Kindly take a note that your *Income Tax Return* (ITR) for the *Financial Year 2020-21* i.e. *A.Y. 2021-22* has *not been filed.*
Please make sure you visit the Office or Call and clear your Income Tax related queries.
*Documents Required for the Financial Year 2020-21(A.Y.21-22)* 1. PAN Card
2. Aadhar Card
3.Form no 16( If Salary Income)
3. Bank Statement.(All Banks Statements_ Current as well as Savings) 4. Home Loan Statement.(If any)
5. LIC Policy Premium Paid receipt
6. Mediclaim Insurance Premium paid Receipt 7. PF
9. Any other Loan
Statements.(gold loan car loan personal loan Cash credit)
10.Credit Card .
11.New car Flat Bike Land gold purchase documents
The Last Date for filling Income Tax Return ( ITR ) is on *31st Sep 2021*
Hurry Up !!! Don't wait for the last minute rush.
*_Ignore if already filed lakshvedhimm. blogspot. com📞9876824365
Have A Great Day Ahead
भरल्यास काय तोटे उद्भवू शकतात, हे माहित नसेल तर अश्या व्यक्तींनी ही माहिती वाचणे गरजेचे आहे.
ReplyDelete✍️सर्वप्रथम जाणून घेऊया इनकम टॅक्स रिटर्न का भरावे त्याची ठराविक पण महत्वाची कारणे :
१. आपल्याला भविष्यात कुठल्याही प्रकारचे *कर्ज* हवे असल्यास त्यासाठी आपण बँकेत गेलात तर तिथे सर्वात आधी आपले वार्षिक उत्पन्न किती? आणि आपण आयकर पत्रक (इनकम टॅक्स रिटर्न) भरता का? असे विचारले जाते. आणि अश्या वेळी बँक मागील ३ वर्षांचे भरलेले आयकर पत्रक जमा करायला सांगते.
(ह्यात अजून एक महत्वाची बाब अशी कि ह्या मागील ३ वर्षांच्या इनकम टॅक्स रिटर्न दाखल केलेल्या तारखामध्ये ठराविक महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे. पूर्वी सारखे एकाच वेळी सलग ३ वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न भरलेले असेल तर आपला अर्ज बँक रद्दबातल करू शकते. सद्य स्थितीत तर इनकम टॅक्स ऍक्ट मध्ये लागू केलेल्या नवीन नियमांनुसार एका विशिष्ट तारखे नंतर तुम्ही मागील वर्षाचे रिटर्न भरूच शकत नाही.)
२. परदेशात जाण्यासाठी जसा पासपोर्ट महत्वाचा असतो तसाच *visa* ही लागतो आणि सदर visa च्या process मध्ये तुमचे भरलेले इनकम टॅक्स रिटर्न विचारात घेतले जाते.
३. जर आपले एका आर्थिक वर्षातील *एकूण उत्पन्न* इनकम टॅक्स ऍक्ट मधील तरतूदी नुसार दिलेल्या *basic exemption limit* च्या वर असेल आणि ते *करपात्र* ठरत असेल तर आपल्याला इनकम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे.
४. जर आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नावर त्याच वेळी समोरील व्यक्ती/संस्थेने टॅक्स कापला असेल *(TDS)*, परंतु आपले एकूण वार्षिक उत्पन्न basic exemption limit च्या आत मध्ये असेल तर अश्या कापल्या गेलेल्या *टॅक्स चा refund* घेण्यासाठी आपल्याला इनकम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे.
(अश्या वेळी आपण आपल्या active बँक खात्याची अचूक माहिती इनकम टॅक्स रिटर्न मध्ये भरणे जरुरी असते जेणेकरून रिटर्न प्रोसेस झाल्यावर tax ची refund रक्कम आपल्या खात्यात डायरेक्ट जमा होऊ शकते.)
५. जर आपल्याला एखाद्या आर्थिक वर्षात, व्यवसायात किंवा इतर व्यावहारिक बाबींमध्ये नुकसान झाले असेल तर असे *नुकसान / losses* पुढील वर्षात *carry forward* करून त्या वर्षातील नफ्यासमोर *adjust / set off* करण्यासाठी आपल्याला इनकम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे.
६. जर एखाद्या आर्थिक वर्षात आपण एखादे *high value transaction* केले असेल, तर आपल्याला इनकम tax डिपार्टमेंट कडून ह्या संदर्भात विचारणा करण्यासाठी नोटीस येऊ शकते. हे टाळण्यासाठी आपण आधीच सदर व्यवहाराची माहिती, त्याच्या उत्पन्नाचा स्रोत वैगरे सगळ्या बाबी नियमानुसार दाखवून, सगळी कायदेशीर अंमलबजावणी करून इनकम टॅक्स रिटर्न दाखल कारणे आवश्यक आहे.
बचत खात्यात रोख भरणा/उचल (१० लाख मर्यादा),
सोने, चांदी, शेअर्स, खरेदी विक्री,( साधारण (१० लाख मर्यादा),
जमीन, घर, खरेदी विक्री (३० लाख मर्यादा )
टर्म deposit (१० लाख मर्यादा )
ही काही high value transactions ची उदाहरणे आहेत. ह्या मर्यादांच्या आतील व्यवहारसुद्धा आपण आपल्या पत्रकात दाखविण्याचे आहेतच.
७. वरील महत्वाच्या मुद्द्याव्यतिरिक्त इतर कारणाने सुद्धा इनकम टॅक्स रिटर्न भरावे लागते.
उदा. जास्तीत जास्त रिस्क कव्हरेज करणारी मोठ्या किमतीची policy काढण्यासाठी, कधी कधी आपले उत्पन्न आणि पत्ता ह्याचा कायदेशीर पुरावा म्हणून सादर करण्यासाठी, मिळालेले उत्पन्न हे मूलतः करमुक्त उत्पन्न आहे हे दर्शवण्यासाठी, आपण इनकम टॅक्स रिटर्न भरणे जरुरी आहे.
✍️ आता जाणून घेऊ इनकम टॅक्स रिटर्न *कधी आणि कसे* भरायचे?
वर नमूद केलेल्या ज्या वेगवेगळ्या कारणासाठी इनकम टॅक्स भरावे लागते त्यातील काही कारणे इनकम टॅक्स रिटर्न कधी भरावे ह्याच्याशी निगडित आहेत. जसे कि वरील बँकेशी निगडित १ल्या क्र च्या मुद्य्यात एक महत्वाची बाब अशी कि मागील ३ वर्षांच्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये ठराविक महिन्याचे अंतर असावेच लागते. म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर दर वर्षी इनकम टॅक्स ऍक्ट नुसार नेमून दिलेल्या *due date* च्या आत आपले रिटर्न दाखल होणे गरजेचे आहे. चुकून जर ह्या due date च्या आत रिटर्न दाखल कारणे राहून गेले असेल तर त्या तारखे नंतरही आपण दंड भरून रिटर्न दाखल करू शकता. हा *दंड कमीत कमी ₹१००० ते जास्तीत जास्त ₹१००००* इतका असतो. ३१ मार्च ला आर्थिक वर्ष संपल्यावर साधारण पणे त्यापुढील ४ महिन्या पर्यंत म्हणजे ३१ जुलै ह्या पहिल्या due date पर्यंत हे रिटर्न दाखल करावयाचे असते. पण जर ही तारीख चुकली तर मग पुढील ३१ डिसेंबर पर्यंत ₹ ५००० दंड भरून रिटर्न फाईल करू शकतो. काही कारणास्तव ही सुद्धा तारीख चुकली तर त्यापुढे १ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत ₹१०००० दंड म्हणून भरून रिटर्न फाईल केले जाऊ शकते.
Continue .
ReplyDelete(जर आपले *वार्षिक उत्पन्न ₹ ५,००,००० च्या आत असेल तर दंडाची रक्कम कमी होऊन ₹ १०००* एवढीच होते). परंतु ह्या ३१ मार्च नंतर मात्र तुम्ही तुमचे रिटर्न फाईल करू शकत नाही. आणि रिटर्न फाईल झाले तरी ते INVALID म्हणून धरले जाईल.
म्हणून कोणतेही रिटर्न हे देय तारखांच्या (due date )आत भरणे अतिशय महत्वाचे आहे. असे केल्याने आपणास फायदा असा होतो कि आपली दंडापोटी भरावयाची रक्कम वाचते आणि भविष्यात काही कारणाने revised रिटर्न फाईल करायचे झाल्यास ते करू शकतो. तसेच losses carry forward करून सेट ऑफ/adjust करू शकतो. इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून कुठल्याच प्रकारची नोटीस येण्याच्या चिंतेतून तूर्तास सुटका होते. हल्लीच्या ऍडव्हान्स युगात सगळे काही डिजिटल आणि ऑनलाईन होते, त्याच प्रकारे आपल्याला इनकम टॅक्स रिटर्न चा भरणा सुद्धा डिपार्टमेंट च्या वेबसाईट वर जाऊन online/ e - file पद्धतीने करायचा असतो. कराचा भरणा देखील e-banking पद्धतीने करण्याची सोय आहे. म्हणून ह्या सगळ्या सोयी सुविधा आणि फायद्यांचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी नियमित आणि वेळेत रिटर्न भरायचे असल्यास, कुठलेही छोटे मोठे व्यवहार करताना संपूर्ण निश्चिन्त राहायचे असल्यास, आपले रिटर्न chartered accountant (CA), टॅक्स कन्सल्टन्ट, किंवा इतर जाणकार, तज्ञ, विश्वासू व्यक्ती कडून *e -filing* करून घेणे नेहमीच चांगले. तसेच कुठलाही व्यवहार करण्याआधी आपल्या CA किंवा कर सल्लागार यांच्याशी सल्ला मसलत करून च त्यांच्या मार्गदर्शनाने करणेच उत्तम. नाहीतर अधिक व्याज, वाढीव दंड, डिपार्टमेंट कडून येणाऱ्या नोटिसांवर नोटीस, फुकटचे टेन्शन, आणि कायद्याने मिळणाऱ्या सवलती न मिळाल्याने बसणारा अधिकचा आर्थिक भुर्दंड, कोलमडलेले नियोजन, मनस्ताप हा तोटा पदरात पडलाच म्हणून समजा.
सदर लेखातील माहितीचे संकलन हे इंटरनेट, कायदाविषयक पुस्तके इत्यादी माध्यमातून केले गेले आहे. सदर लेखाबाबत आपले मत जरूर कळवावे.
👉श्री. गौरव प्रवीण राऊत
🔸श्री कृपा कन्सल्टन्सी🔸
(सोलुशन फॉर अकाउंटिंग अँड टॅक्सेशन)
📱९२२६२७१९५९ ७७७७०७१२४१
📧 gauravraut115@gmail.com
*दिमाग़ हिला देने वाले सवाल...❓️*
ReplyDeleteQ. No. 1 :- क्या आप अपनी Current Job से बहुत खुश हैँ ?
Q. No. 2 :- क्या आप एक शानदार Income ले रहे है ?
Q. No. 3 :- क्या आपकी जॉब या बिज़नेस में लगातार Growth हो रही है? Q. No. 4 :- क्या अपनी लाइफ को Enjoy करने के लिए आपके पास Proper Time है?
Q. No. 5 :- क्या आपकी जॉब या बिज़नेस, अगले साल भी आपको Proper Income दे रहा होगा?
Q. No. 6 :- क्या आपकी इनकम हर साल बढ़ रही हैँ?
Q. No. 7 :- क्या आप अपनी योग्यता के हिसाब से पैसे कमा रहे हैँ ? Q. No. 8 :- क्या आपकी जॉब आपकी Salary से ज्यादा Pension दे सकेगी ? Q. No. 9 :- क्या आप अपने परिवार से प्यार करते हैँ?
Q. No. 10 :- क्या आप अपने परिवार के सपनो को पूरा कर पा रहे हैँ? ✅Q. No. 11:- अगर सवाल आपके परिवार के सपनो का हो, तो क्या आप खुद को एक मौका देने की हिम्मत करेंगे?
अगर आपके पास 10 सवाल के जवाब नहीं हैँ, और 11वे सवाल का जवाब "हाँ" है, तो दोस्तों ।
*WhatsApp or Call*9834271672
रिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा कसा उपयोग होवू शकतो हे आजच्या लेखात सांगितले आहे, नक्की वाचा मित्रानो , आर्थिक साक्षर व्हा*🙏
ReplyDelete_*रिव्हर्स मोर्गेज कर्ज म्हणजे काय*?_👈
*रिव्हर्स मॉर्गेज’ हा गृहकर्जाच्या अगदी उलट प्रकार आहे. गृहकर्जामध्ये आपण कर्ज काढून घर घेतो, तर ‘रिव्हर्स मॉर्गेज’मध्ये मात्र स्वत:च्या मालकीचं राहतं घर बॅंकेकडं मॉर्गेज म्हणजे तारण ठेवून कर्ज घेता येतं. विशेषतः जेव्हा ज्येष्ठ नागरिकांकडची उत्पन्नाची साधनं बंद होतात आणि इतर काही पर्याय राहत नाही, तेव्हा अशा वेळी ते या पर्यायाचा वापर करून स्वतःचं बाकी आयुष्य स्वाभिमानानं जगू शकतात*👈.
वेगवेगळ्या बॅंकांकडं चौकशी करून आपल्या गरजेनुसार योग्य अशी योजना निवडता येते. असं कर्ज एकरकमी अथवा दरमहा हप्त्यानं घेता येतं. *विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदारावर नसते.*👈☺ त्यामुळं ती मोठी चिंता दूर होते. हे ‘रिव्हर्स मॉर्गेज’ नक्की कसं घ्यायचं, त्यासाठीचे नियम काय, कोणती पात्रता लागते आदी गोष्टींवर एक नजर टाकू.
‘रिव्हर्स मॉर्गेज’मध्ये ‘मॉर्गेज’ ठेवलं जात असलेलं घर अर्जदाराच्या स्वत:च्या मालकीचं असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर, अर्जदार त्या घरात राहत असणंही आवश्यक असतं. असं कर्ज स्वत:च्या मालकीच्या; परंतु भाड्यानं दिलेल्या घरावर अथवा दुकान किवा अन्य व्यापारी स्वरूपाच्या जागेवर मिळू शकत नाही. *थोडक्यात फक्त स्वत:च्या मालकीच्या आणि तेही आपण त्यात राहत असल्यासच अशा प्रकारचं कर्ज मिळू शकतं. अर्जदाराचं वय साठ किंवा त्याहून अधिक असावं लागतं. थोडक्यात, ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत संपले आहेत आणि ते मिळवण्याची शक्यता नाही, अशा व्यक्तींचाच यासाठी विचार केला जातो. या घरावर अन्य कोणताही बोजा असता कामा नये, हेही महत्त्वाचं. त्या घराच्या बाजारभावाच्या साठ टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते*. एकरकमी कर्ज हवं असल्यास पन्नास टक्के इतकंच मिळू शकतं. *कर्जाची मुदत जास्तीत जास्त १५ वर्षं इतकी असते.* नियमित मिळणाऱ्या हप्त्याच्या (मासिक/तिमाही) कर्जास जास्त मागणी दिसून येते. दर पाच वर्षांनंतर घराच्या वाढलेल्या बाजारभावानुसार, दरमहा मिळणारा कर्जाचा हप्ता गरज असल्यास वाढवला जाऊ शकतो. दरमहा मिळणारी रक्कम ही कर्ज स्वरूपाची असल्यामुळं यावर प्राप्तिकर लागू होत नाही. *विशेष म्हणजे कर्जाची मुदत संपली, तरी हयात असेपर्यंत कर्जदार या घरात राहू शकतो. इतकंच नव्हे, तर कर्जदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीपैकी हयात असलेली व्यक्ती तिच्या हयातभर या घरात राहू शकते.
*कर्जदार पती/पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर बॅंक घर विकून कर्जवसुली करू शकते, अथवा स्वत:कडं ताबा घेऊ शकते. मात्र, असं करताना मृताचा कायदेशीर वारस जर कर्जाची रक्कम व्याजासह एकरकमी भरण्यास तयार असेल, तर रक्कम वसूल करून घराचा ताबा कायदेशीर वारसास दिला जातो. मात्र, वारसानं याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही, तर घराची विक्री करून बॅंक कर्जवसुली करते*. असं करताना विक्रीची रक्कम कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असेल, तर त्यावरचा कॅपिटल गेन बॅंकेस भरावा लागतो. या उलट जर घराची विक्री रक्कम कर्जापेक्षा कमी असेल, तर होणारा तोटा बॅंकेलाच सहन करावा लागतो, वारसाकडून वसुली करता येत नाही.
