय👌

              

 हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान बहुतेक लोक एकटे असल्याने, त्यांना कोणत्याही मदतीशिवाय श्वास घेण्यास त्रास होतो.

 असे घडत असते, असे घडू शकते. ते बेहोश होऊ लागतात आणि 

तुमच्या हातात फक्त 10 सेकंद असतात.

 अशा परिस्थितीत, पीडित व्यक्ती जोरात खोकून खोकून स्वतःला सामान्य ठेवू शकते. झटका

 प्रत्येक खोकल्यापूर्वी घेतले पाहिजे

 आणि खोकला इतका मजबूत आहे की, 

 छातीतून थुंकणे प्रक्रिया होते. 

 मदत येईपर्यंत

 दोन सेकंदांसाठी ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. 

 हृदयाचे ठोके सामान्य असल्यास नंतर जा

 चला करूया👇👇

 जोरदार श्वास घेणे

 ऑक्सिजन निर्माण करतो, 

 आणि तीव्र खोकला होतो की

 ज्यामुळे हृदय आकुंचन पावते व

 नियमित रक्त परिसंचरण (blood circulation) 

 हलवत आहे.

 

 *कृपया हा संदेश शक्य तितक्या सर्वांपर्यंत पोहोचवा.* *हा मेसेज प्रत्येकाने १० जणांना पाठवला तर एखाद्याचा जीव वाचू शकतो,* *असेही हृदयाच्या डॉक्टरांनी* 

*( हार्ट स्पेशलिस्ट )सांगितले.*

 

       *नक्की  हा संदेश सर्वांना पाठवा*

     *कुणाचा तरी जीव वाचवा.* 

 

 मलाही एका मित्राने पाठवले

 आता तुमची पाळी आहे  SAVE LIFE .

 सार्वजनिक हिताचे हे प्रसारण. 

  

 हा मेसेज 3 ग्रुपवर पाठवण्याचा प्रयत्न करा. सर्व अक्षरे उघडतील आणि तुम्हाला तुमचे नाव लिहिलेले दिसेल

 हा विनोद नाही पण त्याची जादू तुम्हाला थक्क करेल.🙏🙏

   *🌷🌷🍁!!शुभ सकाळ!!🍁🌷🌷*

आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली; ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली;

५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

 

Featured post

Lakshvedhi