Tuesday, 19 April 2022

 आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ

            नाशिक दि. 18 :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांकरीता ग्रीष्मकालीन आंतरवासीयता - २०२२ योजनेस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दि. १९ एप्रिल २०२२ पर्यत आहे.

            विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आंतरवासीयता पूर्ण करता यावे यासाठी विद्यापीठाने कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस (Summer Internship Program) प्रारंभ केला आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर विद्वत्तापूर्ण तपासांमध्ये सैद्धांतिकज्ञान आणि विद्यार्थ्याचे व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेमध्ये वास्तविक जीवनाचा अनुभव व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर योजना विद्यापीठाने सुरू केली आहे.

            विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेत विद्यार्थ्यांना संशोधन, क्लिनिकल रिसर्च, निसर्गोपचार, योगा, आयुर्वेद, पंचकर्म, वैद्यकीय बायोमेट्रीक वैद्यकीय तंत्रज्ञान, सामाजिक बांधिलकी, नीतिशास्त्र, पर्यावरणीय आरोग्य विज्ञान, मेडिकल मॅनेजमेंट, इपिडेमोलॉजी, बायोस्टॅटिटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोइफोरमेटिक्स, रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईक यांच्याशी संयमाने संवाद करण्याची पध्दती, सामाजिक आरोग्य व शिक्षण, धोरण आणि व्यवस्थापन, वैद्यकीय शिस्त, मानसोपचाराचे पैलू आणि सामाजिक उपयुक्तता, मानसोपचार पोषण आणि आहारशास्त्र, बायोमेडिकल इंजिनिअरींग, वैद्यकीय तंत्रज्ञान पारंपरिक आरोग्य सेवा प्रणाली, वृद्धत्व रोखण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी सर्वांगिण दृष्टीकोन, इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय रेकॉर्ड, ग्रामीण भागातील लोकसंख्या व आरोग्य समस्या समाजात रक्तदानाविषयी जनजागृती, रक्तपेढी, आरोग्य क्षेत्रात नॅनो टेक्नोलॉजीचा वापर, अनुवंशिक रोगांबाबत समुपदेशन आदींची माहिती व शिक्षण यामाध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

            विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे प्रथम द्वितीय व तृतीय वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांना ग्रीष्मकालीन आंतरवासियता प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. योजनेत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रति आठवडा रु. दोन हजार पाचशे इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी सुमारे दोन ते चार आठवडे इतका असणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या समर इंटर्नशिप प्रोग्रम सेंटरवर ग्रीष्मकालीन आंतरवासीयता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

            ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनाचा कालावधी शुल्क व अधिक माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने अधिसूचनेत दिलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून दि. १९ एप्रिल २०२२ पर्यंत विद्यापीठाकडे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल विभागास ऑनलाईन ieh@muhs.ac.in या ई-मेल पत्यावर किंवा दूरध्वनी क. 0253 - 2539156या क्रमांकावर संपर्क साधावा, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य व महाविद्यालय प्रमुखांनी विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनाची माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करावी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात येत आहे.

0000


 



 



 पां.वा.काणे यांचे संशोधन कार्य पुढे नेण्याचा विद्यापीठांनी संकल्प करावा                                                           - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी .

            मुंबई दि. 18 : भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र व भारतीय संस्कृती याविषयी केलेले अफाट संशोधन कार्य केवळ थक्क करणारे आहे. आपल्या कार्यातून काणे यांनी देश, समाज व संस्कृतीचा गौरव वाढविला. विद्यापीठ, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांनी संकल्प करून त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.    

            थोर कायदेपंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  

            एशियाटिक सोसायटी तसेच टपाल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर, सोसायटीच्या अध्यक्ष विस्पी बालापोरिया, विश्वस्त डॉ भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्तर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, सोसायटीच्या कार्यवाह मानद सचिव मंगला सरदेशपांडे तसेच काणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.      