*जे मुले आपल्या आईवडिलांना त्यांच्या वृद्धपकाळात अजिबात न बघता त्यांच्या मृत्यूपश्चात केवळ हिस्स्यासाठी नंतर येवून आहे ते घर विक्री करून वाटणी साठी येतात त्यांच्यासाठी हि मोठी चपराक आहे*
बहुतेक सर्व व्यापारी बॅंका असं कर्ज देऊ करतात. या कर्जाचा व्याजदर बॅंकेनुसार कमी-अधिक असू शकतो. *या सुविधेमुळं ज्येष्ठ नागरिकास निश्चितच एक दिलासा मिळाला आहे. आता स्वत:च्या मालकीचं राहतं घर असणाऱ्या जेष्ठ नागरिकास हयातभर स्वत:च्या घराचा उपभोग घेऊन रिव्हर्स मॉर्गेज सुविधेचा वापर करून उतारवयातली आपली आर्थिक समस्या सहज सोडवता येईल आणि स्वाभिमानानं जीवन जगता येईल. थोडक्यात, आपलं राहतं घरच आपला आधारवड होऊ शकतो.* याचा उपयोग जसा ज्येष्ठांना आहे, तसा तो आजच्या तरुणांना त्यांच्या उतारवयात होऊ शकणार असल्यानं स्वत:च्या मालकीचं घर शक्य तितक्या लवकर घेणं हे रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टीनं आवश्यक आहे.
🌹🌹🌹
एक निवृत्त आधिकारी, बँक ऑफ इंडिया, मुंबई.
*मैं जुड़ने-जोड़ने का काम नही करूँगा कहने वालों को प्यार से ज़रा यह बात पूछिए👇🏻*
ReplyDelete*क्या गूगल आपका रिस्तेदार है..?*
*क्या यूट्यूब आपका रिस्तेदार है..?*
*क्या D2H वाला रिस्तेदार है..?*
*क्या FILIPKART रिश्तेदार है..?*
*क्या अमेजोन रिस्तेदार है..?*
*ऐसे बहुत से उदाहरण हैं जैसे कि बाइक एजेंसी, कपड़े वाला, राशन वाला, मोबाईल शॉप वाला, शॉपिंग मॉल, न्यूजवाला, चायवाला, समोसे वाला, फल वाला, दूध वाला और भी अन्य दुकानदार, कोई भी आपके रिस्तेदार नही है। फिर भी आप इनके नेटवर्क में जाने-अनजाने में जुड़कर, पूरे परिवार सहित इन्हें अमीर बनाते हैं। और तो और रोज इन्हें पैसा भी देते हैं। जिसकी वजह से यह अमीर बनते हैं और आप बहुत खुश हैं कि मैं जुड़ने-जोड़ने का काम नही करता हूँ। बहुत समझदार हैं आप, आपका बच्चा गेम्स खेलने को रोता है आप मोबाईल या कम्प्यूटर में गेम्स खेलने देते हैं, कभी सोचा आपने, कितने लोग अमीर बनते हैं आपके बच्चे के एक उस गेम को खेलने पर, नही सोचा ना तो आज ही सोचिये और ये भी सोचिए कि आप के खुद के पैसे से आप रोज कितने लोगों को अमीर पे अमीर बनाते आएं हैं, और आज आपको 'वेल्सर' से अमीर बन जाने का अवसर मिला तो वही काम आपको बेकार लग रहा है।*
*आप सच मे बहुत समझदार और बुद्धिमान हैं।*
*आपके SUBSCRIBERS के सहयोग से ही यह COMPANIES अरबो-खरबो की सम्पत्ति के मालिक हैं! हमें क्या मिलता है..? ज़रा दिमाग लगाएं कि आप अपना कीमती समय व आय इन COMPANIES के पूंजीपति को देते हैं जिनसे यह और पूंजीपति बन जाते हैं। अब आप बताएं कि क्या आपको कभी भी कोई INCOME हुई..? नही ना फिर भी हम इन COMPANIES को अरबपति खरबपति बनाने में लगे हुए है।*
*👉GOOGLE के पास क्या है?*
*NETWORK, SUBSCRIBERS*
*👉FACEBOOK के पास क्या है? NETWORK, SUBSCRIBERS*
*👉WHATSAPP, TELEGRAM, INSTAGRAM, YOUTUBE, SNAPCHAT, HOTSTAR, SONY LIV, AMAZON PRIME, NETFLIX इनके अलावा और भी बहुत सारे हजारों की संख्या में APPS है, इनके पास क्या है..?*
*सिर्फ और सिर्फ NETWORK, SUBSCRIBERS*
*👉AMBANI के पास क्या है: NETWORK*
*👉FLIPKART, AMAZON & SNAPDEAL के पास क्या है: NETWORK*
*👉GROFER & BIGBASKET के पास क्या है: NETWORK*
*👉AIRTEL,VI, JIO के पास क्या है: NETWORK*
*👉IPHONE & SAMSUNG के पास क्या है: NETWORK*
*👉TATA के पास क्या है: NETWORK*
*👉ADANI के पास क्या है: NETWORK*
*👉OLA & UBER के पास क्या है: NETWORK*
*👉FOODPANDA & SWIGGY के पास क्या है: NETWORK*
*👉OYO के पास क्या है: NETWORK*
*👉👨👩👧👦ऐसी बहुत सारी कम्पनी है जिनका अपना खुद का बहुत बड़ा NETWORK है !!*
*👉👨👩👧👦और इन्होंने नेटवर्क बनाकर ही अपने बिजनेस में कामयाबी हासिल की है।*
*👉👨👩👧👦इसलिए सफल होना है तो 'वेल्सर' में खुद का नेटवर्क बनाकर जिंदगी को बदलिये..*
*सोच बदलो, 'वेल्सर' में जिंदगी अपने आप बदल जाएगी....*
Such jindgi badlneke liye 9834271672
ReplyDeleteसेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवार्थ मध्ये ऑनलाईन नोंदणी करणे साठी स्टेप्स खालील प्रमाणे आहेत. या नोंदणी नंतर कोषागार कार्यालय मधील आपल्या विषयी माहीती आपण घरबसल्या बघू शकतो. ऑनलाईन कार्यवाहीसाठी याचा उपयोग होतो.
ReplyDelete1 google मधुन sevarth उघडा
2 ID: PENSIONER
3 Pass: ifms123 टाका लॉगिन झाल्यावर
Worklist click करा
त्यामध्ये create pensioner user ला क्लीक करा
तुमचे कोषागार निवडा,
ppo क्रमांक टाका,
बँकेचे नांव ब्रँच, खाते क्रमांक टाका
शेवटी create user ला क्लीक करा आपले खाते तयार होईल.
खाते तयार झाल्यावर तुम्हाला user ID मिळेल तो लिहून घ्या user ID: PEN_तुमचा ppo क्रमांक असा असतो.
User ID मिळाल्या नंतर पुन्हा
Sevarth प्रणाली उघडा
आता मात्र User ID मिळालेला टाका प्रथम पासवर्ड
ifms123 टाका
सिस्टीम तुम्हाला सांगेल की तुमचा पासवर्ड रीसेट करा.
तुमचा पासवर्ड ठरवा save करा बदलून घेतलेला पासवर्ड लिहून घ्यावा.
आता आपल्या पासवर्ड ने आपले खाते बघा. पासवर्ड सुरक्षित ठेवा.
पासवर्ड विसरल्यास ATO pension कोषागार यांना संपर्क करून पासवर्ड रीसेट करू शकतो.💐💐💐👍
काही अडचण आल्यास मला संपर्क करा👏👏
ईतर सेवानिवृत्त कर्मचारी यांना सुध्दा हा मेसेज पाठवा. कोषागार कार्यालय आपल्या घरी जोडा👍
अशोक चौधरी
लेखाधिकारी(नि)
9923795915
*How do you know you are rich?*
ReplyDeleteAmazing answer by Mr Awadhesh Singh:
When I was doing my B Tech, there was a Professor Talukedar who used to teach us ‘Mechanics’.
His lectures used to be very interesting since he had an interesting way to teach and explain the concepts.
One day, in the class, he asked the following questions,
1. What is ZERO?
2.What is INFINITY?
3. Can ZERO and INFINITY be same?
We all thought that we knew the answers and we replied as following,
ZERO means *nothing*
INFINITY means *a number greater than any countable number*
ZERO and INFINITY *are opposite and they can never be same*
He countered us by first talking about infinity and asked, ‘How can there be any number which is greater than any countable number?’
We had no answers.
He then explained the concept of infinity in a very interesting way, which I remember even after more than 35 years.
He said that imagine that there is an illiterate shepherd who can count only upto 20.
Now, if the number of sheep he has less than 20 and you ask him how many sheep he has, he can tell you the precise number (like 3, 5 14 etc.). However, if the number is more than 20, he is likely to say “TOO MANY”.
He then explained that in science infinity means ‘too many’ (and not uncountable) and in the same way zero means ‘too few’ (and not nothing)
As an example, he said that if we take the diameter of the Earth as compared to distance between Earth and Sun, the diameter of earth can be said to zero since it is too small.
However, when we compare the same diameter of earth with the size of a grain, diameter of earth can be said to be infinite.
Hence, he concluded that the same thing can be ZERO and INFINITE at the same time, depending on the context, or your matrix of comparison.
The relationship between richness and poverty is similar to the relationship between infinity and zero.
It all depends on the scale of comparison with your wants.
If your income is more than your wants, you are rich.
If your wants are more than your income, you are poor.
I consider myself rich because my wants are far less than my income.
I have become rich not so much by acquiring lots of money, but by progressively reducing my wants.
If you can reduce your wants, you too can become rich at this very moment.
श्रीदत्तात्रेयांचे चोवीस गुरु (एक खंडकाव्य)
ReplyDelete[ हे खंडकाव्य परमपूज्य श्री. टेंबेस्वामी यांच्या “श्रीदत्तमाहात्म्य” या ग्रंथावर आधारित आहे. हे सारे चोवीस गुरु आपल्या नित्य पाहण्यातील आहेत. आकाश,जमीन,समुद्र, भुंगा, हत्ती, हरीण, मासा इत्यादि सर्व मंडळी जरी आपल्या पाहण्यातील असली तरी ती काहीतरी जीवनपोषक तत्व सांगतात हे आपल्या गावी नसते. “श्रीदत्तमाहात्म्य”पद्यात असलेला ५१ अध्यायाचा ग्रंथ मी गद्यात रुपांतर केला असून तो मला लवकरच प्रसिद्ध करावयाचा आहे. त्यासाठी कोणी प्रकाशक असल्यास हे लिखाण मी विनामुल्यदेऊन
छपाई खर्चाचा हा काही भागपण उचल्याणास तयार आहे. तरी आपली मोलाची मदत ही दत्तसेवा असेल.त्या ग्रंथातील शेवटचे चार अध्याय हे गुरु सांगतात. हे गुरु वाचून मी भारावून गेलो आणि हे तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे असे प्रकर्षाने वाटले. या वाटण्याला मी श्रीटेंबेस्वामी यांची आज्ञा समजतो. पद्य लिहिण्याचा हा माझा वयाच्या ८०व्या वर्षी पहिलाच प्रयत्न. श्रीस्वामींनी जसे सुचवले तसे लिहित गेलो. विषय मुळात अवघड, तो सोपा करण्याचा हा अल्प आणि बाळबोध प्रयत्न. पण भक्तांना आपल्या लाडक्या देवाचे सारेच प्रिय असते म्हणून श्रीदत्तभक्तांचरणी हे अर्पण. आपले मत, आपली सूचना मला शिरोधार्य मान्य. सर्व भक्तांना हे कळावे हा माझा मानस पूर्ण होण्यास आपली मदत ही दत्त सेवाच असेल ] सु.अ. कुलकर्,अलिबाग
भ्रमणध्वनी ९४२१२५४६००
महसूली जमा आता एका क्लिकवर,
ReplyDeleteग्रास महाकोष महाराष्ट्र मोबाईल ॲप उपलब्ध
मुंबई, दि. 5 : संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे (NIC) यांचे मार्फत विकसित केलेल्या महसूली कर व करेतर रकमा भरण्याची सुविधा देणारे, “gras mahakosh maharashtra” या Android Mobile App चे वित्त विभाग, अपर मुख्य सचिव श्री मनोज सौनिक यांच्या हस्ते दि.04 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील २४X७ या ग्रास ॲपचा वापर करुन शासन खाती रक्कम जमा करू शकतात.
हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. NIC SCIENTIFIC OFFICER श्री. बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे.
देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज आँनलाईन पध्दतीने करण्यात येत असलेल्या संचालनालय, लेखा व कोषागारे या विभागात GRAS मोबाईल अँपचे विकसन हा महत्त्वपुर्ण टप्पा ठरल्यामुळे वित्त विभागातील सर्व अधिका-यांनी याबद्दल या प्रसंगी आनंद व्यक्त केला.
नवीन निवृत्ती वेतनधारकांना त्वरित PRAN क्रमांक व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्याकरिता ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वेतन पडताळणी मार्गदर्शिका पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यांत आले.
या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यांत येणा-या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील ? याबाबत मार्गदर्शक ठरेल असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.
ही पुस्तके PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहेत.
यावेळी प्रधान सचिव (ले व को) श्री. नितीन गद्रे, प्रधान सचिव ( वित्तीय सुधारणा ) श्री. राजगोपाल देवरा व सचिव (व्यय ) श्री. राजीव मित्तल उपस्थित होते.
तसेच संचालनालय, लेखा व कोषागारे कार्यालयातील श्री.ज.र.मेनन (संचालक), श्री.जि.रा.इंगळे (सहसंचालक), श्री.विनोद शिंगटे (उपसंचालक), श्रीम. प्रगती धनावडे (सहाय्यक संचालक) व श्रीम.चित्रलेखा खातू (सहाय्यक संचालक) उपस्थित होते.
संचालक, लेखा व कोषागारे श्री.ज.र.मेनन यांनी सर्व नागरिकांनी सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी gras mahakosh Maharashtra या मोबाईल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन केलेले आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परिपुर्ण दस्ताऐवजासह
ReplyDeleteऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 11 : सन 2020-21 करिता शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता अर्ज ऑनलाईन स्वरुपात दि. 01 ऑगस्ट, 2020 पासून स्विकारण्यात येत असून, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील दि.12 डिसेंबर, 2020 पासून अर्जदार यांचे सोयीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व ऑनलाईन सेवा शुल्क भरल्यानंतर संबंधीत अर्जदार यांनी अर्ज दस्ताऐवजासह समितीस सादर करणे अनिवार्य आहे. अनेक अर्जदार यांनी मुळ दस्ताऐवज व मुळ प्रतिज्ञापत्रे अद्यापि सादर केलेले नाही तसेच बऱ्याच अर्जदारांनी विलंबाने सादर केल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस विलंब होत आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणारे/ लाभ घेऊ इच्छिणारे अर्जदार यांनी कृपया अर्जासोबत ऑनलाईन प्रक्रियेवेळी सादर केलेले दस्ताऐवज व मुळ प्रतिज्ञापत्र पत्र (वंशावळ सत्यता प्रमाणपत्र) यासह संबंधीत समिती यांचे समक्ष सादर करावे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे समन्वयक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
००००
मानसिक आजार पळवुन लावणार्या चौदा कृती!…
ReplyDeleteकसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे :-
1) सतत पॉझीटीव्ह -
कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!
उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.
प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.
उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.
आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.
२) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.
पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!
त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!
कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.
त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,
ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….
३) महिन्याला दोन पुस्तके - माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.
महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.
4) डायरी लिहा - दररोज घडलेल्या बर्या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.
माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.
आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.
5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!
मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!
‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!
6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा - तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?
7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम - मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!
जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.
�� ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!
खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.
आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.
9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.
ReplyDeleteContinue mansik aajar
10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा - घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्यावर हसु फुलवणार आहे.
कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!
कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.
11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.
जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.
आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.
१2) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.
यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!
13) सुरक्षित अंतर ठेवा - जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.
14) तीस दिवसांचा प्लान - पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.
एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!
।।सर्वे सन्तु निरामयः।।
कॉपी पेस्ट
🌼अध्यात्माचा पत्ता🌼
ReplyDelete'अहंकाराच्या' धुंदीत 'जगण्याच्या' वाटे वरुन चालताना 'सुखदुःखाचे' घाट उतरून मी जेव्हां 'सन्मार्गावरुन' आलो
तेव्हा 'ग्रंथांच्या' झाड़ातुन वाळलेल्या रसांचे दोन ओघळ पाहिले मी,
शेवटी पाने म्हणाली 'शांतिरस' आणि 'भक्तिरसाचे' आहेत ते म्हणून 'स्वानुभवाच्या' चौकात उभ्या असलेल्या 'सिद्धाला' मी विचारलं हा 'शांतिरस' कुठे मिळतो हो?
