Monday, 19 May 2025

सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध तब्बल 1 हजार 51 नागरिकांकडून निवेदने

 सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध

                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·     मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल हजार 51 नागरिकांकडून निवेदने

·     हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप

·       जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

नागपूरदि. 17 :  नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी ईच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिकानझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.                हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वेगवेगळया झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 21 झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशीआमदार प्रवीण दटकेविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीमनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरीपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगलनागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनीप्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णीमहामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटेआदी यावेळी उपस्थित होते.

सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानव्दारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी  तुकडोजी नगरकामगार कॉलनीभांडेवाडी या झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना  पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत  दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

उर्वरित चिंचभुवनशामनगरगिट्टीखदानपन्नालाल देशराज नगरआदिवासी नगरपुनापुरवाठोडाभरतवाडाहुडकेश्वरकुराडपुराशोभाखेतबिनाकीकोष्टीपुराठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.

एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी

 एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी


नागपूरदि. 17 -  शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली.

यावेळी आमदार कृष्णा खोपडेआमदार प्रवीण दटकेमहापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतअधिक्षक अभियंता डॉ.श्वेता बैनर्जी उपायुक्त राजेश भगतकार्यकारी अभियंता राजेश दुफारेस्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ.गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त सोनम देशमुखसुसबिडीच्या श्रीमती वृंदा ठाकूरप्रकल्प संचालक संजय गदरेवित्तीय संचालक विनोद टंडननागपूर प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धनसल्लागार राजेंद्र जगताप व माजी नगरसेवक बाल्या बोरकर आणि दीपक वाडिभस्मे उपस्थित होते. मनपा आयुक्त यांनी मुख्यमंत्री यांना प्रकल्पाची माहिती दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. कंपनी तर्फे 30 एकर जागेवर बांधकाम करण्यात येत आहे.

            नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे 1000 मे. टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईनफायनान्सबांधणीस्वमालकीवापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारला जात आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता
M/s. SusBDe 
 नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करत आहे.

या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँससेंद्रिय खतआरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असूनत्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत.  सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermentation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधीमध्ये या 30 एकर जागे व्यतिरिक्त एकर जागा Fresh Waste processing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या या जागेवर पायलट प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. या केंद्राची सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.

0000



वृत्त क्र. 2076


निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक

 निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक

                                                                        -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूर दि. 17 : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

            नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे लाख स्केअर मीटर क्षेत्रावर हा पार्क साकारण्याबाबत आज प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य संदीप जोशीमनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त बी.वैष्णवीग्रिन यात्राचे प्रदीप त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

असा असेल बायोडायव्हर्सिटी पार्क

            निसर्गाशी जवळीकता साधत त्याच्या जपवणुकीविषयी सर्वच धर्माने भर दिला आहे. यातील तत्व लक्षात घेऊन हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचीशिक्षणाची संधी मिळेल. कृषीविज्ञानवनजैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे दिडशेपेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

            आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वननक्षत्र वनराशी वनऔषधी वनस्पती संशोधन व संवर्धनफुलपाखरु व काजवे असलेले वनविविध मातींचे वैविध्य जपणारे दालनपर्जन्यमापनदिशा शास्त्रयोगा झोनपीस झोनफॅमिली झोनमानसशास्त्रआरोग्य या प्रमुख घटकांशी अंर्तमुख करणारा हा पार्क राहील.