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले,सार्वजनिक जीवनात वावरत असताना देखील काणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जोपासलेल्या व्यासंगाचा विचार करतो त्यावेळी हे कुणी अवतारी पुरुषच असावे असे आपल्याला वाटते असे नमूद करून एशियाटीक सोसायटीमध्ये बसून त्यांच्यासारख्या महान लोकांनी तपस्या केली असल्यामुळे ज्ञानाचे भंडार असलेली सोसायटी सर्व संकटांवर मात करून अवश्य जगेल याबद्दल आपण आश्वस्त असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

            काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राचे हिंदी अनुवादित खंड वाचले असल्याचे नमूद करून विद्यापीठांमध्ये आता आंतरशाखीय अध्ययनाचे पर्याय उपलब्ध असताना संशोधकांनी काणे यांचे ग्रंथ अवश्य अभ्यासावे. त्यातून समाजाला उत्तम नेतृत्व लाभेल असे राज्यपालांनी सांगितले.  

एशियाटिक सोसायटी तसेच पोस्ट विभागाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ सुरज पंडित यांनी काणे यांच्या कार्याचा परिचय करून दिला तर मंगला सरदेशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. 


0000

Governor Koshyari releases commemorative postage stamp of Indologist P V Kane.

            Mumbai;Date 18:Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released a commemorative stamp on Bharat Ratna Mahamahopadhyaya Dr Pandurang Vaman Kane on the occasion of the 50th death anniversary of the great Indologist and Sanskrit scholar at Raj Bhavan Mumbai on Monday (18 April)

            The postage stamp was brought out by the Asiatic Society of Mumbai in association with the Department of Posts. 

            Chairman of the Board of Trustees of the Asiatic Society Eknath Kshirsagar, President of the Society Prof. Vispi Balaporia, Trustee Dr B L Mungekar, Chief Post Master General of Maharashtra Circle Veena Srinivas, Post Master General of Mumbai Circle Swati Pandey, Officiating Honorary Secretary Mangala Sirdeshpande and family members of late Kane were present on the occasion.

000000


 



 



 कनोईंग व कायाकिंग खेळासाठीच्या आरक्षणासाठी एकच संघटना हवी.

- क्रीडा व युवक सेवा आयुक्तांची माहिती.

        मुंबई, दि. 18 :- कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “ महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग “ राज्य संघटनेच्या दोन कार्यकारिणी अस्तित्वात असल्याने राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंना ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी लाभ देण्यात येणार नसल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

            शासकीय व निमशासकीय सेवेत खेळाडूंना 5% आरक्षण असून, कॅनोईंग अँन्ड कयाकिंग हा खेळ ऑलिंपिक, एशियन व कॉमनवेल्थ या स्पर्धांमध्ये खेळला जात असल्याने या खेळाला शासकीय/निमशासकीय सेवेत 5% खेळाडू आरक्षण देण्यात येत .

            कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग” राज्य संघटनेच्या दोन कार्यकारणी अस्तित्वात असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्यात संबंधित खेळाची एकच संघटना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. जेणेकरुन संघटनेमार्फत आयोजित अधिकृत स्पर्धांमधील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय राहील. यामुळे “ महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग “ राज्य संघटनेतील वाद संपुष्टात येऊन एकच अधिकृत कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत. धर्मादाय आयुक्त यांच्याकडून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत या खेळाच्या एकाच अधिकृत राज्य कार्यकारणीस मान्यता मिळेपर्यंत कनोईंग व कायाकिंग खेळाच्या आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्राविण्य प्रमाणपत्रे 5 टक्के खेळाडू आरक्षण अंतर्गत पात्र करण्यात येणार नाही.

            भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. वरील बदलाची नोंद कनोईंग व कायाकिंग या खेळातील खेळाडूंनी घ्यावी असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य श्री. ओम प्रकाश बकोरिया यांनी केलेली आहे.

0000




 उष्माघातासंदर्भात ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

डॉ. मधुकर गायकवाड यांच्या मुलाखतीचे पुन:प्रसारण

            मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभाग प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्या विशेष मुलाखतीचे पुन:प्रसारण होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 19 व बुधवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशाबरोबरच मराठवाड्यातील तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. गायकवाड यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

 अंगारकी चतुर्थी

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.[१]



गणेश मूर्ती दर्शन

धार्मिक महत्त्व संपादन करा


नैवेद्याला उकडीचे मोदक

गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे.[२] या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात.


भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात..[३]


कथा व व्रत संपादन करा

मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.[४]

 



 

Featured post

Lakshvedhi