तेव्हा तो म्हणाला
समोर 'संयमाच्या' मार्गावरुन जाताना तुला 'प्रलोभनांची' दुकाने लागतील
पुढे 'मायेचे' सर्कल लागेल, तिथेच 'मूर्खांचा' बाजार म्हणून एक मोठा मॉल आहे
त्याच्या आधी 'शहाणपणाची' एक गल्ली लागते
ती ओलांडून जा,
पुढे 'वैराग्याचा' आडवा रस्ता लागेल
तो ही क्रॉस कर.
डाव्या हाताला 'ज्ञानाचे मंदिर' लागेल
समोरच 'अध्यात्माचे कॉम्पलेक्स' आहे.
ठेकेदारांचे वॉचमन तुला अड़वतील
"नामाचा पास" दाखवून आत जा,
समोरच तुला चार बिल्डिंग दिसतील.
'वैखरी', 'मध्यमा', 'पश्यन्ति', 'परा'
त्यातल्या 'परा' बिल्डिंग मध्ये 'तिस-या' मजल्यावर 'स्वानंदाचा' फ्लॅट आहे.
'शरणागतीची' बेल वाजव 'कृपेचे' दार उघडले जाईल समोर 'ध्यानाचा' कोच असेल त्यावर जरा निवांत बैस 'मुक्ती' उभी असेल 'समाधानाच्या' ट्रे मधे 'शांतिरसाचा' कुंभ घेऊन...
🌼ॐ शांती 🌼
सतीश अलोनी:
ReplyDelete---------------------------
*शुभ आणि लाभ*
----------------------------
आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंती वर शुभ आणि लाभ असे लिहितो.
*हे का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध असे, चला तर मग जाणून घेऊ, या बद्दलची थोडक्यात माहिती.*
*श्रीगणेशाचे दोन मुले शुभ आणि लाभ 😗
महादेवाचे पुत्र गणेशा याचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांचा दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धीशी झाले. सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे असे दोन मुले झाले. लोक परंपरेत यांनाच शुभ आणि लाभ म्हणतात.
गणेशपुराणानुसार शुभ आणि लाभाला केशं आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते.
*सिद्धी शब्दाचा अर्थ आहे*
'बुद्धी'ज्याला हिंदी भाषेत शुभ म्हणतात. त्याच प्रमाणे सिद्धी शब्दाचा अर्थ आहे 'आध्यात्मिक शक्तीची पूर्णता' म्हणजे 'लाभ'.
*शुभ आणि लाभाची मुले 😗 शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या सून म्हटले आहे. श्री गणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहे.
मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती. संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर माहितीच असणार. शुक्रवार तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवास धरतात.
*चौघडिया -*
जेव्हा आपण एखादा चौघडिया किंवा मुहूर्त बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ
महत्त्वपूर्ण मानले जाते.
*दारावर 😗
श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो. घराच्या मुख्यदारावर 'स्वस्तिक' मुख्यदाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतींच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवितात.
घराच्या बाहेर शुभ-लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो.
लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो, त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो.
*घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक,*
शुभ आणि लाभ या शक्तींचे प्रतीक आहे :
गणेश (बुद्धी) + रिद्धि (ज्ञान) = शुभ।
गणेश (बुद्धी) + सिद्धी (आध्यात्मिक स्वातंत्र्य )
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-------------------------------------------------
कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?
ReplyDeleteमला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.
परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!
एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.
द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.
कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.
मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"
*कृष्णाने उत्तर दिले:*
"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.
जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.
रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.
तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.
मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.
ना कोणती सेना, ना शिक्षण.
मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.
मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.
जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल... फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.
एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत
*आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही*
दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.
परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...
कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,
तरीही
त्यावेळी आपण त्याला कसा *प्रतिसाद* देतो याला महत्व आहे.
तक्रारी थांबव कर्णा!
*आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.*
म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, स्वाध्यायी व्हा, भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!
माहिती स्रोत
अध्यात्मिक समूह
🙏
*जय श्रीकृष्ण*
*रामकृष्ण हरी*
तक्रार असलेल्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी
ReplyDelete- शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 23 : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांच्या दालनात नुकतीच शालेय शुल्क वाढीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, सचिव, विधी व न्याय विभाग, सहसचिव, विधी (शालेय शिक्षण) व पॅरेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी श्री.जयंत जैन, श्री. प्रसाद तुळसकर, श्री. सुनिल चौधरी, श्रीमती जयश्री देशपांडे, श्रीमती सुषमा गोराणे, इंजि. नाविद बेताब व अॅड अरविंद तिवारी उपस्थित होते. बैठकीमध्ये शाळांच्या शुल्कासंबधीत विषयांवर चर्चा करण्यात आली.
खाजगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम-2011 व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम -2016 तयार केलेले आहेत. तथापि नियमाची अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर अडचणी येतात. तसेच शाळेतील शुल्काबाबत पालकांच्या सातत्याने तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. म्हणून या अधिनियमामध्ये / नियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी सहसचिव शालेय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीमध्ये संचालक बालभारती, सहसचिव विधी (शालेय शिक्षण), सहसंचालक प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण उपनिरीक्षक, मुंबई, वरिष्ठ लेखापरीक्षक, सोलापूर, अधीक्षक शिक्षण आयुक्त कार्यालय या सदस्यांचा समावेश आहे.
राज्यस्तरीय व विभागीय शुल्क नियंत्रण समित्या:- राज्यस्तरीय व विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समित्यांकड़े फी वाढीबाबतच्या पालकांच्या तक्रारी पाठविण्यात याव्या असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले. तर अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांवर RTE नुसार कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
000
*अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?*
ReplyDelete१. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे
*जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता, ... आणि त्याऐवजी स्वत:ला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता.*
२. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*लोकांना जसे आहे तसे स्विकारता.*
३. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*हे समजून घेता की प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या दृष्टीकोनातून बरोबरच असतो.*
४. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*"सोडून देणे" शिकता.*
५. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*नातेसंबंधांतून "अपेक्षा" करणं थांबवता आणि फक्त "देण्यासाठीच देणे" सूरू करता.*
६. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*हे समजून घेता की तुम्ही जे काही करता, ते फक्त स्वतःच्या मन: शांतीसाठी करता.*
७. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*जगाला, "मी किती बुद्धीमान आहे" हे सिद्ध करणे थांबवता.*
८. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*आपल्या कृतीला दुसऱ्यांच्या कडून मान्यता मिळवत नाही.*
९. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवता.*
१०. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*स्वतःसोबत शांतपणे रहाता.*
११. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*"गरज असणे" आणि "हवे असणे" यातील फरक ओळखता आणि सर्व "हव्या" असलेल्या गोष्टींचा त्याग करता.*
*आणि सर्वात शेवटी आणि सगळ्यात अर्थपूर्ण!*
१२. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही
*"आनंद" भौतिक गोष्टींशी जोडणे थांबवता!!*
*सर्वांना अध्यात्मिक परीपक्वतेसाठी हार्दिक शुभेच्छा.*
🙏🌹🙏🌹
*हर हिरा कूछ कहाता हैं....*
ReplyDeleteसर दोराबजी टाटा, हे मेहेरबाई यांच्या घरी म्हैसूर ला आले होते ! त्यांनी तिला पाहिले आणि प्रथमदर्शनी तिच्या प्रेमातच पडले !
मग रीतसर १८९८ चा व्हॅलेंटाईन डे ला दोघांनी लग्न केले.
आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर दोराब जी टाटा,यांनी आपल्या प्रिय पत्नी मेहेर बाई ला,२४५ कॅरेट चा जुबिली हिरा भेट दिला.त्या वेळी जगात, तो ६ व्या क्रमांका चा हिरा, म्हणून गणला जात होता ! आणि हो ! आपल्या कोहिनूर हिरा पेक्षा आकाराने दुप्पट होता ! प्लॅटिनम साखळीत ओवलेला तो अनमोल हिरा मेहेर बाई, सणा सुदी, खास प्रसंगी परिधान करीत असत.
१९२४ साल, ' टाटा स्टील ' वर एक वादळ घोंगावू लागले.त्यांना एका प्रचंड आर्थिक संकटाशी सामना करावा लागला.ते संकटइतके भयंकर होते, की कामगारांचे पगार, त्यांची देणी, वेळेत पूर्ण करणे, कठीण होत चालले होते. टाटा स्टील कंपनी वाचवण्यासाठी, सर दोराब जी आणि लेडी मेहेर बाई , ह्यांनी आपले सगळे दाग- दागिने आणि तो अनमोल जुबीली हिरा,त्या वेळेच्या इंपिरियल बँकेत गहाण ठेवले व पैसे उभे करून, कामगारांचे पगार, त्यांची देणी दिली. इतकेच काय, एक ही कामगार, कंपनी च्य पटला वरून काढला गेला नाही ! कालांतराने १९३० ला टाटा स्टील ला भरभराटीचे दिवस आले !
लेडी मेहेर बाई यांचे १९३१ ला दुःखद निधन झाले आणि पाठोपाठ सर दोरब जी सुद्धा १९३२ ला निवर्तले ! मात्र मरणापुर्वी, त्यांनी आपली सारी संपत्ती आणि तो अनमोल हिरा, ' सर दोरब् जी टाटा चॅरीटेबल ट्रस्ट ' ला दान केली.
पुढे, १९३७ ला, तो अनमोल हिरा विकण्यात आला. ट्रस्ट नीं आलेल्या धनराशितून टाटा मेमरिअल हॉस्पिटल,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडा मेंटल रिसर्च सारख्या संस्था, मुंबईत उभ्या केल्या...
असे हे व्हॅलेंटाईन गिफ्ट फक्त आणि फक्त
TATAS, समाजाला देऊ शकतात! 🙏🙏🙏
( श्री हरीश भट, Brand Custodian, TATA Group, ह्यांच्या मुळ इंग्रजी लेखाचा मराठी वाचकांसाठी स्वैर अनुवाद )
दिपक धारगळकर, मुंबई ९१
९८६९४१५५८८
*दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा*
ReplyDeleteसांज वात ....एक अनुभव
नमस्कार,
साधारण २५ वर्षापूर्वी मी आणि माझे पती पवई येथील चिन्मयानंद स्वामींच्या आश्रमात जाणे झाले होते. तेथील शंकर मंदिराच्या आवारात आम्ही बसलो असता ..तेथे बाजूला बसलेले एक अमराठी हिंदी भाषिक वयस्कर काकानी पण आमच्या गप्पात भाग घेतला. त्यांनी एक महत्व पूर्ण माहिती दिली ती अशी ...
काका: आपण सर्व जण संध्याकाळी देवाला दिवा लावतो.
आम्ही : हो बहुतेक सर्व हिंदू लोकं.
काका : का लावतो?
आम्ही : पूर्व परंपरा, घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते !
काका : वेळ कोणती ?
आम्ही : सुर्यास्ता नंतर घरच्या गृहिणीच्या सवडीनुसार !
काका : असे का ?
मी: घरातल्या पुरुष वर्गांनी आम्हाला दिलेला हा एकमेव अधिकार
काका: आता मी काय सांगतो ऐका... योग्य वाटल्यास त्याचे आचरण करा.. त्याची अनुभूती किंवा प्रचीती आल्यास इतरांना सांगा
काका: दिवा नेहमी संध्याकाळी ७.३७ मिनिटांनी लावावा.
आम्ही: ७.३७ च का? सर्वांची घड्याळे सारखी नसतात ... मग त्याचे काय?
काका : असे सांगितले जाते कि जगाची जगन्माता श्री कामाक्षी देवीच्या मंदिरात तेजोवात अखंड तेवत असते परंतु तेथेही एक सांजवात संध्याकाळी ७.३७ वाजता लावली जाते. ती सांज वात सूक्ष्म रूपाने अखंड भारत वर्षात घरोघर जाऊन जेथे जेथे दिवा लागला असेल त्या घराचे क्षेम कुशल विचारून पुन्हा जगन्माता श्री कामाक्षी देवी च्या मंदिरात तेवत असलेल्या तेजोवाती मध्ये विलीन होतात त्या घराची, घर धन्याची सुख-दुःखे सांगतात आई कामाक्षी देवी त्याप्रमाणे सर्व अमंगल, अडचणी दूर करते.
आम्ही: ह्या विज्ञान युगात हे खरे कोण मानणार. ह्या वर कोण विश्वास ठेवणार?
काका : तुम्ही तर ठेवाल ना ? तुम्हाला अनुभव आल्यावर इतरांना सांगा किंवा मी नेहमी येथेच असतो मला येऊन सांगा!
आम्ही त्याप्रमाणे दररोज संध्याकाळी ७.३७ ला दिवा लावणे सुरु केले.
खंर सांगू का? काही दिवसाच्या आत आमच्या घरात, आमच्या आर्थिक परिस्थितीत अमुलाग्र बदल झाला.
हा अनुभव आम्ही इतरांना सांगितला ...त्यानाही खूप चांगला अनुभव आला ... तुम्हाला ही असा अनुभव येवो ही ईच्छा!
हा आमचा अनुभव ऐकायला ते काका त्या दिवसापासून तेथे आजतागायत दिसले नाहीत.
आई कामाक्षी देवी तुम्हा सर्वांचे भले करो !!!🙏🏻🌹🙏🏻
*समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना.*
ReplyDelete*ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.*
*अतीकोपता कार्य जाते लयाला,*
*अती नम्रता पात्र होते भयाला ।*
*अती काम ते कोणतेही नसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।*
*अती लोभ आणी जना नित्य लाज,*
*अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।*
*सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।।
*अती मोह हा दु:ख शोकास मूळ,*
*अती काळजी टाकणे हेही खूळ ।*
*सदा चित्त हे सद्विचारे कसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।*
*अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,*
*अती खेळणे हा भिकेचाच पाया ।*
*न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।*
*अती दान तेही प्रपंचात छिद्र,*
*अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।*
*बरे कोणते ते मनाला पुसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।*
*अती भोजने रोग येतो घराला,*
*उपासे अती कष्ट होती नराला ।*
*फुका सांग देवावरी का रुसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।*
*अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,*
*अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।*
*अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।*
*अती आळशी वाचुनी प्रेतरूप,*
*अती झोप घे तोही त्याचाच भूप ।*
*सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।*
*अती द्रव्यही जोडते पापरास,*
*अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।*
*धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।*
*अती भाषणे वीटती बुद्धिवंत,*
*अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।*
*खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।*
*अती वाद घेता दुरावेल सत्य,*
*अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।*
*विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।*
*अती औषधे वाढवितात रोग,*
*उपेक्षा अती आणते सर्व भोग ।*
*हिताच्या उपायास कां आळसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।*
*अती दाट वस्तीत नाना उपाधी,*
*अती शून्य रानात औदास्य बाधी ।*
*लघुग्राम पाहून तेथे वसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।*
*अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,*
*अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।*
*ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।*
*अती भूषणे मार्ग तो संकटाचा,*
*अती थाट तो वेष होतो नटाचा ।*
*रहावे असे की न कोणी हसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।*
*स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,*
*अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।*
*न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।*
*अती भांडणे नाश तो यादवांचा,*
*हठाने अती वंश ना कौरवांचा ।*
*कराया अती हे न कोणी वसावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।*
*अती गोड खाणे नसे रोज इष्ट,*
*कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।*
*असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।*
*जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,*
*नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।*
*खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।*
*सदा पद्य घोकोनियां शीण येतो,*
*सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।*
*कधी ते कधी हेही वाचीत जावे,*
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।*
🚩🚩जय जय रघुवीर समर्थ🚩🚩share by prateema
*1) लस का घ्यावी़?*
ReplyDeleteकोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे.
*2.लसिकरणाची कार्यक्षमता आहे का?*
सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.
*3. लस सुरक्षित आहे का?*
सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत.
*4. आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?*
आता तरी सगळीकडे कोविशिल्ड - सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे नामको लसिकरण सेंटरला जे उपलब्ध आहे ते घ्या.
*5. दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?*
६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येवून नोंदणी करावी.
*6. लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होवू शकतात?*
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य
दुष्परिणाम साधरणपणे दिसतात. ते
१ ते २ दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत. वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वीत झाल्याचे लक्षण आहे.
*7. लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?*
लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाशीपोटी जावू नये. लसिकरण सेेंटरवर कमी जास्त वेळ लागु शकतो त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घेवून जावे. तसेच जातांना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेवून जावे.
*8.लस किती वेळा घ्यावे?*
पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.
*9. कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी लस घ्यावी का?*
नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसिकरण करून घ्यावे.
*10. ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?*
१०० टक्के.... मुळात लस याच लोकांसाठी बनली आहे ज्यांना असे आजार - Co-morbidity आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रूग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने लसिकरण करावे.
*11. ॲलर्जीक ब्रोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?*
नक्कीच घेऊ शकता परंतु ॲलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*12. कोविड होवून गेल्यावर पण लस घ्यावी का?*
हो १०० टक्के कारण कोविड नंतर बनणा-या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधी पर्यंत राहतात.
