👇👇 *वाचा माइंड फ्रेश होईल* 👇👇
📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति शिवाजी महाराज
स्वराज निर्माण करतात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
*"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग*
*निर्माण करतात..."*
🍒
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
🍒
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒
🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच किडेमुंग्या पक्षाला खातात..
तुम्ही खूप शक्तिशाली असाल 💪पण वेळ ⏰तुमच्या पेक्षा शक्तिशाली आहे...
वेळ आणि स्तिथी केव्हाही बदलू शकते. त्यामुळे कोणाचा अपमान ही करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका...
🌻 *कोणी कितीही महान असला तरी निसर्ग कोणालाही त्याच्यापेक्षा महान बनायला देत नाही... जसे...*
🦅कंठ दिला कोकिळेला पण रूप काढून घेतले ..
🦚रूप दिले मोराला पण इच्छा काढून घेतल्या...
👨👩👦👦इच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
👳♀️संतोष दिला संतांना पण संसार काढून घेतला.
म्हणून माणसाने अहंकार करू नये. 💰ना पैशाचा, ना संपत्तीचा, ना सत्तेचा कारण जे आज एकाकडे आहे ते उद्या दुसऱ्याकडे असणार.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
कित्येकांना या मातीने घडवले⛰️ आणि मातीतच घातले.लग्नाच्या वरातीत लोकं पुढेपुढे नाचतात💃 पण अंतयात्रेत पाठीमागून चालतात. याचाच अर्थ सुखांमध्ये☺️ सर्वजण पुढेपुढे करतात, पण दुःखात मागे हटतात. 😭
🍀🍀 *ज्या माणसांना पैशाची किंमत जास्त असते, त्यांना माणसांची किंमत नसते. हे देखील कटू सत्य आहे.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लोकं त्यांच्या गरजेनुसार पुढेमागे होत असतात. म्हणून ती पुढे असली काय आणि मागे असली काय आपलें आयुष्य आपल्या हिमतीने आणि निश्चयाने जगायचे.....
🍀🍀🍀गरज पडली की सुकलेल्या ओठातून देखील गोड शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसांची नियत दोन्ही बदलतात....
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
पैसा आला म्हणून कधीही उन्मत्त होऊ नये. शंभर मुलांचा बाप असणाऱ्या धृतराष्ट्राला मृत्यूसमयी कोणी वाली नव्हता, परंतु ज्या तुकोबारायांच्या घरात बसायला पोतेसुद्धा नव्हते, त्यांना न्यायला जगाचा बाप आला.....
🙏☘️🌸🍀🙏
*परमेश्वर फक्त पूजा करताना आपल्याला बघत नसतो , तर चांगले-वाईट कर्म करताना देखील तो आपल्याला बघत असतो. म्हणून कर्म ही स्वच्छ ठेवा आणि वाणी ही स्वच्छ ठेवा.*
🙏☘️☘️☘️☘️☘️🙏