सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 18 May 2019
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विशेष बाबीच्या प्रस्तावासंदर्भात मार्गदर्शक सूचना.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत
विशेष बाबीच्या प्रस्तावासंदर्भात मार्गदर्शक सूचना.
महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
शासन परिपत्रक कमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र. ९६/का. १४८२.
मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादामा कामा मार्ग, मुंबई - ४००
०३२.
दिनांक : १ जानेवारी, २०१८
वाचा :
१) नियोजन विभाग, शासन निर्णय
क्रमांक : क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का. १४८२, दि. १२.७.२०१६
२) नियोजन विभाग, शासन निर्णय
क्रमांक : क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का. १४८२, दि. ३१.८.२०१७
शासन परिपत्रक :
आमदार
स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विधानसभा/विधानपरिषद सदस्यांनी सुचविलेल्या कामास जिल्हाधिकारी
यांचेकडून प्रशासकीय मान्यता देवून निधी संबंधीत जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सुपूर्द करण्यांत
येतो. तथापि, काम विहित कालावधीत पूर्ण न झाल्याने निधी शासनास समर्पित केला जातो.
दरम्यानच्या काळात विधानसभा/विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने समर्पित
निधीची मागणी जिल्हाधिकारी, यांच्याकडून शासनाकडे केली जात नाही. परिणामी अशी कामे
दिर्घकाळ अपूर्ण राहतात किंवा काम पूर्ण झाल्यानंतर निधीची मागणी शासनाकडे केली जाते.
२. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी आवश्यक तेवढाच निधी अर्थसंकल्पीत
केला जात असल्याने जादा निधी मंजूर करणे शासनास शक्य होत नाही. तथापिक काम पूर्ण झाले
असल्याने संबंधीत जिल्हास्तरीय यंत्रणेस देयक अदा करणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत
प्रथम अशी कामे वेळेत पूर्ण न होण्यास/निधी खर्च न होण्यास तसेच निधीची मागणी शासनाकडे
वेळीच न करण्यास जबाबदार असणाया अधिकायांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसेच कार्यकाल संपुष्टात आलेल्या
विधानसभा/विधानपरिषद सदस्याने प्रस्तावित केलेले काम हे बांधकामाशी संबंधीत असेल व
त्यातून शासकीय मालमत्ता निर्माण होणार असेल आणि अशा अपुर्ण राहिलेल्या किंवा पूर्ण
कामांकरिता संबंधीत जिल्ह्यातील विद्यमान विधानसभा/विधान परिषद सदस्य उर्वरित निधी
देण्यास इच्छूक असतील तर त्यांच्या चालू आर्थिक वर्षाच्या निधीमधून विशेष बाब म्हणून
उपलब्ध करुन देता येईल. संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाचे स्थायी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उचित कार्यवाही
करावी.
३. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत “विशेष बाब” म्हणून मंजूरी
देण्या संदर्भातील परिच्छेद क्र. ३.३९ नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.
९६/का. १४८२, दि. ३१.८.२०१७ अन्वये मार्गदर्शक सूचनामध्ये काही सुधारणा करण्यांत आल्या
आहेत. या शासन निर्णयातील ब(II) नुसार सांस्कृतिक/साहित्यिक /शैक्षणिक/क्रीडाविषयक/पर्यावरण/आरोग्य
इ. विषयक बाबींना “विशेष बाब” म्हणून मंजूरी देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार विशिष्ट कालावधीत
आयोजित होणारे साहित्य संमेलने/क्रीडा स्पर्धा/आरोग्य शिबीरे/महोत्सव इ. कार्यक्रमांसाठी
निधी देण्यास “विशेष बाब” म्हणून मंजूरी देण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त होत असतात. अशा
प्रस्तावांची छाननी करुन त्यावर उचित निर्णय घेण्यास शासनास पुरेसा कालवधी मिळणे आवश्यक
आहे. यास्तव जिल्हाधिकारी यांनी खबरदारी घ्यावी. उशिरा प्राप्त होणारे प्रस्तावांचा
विचार केला जाणार नाही, याची जिल्हाधिकारी यांनी कृपया नोंद घ्यावी.
सदर शासन
निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०१८०१०११७३३३४७३१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यांत
येत आहे.