*13. नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?*
कोविड होवून गेल्यावर ८ ते १२ आठवडयांनी लस घ्यावी.
*14. मी सर्व नियम पाळतो मला वर्षभरात कोरोना झाला नाही, माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे तरी मी लस घ्यावी का?*
१०० टक्के...... हो
*15. लहान मुलांना लस दयावी का?*
१६ वर्षाखालील मुलांना देवू नये.
*16. गर्भवती महिलांना लस दयावी का?*
सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी देवू नये.
*17. लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?*
हो. लसिकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.
*18. लस नंतर १०० टक्के कोरोना होणार नाही का?*
असे अजिबात नाही पण झाला तरी तो सौम्य असेल.
*19. जर लस घेवूनही कोरोना होणार असेल तर लसिचा हेतू काय?*
१. कोविडची दुसरी लाट टाळणे.
२. मृत्यू दर कमी करणे.
३. गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी करणेे.
*20. लस घेतल्यावर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?*
पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते पण त्यासाठी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
४५ ते ५९ वयोगटातले व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील सर्वांनी हे लसीकरण करून स्वतःला व आपल्या परीवाराला कोरोना संक्रमणापासुन सुरक्षीत ठेवा.*
आपले स्नेहांकित
*आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे*
इर्शाद बागवान/विसंअ/दि.१२.०३.२०२१
ReplyDeleteशैक्षणिक संस्था शुल्क विनियमन
अधिनियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी समिती गठीत
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी सह सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
विद्यार्थी, पालक व पालकसंघटना यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अधिनियमामध्ये आवश्यक ते
बदल करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये या विषयाचे ज्ञान व अनुभव असलेल्या शालेय शिक्षण विभागातील तसेच विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
खाजगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम- २०११ व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) नियम-२०१६ तसेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०१८ तयार केलेले आहेत तथापि या अधिनियमांची/नियमाची अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर अडचणी येतात. तसेच शाळेतील शुल्काबाबत पालकांच्या सातत्याने तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत या पार्श्वभूमीवर ही समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीच्या बैठकीकरीता आवश्यतेनुसार पालक व पालक संघटनांचे प्रतिनिधी यांना निमंत्रीत सदस्य म्हणून बोलविण्यात येणार असून, या सदंर्भात पालक व पालक संघटनांचे प्रतिनिधी यांनी केलेल्या शिफारशी समिती मार्फत विचारात घेण्यात येतील,अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
००००
व्यवसाय कर 31 मार्चपूर्वी
ReplyDeleteभरण्याचे शासनाचे आवाहन
मुंबई, दि. 12 : नावनोंदणी धारक तथा नोंदणी धारक व्यवसायकरदात्यांनी आपला सन २०२०-२१ या वर्षाचा देय व्यवसायकर ३१ मार्च 20२१ पूर्वी भरण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
नवीनच करपात्र झालेल्या करदात्यांनी कायद्याप्रमाणे नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्र मिळवावे आणि सन २०२०-२१ या वर्षाचा देय व्यवसायकर ३१ मार्च २०२१ पूर्वी भरावा, असे महाराष्ट्र व्यवसाय कर विभाग यांनी कळविले आहे.
००००
*सुवर्ण संधी*🙏
ReplyDeleteमहाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या आय ए एस, आय पी एस, आय आर एस, अश्या विविध पदांच्या परीक्षांविषयी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण व त्यांच्यातील जागृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एक वर्षाचा कोर्स सुरू होत आहे. सदर एक वर्षाच्या कोर्स ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
✔️ वर्षभर मोफत मार्गदर्शन
✔️ वर्षभर राहण्याची मोफत व्यवस्था
✔️ वर्षभर दरमहा 4000/- रुपये भत्ता
वरील सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. वरील लाभ मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी common entrance test देणे बंधनकारक आहे. सदर परीक्षा शनिवार दिनांक 20/03/2021 रोजी 11 ते 1 या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांनी या लिंक वर नाव नोंदणी करावी. 👇http://siacexam.org
सोबत शासनाचे माहिती पत्र.
अधिक माहितीसाठी संपर्क.
विज्ञान शाखा-
प्रा. सुर्वे 7972442631
प्रा. सनगरे 9823319447
वाणिज्य शाखा-
प्रा. पाटील 7829602624
कला शाखा-
डॉ. सावंत 9923327527
➖➖➖➖➖➖➖➖
💰 *सौजन्य-Regard's*💰
➖➖➖➖➖➖➖➖
*इयत्ता १० वी नतंर, ११ वी,१२ वी,आणी महाविधालयीन शिक्षणासोबत करुया स्पर्धा परीक्षेची तयारी.....*
🇮🇳*JSSPM*🇮🇳
JAGANNATH SHINDE SHIKASHAN PRASARAK MANDAL.
*जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मडंळ*संचलित,
1)*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका*(AC)
*UPSC*
*MPSC-राज्यसेवा,PSI/STI/ASO*
*वनसेवा, कृषीसेवा, अभियात्रींकी सेवा*
*सरळसेवा-मेगाभरती*
*NDA,AFCAT,CDS*
*BANKING-INSURANCE, RAILWAY, STAFF SELECTION*
➖➖➖➖➖➖➖➖
*जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मडंळ*-👉👉
📣*JSSPM*
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र*
*संपर्क*:-
📣*JSSPM*
*2-Khushi Hights*
*Near Abhudaya Bank*,
*Katemanavali*,
*Kalyan(East),Dist Thane*
Pin 421306
*Tel no-0251-2365252*
*Mobile no-*9594955252* *7039515252.*
Email:-jsspmkalyan@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖
एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक
ReplyDeleteलहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे सर करतील : राज्यपाल कोश्यारी
मुंबई, दि. 15 : राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांच्या अधिपत्याखाली आज ७०० ते ८०० महाविद्यालये संलग्न आहेत. अशावेळी विद्यापीठांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. त्याउलट लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचे व्यवस्थापन सुलभ पद्धतीने होत असून त्याठिकाणी गुणवत्ता राखणे तसेच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणे शक्य होते. राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठे तयार केल्यास अशी लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे निश्चितच सर करतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
नव्याने सुरु झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री.कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झाली.
बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, कुलगुरू डॉ. दिनेश पंजवानी, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र व विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवायचे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलानंतर शिक्षकांना महत्वाचे स्थान आहे, शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
एचएसएनसी समूह विद्यापीठ योग, संगीत, बांधकाम व्यवसाय, उपयोजित विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट आदी नवनवे अभ्यासक्रम सुरु करीत असल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना उच्च ध्येय व उद्दिष्टे पुढे ठेवून काम केल्यास विद्यापीठाला मोठी सफलता मिळेल असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
हार्वर्ड विद्यापीठाशी सहकार्य
एचएसएनसी समूह विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने दूरस्थ अभ्यासक्रम राबविण्याबद्दल प्रयत्नशील आहे अशी माहिती विद्यापीठाचे प्रमुख निरंजन हिरानंदानी यांनी यावेळी दिली.
एचएसएनसी विद्यापीठांतर्गत एच.आर. महाविद्यालय, के.सी. महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज या नामांकित महाविद्यालयांचा समावेश असून कोरोना काळात सर्व महाविद्यालयांनी आपले संपूर्ण अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने पूर्ण केले तसेच परीक्षा यशस्वीरित्या घेतल्या, अशी माहिती श्री.हिरानंदानी यांनी दिली.
0000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-2019 करिता
ReplyDeleteऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 15 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-2019 साठी 106 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2021 ते दि. 15 मार्च 2021 पर्यंत देण्यात आलेली होती. आता ही मुदत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी बार्टी पुणे च्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in >Notice Board ला भेट द्यावी, असे बार्टी, पुणे चे महासंचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
'दिलखुलास' कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजना
ReplyDeleteमुंबई, दि.14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'ग्रामीण उद्योगाला प्रोत्साहन व पाठबळ' या विषयावर राज्य खादी व ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअर' या मोबाईल अॅपवर सोमवार दि. 15 मार्च, मंगळवार दि. 16 मार्च रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापनेचा उद्देश, रोजगार निर्मितीसाठी कोणकोणत्या योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, शेतीपूरक उद्योगांना मंडळ करत असलेले सहाय, मध केंद्र योजना, ग्रामीण उद्योजकांना बाजारपेठ निर्मितीसाठी मंडळ करत असलेले सहाय या विषयांची माहिती श्री. जगताप यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
राज्यात 15 मार्चपासून जात वैधता प्रमाणपत्र
ReplyDeleteपडताळणीची विशेष मोहीम
मुंबई, दि. 16 : शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना व अर्जदारांचे नुकसान होवु नये म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 15 मार्च, 2021 ते 30 मार्च,2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील 6 महिन्यावरील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांस व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटी पुर्तता करुन घेण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्राप्त झालेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पुर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मुळ कागद पत्रासह संपर्क साधावा, असे आवाहन श्री.धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रणालीच्या
ReplyDeleteवैशिष्ट्यांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा (आयडॉल) पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
मुंबई, दि. 17 : राज्यात दूर व मुक्त अध्ययन सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ असून या संस्थेच्या वैशिष्ट्यांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षात १८ हजार ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त १५ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणालीतून ६४ हजार विद्यार्थी शिकत आहेत. सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शासनाच्या वतीने करण्यात येईल. यात दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ ही योजना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही एक चळवळ निर्माण होण्यासाठी विद्यापीठांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या या पदवी वितरण समारंभात विविध शिक्षणक्रमातील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयडॉलच्या १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. शाखानिहाय पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या - मानव्य विद्याशाखा-४७००, वाणिज्य विद्याशाखा- १३००३, विज्ञान व तंत्रज्ञान-३८८-कौशल्यविकास विद्याशाखा २३० - एकूण १८३२१ पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या आहे.
या कार्यक्रमाला पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर आयडॉल संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी देखील आयडॉलमधून एम.ए.अभ्यासक्रमातून विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली. त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
खाजगी शाळांमधील शुल्काबाबत सूचना
ReplyDeleteपाठविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
मुंबई, दि.17 : खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. दरम्यान, पुढील एक महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
oooo
Suggestions are invited for regulation of fees
Mumbai, Date : 17 : Inviting suggestions from the general public regarding suitable amendments to the Maharashtra Educational Institutions ( Regulation of Fee ) Act. These can be submitted http://www.research.net/r/feeregulation, which will be active within some time. We've formed a committee to suggest the modifications in response to complaints received from parents.
0000
मुंबई शहरातील जमिनीची मिळकत पत्रिका मोबाईल ॲपवर
ReplyDelete· जिल्हाधिकाऱ्यांनी केले ई-प्रॉपर्टी कार्ड ॲपचे लोकार्पण
मुंबई, दि. 18 : मुंबई शहर जिल्ह्यातील 19 महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले असून या ॲपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी लोकार्पण केले.
या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्मित केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी यावेळी केले.
या ॲपची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या mumbaicity.gov.in व prcmumbai.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ (ePropertycard) या ॲपची निर्मिती केली असून जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे ॲप विकसित केले आहे.
००००
ऑफीससह इतर सुविधांद्वारे नागरिकांना सेवा सुलभपणे मिळावी
ReplyDeleteमाहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई दि. 18 : - प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून पारदर्शकता व उत्तरदायित्व या आधारे सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान विभागाने ई ऑफिस, नगरपालिका व महानगरपालिकांकडून आकारले जाणारे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली, हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम व डाटा मानकीकरण हे नागरिकांना सुलभ प्रक्रियेद्वारे सेवा देणारे पाच पथदर्शी प्रकल्प येत्या सहा महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक झाली.
सर्व विभागांनी 'ई -ऑफिस' प्रणालीचा अवलंब करावा यासाठी या प्रणालीची माहिती व महत्व सांगणारे प्रात्यक्षिक व सादरीकरण माहिती तंत्रज्ञान विभागाने सादरीकरण करावे. ई -ऑफिस मुळे पारदर्शकता व उत्तरदायित्व कसे येणार यासंदर्भात माहिती द्यावी. एक फाईल तयार करून त्याची हालचाल कशी होणार त्याचे प्रात्यक्षिक द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
ई -ऑफिसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाचे मंत्री व सचिव यांच्यासमोर प्रात्यक्षिक द्यावे. ज्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण दिले आहे त्यांना घेऊन ते प्रात्यक्षिक देण्यात यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
प्रत्येक योजनेचे लाभार्थी कोण असतील, त्याचा प्रशासकीयदृष्ट्या तसेच सामान्य माणसांना कसा उपयोग होणार आहे याची माहिती एकत्रित करावी. हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची अंमलबजावणी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन वैद्यकीय महाविद्यालयांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करावी व पथदर्शी प्रकल्प राबवावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील म्हणाले,प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी ई ऑफिस प्रणालीचा सर्वत्र वापर झाला पाहिजे.हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची अंमलबजावणी करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज, महा आयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद कोलते, अवर सचिव मुकेश सोमकुंवर आदी उपस्थित होते.
0000
देवेंद्र पाटील/विसंअ/18.3.21
मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन
ReplyDeleteमुंबई, दि. 18 : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी मुंबई शहरास बाल कामगार बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त करण्याबाबत अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘मुंबई आमची बाल मित्रांची’ या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते झाले.
प्रतिकुल परिस्थितीमध्ये, असुरक्षित, हरवलेली आणि सापडलेली अशा मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मुंबई येथे मैत्रीपूर्ण ठिकाणे या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मुंबई शहराला अशा मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाण बनविणे आहे, असे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले.
ही मोहीम बाल कामगार, बालकांचे लैंगिक शोषण, भीक मागणे, असुरक्षित हरवलेली आणि सापडलेल्या मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामाची व्याप्ती वाढविणे यावर आधारित असल्याचे श्री.निवतकर यांनी सांगितले.
या अभियानाद्वारे मुंबई येथील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, हाजी अली, सिध्दी विनायक मंदिर, सार्वजनिक उद्यान, रेल्वे स्टेशन, रस्ते त्या त्या विभागामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी अशी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविण्यात येतील जेथे त्यांचे आरोग्य, शिक्षण, पौष्टिक आहार, समुपदेशन यांची सर्वांगीण काळजी घेण्यात येईल, तसेच हरवलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेवून त्यांना पुन्हा पालकांच्या ताब्यात देवून पुनर्वसन करण्यात येईल. अशा प्रकारे बालकांच्या सर्व हक्काचे संवर्धन करण्याचे प्रयोजन आहे, असे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी सांगितले.
या अभियानाअंतर्गत पुढील सहा महिन्यात सोशल मीडियाव्दारे याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्य शिबीर घेणे, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे येथे बचावकार्य राबविणे, सामान्य लोकांच्या माहितीसाठी बूथ उभारणे, कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांसह बाल कल्याण समिती, पोलीस, वॉर्ड समित्या, नगरसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण घेणे यांचा सामावेश आहे.
मुंबईमध्ये अशा प्रकारच्या मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या कामामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई शहर, समाज सेवा शाखा, मुंबई पोलीस, बाल आशा ट्रस्ट, आय.जी.एम. प्रेरणा, विधायक भारती, प्रथम, चाईल्ड लाईन इ. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ही मोहिम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर, श्रीमती प्रेमा घाटगे यांच्या अधिपत्याखाली सर्व संबंधित शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्था यांचे समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात
ReplyDeleteपर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांची मुलाखत
मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'पर्यटनातून रोजगारवृद्धी' या विषयावर पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या अॅपवरून बुधवार दि.17, गुरुवार दि. 18 व शुक्रवार दि. 19 मार्च 2021 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात पर्यटन वाढीसाठी सुरु करण्यात आलेली गाईड योजना, या योजनेचा विस्तार, राज्यात कृषी पर्यटनासंदर्भात घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय, कॅरा व्हॅन धोरण, साहसी पर्यटन धोरण, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, पर्यटन महोत्सव यातून होणारी रोजगार वाढ, आंतर जिल्हा पर्यटन वाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न, सत्तरवरून दहावर आणण्यात आलेले आदरतिथ्य क्षेत्रासाठीचे परवाने, बीच शॅक धोरण त्यातून होणारी रोजगार निर्मिती, होम-स्टे याबाबत डॉ.धनंजय सावळकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये
ReplyDelete50 टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश
मुंबई, दि. 19 : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
सामाजिक अंतर राखणे सोईस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
००००
*सुंदर* :-
ReplyDelete*(ज्यांनी लिहली त्यांना अभिवादन*..👌👌)
*रोज नामस्मरण*
*केल्यावाचून राहू नकोस*,
*गुरु पाहताहेत तुला,*
*नामस्मरण मात्र विसरु नकोस.*...