 

ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन

 ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन

 

नागपुर18 मई: ऑपरेशन सिंदूर को सफलतापूर्वक अंजाम देते हुए भारतीय सेना ने पाकिस्तान का एक भी हमला सफल नहीं होने दिया। इस युद्ध में देश में ही निर्मित हथियारों का उपयोग कर भारत ने जीत हासिल कीजिससे पूरी दुनिया को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत’ की झलक देखने को मिली। यह हम सभी के लिए अत्यंत गर्व की बात हैऐसा वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां दिया।

 

वे ऑपरेशन सिंदूर की सफलता के उपलक्ष्य में खापरखेड़ा (नागपुर) में आयोजित तिरंगा यात्रा के दौरान बोल रहे थे। इस अवसर पर राज्य के राजस्व मंत्री एवं पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेविधायक आशीष देशमुख और चरणसिंह ठाकुर उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि तिरंगा यात्रा का उद्देश्य प्रत्येक नागरिक के हृदय में राष्ट्रप्रेम की भावना जागृत करना और हमारे वीर जवानों के प्रति कृतज्ञता प्रकट करना है। उन्होंने कहा कि पहलगाम में हुए आतंकी हमले के सूत्रधार पाकिस्तान को प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में ऑपरेशन सिंदूर के माध्यम से करारा जवाब दिया गया है। अब भारत पर कोई भी हमला सहन नहीं किया जाएगा और उसका तत्काल कड़ा उत्तर दिया जाएगा। इस अभियान को सफल बनाने वाले वीर जवानों के प्रति हम तिरंगा यात्रा के माध्यम से कृतज्ञता प्रकट करेंऐसा आह्वान भी मुख्यमंत्री ने किया।

 

युद्ध में शहीद हुए जवानों को श्रद्धांजलि देते हुए मुख्यमंत्री ने कहा कि पूरा देश उनके परिजनों के साथ मजबूती से खड़ा है। उन्होंने कहा कि पाकिस्तान में स्थित आतंकियों के ठिकानों पर भारत ने आक्रामक कार्रवाई कीजिससे अंततः पाकिस्तान को युद्धबंदी की मांग करनी पड़ी। यह पूरे देश की ऐतिहासिक जीत है।

 

श्री बावनकुळे ने कहा कि इस यात्रा के माध्यम से सर्वधर्म समभाव और देश की एकता का प्रतीक प्रस्तुत हो रहा है। यह यात्रा हमारे सैनिकों के शौर्य और पराक्रम के प्रति कृतज्ञता और गर्व को दर्शाती है।

 

अण्णा मोड से लेकर रेलवे क्रॉसिंग तक निकाली गई इस तिरंगा यात्रा में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया।

0000

Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

 Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

Tricolour Rally Held in Khaparkheda

 

Nagpur, May 18: While successfully executing Operation Sindoor, the Indian Army ensured that not a single attack by Pakistan succeeded. Using indigenously developed weapons to win this battle has shown India’s strength and offered a glimpse of Prime Minister Narendra Modi’s vision of a self-reliant (Atmanirbhar) India to the world. This is a moment of immense pride for us, said Chief Minister Devendra Fadnavis today.

 

He was speaking at a Tricolour Rally organized in Khaparkheda (Nagpur) to mark the success of Operation Sindoor. Also present at the event were State Revenue Minister and Guardian Minister Chandrashekhar Bawankule, MLA Ashish Deshmukh, and Charansingh Thakur.

 

CM Fadnavis stated that the rally aimed to ignite patriotism in every citizen’s heart and express gratitude to our brave soldiers. He said that Operation Sindoor, executed under the leadership of Prime Minister Modi, was a fitting reply to Pakistan — the mastermind behind the terrorist attack in Pahalgam. Going forward, no attack on India will be tolerated and will be met with an immediate and strong response, he declared. The Tricolour Rally is a way to express our gratitude to the valiant soldiers who ensured the success of this operation, he added.

 

Paying homage to the martyred soldiers and assuring their families of the nation’s unwavering support, CM Fadnavis said India carried out aggressive action to destroy the terrorist bases in Pakistan. The outcome of this war led to Pakistan calling for a ceasefire — a clear victory for the entire nation.

 

Minister Bawankule said the rally reflected national unity and religious harmony, expressing collective pride and gratitude for the courage shown by Indian soldiers.

 

The Tricolour Rally, held from the Anna Mod area to the railway crossing, witnessed massive public participation.