महाराष्ट्राचे
राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(अ.द. जोशी)
उप सचिव, महाराष्ट्र
शासन
Friday, 17 May 2019
गेले ते दिन गेले
गेले ते दिन गेले
खरचं बालपण किती सुंदर शब्द आहे ना. नुसत आपल बालपण आठवल तरी मनाला किती आनंद वाटतो. एप्रिल मे महिन्याची शाळेला सुट्टी मिळाली की किती तो दंगा असायचा आमचा. सारे मित्र मैत्रिणी एकत्र येवून सुट्टीचा छान बेत आखायचो.
कुठे फिरायला जाणे, तर कधी कुणाच्या
घरी जावून खेळणे. तेव्हा मोबाईल, टिव्ही हे फारशा प्रमाणात नव्हतेच त्यामुळे वडिलधारी
माणस सुध्दा मुलांसोबत राहून गप्पा गोष्टी, खेळ वगैरे खेळत असत. ना तेव्हा कधी समर
कॅम्प होता ना कसला व्हॅकेशन क्लास. पण आताच्या मुलांच मात्र बालपण हरवलय जणू....
सुट्टीचा
आनंदही त्यांना उपभोगता येत नाही. वर्षभर अभ्यास करणारी मुल एप्रिल मे महिन्याच्या
सुट्टीतही समर कॅम्प, व्हॅकेशन क्लासच्या रुपाने अभ्यास करीत असतात. मग ते त्यांच्या
बालपणाचा आनंद घेणार कसे आणि कधी ? खर तर आपण पालकच त्यांच्यावर अभ्यासच ओझ टाकत असतो.
वर्षाचे १२ ही महिने त्यांना अभ्यास करायला सांगत बसतो. प्रत्येकाला एवढच वाटत की दुसयाच्या मुलापेक्षा
माझं मुल हुशार असावं. त्यासाठी आपण आपल्या मुलांचं बालपणच हिरवून घेत आहोत.

पुर्वी सुट्टीत
आंबे, फणस, जांभ, चिंच, जांभुळ, करवंद अशा अनेक रानमेव्याचा आस्वाद घ्यायला जंगलात,
वाड्यांमध्ये फिरायचो. दुपारच्या वेळेत मित्र मैत्रिणी घरातून वेगवेगळे जिन्नस आणून
दगडांची चुल मांडून भातुकलीचा खेळ खेळायचो. कैरीचे तिखट मिठ घालून करंबूस, करवंद झाडावर
बसनू पानांचे द्रोण बनवून एकमेकांना देवून आनंद मिळवायचो.
भरती ओहोटी पाहून समुद्रात पोहायला
जाणे तर कुठे ओढ्यावर, तलावात, पोखरणीमध्ये डुंबायला जायच. कधीही हात न धुता रानमेवा
न धुता कधीही आजारी पडलो नाही की साधी शिंक आली नाही. विटी दांडू, गोट्या, तळ्यात मळ्यात
असे ग्रामीण खेळ खेळायचो. बैलगाडीतून शेतात जायचो. रात्री गाण्याच्या भेंड्या, पत्ते,
सारीपाट, सागरगोटे असे खेळ खेळायचो. मे महिना आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, आत्या
मावशी अशा सर्वांसोबत मजेत जायचा. मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदाची बट्टीच असायची.
पण आताची मुल मात्र मॅगी, कुरकुरे,
लेस आणि अशा अनेक प्रकारचे फास्ट फुड खाण्यातच दंग झालेली दिसतात. खरतर आपणच आपल्या
मुलांना रानमेव्याच महत्त्व पटवून दिल पाहिजे. त्यांना सुट्टीचा आनंद मनोसोक्त घेवून
दिला पाहिजे. ना कसला क्लास, ना कसला कॅम्प, ना मोबाईल फक्त गप्पा टप्पा, मस्ती आणि
दंगा. आपण आपल्या लहानपणी जे खेळ खेळलो ते आपल्या मुलांसोबत खेळायला पाहिजे. त्यांच्या
सोबत आपणही लहान होवून जगल पाहिजे. फक्त २ महिन्याच्या कालावधीत मुलांना आनंदाचे क्षण
दिले तर वर्षभर त्या आठवणीने आपली मुल खूप छान प्रकारे अभ्यास करतील.
मी तर हा
अनुभव माझ्या मुलीसोबत घेतलाय तुम्हीपण घेवून बघा.....
- गीता
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...