*तुझ्या वाटेत आडवे खूप येतील*...
*पायात पाय घालून* *पाडतील*....
*त्यांना घाबरून तुझं*
*उभं राहणं सोडू नकोस*..
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु* *नकोस*....
*तुझं कौतुक प्रत्येकाला इथं*
*रुचेलच असं नाही*...
*कौतुकासाठी तुझं नांव*
*सूचेलच असं नाही*...
*तू मात्र इतरांचं कौतुक*
*करण्यास कचरु नकोस*...
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
*तुलासुद्धा मन आहे*
*हे माहीत आहे मला*.....
*पण परमेश्वर हृदयात *असताना काय रे कमी तुला*....
*इतरांना भरभरून देणं मात्र*
*कधी सोडू नकोस* ...
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
*रडावंसं वाटतं तेव्हां*
*रडून तू मोकळा हो*...
*कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां*,
*लढून तू मोकळा हो*....
*रडण्यामध्ये मात्र तुझे*
*कार्य विसरू नकोस*
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
*तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे*
*द्यायची गरज नाही...*
*कुणासाठी तुला कार्य*
*सोडायची गरज नाही*....
*गुरु संकल्पासाठी पुढे*
*चालणं तू सोडू नकोस*.......
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....*🙏
🙏🏻|| शरीरी वसे रामायण ||
ReplyDeleteजाणतो ना कांही आपण
शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||
आत्मा म्हणजे रामच केवळ,
मन म्हणजे हो सीता निर्मळ !
जागरुकता हा तर लक्ष्मण,
शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||
श्वास, प्राण हा मारुतराया,
फिरतो जगवित आपुली काया |
या आत्म्याचे करीतो रक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||
नील जाम्बुवंत रक्त नसा या,
फिरती शोधत जनक तनया
गर्वच म्हणजे असतो रावण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||
रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,
भाव भावना त्यातील वावर
मोहांधता करी आरोग्य भक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||
नखें केंस त्वचा शरीरावरती,
शरीर नगरीचे रक्षण करती
बंधु खरे हे करती राखण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||
क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,
शांत असता घोरत पडतो
डिवचताच त्या करी रणक्रंदन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||
गर्वे हरले सौख्य मनाचे
कांसाविस हो जीवन आमुचे
संकटी येई शरीर एकवटून
शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||
मनन करता भगवंताचे,
रक्षण होईल आरोग्याचे
राम जपाचे अखंड चिंतन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||
|| रामर्पणमस्तु ||🙏🏻share by prateema vadke
१०, १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईनच
ReplyDelete- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड
· परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून मध्ये विशेष परीक्षा
· कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही
· लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ
मुंबई दि. २०: विद्यार्थ्याची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती गायकवाड पुढे म्हणाल्या, इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा या पूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये तर इ. १२ वी ची परीक्षा दि.२३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
विशेष परीक्षा
एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.
लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ
दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परिक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.
प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी गृहपाठ
इ. १० वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात परंतु या वर्षी कोविड-१९ परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने २१ मे ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करावे लागणार आहे. इ. १२ वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
विशिष्ट परिस्थितीत गृहपाठ सादर करण्यासाठी मुदतवाढ
कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर १५ दिवसात गृहपाठ सादर करावेत. इ.१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा गृहपाठ सादर करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील, अशी माहिती श्रीमती गायकवाड यांनी दिली.
कोविड-१९ बाबत सुरक्षात्मक उपाययोजना
परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबींसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. कोविड-१९ बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि भौगोलीत परिस्थितीचा विचार करुन या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.परीक्षार्थी परीक्षेपासून कोणताही वंचित राहणार नाही याची राज्य शासनाने दक्षता घेतली आहे. परीक्षांबाबत अनेक वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होताना आढळून येत आहे. त्यामुळे घाबरुन न जाता विद्यार्थी आणि पालकांनी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजावी, असे आवाहनही श्रीमती गायकवाड यांनी यावेळी केले
*Only for senior citizens*
ReplyDeleteHere is a little neurological test:
Only use your eyes!
1- Find the C in the table below! without using finger as pointer.
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOCOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
2- If you have already found the C,
Then find the 6 in the table below.
999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999969999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999
3- Now find the N in the table below.
Attention, it's a little more difficult!
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMNMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
If you pass these three tests without problem:
- you can cancel your annual visit to the neurologist.
- your brain is in perfect shape!
- you are far from having any relationship with Alzheimer's.
So, share this with your over-60 friends, it can reassure them.
🙏🌹🙏🌹🤝🤝🌹🙏🌹🙏
राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजीटल मार्केटींग आणि कृत्रीम बुद्धीमत्तेचे प्रशिक्षण
ReplyDeleteकौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
· एचडीएफसी बँक आणि फ्यूएल संस्थेचा पुढाकार
मुंबई, दि. २२ : एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील १ हजार ८०० तरुणांना कृत्रीम बुद्धीमत्ता (आर्टीफिशीयल इंटेलिजन्स) आणि डिजीटल मार्केटींगचे ट्रेनिंग आणि करिअर समुपदेशन देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मंत्रालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
एचडीएफसी बँकेने महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्यूचर स्किल्स इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. बँकेच्या सीएसआर निधीमधून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी फ्यूएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझींग लाइव्ह्ज) ही स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, प्रशिक्षण आणि जॉब प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन करणार आहे.
या उपक्रमाद्वारे एचडीएफसी बँक महाराष्ट्रातील १ हजार ८०० पेक्षा जास्त तरुणांना करिअरविषयक सल्ला व कौशल्य प्रशिक्षण देईल. शिवाय या तरुणांना प्रशिक्षणानंतर आयटी/आयटीईएस क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधण्यास मदत करेल. प्रशिक्षणासाठी पात्र तरुण http://bit.ly/maharashtraregistration येथे नोंदणी आणि अर्ज करू शकतात. हे प्रशिक्षण एकुण सुमारे २०० तासांचे असेल. प्रशिक्षण पुणे येथे ऑफलाईन पद्धतीने तर इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने होईल.
कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक यावेळी म्हणाले की, एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तरुणांना फक्त कौशल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना रोजगारही मिळणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचे संकट असतानाही रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल यासह विभागाच्या विविध उपक्रमांमधून राज्यात १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे. यापुढील काळातही असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. यासाठी सीएसआरमधूनही मोठे सहकार्य मिळत असून एचडीएफसीसारख्या विविध संस्था सहकार्य करीत आहेत. सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे ते म्हणाले.
एचडीएफसी बँकेच्या सीएसआर प्रकल्प प्रमुख नुसरत पठाण म्हणाल्या की, एक सामाजिक जबाबदार कॉर्पोरेट संस्था म्हणून राज्यातील तरुणांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक तरुणांना नोकरीस तयार करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. यामुळे तरुणांच्या रोजगाराची क्षमता वाढेल. त्यांना अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी मिळू शकतील. तरुणांसाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त तरुणांना त्यांच्या पायावर ऊभे करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
फ्यूएलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केतन देशपांडे म्हणाले की, गरजू तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी एचडीएफसी बँकेबरोबर झालेल्या भागीदारीबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. भविष्यात अशा आणखी संधींसाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रशिक्षणाचा हा उपक्रम आम्ही प्रभावीपणे राबवू, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास एचडीएफसी बँकेच्या सीएसआर प्रकल्प प्रमुख नुसरत पठाण, फ्यूएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझींग लाइव्ह्ज) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन देशपांडे, एचडीएफसी बँकेच्या सीएसआर टीमचे रितेश सिन्हा, राजा उपाध्याय, फ्यूएलचे चीफ मेंटॉर संतोश हुरळीकोप्पी, हेड (नॉर्थ) बाजीप्रभू देशपांडे, मास्टर ट्रेनर अबोली मिश्रा आदी मान्यवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते.
🏵️🪔🏵️🪔🏵️🙏🏵️🪔🏵️🪔🏵️
ReplyDelete*कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?*
*एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- " कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल ?*
*या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला," कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.*
*असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.*
*सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.*
*जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.*
*या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.*
*भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.*
*एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.*
*चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.*
*पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.*
*हे पाहून भीम चक्रावून गेला.*
*नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.*
*जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.*
*पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.*
*खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.*
*तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.*
*हे पाहून नकूल गोंधळून गेला.*
*सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.*
*ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.*
*यावेळी सहदेवही चकीत झाला.*
*या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.*
*श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.*
*" कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.*
*कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.*
*श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.*
*कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.*
*कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."*
*" कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या. "*
*🏵️जय श्रीकृष्ण🏵️*
🏵️🔔🏵️🔔🏵️🙏🏵️🔔🏵️🔔🏵️
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परिक्षा मार्गदर्शन
ReplyDeleteमुंबई, दि. 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या दरम्यान यु टयुब चॅनलवर “Barti Online” व्दारे एम. पी. एस. सी. पूर्व परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणा दरम्यान एमपीएससी पूर्व परीक्षेतील विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले होते.
18 मार्च 2021 पासून एमपीएससी मुख्य (Mains) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गामध्ये एमपीएससी मुख्य परीक्षेस आवश्यक उर्वरित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. तरी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी, पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई- बार्टी ॲपमधील M-governance अंर्तगत ऑनलाईन “एमपीएससी मुख्य (Mains) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज” या लिंकवर उपलब्ध आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 4 महिन्यांचा (जुलै 2021 पर्यंत) असेल व आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी कमी किंवा अधिक करण्यात येईल. मार्गदर्शन वर्ग सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 ते 4 या वेळेत आयोजित केले जातील. तसेच शनिवार, रविवार व शासकिय सुटयांच्या दिवशी बंद राहतील. सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे फेसबुक पेज व बार्टीच्या “Barti Online” या यु टयुब चॅनल वरुन लाईव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येत आहे, असे बार्टीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
०००००
छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
ReplyDeleteमुंबई, दि. 26 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी 31 मार्च, 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’निमित्ताने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या दिवशी अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
तसेच दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
वरील प्रमाणे नियमांचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 2013 ची प्रभावीपणे
ReplyDeleteअंमलबजावणी करण्याचे निर्देश
मुंबई, दि. 26 : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा, 2013च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी, तसेच सामाजिक न्याय व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 लागू आहे.
कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरुपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमाच्या तरतूदीचे उल्लंघन करुन नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केले तर तो या अधिनियमाच्या तरतूदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षेस पात्र असेल अशी तरतूद यामध्ये आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.
या अधिनियमाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी प्रभावीपणे करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
000
होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण
ReplyDeleteसाधेपणाने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना
मुंबई, दि. 26 : कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे यावर्षी ‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमी चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
होळी/शिमगा सणाच्या निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदीरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.
कोविड-19 च्या विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
००००
राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
ReplyDeleteरुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
मुंबई दि. 26 : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारपासून (दि. 28 मार्च 2021) रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही श्री.ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.
लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण...
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
धोका टळला नाही उलट वाढला
ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
Continue-कडक निर्बंधांचे संकेत
ReplyDeleteजनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
लसीकरणाचा वेग वाढवा
लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोधोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे
याचीही काळजी घ्या
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्निसुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडसची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी- अमित देशमुख
गावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्या संख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यात 52 लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
महिला वन परिक्षेत्र अधिकारी आत्महत्या प्रकरणी
ReplyDeleteजबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
· विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश
मुंबई, दि. 26 : हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालून दि. 25 मार्च, 2021 रोजी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदराचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबन करण्यात यावे, अशी मागणी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्याचबरोबर या आत्महत्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री ॲड. ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करा
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून जर कोठे या समित्या कार्यान्वित नसल्यास त्या तातडीने पंधरा दिवसांच्या आत कार्यान्वित कराव्यात तसेच या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधावा
लैंगिक, मानसिक छळाची समस्या असल्यास महिलांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.
०००००
मुद्रांक शुल्कात 31 मार्च पर्यंत सवलत;
ReplyDeleteपरंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा
मुंबई, दि. 26 : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपटटयाच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेवून हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.
दि.01 जानेवारी 2021 पासून 31 मार्च 2021 पर्यंत संपुर्ण राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर 5 टक्क्यांवरुन 3 टक्के करण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दि.31 मार्च 2021 किंवा त्यापुर्वी मुद्रांक शुल्क भरावे व दस्तामधील पक्षकारांनी त्यावर स्वाक्षरी पुर्ण करावी; जेणेकरुन नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील चार महिन्यात पक्षकारांना आपला दस्त नोंदता येईल.
शासनाने दि.01 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत संपुर्ण राज्यासाठी मुद्रांक शुल्कात सुट देऊन देय 5 टक्के ऐवजी 2 टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी लागु केली. त्याचप्रमाणे दि. 01 जानेवारी 2021 पासून 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काचा दर 3 टक्के लागु राहणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त्ा नोंदणीकरिता गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता, या सवलतीचा लाभ घेण्याकरिता मार्च 2021 अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
0000
गुड फ्रायडे व ईस्टर सण्डे सण साधेपणाने साजरा करावा
ReplyDeleteमुंबई, दि. 26 : ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस यावर्षी 2 एप्रिल 2021 रोजी तसेच ईस्टर सन्डे 4 एप्रिल 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते. कोविड- 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सर्वधर्मीय सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड- 19 चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता 28 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 या होली वीक दरम्यान येणारा "गुड फ्रायडे व ईस्टर सण्डे" हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
शासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत :-
28 मार्च ते 4 एप्रिल, 2021 या दरम्यान होली वीक' मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे. मोठे चर्च असल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा कमी असल्यास तिथे 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थनासभेचे आयोजन करावे. जेणेकरुन चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी न होता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील. आवश्यकतेनुसार 4 ते 5 खास प्रार्थना सभांचे (Multiple Masses) आयोजन करावे.
ख्रिश्चन धर्मीय भावीक लोक हे प्रार्थना सभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चर्चमध्ये निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉटसअॅप, फेसबुक, युट्यूब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रसारीत करावे.
चर्चच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.
कोव्हिड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0000
‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण
ReplyDeleteसाधेपणाने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना
मुंबई, दि. 26 : कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे यावर्षी ‘होळी, धूलिवंदन व रंगपंचमी चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
होळी/शिमगा सणाच्या निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदीरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.
कोविड-19 च्या विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काँग्रेसने ओबीसी आरक्षण कट रचून कमी केले - डॉ. परिणय फुके यांचा गंभीर आरोप
ReplyDelete४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. याबाबतची याचिका कांग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या मतदार संघातील कांग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य व भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री. रमेश डोंगरे यांनी केली होती, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
डॉ. फुके यांनी म्हटले आहे की, एकीकडे ओबीसीच्या नावाखाली मते घ्यायची, मोर्चे काढायचे, आंदोलनं करायची लोकांना सांगायचे की, ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही. तर दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही. हा काँग्रेस पक्षाचा ढोंगीपणा आहे. ओबीसी मंत्रालय काँग्रेसकडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गप्प का होते? काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर, हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे? असा सवालही डॉ. फुके यांनी विचारला आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महविकास आघाडी सरकार ओबीसीसाठी आयोग स्थापन करत नाही. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे असे या सरकारलाच वाटत नाही ही वस्तुस्थिती असून यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. ओबीसी समाज काँग्रेसला आणि या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
आशुतोष खरात- 8097751977
आपणांस कळवण्यात येते की तुमचे आधार तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे आणि आम्ही ते इनकम टॅक्स च्या पोर्टल सोबत तपासून बघितले आहे.आपण आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले तर ३१मार्च २०२१ च्या आधी करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल .
ReplyDeleteआधार-पॅन लिंक आहे का तपासण्यासाठी खालील लिंक १ चा वापर करा व आधार-पॅन लिंक नसेल तर लिंक २ चा वापर करून लवकरात लवकर लिंक करून घ्या.
लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html
लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
विशाखा समितीच्या प्रभावी
ReplyDeleteअंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार
- महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर
मुंबई, दि. ३१ : राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत सांगितले.
कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद तसेच सामान्य प्रशासन, उद्योग, उर्जा,सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तक्रारींची चौकीशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा व त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात.
याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करुन त्यांनी तो अहवाल महिला व बालविकास विभागास प्रत्येक वर्षाच्या ३० एप्रिलपूर्वी सादर करावा अशी तरतूद नियमानुसार असून याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार करावी, असे निर्देशही ॲङ ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत विशाखा समिती नेमणे अनिवार्य आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयात विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलावी, तसेच अमंलबजावणी करिता टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा असे निर्देश यावेळी ॲङ ठाकूर यांनी दिले.
000
500 रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी
ReplyDelete- आरोग्यमंत्री राजेश टोपे
· खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी
मुंबई दि. 31 : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
यापूर्वी राज्यशासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.
या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे.
वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या
ReplyDelete- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई, दि.6 : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवुन व देयके भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केले आहे.
मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले.
ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीपण जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कोरोना काळात रिडींग न घेता बिले पाठविल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणुन शक्यतो मीटर रिडींग घेऊन वीज बिले पाठविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडींग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रिडींग पाठविले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यात विजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्सचेंजमधून दररोज साधारणतः 1100 ते 1800 मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्सचेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ग्राहकांची सेवा हेच महावितरणचे ब्रीद असून ग्राहक महावितरणचे दैवत आहे. कोरोना काळात महावितरणचे कर्मचारी हे ग्राहकांना अव्याहत सेवा देत आहेत. थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही. महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
0000
आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या
ReplyDeleteपदभरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात 14 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांमध्ये एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार असून याकरिता 30 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या 25 शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी च्या वर्गात साधारण 6000 पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात या एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल शाळेमध्ये प्राचार्य (16), उप-प्राचार्य (08), टी.जी.टी. (इंग्रजी, फिजिक्स, गणित, अर्थशास्त्र, बायोलॉजी, कॉमर्स)(28) आणि पी.जी.टी (इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र) (164) अशा एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार आहे. या पदांसाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment या संकेतस्थळावर करावे. पदभरतीकरीता होणारी परीक्षा ही तीन तासांची असून ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जून 2021 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तसेच ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत संगणकावर घेण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000
शासकीय नोकरीत
ReplyDeleteदिव्यांगांसाठी 4 टक्के आरक्षण
- राज्यमंत्री दिलीप कांबळे
मुंबई, दि. 30 : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या दिव्यांगांना सरकारी नोकर भरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कालच (बुधवार दि.29 मे 2019) त्या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे अशी माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. या निर्णयामुळे अंध/अल्पदृष्टी, कर्णबधीरता, अस्थिव्यंग, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायू विकृती, स्वमग्नता, मंदबुध्दी, मानसिक आजार अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत.
श्री. कांबळे पुढे म्हणाले, दिव्यांगाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. दिव्यांग व्यक्तींसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील प्रत्येक संवर्गासाठी दिव्यांग व्यक्ती सरळ सेवा भरतीच्या पदासाठी 100 बिंदू नामावलीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या वर्षी दिव्यांग उमेदवार न मिळाल्यास त्या जागेचा अनुशेष पुढील वर्षीच्या नोकर भरतीत ठेवावा असाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री. कांबळे यांनी शेवटी दिली.
००००
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
ReplyDeleteपरिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील
मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यसचिवांनी दिली.
बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे
ReplyDeleteमुंबई, दि. 9 : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.
१. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?
४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील
२. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?
ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.
३. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?
कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे
४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?
बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील
५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?
वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?
नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.
७. नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?
हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.
८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?
नाही.
९. रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?
हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.
१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?
नाही.
११.दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?
नाही.
१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ?
हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.
१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?
आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.
--
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
ReplyDelete15 एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे
मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
मुंबई, दि.६: मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९ . २०१९-२० व २०२०-२१ या तीन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणा-या संस्थांकडून अर्ज १५ एप्रिल २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ या तीन वर्षाकरिता प्रत्येकी १ युवक, १ युवती आणि १ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०३ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
(अ) युवक/युवती पुरस्कार
(१) पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थीचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.
(२) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्यास असला पाहिजे.
(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत. (गत तीन वर्षाच्या १ जून ते ३१ मे या कालावधीतील कार्याबाबतच्या माहितीसह सादर करावेत.)
(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार
(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.
(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी.
(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत.
वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढविली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दि. १५ एप्रिल, २०२१ पर्यंत सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुलीरोड, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२ - २८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर
ReplyDeleteशनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय
मुंबई, दि. 9 :- राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच शनिवार
दि. 10 एप्रिल पासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल.
आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे.
या आदेशानुसार, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव राज्य शासनाला ‘ब्रेक द चेन’ घोषित करून काही निर्बंध लावावे लागले. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली. आता यात सुधारणा करण्यात आली असून दि. 10 एप्रिलपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येईल.
यामध्ये सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवे मधील कर्मचारी, परीक्षा कार्यातील सगळे कर्मचारी व अधिकारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, खाद्य विक्री करणारे लोक, इतर कर्मचारी कथा कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्स मधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी आदींचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी सेवा केंद्र, सेतू केंद्र, पारपत्र सेवा केंद्र आणि एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेवा यांना सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत कार्यालये उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर वृत्तपत्रांत बाबतीत जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात आता वृत्तपत्रांबरोबरच नियतकालिका, पत्रिका व इतर प्रकाशनांचा ही समावेश करण्यात आला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचे समाजमाध्यमांवरील ‘ते’ परिपत्रक खोटे!
ReplyDeleteपूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येणार
सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. ९ – सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला संदेश आणि परिपत्रक खोटे असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी केले आहे.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलली आहे, अशा आशयाचे कार्यालयीन परिपत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले परिपत्रक हे खोटे आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा विहित वेळेनुसारच घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठात्यांनी कळविले आहे.
०००
मुख्यमंत्री श्री ठाकरे ने राज्य के निजी अस्पतालों के संचालकों से किया संवाद
ReplyDeleteमहाराष्ट्र एक होता है तब वो जीतता है, कोरोना के खिलाफ एक होकर उसे भी हराएंगे
निजी अस्पतालों के संचालक, डॉक्टर्स को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का आवाहन
मुंबई, दि. 9 : कोरोना टेस्टिंग, टीकाकरण, सुविधाएं निर्माण करने में और दर्जेदार सेवा देने में महाराष्ट्र राज्य नंबर एक पर है. महाराष्ट्र एक होता है तब वो जीतता है, कोरोना के खिलाफ भी एक होकर उसे भी हराएंगे, ऐसा आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज राज्य के सभी निजी अस्पतालों के संचालक, विशेषज्ञ डॉक्टर्स को किया.
कोरोना के बढ़ते हुए मरीजों की संख्या की पार्श्वभूमिपर मुख्यमंत्री ने आज राज्य के नामचीन निजी अस्पतालों के संचालकों और विशेषज्ञों के साथ व्हिडीओ कॉन्फ्रेंस के जरिए संवाद किया. इस समय स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री के अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई महापालिका के आयुक्त आय.एस. चहल, स्वास्थ्य विभाग के प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुंबई महापालिका के अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, धर्मदाय आयुक्त चौरे, टास्क फोर्स के प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत उपस्थित थे.
अब कोरोना ने विकराल रूप धारण किया है
मुख्यमंत्री श्री ठाकरे ने कहा कि कोरोना के साथ पिछले साल युद्ध अभी भी जारी है. आप दिन-रात मरीजों की सेवा कर रहे हैं, ठीक उसी तरह जैसे वास्तविक युद्ध लड़ रहे सैनिक करते हैं. बीच में कोरोना मरीजों की संख्या में नियंत्रण आ रहा था लेकिन शिथिलता आई और कोरोनाने विकराल रूप धारण कर लिया है. इस वजह से अब स्थिति गंभीर बनी है, ऐसा उन्होंने कहा.
जम्बो कोविड सेंटर्स को गोद लें निजी अस्पताल
कोरोना के इस कठिन काल में निजी अस्पतालों द्वारा अपनी सुविधाएं बढ़ाकर मरीजों को राहत दें. सरकार की ओर से जम्बो कोविड सेंटर्स निर्माण किए है, उसमें से कुछ कोविड सेंटर्स को निजी अस्पतालों द्वारा गोद में ले, ऐसा आवाहन मुख्यमंत्री ने किया. उन्होंने कहा कि, इन सेंटर्स में निजी अस्पतालों के डॉक्टरों के राऊंड बढ़ने पर उपचार में मदद होगी और लोगों के मन इन सेंटर्स के बारे में जो भावनाएं है वो दूर होने में उपयोग होगा, ऐसा मुख्यमंत्री ने कहा.
महाराष्ट्र एक होने के बाद जीतता है. यह एकजूट सभी स्तरों पर आने के बाद कोरोना को हराना है और इसमें आप महत्वपूर्ण पूल है, ऐसा मुख्यमंत्री ने कहा.
प्रत्येक जिले में डॅशबोर्ड तैयार हो – राजेश टोपे
स्वास्थ्य मंत्री श्री. टोपे ने कहा कि, कोरोना के उपचार में निजी अस्पतालों का योगदान बहुत बड़ा है. वर्तमान स्थिति को मिशन मोड पर काम करने की आवश्यकता है. राज्य सरकार ने निजी अस्पतालों में 80 प्रतिशत से अधिक बेड अपने कब्जे में लिए हैं और अतिरिक्त बेड उपलब्ध कराए जाने चाहिए. जिला अस्पताल में बेड्स की संख्या में वृद्धि करते समय प्रत्येक जिले में एक डैशबोर्ड होना चाहिए और इसके माध्यम से बेड्स की उपलब्धता देखी जानी चाहिए. निजी अस्पतालों को सावधानी के साथ रेमेडेसिविर का उपयोग करना चाहिए. लक्षणों के बिना मरिजों को रेमेडेसिविर नहीं दिया जाना चाहिए, ऐसा आवाहन स्वास्थ्य मंत्री ने किया. राज्य सरकार द्वारा कोरोना टेस्टिंग और उपचार दरों पर नियंत्रण लाए है, उनका पालन करने की आवश्यकता है. बिना लक्षण के मरीजों के उपचार खर्चो में वृद्धि न हो, इसका ध्यान निजी अस्पताल लें. छोटे शहरों के लिए ई-आईसीयू उपयोगी साबित होगा और इसके उपयोग को बढ़ाने की आवश्यकता है, ऐसा टोपे ने कहा. Continue
सेवानिवृत्त डॉक्टर्स, नर्सेस को कुछ समय के लिए को फिर से सेवा में ले – अमित देशमुख
ReplyDeleteवैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख ने कहा कि, उपचार की सुविधा बढाने श्रमशक्ति की कमी पूरी करने के लिए जो डॉक्टर्स, नर्स सेवा से निवृत्त हुए है. उन्हें अगले तीन से छह महीनों के लिए सेवा में लेने के संदर्भ प्रयास करें, जिससे अनुभवी श्रम शक्ति उपलब्ध होगी. निजी अस्पतालों को इस अवधि के दौरान आईसीयू बेड और ऑक्सीजन बेड का विस्तार करना चाहिए. राज्य में 20 से 25 मेडिकल कॉलेज के अस्पताल हैं. वहां पर जहां भी संभव हो वहां वेंटिलेटर और ऑक्सीजन बेड का विस्तार तुरंत किया जाना चाहिए, ऐसा श्री देशमुख ने कहा.
क्षेत्र के विशेषज्ञों को यह अध्ययन करना चाहिए कि दूसरी लहर कितने समय तक चलेगी ताकि इसका उपयोग उपाययोजनाओं के लिए किया जा सके. छोटे जिलों के निजी अस्पतालों के रेट्स भी नियंत्रण में होने चाहिए. महानगर और छोटे जिलों के निजी अस्पतालों में रेट्स अलग-अलग होने चाहिए, ऐसा श्री देशमुख ने कहा. टास्क फोर्स के उपचार प्रोटोकॉल को निजी अस्पताल के डॉक्टरों द्वारा लागू किया जाना चाहिए ताकि दवाओं की कमी न हो, ऐसा भी उन्होंने कहा.
इस डॉ. व्यास, श्री. चहल ने भी मनोगत व्यक्त किया. इस समय ब्रीच कँडी हॉस्पिटल की गीता कोप्पीकर, अश्विनी हॉस्पिटल के डॉ. राजेंद्र, पुणे के रुबी हॉल क्लिनीक डॉ. पी. के. ग्रांट, नागपूर केअर हॉस्पिटल डॉ. रवि मनाडे, औरंगाबाद के एमजीएम हॉस्पिटल के डॉ. प्रवीण सुर्यवंशी, ठाणे डॉ. संतोष कदम, डॉ. बिचू, डॉ. गौतम भन्साली, डॉ. हिमांशू गुप्ता, निर्मल जैस्वाल, डॉ. सुजित चटर्जी, राजन बोरकर, डॉ. ऋषीकेश वैद्य, अविनाश सुपे, डॉ. रविंद्र मोहन, महेश नार्वेकर, संतोष घाग, अमित सोमानी, निर्मल तापरिया, भाटिया रुग्णालय, नानावटी, कमल नयन बजाज, दिनानाथ मंगेशकर अस्पताल के प्रतिनिधि उपस्थित थे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध
ReplyDelete- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची व्यक्त केली गरज
आम्ही राज्य शासनाच्या पाठीशी - डायमंड असोसिएशन ने दिली ग्वाही
मुंबई दि. 9 : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह डायमंड असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री. कोलिन शहा, सुरेंद्र दासानी, अनुप मेहता, मेहूल शहा, रमणिक शहा, राहूल ढोलकिया, किरीट बन्साली रसेल मेहता, अरूण शहा, सब्यास्याची रे, चिराग लाखी, अरविंद संघवी, दिनेश लखानी, संजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल डायमंड असोसिएशनला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, संकटाची चिंता नाही पण या संकटाला सामोरे जातांना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करतांना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे, ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट ड्युट्या लावल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी, त्यांचे टेस्टींग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कडक निर्बंध गरजेचे
ReplyDeleteराज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतू कोरोनाचा नवा विषाणु असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ७५ ते ८० टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना त्रासही होत नाही परंतू ते इतरांना बाधित करू शकतात, कोरोनाचा प्रसार करू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचाही शासन गांभीर्याने विचार करील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी देण्याची तयारी दाखवली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना निर्गमित होताच राज्यात अशाप्रकारे लसीकरण सुरु करता येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
डायमंड असोसिएशनच्या विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. मुख्य सचिवांनी सुरुवातील राज्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे ते म्हणाले. राज्यात आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या परंतू त्याही कमी पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कडक निर्बंध लावावे लागल्याचे ते म्हणाले.
डायमंड इंडस्ट्री शासनासोबत
डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने उत्पादनक्षेत्रातील कंपन्या सुरु ठेवल्याबद्दल धन्यवाद देऊन म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य शासन कोरोना प्रतिबंधाचे काम चांगल्या प्रकारे करत आहे. संपूर्ण डायमंड इंडस्ट्री शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगतांना त्यांनी या उद्योगक्षेत्राला शासनाने अपेक्षेपेक्षा अधिक आणि विनाविलंब मदत केल्याबद्दल धन्यवादही दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकान सुरु करण्याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चा निर्णय
ReplyDeleteब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. मा. मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून २ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चर तर्फे आज दि. ८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ६ वाजता "ब्रेक द चेन व व्यापार बंद" या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची झूम ॲपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली.
सुरुवातीला चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी सर्वांचे स्वागत करून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे २ दिवस वाट बघावी असे सांगितले आहे. याबाबत आपण सर्वांनी मते मांडावी असे सांगितले.
बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून गेल्या ४ दिवस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत तसेच सरकारशी संपर्क करून आहोत. सर्वांच्या भुमीका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा आढावा घेतला व सर्वांनी आजच्या बैठकीत आपल्या संघटनेची भूमिका मांडावी असे सांगितले.
बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी,उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमन श्री. संजय दादलीका, पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी,, चेंबर ऑफ मराठवाडा, इंडस्ट्रीज अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. कमलेश धूत , पूना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष श्री. पोपटलाल ओस्तवाल, चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन संघवी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. अश्विन मेहाडिया, चंद्रपूर जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रामजीवन परमार, नाशिक घाऊक व्यापारी किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, हार्डवेअर अँन्ड पेन्ट्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार लोढा, येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. योगेश सोनवणे, श्री. मोहन गुरुनानी, नाशिक मोटार मर्चन्ट असोसिएशनचे श्री. कैलाश चावला, श्री. हर्षवर्धन संघवी, सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, श्री. सुरेश पाटील, सांगली, संगमनेर असोसिएशनचे श्री. ओंकारनाथ भंडारी, टिम्बर फेडरेशन, जळगाव व्यापारी महासंघ, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, स्टील चेंबर, सिमेंट स्टोकिस्ट असोसिएशन, तुर्भे व्यापारी असोसिएशन, पालघर वसई तारापूर असोसिएशन, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, व्हीटीपी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल शहा चिपळूण इंडस्ट्री असोसिएशन अध्यक्ष अविनाश अशोक, अंबरनाथ असोसिएशनच्या पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सरकारच्या ब्रेक द चेन विषयावर सरकारच्या निर्णयाची २ दिवस वाट बघावी असे मत मांडली.