0000

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची

ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती

            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      

 खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 

नागपूर दि.18: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारता'ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 

ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष देशमुखचरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईलहा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही  मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूयाअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

 

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

 

श्री बावनकुळे म्हणालेया यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे.

 

अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Water Supply Projects in Shirol Constituency Should Be Expedited

 Water Supply Projects in Shirol Constituency Should Be Expedited

- Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil

 

Mumbai, May 13 : Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil has directed that various water supply projects in the Shirol Assembly Constituency of Kolhapur district should be completed in a planned and time-bound manner.

He was speaking at a review meeting held in the Ministry regarding the water supply projects of Shirol Assembly Constituency. The meeting was attended by MLA Rajendra Patil-Yadravkar, Principal Secretary of the Water Supply Department Sanjay Khandare, Mission Director's representative Sushma Satpute, Chief Engineer Prashant Bhamre, and other officials connected to the water supply projects in the constituency.

Minister Patil stated that considering the delays caused by some contractors in the ongoing water supply works under the Jal Jeevan Mission, immediate action should be taken against such contractors. He emphasized that ongoing works should be further expedited so that the benefits can reach citizens at the earliest.

He also mentioned that the use of solar energy in all water supply schemes of the constituency is under consideration.

0000

शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए

 शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए

- जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल

 

मुंबई, 13 मई : जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल ने कोल्हापुर जिले के शिरोळ विधानसभा क्षेत्र की विभिन्न जलापूर्ति योजनाएं सुनियोजित और समयबद्ध तरीके से पूरी करने के निर्देश दिए हैं।

वे मंत्रालय में शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं के संबंध में आयोजित समीक्षा बैठक में बोल रहे थे। इस बैठक में विधायक राजेंद्र पाटिल-यड्रावकरजलापूर्ति विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधि सुषमा सातपुतेमुख्य अभियंता प्रशांत भामरे और क्षेत्र से संबंधित जलापूर्ति परियोजनाओं के अन्य अधिकारी उपस्थित थे।

मंत्री पाटिल ने कहा कि जल जीवन मिशन के तहत चल रहे जलापूर्ति कार्यों में कुछ ठेकेदारों द्वारा की जा रही देरी को देखते हुएऐसे ठेकेदारों पर तुरंत कार्रवाई की जाए। साथ ही वर्तमान में प्रगति पर चल रहे कार्यों में और अधिक तेजी लाई जाएताकि नागरिकों को जल्द से जल्द इसका लाभ मिल सके।

उन्होंने यह भी बताया कि क्षेत्र की सभी जलापूर्ति योजनाओं में सौर ऊर्जा के उपयोग पर विचार किया जा रहा है।

लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

 लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

मुंबईदि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालयमुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबईसहकारी अपिलीय न्यायालयडीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरणमुंबई येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे १० मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात ७५ पॅनल नेमण्यात आली होती. ज्यामध्ये ९०२२ प्रलंबित प्रकरणे व ४२७४ दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण १३२९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७०४ कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरूवात नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यममुंबई वकील संघाचे सचिव ॲड आसिफ नकवीपक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षला जल अर्पण करुन करण्यात आली. यावेळी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या मराठी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ५ मे ते ९ मे या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व न्यायदंडाधिकारी न्यायालयातील एकूण ४२०६ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारीमुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व न्यायालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न 

Sunday, 18 May 2025

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना, समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार

 रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना,

समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार

 

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षणआरोग्यसंरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येणार असूनआगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे.

या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्याएकलअनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणेत्यांना शिक्षणाची गोडी लावणेवैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.

सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपुणेनागपूरनाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस/व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशकशिक्षकमहिला कर्मचारीवाहनचालक व काळजीवाहक अशी चार जणांचे पथक असणार असून बसमध्ये जीपीएस ट्रॅकिंग व सीसीटीव्ही कॅमेरा देखील असणार आहे. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल.

मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीतशाळांमध्ये प्रवेश मिळवून देणेत्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरणपोषण आहारऔषधोपचारस्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे.

