Thursday, 21 April 2022

 पुण्यातील स्वारगेट ते कात्रजभुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

            पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

            पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामध्ये महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज ही टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका भुयारी पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 668 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

            स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबीच्या मार्गावर 3 स्थानके असतील. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भुयारी मेट्रो रेल्वे मार्गिका उपयोगी ठरणार आहे.


            प्रकल्पासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात 450 कोटी 95 लाख व केंद्र व राज्य शासनाचे कर,शुल्क यावरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात 440 कोटी 32 लाख रुपये असा एकूण 891 कोटी 27 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेकडून 655 कोटी 9 लाख रुपयांचे वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 300 कोटी 63 लाख रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी विनंती करण्यात येणार आहे. द्विपक्षीय/बहुपक्षीय वित्तीय संस्थेमार्फत 1803 कोटी 79 लाख रुपयांचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, या कर्जाचा कोणताही भार राज्य शासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली.


-----०----

 नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदीरासाठी तिरुपती देवस्थानास जमीन

            नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            शहर पातळीवरील सुविधा (सिटी लेवल फॅसिलिटी) म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 येथे जमीन देण्यात येणार आहे. त्यानुसार उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 (एकूण क्षेत्र 40,400 चौ.मी.) 1.00 चटईक्षेत्र निर्देशांकासह एक रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने भाडेपट्टयाने थेट वाटप करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

            तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

            नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


-----०-----

 


हास्य


 

Wednesday, 20 April 2022

 🤔🤔🤔 *आश्चर्य* 🤔🤔🤔

पोट दुखो, पाठ दुखो, 

हात दुखो, मान ।

डोकं दुखो, पाय दुखो, 

नाक दुखो, कान ॥


काही झालं तरी औषध 

पोटातच घ्यायचं ।

औषधाला कसं कळतं, 

कुठल्या गल्लीत जायचं? 


जिथे दुखतं, तिथे कसं, 

हे औषध पोचतं?

उजेड नाही, दिवा नाही, 

त्याला कसं दिसतं?


हातगल्ली, पायगल्ली, 

पाठीचं पठार ।

छातीमधला मोठा चौक, 

पोटाचा उतार ॥


फासळ्यांच्या बोळामधून,

इकडेतिकडे वाटा।

औषधाला कसं कळतं, 

कुठून जातो फाटा?


लालहिरवे दिवे नाहीत, 

नाही पाटी, खुणा ।

पोलीसदादा कुठेच नसतो, 

वाटा पुसतं कुणा? 


आई, असं वाटतं की, 

इतकं लहान व्हावं ।

गोळीबरोबर पोटात जाऊन, 

सारं बघून यावं ॥


आईनं गपकन धरलं, 

म्हणे, बरी आठवण केली ।

आज तुझी आहेच राजा,

एरंडेलची पाळी !!!!

😖😖 🥴🥴 😫😫

काव्यरचना : अनामिक.

Jeneration gap

 किती सुंदर उत्तर!

 दोन "पिढ्या" मधील तुलना....... प्रत्येकाने जरूर वाचा 👌👌


 एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले: "तुम्ही लोक आधी कसे जगता-

 तंत्रज्ञानात प्रवेश नाही

 विमाने नाहीत

 इंटरनेट नाही

 संगणक नाहीत

 नाटके नाहीत

 टीव्ही नाहीत

 हवाई बाधक नाहीत

 गाड्या नाहीत

 मोबाईल फोन नाहीत?"


 त्याच्या वडिलांनी उत्तर दिले:

 "आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे -


 प्रार्थना नाहीत

 करुणा नाही

 सन्मान नाही

 आदर नाही

 वर्ण नाही

 लाज नाही

 नम्रता नाही

 वेळेचे नियोजन नाही

 खेळ नाही

 वाचन नाही"


 "आम्ही, 1940-1980 दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे:


 👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.

 👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.

 👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.

 👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.

 👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.

 👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.

 👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.

 👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.

 👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.

 👉 आमचे आई वडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.

 👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते - पण आमचे खरे मित्र होते.

 👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.

 👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.

 👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.

 👉 आम्ही एक अद्वितीय आणि, सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण *आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले*.

 *तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले.*

 आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत!!!


 आम्ही एक *लिमिटेड* आवृत्ती आहोत!


 तर आपण चांगले -

 आम्हाला आनंद द्या.

 आमच्याकडून शिका.

👇

 आम्ही पृथ्वी आणि तुमच्या जीवनातून अदृश्य होण्यापूर्वी."💔

 अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा, शेकदरी निसर्ग वन पर्यटन

केंद्र विकसीत करावे

                                                     - दत्तात्रय भरणे.

            मुंबई, दि. 20 : अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, उपसचिव वने बा.ना.पिंगळे, नागपूरचे उपवनसंरक्षक बाला यावेळी बैठकीला उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले,अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंभोरा सिंचन प्रकल्प (नल-दमयंती सरोवर) हा प्रकल्प प्रसिध्द असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणी पर्यटन सुविधा वाढल्यास स्थानिक ठिकाणी पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होईल तसेच शेकदरी सिंचन प्रकल्प येथेही पर्यटन वाढीस चालना देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. वन विभागाने यादृष्टीने कार्यवाही करावी. सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प या दोन्ही भागात निसर्ग वन पर्यटन विकसीत करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना राज्यमंत्री श्री.भरणे यांनी बैठकीत दिल्या.

            आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्याबाबत सविस्तर मुद्दे बैठकीत मांडले.


*****

ठाणे वन विभागातील टोकावडे दक्षिण वनपरिक्षेत्रात

बोगस मजुरांच्या तक्रारीची चौकशी करा

- दत्तात्रय भरने.

            मुंबई, दि. 20 : ठाणे वन विभागातील टोकावडे दक्षिण वनपरीक्षेत्रात बोगस मजुरांची यादी बाबत तक्रार प्राप्त झाल्या असून याबाबत योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात ठाणे वन विभागातील टोकावडे वनपरिक्षेत्रात बोगस मजुरांची यादी तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी उपसचिव वने बा.ना.पिंगळे, तक्रारदार अनिल गावंडे बैठकीला उपस्थित होते.

*******




Featured post

Lakshvedhi