शेवटी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीस कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात, श्री. अजित सुराणा, प्रवीण पगारिया, मुस्ताक शेख, महाराष्ट्र चेंबर प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता आदीसह ३०० व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक असल्याने गर्दी टाळणारे निर्बंध घातले
ReplyDeleteशासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· निर्बंधांविषयी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे
· मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई, दि. 7 : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनाही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही केले.
राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता continue.
व्यापाऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे - संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसऱा हल्लाही आपल्यावर झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणे जाणेही मुंबईत मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापुर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते. खरेतर, दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापुर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केली होती. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे.
ReplyDeleteमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुमच्या सूचनांचा स्वीकार केला, तर कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड-चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या येता-जातानाची काळजी घ्या. यात एकमेकाची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. नक्कीच या संकटातून बाहेर पडू. पण गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. कोरोना पूर्ण जात नाही. तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत. शांतपणे, कुठलाही धोका न पत्करता कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा विचार करू. सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले. या सर्वांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या हातात-हात घालून काम करू. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापाऱ्यांचे काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमही काटेकोर पालन होईल, अश्या उपाययोजना करण्याची मागणी करतानाच, ब्रेक दि चेनला सहकार्य करू असे सांगितले. यावेळी दिपेन अग्रवाल, जयकृष्ण पाठक, रसेश दोशी, महेश बखाई, निमित शहा, मितेश मोदी, धीरज कोठारी, राजेश शहा, राजेंद्र बठिया, धैर्यशील पाटील, दिलीप कुंभोजकर, संतोष मंडलेचा, वालचंद संचेती आदी उपस्थित होते.
मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी प्रास्ताविक केले व राज्यातील कोरोना नियमावलीच्या अनुषंगाने माहिती दिली.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. व्यास म्हणाले, फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर 2020 मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस बारा लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते.
टास्क फोर्सचे डॉ. जोशी म्हणाले, राज्यात गंभीर परिस्थिती असून विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरूण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखी दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील
एकही पीडित महिला न्यायापासून वंचित राहू नये
ReplyDeleteयासाठी अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा
- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 7: महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत कराव्यात. चुकीचे काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता कामा नये तसेच कोणीही पीडित महिला न्यायापासून वंचित राहू नये, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
महिला व बालविकास मंत्री मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन अंतर्गत तक्रार निवारण समित्यांच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यावेळी उपस्थित होत्या.
विभागनिहाय किती समित्या स्थापन झाल्या याची माहिती घेऊन उर्वरित समित्या 10 दिवसाच्या आत स्थापन कराव्यात असे निर्देश देऊन ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, विभागीय आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून अधिनस्त सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची कार्यवाही गतीने होईल याची दक्षता घ्यावी. तसेच स्थापन झालेल्या परंतु, कार्यान्वित नसलेल्या समित्या पुनरुज्जीवित कराव्यात. समित्यांच्या अध्यक्षांचे संपर्क क्रमांकासह समित्यांची यादी सचिव कार्यालयाला पाठवावी. ही माहिती वेबपोर्टल तयार करण्यासाठी उपयोगात आणली जाणार असून संकटग्रस्त महिला अधिकारी, कर्मचारी यावर संपर्क साधून मदत मिळवू शकतील.
अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करून त्याबाबतच्या माहितीचे फलक सर्व संबंधित कार्यालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. समितीमधील समाविष्ट सर्व घटकांचे प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील. तसेच जाणीव जागृती साहित्य तयार करून वितरण करावे, प्रसिद्धी करावी. 'शी बॉक्स'मध्ये (She box) प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे सनियंत्रण योग्यरीत्या होण्यासाठी त्याचे युजर आयडी, पासवर्ड जिल्हाधिकाऱ्यांनाही द्यावेत.
कामगार विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाला सोबत घेऊन याबाबतच्या कार्यवाहीला गती द्यावी. अशासकीय संस्थांनाही या कायद्यांतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करणे बंधनकारक असून त्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. ज्या ठिकाणी खोट्या तक्रारी होतील त्याची शहानिशा करून कोणावरही अन्याय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असेही मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
0000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करावे
ReplyDeleteकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
मुंबई, दि. 7 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल या जयंतीदिनी अभिवादन करावे, असे आवाहन केद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात यावे. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी करू नये. प्रथा-परंपरेनुसार जयंती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार असल्याने या माध्यमातूनच यावर्षी अभिवादन करावे. शहरांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करतांना पाचपेक्षा जास्त लोक जमणार नाही याची काळजी घेतली जावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात विविध सामाजिक संस्था रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवित असतात. यावर्षीही संबंधितांची परवानगी घेवून आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही यांची दक्षता घेवून याचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश श्री. आठवले यांनी दिले.
बांद्रा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व परवानग्या मिळत आहेत. 14 एप्रिल रोजी येथे भूमीपुजन करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमासाठी परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. पण विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र निर्बंध कमी केले आहेत. पण विषाणूने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन करावे लागत आहे. कमीत – कमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जातील. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असेही श्री. आठवले यांनी सांगितले.
यावेळी महसूल, पोलिस तसेच सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक बांधकाम महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच श्री. अविनाश महातेकर,यशवंत जाधव, गौतम सोनवणे, श्री कांबळे यांची उपस्थित होती.
0000
दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन
ReplyDeleteमुंबई, दि. 7 : सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणू प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. या सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने खालील सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य करण्यात आले असून त्याचा वापर करुन दस्त नोंदणी बाबत शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
1) नागरीकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE व्दारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत.
2) नागरीकांनी PDE डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईटवर eStep-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर) समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
3) नागरीकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सहयांसाठी स्वत:चे पेन आणणे, एकच पेन एकमेकात सहयांसाठी वापरू नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
4) विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह अॅड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अॅड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यत थांबवण्यात येत आहे.
5) सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठया शहरात उदा. मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकाणी सकाळ व दुपार दोन सत्रात कार्यालये सुरू आहेत. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहतील, याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरु होते. त्याचे कामकाज शनिवार व रविवारी बंद करण्यात येत असून त्या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहील असे नोंदणी उपमहानिरीक्षक मुंबई विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
0000
आरोग्यासाठी महत्वपूर्णमाहीती
ReplyDelete🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.
🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
🎾 पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
पोटदुखी
ReplyDeleteओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो
🎾चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
ReplyDelete●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.
2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो.
3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.
४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.
५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.
६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.
७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.
९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.
१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.
११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.
१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.
१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.
Continue :-▪
ReplyDeleteमुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
१) आवळा २) चिकु ३) भेंडी
४) पालक ५) गोबी ६) काकडी
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
यांनी पाठवले आहे..!!!
🌴 आरोग्य वार्ता🌴
"पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.
जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया .!!!
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही
ReplyDeleteराज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल,
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार
- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
मुंबई, दि. 12 :- कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील 72 तासात निर्णय घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी आज स्पष्ट केले.
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी संवाद साधला त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांचेसह मान्यवर आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी वैष्णवी किराड, आशिष मोहोर आदी विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीतील अडचणींची माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अजून हे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी उद्भवणार असतील तर त्या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू, यापूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल, मात्र दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात अडचणी पाहून राज्यपाल, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भातील पुढील 72 तासात निर्णय घेणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतानाच कोविड काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
ReplyDeleteबारावीची परीक्षा मे अखेरीस तर 10 वीची परीक्षा
जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी
- मुख्यमंत्री
मुंबई दिनांक 12: राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता 12 वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता 10 वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे, त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
राज्यातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांना अवगत केले जावे तसेच सुधारित नियोजनानुसार पुढील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत जाहीर केले जावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक आज घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील , राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
12 वीच्या परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच घ्याव्यात
12 वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना 12 वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीट च्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात हे लक्षात घ्यावे, त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.
तयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा
आपण ज्या तारखांना 12 व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली(एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वंदना कृष्णा यांनी यासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे उपस्थित अधिकारी यांनी आपली मते आणि भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
0000
लोकराज्य’चा एप्रिल 2021चा अंक प्रकाशित
ReplyDeleteमुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा एप्रिल महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. अर्थसंकल्प 2021-22 चा आढावा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत विशेष लेखांचा विभाग हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
विधिमंडळात नुकताच सादर करण्यात आलेल्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात विकासकामांची मोठ्या प्रमाणावर पायाभरणी केली गेली असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मनोगत व विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण तरतूदींची माहिती या अंकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर कृषिपंप वीज जोडणी धोरण, ग्रामीण महाआवास योजना, कोरोना प्रतिबंधक लसीकरण, प्राचीन मंदिरांचे जतन याबातच्या लेखांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय महत्त्वपूर्ण घडामोडी व मंत्रिमंडळ निर्णयांचा अंकात समावेश आहे. हा अंक माहिती व जनसंपर्कच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
रमजान महिना संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
ReplyDeleteमुंबई दि.13:- राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
यावर्षी दि. १४ एप्रिल ते १३ मे २०२१ पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता या वर्षी पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्यानुसार खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
१. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.
२. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क. सँनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.
३. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पुर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
४. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.
५. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.
६. पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
७, धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत;
८. कोवीड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात १४४ कलम लागू असल्याने तसेच रात्रीची
संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
९. या पवित्र रमजान महीन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
५०.धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.
११.पवित्र रमजान महिन्यात सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
१२,कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२१०४१२२०३७४५२२९ असा आहे.
19 एप्रिल रोजी जात पडताळणीबाबत
ReplyDeleteऑनलाईन वेबीनारचे आयोजन
मुंबई दि. 16 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेसंदर्भातील माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी 19 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वा. ऑनलाईन बेबीनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने जात पडताळणीबाबतची माहिती उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे इत्यादीची माहिती सर्वसामान्य लोकांना देणेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केलेले आहे. या वेबीनारमध्ये समितीचे अध्यक्ष, उपायुक्त व संशोधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या वेबीनार मध्ये सहभागी होणेसाठी खालील लिंक देण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक, महाविद्यालयांमधील प्राचार्य कर्मचारी वर्ग व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवा असे आवाहन संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई उपनगर यांनी केले आहे .
Zoom Meeting लिंक खालील प्रमाणे आहे. Topic: Caste Certificate Verification and other helping aspects
Time: April 19, 2021 03:00PM
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/8027832431?pwd=UEJwNFp2WWxHeFRpcUpvN2UxVkxOdz09
Meeting ID 8027832431 Passcode: caste 123
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र
ReplyDeleteकोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा
गरीब, प्राधान्य गटातील कुटुंबांना सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास मान्यता द्या
हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करणे, रेमडीसीव्हीर उपलब्धतेसाठी देखील विनंती
मुंबई दि 15: राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत.
ऑक्सिजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर कोविडच्या चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण 10.5 लाख होते. राज्यात आजमितीस 5.64 लाख सक्रिय रुग्ण आहेत अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे.
आज राज्यात 1200 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला 2 हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, आम्ही देखील स्थानिक व आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गानी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
रेमडीसीव्हीर उपलब्ध करावे
रेमडीसीव्हीरची निर्यात थांबविण्याच्या निर्णयाविषयी धन्यवाद देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, इंडियन पेटंट ॲक्ट 1970 च्या कलम 92 नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत जेणे करून ते रेमडीसीव्हीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील.
गरीब व प्राधान्य गटातील कुटुंबाना अर्थ सहाय्य
कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज 100 रुपये आणि मुलांना प्रत्येकी 60 रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता देखील लगेच मिळावा जेणे करून कोविड मुकाबल्यात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणतात.
कर्ज हप्ते न आकारण्याबाबत
अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घातली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणतात.
जीएसटी परताव्याला मुदतवाढ मिळावी
कोविड संसर्गामुळे लहान व्यापारी व उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची जीएसटी परतावा मुदत आणखी 3 महिने वाढवून मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.
0000
येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या
ReplyDeleteवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
लातूर दि.15: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
0000
ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे
ReplyDeleteघरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का ?
- प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे.
मूव्हर्स एन्ड पॅकर्स च्या मदतीने घरसमान हलवू शकतात का ?
- अतिशय अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल. मात्र सर्वसामान्यरित्या याचे उत्तर नाही असेच आहे.
महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का ?
- ब्रेक दि चेनच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून/ स्थानकाहून दुसरीकडे जाऊ शकता.
वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का ?
- नाही. केवळ आवश्यक गटातील दुकानच उघडी राहू शकतील
लोकं सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करू शकतात का ?
- नाही.
सिमेंट, रेडी मिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळणार का ?
- आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बांधकाम स्थळ सुरु ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने आण करता येईल. साहित्यांची ऑर्डर ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.
कुरियर सेवा सुरु राहील का ?
- फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरु राहू शकेल.
प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काय ?
- स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरु ठेवता येणार नाही.
वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरु ठेवता येईल ?
- नाही
19 एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होईल का ?
- परीक्षा आयोजित करण्याविषयी संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल मात्र विद्यार्थ्यांना हॉल तिकीट च्या आधारे ये-जा करता येईल तसेच प्रौढ व्यक्ती बरोबर असेल तरी मान्यता दिली जाईल.
आवश्यक इ कॉमर्स म्हणजे नेमके काय ?
- सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा ज्या आवश्यक गटात येतात उदा. किराणा , औषधी, अन्न पदार्थ इत्यादी इ कॉमर्स मार्फत वितरित केले जाऊ शकतात.
प्लम्बर. सुतार, वातानुकूलन, फ्रिज तंत्रज्ञ, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुती करणारे येऊ शकतात का ?
- अगदी टाळण्यासारखे नसेल तर पाणी आणि वीज याबाबतीत सेवा देणाऱ्या व्यक्ती ये जा करू शकतात. त्याचप्रमाणे पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता,उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे. त्याची तात्काळ निकड हवी.
यावर केवळ निर्बंध टाकायचे म्ह्णून टाकलेले नाहीत तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे, मग त्यात ती सेवा पुरविणारी व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय देखील आलेच. त्यामुळे या दिलेल्या सवलतीचा विचारपूर्वक आणि अत्यावश्यक असेल तरच उपयोग करावा अन्यथा
Continue-डेंटिस्टचे दवाखाने सुरु राहतील का ?
ReplyDelete- होय
स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने सुरु राहतील का ?
- नाही
ट्रॅव्हल कंपन्या व सेवा सुरु राहतील का ? ट्रॅव्हल, पासपोर्ट, व्हिसा सेवांचे काय ?
- ट्रॅव्हल एजन्सीज दुकान सुरु ठेवून काम करू शकणार नाहीत मात्र इंटरनेट/ ऑनलाईन काम करू शकतात. आपण एक खिडकी योजनेतील सर्व सुविधा जसे कि व्हिसा, पासपोर्ट सेवा , सर्व शासकीय सेतू केंद्रे, हे शासनाचा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे.
आवश्यक सेवा व सुविधांना सुरु ठेवण्यासाठी सहाय्यभूत उद्योग सुरु राहू शकतील का ?
- " essential for essential is essential" म्हणजेच आवश्यकसाठी आवश्यक ते आवश्यक हे तत्व आहे. तरी देखील काही संभ्रम असल्यास उद्योग विभागाचा निर्णय अंतिम राहील.
कामाच्या ठिकाणाजवळ राहणारे कामगार आणि कर्मचारीच उद्योग-कंपनीत येऊ शकतात की, इतर भागातून व गावांतून कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांना सुद्धा परवानगी आहे ?
- 13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना परवानगी आहे. त्यामुळे तेथील कामगार व कर्मचारी ये जा करू शकतात. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरु राहू शकतात.
आयातदार व निर्यातदार यांना परवानगी दिली आहे मात्र या निर्यातदारांना कामासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वस्तू किंवा सेवा देणारे सुरु ठेवू शकतील का ?
-नाही. केवळ आवश्यक वस्तूंची आयात करणे अपेक्षित आहे. इतर आयात वस्तूंचा साठा करून ठेवावा लागेल. निर्यातीच्या बाबतीत अगोदरच तयार करून ठेवलेल्या वस्तूंची निर्यात करता येईल. निर्यात करणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाबाबत बोलायचे तर केवळ निर्यातीची जी पुरवठा ऑर्डर असेल त्या मर्यादेतच उत्पादन करता येईल. काही अडचण असल्यास उद्योग विभाग मार्गदर्शन करेल.
उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परत परवानग्या घ्याव्या लागतील कि पूर्वीच्या परवानगी वैध असतील ?
- उद्योगांना सुरु राहण्यासाठी 13 एप्रिल 2021 च्या आदेशाप्रमाणे पूर्तता करणे गरजेचे आहे.
आवश्यक वस्तूंचा पुरवठा दुकानांना करण्यासाठी त्या व्यक्तीस रॅपिड अँटीजेन चाचणी करावी लागेल का ?