या योजनेंतर्गत दरमहा किमान २० टक्के मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत संस्थांना त्रैमासिक निधी वितरित केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.

-----०-----

भारतीय सेना के जूते की दास्तान*

 .

 *भारतीय सेना के जूते की दास्तान*



    जयपुर की कंपनी सेना के लिए 

              जूते बनाती है,

  फिर वह जूते इजराइल को बेचते थे,


       फिर इजराइल वही जूते 

        भारत को बेचता था.

 और फिर वे जूते भारतीय सैनिकों को 

            नसीब होते थे.


         भारत एक नग जूते के 

       Rs. 25,000/- देता था, 

  और यही सिलसिला काँग्रेस द्वारा 

     कई सालों से चल रहा था.


जैसे ही पूर्व रक्षामंत्री मनोहर पर्रिकर को 

      यह पता चला, वो चौंके और

           आग बबूला हो गए.

      और तुरंत जयपुर कंपनी के 

     CEO को मिले, कारण पूछा, तो ...


जवाब मिला : 

*भारत को डायरेक्ट जूते बेचने पर*

*भारत का सरकारी तंत्र सालों तक*

         *पेमेंट नहीं देता था.*

 इसलिए 

हम दूसरे देशों में एक्सपोर्ट करने लगे.


        मनोहर पर्रिकर ने कहा : 

    *एक दिन, सिर्फ एक दिन भी*

  *पेमेंट लेट होता है, तो आप मुझे*

        *तुरंत कॉल कीजिए.*

         बस .... आपको हमें 

       डायरेक्ट जूते बेचना है, 

          आप प्राइस बताएं.


   और इस तरह आखिर पर्रिकर ने 

    वही जूते सिर्फ *2200/-* में 

           फाइनल किया !!


सोचिए ... जूते के *25,000/-* देकर 

                 काँग्रेस ने सालों तक  

            कितनी लूट मचा रखी थी !! 


        विश्वास नहीं हुआ ना ?? 

              कोई बात नहीं.

           RTI लगाइए या 

        Google खँगालिये.


😎     Google सर्च पर बस 

               इतना लिखिए  👇🏽

 *भारतीय सेना के जूते की दास्तान* 

               सच सामने होगा.

एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा जुना प्रश्न भारत निवडणूक आयोगाने सोडवला ,pl share

 एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा जुना प्रश्न

भारत निवडणूक आयोगाने सोडवला

 

मुंबईदि. 13 : निवडणूक यादी निर्दोष व अद्ययावत ठेवण्याच्या प्रयत्नांतर्गतभारत निवडणूक आयोगाने (ECI) जवळपास 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकसारख्या मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांकांचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला आहे. 2005 पासून वेगवेगळ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) वापरलेल्या एकसारख्या मालिकेमुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता आणि खरे मतदार एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांसह नोंदवले गेले होते.

या दीर्घकालीन समस्येच्या समाधानासाठी देशभरातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी (CEOs) आणि 4,123 विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक नोंदणी अधिकारी (EROs) यांनी 10.50 लाख मतदान केंद्रांवरील 99 कोटींपेक्षा जास्त मतदारांची संपूर्ण निवडणूक माहिती तपासली. सरासरी दर चार मतदान केंद्रांमागे केवळ एक अशा प्रकारचा मतदार ओळख पत्र क्रमांक (EPIC) आढळला. क्षेत्रीय पडताळणी दरम्यानअसे सर्व मतदार खरे असून ते वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतील आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. अशा सर्व मतदारांना नव्या क्रमांकांसह नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) कार्डे वितरित करण्यात आली आहेत.

या समस्येचे मूळ 2005 पासून दिसून येतेजेव्हा वेगवेगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वतंत्रपणे विधानसभा मतदारसंघानुसार मतदार ओळखपत्र क्रमांकांच्या (EPIC) मालिका वापरल्या. 2008 मध्ये मतदारसंघांचे पुनर्रचना (delimitation) झाल्यानंतर या मालिका बदलल्या गेल्यामात्र काही ठिकाणी जुन्याच मालिकांचा वापर झाला किंवा टंकलेखनाच्या चुका झाल्यामुळे दुसऱ्या मतदारसंघासाठी असलेल्या मालिकांचा वापर झाला.

दरम्यानप्रत्येक मतदाराचे नाव त्या मतदान केंद्राच्या निवडणूक यादीत असतेजिथे तो/ती सामान्य रहिवासी आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) जरी एकसारखा असला तरीत्याचा वापर करून कोणीही दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करू शकलेले नाही. त्यामुळे या गोंधळाचा कोणत्याही निवडणुकीच्या निकालावर परिणाम झालेला नाहीहेही भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मेजर अनिल अर्स यांना तर विज्ञान पुरस्कार शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर

 स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य  पुरस्कार मेजर अनिल अर्स यांना तर विज्ञान पुरस्कार शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वीर सावरकर यांच्या आदर्श विचारांना अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्यआणि 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कारदेऊन गौरविण्यात येते. मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार - २०२५', जाहीर करण्यात आला आहे. तर आयआयटीमुंबईचे शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मानपत्रस्मृतिचिन्हरू. ५१,००० असे स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराचे स्वरूप आहे. तर  मानपत्रस्मृतिचिन्ह आणि १ लाख १००१ रुपये असे स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराचे स्वरूप आहे.

मेजर अनिल अर्स यांचा परिचय

मेजर अनिल अर्स हे जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर कंपनी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यांना जेव्हा काही दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांवर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती मिळालीतेव्हा त्यांनी प्रसंगावधान दाखवत दहशतवादी टप्प्यात येण्याची प्रतीक्षा केली. दहशतवाद्यांचा गट टप्प्यात येताच मेजर अनिल अर्स यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने गोळीबार करून तीन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेच्या जवळ मेजर अनिल अर्स यांनी ही कारवाई केल्याने नियंत्रण रेषेपलीकडूनही जोरदार गोळीबार सुरु झाला. त्यावेळी जीवितहानी होण्याचा धोका पत्करून ते त्यांच्या पथकासोबत उर्वरित दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी तिथेच थांबले. १५ मिनिटांनंतर त्यांच्या पथकाने आणखी दोन दहशतवाद्यांना पाहिले आणि अचूक गोळीबार करून त्यांनाही कंठस्नान घातले. आपल्या पथकातील सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवत दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर अनिल अर्स यांनी अदम्य साहस आणि लढाऊ नेतृत्व दाखविल्याबद्दल २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते 'शौर्य चक्रप्रदान करण्यात आले.

प्राध्यापक मिलिंद अत्रे यांचा परिचय

सध्या मिलिंद अत्रे हे आयआयटी मुंबईआयनॉक्स येथे उपसंचालक – एआरटी (अॅकेडेमीकरिसर्च आणि ट्रान्सलेशन) आहेत. त्यांनी ४ वर्षांहून अधिक काळ आयआयटी मुंबईचे डीन (संशोधन आणि विकास) म्हणून आणि ६ वर्षांहून अधिक काळ आयआयटी मुंबई येथे बिझनेस इनक्यूबेटर, SINE (सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप) चे प्रोफेसर-इन-चार्ज म्हणून काम केले आहे. प्राध्यापक अत्रे यांनी नागपूरच्या व्हीएनआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर १९९१ मध्ये आयआयटी मुंबई येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात क्रायोजेनिक्समध्ये पीएचडी केली. टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटर (टीआरडीडीसीपुणे) मध्ये २ वर्षे काम केल्यानंतरत्यांनी जर्मनीमध्ये त्यांच्या पोस्ट-डॉक्टरेट संशोधनावर काम केले. १९९६ मध्ये ते अणू ऊर्जा विभागात सहभागी होण्यासाठी भारतात परतले.


त्यांनी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यासाठी इंदूर येथील राजा रमणा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (RRCAT) येथे काम केले. २००० मध्येते MRI/NMR प्रणालींशी संबंधित संशोधन करण्यासाठी ऑक्सफर्ड इन्स्ट्रुमेंट्सइंग्लंड येथे प्रिन्सिपल इंजिनिअर म्हणून सहभागी झालेजिथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स कूलिंगसाठी कोल्ड प्रोब४ के पल्स ट्यूब क्रायोकूलर, MRI, सुपरकंडक्टिंग मॅग्नेट आणि हेलियमसाठी री-कंडेन्सिंग क्रायोस्टॅट विकसित करण्यावर काम केले. अत्रे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेतजसे कीअध्यापनातील उत्कृष्टतेसाठी प्रोफेसर सुखात्मे पुरस्कारडॉ. पटवर्धन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अवार्डइंडस्ट्रियल इम्पॅक्ट अवार्ड. सध्या त्यांच्याकडे संरक्षणअवकाश आणि अणुऊर्जाअणू प्रयोगांशी संबंधित विविध प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बांधकाम क्षेत्रात ‘एम-सॅंड’चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित

 बांधकाम क्षेत्रात एम-सॅंडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित

नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावातसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावेयासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड) चा उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

वाळुच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रतिब्रास ६०० रुपये आकारण्यात येतेत्याऐवजी प्रतिब्रास २०० रुपये इतक्या सवलतीच्या दराने स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

क्वॉरी वेस्ट व डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून क्रशरच्या साहाय्याने तयार होणारी ही कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळूला पर्याय ठरू शकतेया धोरणानुसारजिल्हा प्रशासन व वन विभागाच्या परवानगीनंतर एम-सॅंड युनिट्स उभारण्यास परवानगी देण्यात येणार असूनपर्यावरणीय नियमांचे पालन आवश्यक राहील.

राज्यातील सर्व शासकीयनिमशासकीय व सार्वजनिक संस्थांनी आपल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये एम-सॅंडचा प्राधान्याने वापर करावाअशा सूचना शासनाने दिल्या आहेत. याशिवायभारतीय मानक ब्युरोच्या (IS 383:2016) निकषानुसार गुणवत्ताधारित एम-सॅंडचाच वापर करण्यात यावाअसे स्पष्ट करण्यात आले आहे. कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी - प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार आहे. तसेच एम-सँड तयार करणाऱ्या युनिटला प्रतिब्रास २०० रुपये इतकी सवलत देण्यात येणार आहे.

एम-सॅंड युनिट्समुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतीलतसेच नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरण रक्षणास हातभार लागेलअसा शासनाचा विश्वास आहे. यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार असूनधोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा तयार केली जाणार आहे.

राज्यातील बांधकाम क्षेत्रात या निर्णयामुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या पावलामुळे पर्यावरण रक्षणटिकाऊ विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

एम सँड गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून औद्योगिक प्रोत्साहन अनुदानव्याज सवलतविद्युत शुल्कातून सूटमुद्रांक शुल्क माफी आणि वीजदरात अनुदान दिले जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन




 ऑपरेशन सिंदूर की सफलता ने दिखाई आत्मनिर्भर भारत की ताकत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खापरखेड़ा में तिरंगा यात्रा का आयोजन

 

नागपुर18 मई: ऑपरेशन सिंदूर को सफलतापूर्वक अंजाम देते हुए भारतीय सेना ने पाकिस्तान का एक भी हमला सफल नहीं होने दिया। इस युद्ध में देश में ही निर्मित हथियारों का उपयोग कर भारत ने जीत हासिल कीजिससे पूरी दुनिया को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत’ की झलक देखने को मिली। यह हम सभी के लिए अत्यंत गर्व की बात हैऐसा वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां दिया।

 

वे ऑपरेशन सिंदूर की सफलता के उपलक्ष्य में खापरखेड़ा (नागपुर) में आयोजित तिरंगा यात्रा के दौरान बोल रहे थे। इस अवसर पर राज्य के राजस्व मंत्री एवं पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेविधायक आशीष देशमुख और चरणसिंह ठाकुर उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि तिरंगा यात्रा का उद्देश्य प्रत्येक नागरिक के हृदय में राष्ट्रप्रेम की भावना जागृत करना और हमारे वीर जवानों के प्रति कृतज्ञता प्रकट करना है। उन्होंने कहा कि पहलगाम में हुए आतंकी हमले के सूत्रधार पाकिस्तान को प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में ऑपरेशन सिंदूर के माध्यम से करारा जवाब दिया गया है। अब भारत पर कोई भी हमला सहन नहीं किया जाएगा और उसका तत्काल कड़ा उत्तर दिया जाएगा। इस अभियान को सफल बनाने वाले वीर जवानों के प्रति हम तिरंगा यात्रा के माध्यम से कृतज्ञता प्रकट करेंऐसा आह्वान भी मुख्यमंत्री ने किया।

 

युद्ध में शहीद हुए जवानों को श्रद्धांजलि देते हुए मुख्यमंत्री ने कहा कि पूरा देश उनके परिजनों के साथ मजबूती से खड़ा है। उन्होंने कहा कि पाकिस्तान में स्थित आतंकियों के ठिकानों पर भारत ने आक्रामक कार्रवाई कीजिससे अंततः पाकिस्तान को युद्धबंदी की मांग करनी पड़ी। यह पूरे देश की ऐतिहासिक जीत है।

 

श्री बावनकुळे ने कहा कि इस यात्रा के माध्यम से सर्वधर्म समभाव और देश की एकता का प्रतीक प्रस्तुत हो रहा है। यह यात्रा हमारे सैनिकों के शौर्य और पराक्रम के प्रति कृतज्ञता और गर्व को दर्शाती है।

 

अण्णा मोड से लेकर रेलवे क्रॉसिंग तक निकाली गई इस तिरंगा यात्रा में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया।

0000

Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

 Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

Tricolour Rally Held in Khaparkheda

 

Nagpur, May 18: While successfully executing Operation Sindoor, the Indian Army ensured that not a single attack by Pakistan succeeded. Using indigenously developed weapons to win this battle has shown India’s strength and offered a glimpse of Prime Minister Narendra Modi’s vision of a self-reliant (Atmanirbhar) India to the world. This is a moment of immense pride for us, said Chief Minister Devendra Fadnavis today.

 

He was speaking at a Tricolour Rally organized in Khaparkheda (Nagpur) to mark the success of Operation Sindoor. Also present at the event were State Revenue Minister and Guardian Minister Chandrashekhar Bawankule, MLA Ashish Deshmukh, and Charansingh Thakur.

 

CM Fadnavis stated that the rally aimed to ignite patriotism in every citizen’s heart and express gratitude to our brave soldiers. He said that Operation Sindoor, executed under the leadership of Prime Minister Modi, was a fitting reply to Pakistan — the mastermind behind the terrorist attack in Pahalgam. Going forward, no attack on India will be tolerated and will be met with an immediate and strong response, he declared. The Tricolour Rally is a way to express our gratitude to the valiant soldiers who ensured the success of this operation, he added.

 

Paying homage to the martyred soldiers and assuring their families of the nation’s unwavering support, CM Fadnavis said India carried out aggressive action to destroy the terrorist bases in Pakistan. The outcome of this war led to Pakistan calling for a ceasefire — a clear victory for the entire nation.

 

Minister Bawankule said the rally reflected national unity and religious harmony, expressing collective pride and gratitude for the courage shown by Indian soldiers.

 

The Tricolour Rally, held from the Anna Mod area to the railway crossing, witnessed massive public participation.


आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती

 आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची

ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती

            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      

 खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 

नागपूर दि.18: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारता'ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 

ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष देशमुखचरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईलहा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही  मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूयाअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

 

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

 

श्री बावनकुळे म्हणालेया यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे.

 

अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


Featured post

Lakshvedhi