- नाही
काही आवश्यक वस्तू जसे की अन्न पदार्थ हे उपाहारगृहामार्फत किंवा ई कॉमर्समार्फत रात्री 8 नंतर घरपोच वितरित करता येईल का ?
- 13 एप्रिलच्या आदेशान्वये आवश्यक सेवा आणि सुविधांवर तसेच घरगुती पुरवठा करण्यावर बंदी नाही. या सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांच्या कामांना स्थानिक प्रशासनाने रात्री 8 नंतर काम करण्यास परवानगी दिली असेल तर घरी पुरवठा ( होम डिलिव्हरी) रात्री 8 नंतर करता येईल. स्थानिक प्रशासन वेळेमध्ये आवश्यकता भासल्यास लवचिकता ठेऊ शकते.
रस्त्यावरील खाद्यविक्रेते सुरु ठेवू शकतील ?
- सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणास मान्यता देण्यात आली आहे. ( या प्रकारात होम डिलिव्हरी फारशी होत नाही )
कृपया हा मेसेज कोणत्याही ग्रुपवर पाठवा. आज
ReplyDeleteएकदा
आणि उद्या एकदा
डॉ. एन. एन. मादुराई
* सर्वांसाठी महत्त्वाचा संदेश *
गरम पाणी पिणे
आपल्या घशा साठी चांगले आहे.
पण हा कोरोना विषाणू आपल्या नाकाच्या परानासल सईनच्या मागे 3/4 दिवस लपलेला असतो
गरम पाणी तेथे पोहोचत नाही.
4 ते 5 दिवसांनंतर परानासल साइनस
च्या मागे लपलेला विषाणू आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो.
मग आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो.
म्हणूनच वाफ घेणे फार महत्वाचे
आहे,
जे आपल्या परानासल सायनसच्या मागील भागापर्यंत पोहचते.
आपल्याला हा विषाणू नाकातच वाफेच्या साह्य़ाने मारायचा आहे.
50° सेल्सिअस तापमानात हा
विषाणू अक्षम होतो म्हणजे
अर्धांगवायू.
हा विषाणू 60° सेल्सिअस मध्ये
इतका कमकुवत होतो की कोणतीही मानवी प्रतिकारशक्तीप्रणाली
त्याविरूद्ध लढा देऊ शकते.
70° सेल्सिअस तापमानात हा
विषाणू पूर्णपणे मरत आहे.
*ही वाफ काय करते.*
हे संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाला माहित आहे.
पण प्रत्येकाला घ्यायचा आहे या साथीचा फायदा
म्हणून ते, ही माहिती उघडपणे सांगत नाहीत.
जो घरी राहतो त्याने दिवसातून एकदा वाफ घ्यावी.
आपण किराणा (भाज्या इ.)खरेदी
करण्यासाठी बाजारात गेला तर
दिवसातून दोनदा वाफ घ्या.
काही लोक कार्यालयात जातात
त्यानी दिवसातून 3 वेळा वाफ घ्यावी.
*वाफेचा आठवडा*
डॉक्टरांच्या मते,
नाक आणि तोंडातून वाफ घेतल्याने (कोविड -19) कोरोनाव्हायरस
पुर्णपणे नष्ट होईल.
जर सर्व लोकांनी एका आठवड्यासाठी
वाफेची मोहीम सुरू केली तर.
(Pandemic) सर्व देशातील साथीचा रोग लवकरच संपेल.
*एक सूचना आहे:*
* आज पासून एका आठवड्यासाठी
प्रक्रिया सुरू करा सकाळी आणि
संध्याकाळी फक्त 5 मिनिटे वाफ घेणे
जर आपण सर्वांनी एक आठवडा ही पद्धत अवलंबली तर कोविड -19
मिटविला जाईल.
या प्रक्रियेचे कोणतेही दुष्परिणाम
नाहीत आणि कोणती ही किंमत लागत नाही.
तर कृपया हा संदेश आपल्या सर्व
प्रियजनांना, नातेवाईकांना,मित्र
आणि शेजारी, यांना पाठवावा.
जेणेकरून आपण सर्व मिळून या कोरोना विषाणू ला संपवून टाकू.
आणि आपण सर्वजण एकत्रितपणे जगू आणि मुक्तपणे
या सुंदर जगात वावरू.
*धन्यवाद*
*(डॉ. ब्रॅच)*
Continue break the chain-खूप मोठ्या गृहनिर्माण संस्थेत संपूर्ण सोसायटी मायक्रो कंटेनमेंट जाहीर केली जाऊ शकते का ?
ReplyDelete- सोसायटीच्या परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्ती कोविडग्रस्त आढळ्यास ते क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट घोषित करावे लागेल. जर गृहनिर्माण संस्थ खूप मोठी असेल तर स्थानिक प्रशासन याबाबतीत रुग्णांचे अंशतः: विलगीकरण क्षेत्र कारण्याबाबतीत नियोजन करू शकेल. कंटेनमेंट घोषित करण्यामागचा मूळ उद्देश या क्षेत्रात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणार्यांवर नियंत्रण आणणे आणि इतरत्र संसर्ग फैलावणार नाही यासाठी तो भाग अलग करणे होय. कंटेनमेंटसाठीची एसओपी तंतोतंत पालन केली जावी.
स्थानिक प्रशासन दुसऱ्या कोणत्या मुद्द्यांवर नव्याने आदेश निर्गमित करू शकतील ?
- स्थानिक प्रशासन अपवादात्मक म्हणून काही सेवन आवश्यक गटात अंतर्भूत करून परवानगी देऊ शकतील. मात्र यासाठी त्यांनी संपूर्ण विचारांती आणि अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय घ्यावयाचा आहे.
स्थानिक प्रशासनास त्यांना गरज वाटली तर संसर्ग झपाट्याने पसरविणारा काही स्थळे व ठिकाणे बंद करण्याचे अधिकार असतील. उपाहारगृहे आणि बार साठी स्थानिक प्रशासन वेळा ठरवेल आणि कोविड संसर्ग लक्षात घेऊन सुधारितही करू शकतील. लोकांच्या सोयीसाठी ते वेळा वाढवू देखील शकतील. मात्र कुठलेही असे आदेश निर्गमित करण्याअगोदर राज्य शासनाची मंजुरी घेणे आवश्यक असेल.
पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट हे आवश्यक सेवेत येतात का ?
- हो.
औषधी उत्पादनांची यंत्रसामुग्री आणि उपकरणे यांच्या उद्योगांना मान्यता आहे का ?
- होय
आवश्यक सेवा हि फक्त सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीतच सुरु राहील का ?
- आवश्यक सेवा आठवड्याचे 24 तास सुरु राहील. ( स्थानिक प्रशासनाने या गटातील सेवांना काही इतर कायद्यान्वये वेळा ठरवून दिली असेल तर त्या वेळेत त्यांना सुरु ठेवता येईल ) मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यात यासंदर्भात काही निर्बध नाहीत.
सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करू शकतील का ?
- होय, आदेशात दिलेल्या वैध कारणांसाठी सर्वसामान्य नागरिक लोकल रेल्वेचा उपयोग करू शकतील.
खासगी वाहने कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी ये जा करू शकतील ?
- त्यांची कार्यालये किंवा आस्थापना आवश्यक गटात असतील किंवा त्यांना निर्बंधातून वगळले असेल तेच प्रवास करू शकतील.
बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेचे काय ?
- आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून कुणीही प्रवास करू शकेल.
0000
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात
ReplyDelete‘वन नेशन वन रेशनकार्ड’योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा
कैलास पगारे
मुंबई, दि. 17 : राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेवू शकतो. या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात इतर राज्यातील 1474 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेतले असून लाभार्थ्यांनी “वन नेशन वन रेशन कार्ड” योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी केले.
“वन नेशन वन रेशन कार्ड” या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करुन लाभार्थ्याना पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.
या योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होणेच्या दृष्टीने दि.12 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. तसेच या योजनेची जनजागृती होऊन लाभार्थ्यांना योजनेमध्ये लाभ मिळावा या करिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करुन सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे कशाप्रकारे धान्यवाटप करण्यात येते. या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचे काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यामार्फत करण्यात येते.
“वन नेशन वन रेशन कार्ड” या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन क्र.14445 कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ई-मेल क्रमांक:-helpline.mhpds@gov.in कार्यान्वित आहे.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणा-या सर्व पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता शारिरीक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करुन योजनानिहाय अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात
ReplyDelete‘वन नेशन वन रेशनकार्ड’योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा
कैलास पगारे
मुंबई, दि. 17 : राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेवू शकतो. या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात इतर राज्यातील 1474 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेतले असून लाभार्थ्यांनी “वन नेशन वन रेशन कार्ड” योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी केले.
“वन नेशन वन रेशन कार्ड” या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करुन लाभार्थ्याना पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.
या योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होणेच्या दृष्टीने दि.12 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. तसेच या योजनेची जनजागृती होऊन लाभार्थ्यांना योजनेमध्ये लाभ मिळावा या करिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करुन सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे कशाप्रकारे धान्यवाटप करण्यात येते. या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचे काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यामार्फत करण्यात येते.
“वन नेशन वन रेशन कार्ड” या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन क्र.14445 कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ई-मेल क्रमांक:-helpline.mhpds@gov.in कार्यान्वित आहे.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणा-या सर्व पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता शारिरीक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करुन योजनानिहाय अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे.
कोविड-19 प्रादुर्भाव टाळण्याकरीता मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप
ReplyDeleteदुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या वेळेत सुरु राहणार
मुंबई, दि. 16 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 यावेळेत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.
यासाठी मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. याबाबत तक्रार असल्यास खालील हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.
v राज्य हेल्पलाईन (सकाळी 10 ते सायं.6)
Ø निशुल्क हेल्पलाईन क्रमांक :- 1800 22 4950/1967
Ø अन्य हेल्पलाईन क्रमांक :- 022-23720582/23722970/ 23722483
Ø ई-मेल क्रमांक :- helpline.mhpds@gov.in
Ø वेबसाईटवरील ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली :- mahafood.gov.in
Ø वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन क्रमांक:- 14445
v मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष (सकाळी 10 ते सायं.6)
Ø हेल्पलाईन क्रमांक:- 022-22852814
Ø ई-मेल क्रमांक :- dycor.ho.mum@gov.in
अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असे आवाहन याव्दारे करण्यात येत असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
००००
ब्रेक द चेन" अंतर्गत शिवभोजन थाळी एक महिना मोफत
ReplyDeleteशिवभोजन केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित
मुंबई दि. 16 : "ब्रेक द चेन" ची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे. या कालावधीत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
दि.१५ एप्रिल २०२१ पासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत संपूर्ण राज्याचा शिवभोजन थाळीचा इष्टांक 2 लाख प्रतिदिन एवढा राहील. त्यानुषंगाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1) शिवभोजन थाळीच्या राज्याच्या इष्टांकामध्ये वाढ करण्यात आली असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दीड पट वाढ करण्यात येत आहे. ( उदा. शिवभोजन केंद्राचा इष्टांक 100 असल्यास पुढील एक महिन्यासाठी त्याचा इष्टांक 150 एवढा राहील.) एक महिन्यानंतर सदर ईष्टांक पूर्वरत होईल.
2) शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करुन शिवभोजन केंद्रातून दुपारी 11.00 ते 4.00 या कालावधीत पार्सल सुविधेद्वारे (Take away) ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात यावे.
3) या वेळेत कोणताही लाभार्थी शिवभोजनाविना परत जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
4) कोणत्याही सबळ कारणांशिवाय शिवभोजन केंद्र बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
5) संपूर्ण शिवभोजन केंद्राचे दररोज निर्जंतूकीकरण करावे.
6) शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक राहील.
7) शिवभोजन केंद्रावर सामाजिक अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे.
8) शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत.
9) खोट्या नावाने तसेच तीच-ती लाभार्थ्यांची छायाचित्रे शिवभोजन ॲपवर टाकली जाणार नाहीत याची खबरदारी शिवभोजन केंद्र चालकाने घ्यावी.
10) सर्व शिवभोजन केंद्रांची पुरवठा यंत्रणेद्वारे या महिन्यात किमान एक वेळ काटेकोर तपासणी करण्यात यावी.
अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन
ReplyDeleteमुंबई, दि. 16 : शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी (पु.), मुंबई-60 यांचे कार्यक्षेत्र बांद्रा ते दहिसर (रेल्वेच्या दोन्ही बाजू) आहे. या कार्यक्षेत्रात काही संस्थानी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. या अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश घेवू नये. अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यासाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील, असे श्रीमती उर्मिला पारधे, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम यांनी प्रसिद्धी पत्राकान्वये कळविले आहे.
अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे :- 1). के.पी.पूर्व, दि. प्रागतिक एज्युकेशन सोसायटीचे मरोळ प्रागतिक हायस्कुल, अंधेरी (पुर्व), 5वी ते 10 वी इंग्रजी 2). के.पी.पश्चिम, इत्तेमाद इंग्लिश हायस्कुल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी 3). के.पी.पश्चिम, जे.के. पब्लिक स्कुल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी या आहेत.
जटिल भूतकाळ आणि विविधातपूर्ण भविष्य’ : जागतिक वारसा दिनाची यंदाची संकल्पना
ReplyDelete‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई दि. 18:- युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
श्री देशमुख म्हणाले, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थळांसाठी यूनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. त्यात वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास ह्या नामांकनामुळे मदत होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल. कोकणात आजपर्यंत पर्यटन केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात होत होता, कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटक कोकणातील सडयांकडे वळतील व स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल. कातळशिल्पांच्या शोधामुळे कलेचा इतिहास हजारो वर्षे मागे गेला आहे. जागतिक पातळीवरील तज्ञ यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया अश्मयुगातच रचला गेला या दृष्टीकोनातून बघू शकतील. या कातळशिल्पांच्या पुरास्थळांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
या नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदि किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.
जटिल भूतकाळ आणि विविधातपूर्ण भविष्य’ : जागतिक वारसा दिनाची यंदाची संकल्पना
ReplyDelete‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई दि. 18:- युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
श्री देशमुख म्हणाले, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थळांसाठी यूनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. त्यात वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास ह्या नामांकनामुळे मदत होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल. कोकणात आजपर्यंत पर्यटन केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात होत होता, कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटक कोकणातील सडयांकडे वळतील व स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल. कातळशिल्पांच्या शोधामुळे कलेचा इतिहास हजारो वर्षे मागे गेला आहे. जागतिक पातळीवरील तज्ञ यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया अश्मयुगातच रचला गेला या दृष्टीकोनातून बघू शकतील. या कातळशिल्पांच्या पुरास्थळांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
या नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदि किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी
ReplyDeleteअर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांचा विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई, 18 : कोविड -19 च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणाली मार्फत राबविल्या जातात. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षांमध्ये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च देण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. हे निदर्शनास येताच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास आता दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.
फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी
ReplyDelete‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत जनजागृती
मुंबई, दि. 19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
चाचणी कोणी करावी
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
अशी करावी चाचणी
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.
सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.
चाचणीचा निष्कर्ष
जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.
ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती 6 मिनिटांऐवजी 3 मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.
एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही
ReplyDelete- क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
मुंबई, दि. १९ : नवीन शिक्षण धोरणात निवड आधारित श्रेयांक पद्धतीचा पुरस्कार करण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांना विषय निवडीचा अधिकार असणार आहे. त्यामुळे एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नसल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
श्री. सुनील केदार म्हणाले,वैकल्पिक विषय झाल्याणे विद्यार्थी एनसीसी कडे वळतील, असा आम्हाला विश्वास आहे. शिस्त, देशप्रेम शिकविणाऱ्या या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल. याचबरोबर त्यांना नोकरीसाठीच्या विविध सरकारी योजनांचा लाभही घेता येऊ शकेल.
एनसीसीच्या परेडचा सराव
कॅम्पला जायचे तसेच अभ्यासाला वेळ कसा काढायचा, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो आणि इच्छा असूनही ते एनसीसीच्या वाटेला जात नाहीत. मात्र आता एनसीसीला वैकल्पिक विषयाचा दर्जा मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर या विषयाला सहा सत्रांमध्ये २४ क्रेडिट देण्यात येणार आहेत. याचबरोबर या विद्यार्थ्यांना एनसीसीचे 'बी' आणि 'सी' प्रमाणपत्रही मिळविता येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना कार्यवाही करण्याची सूचना केली असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.
शाळेत एनसीसीमध्ये भाग घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येही त्यात सहभागी होण्याची इच्छा असते. मात्र अभ्यास आणि एनसीसीसाठी द्यावा लागणारा वेळ याचा ताळमेळ जुळत नसल्याने बहुतांश विद्यार्थी यापासून दूर राहतात. परिणामी शाळांपेक्षा कॉलेजमध्ये एनसीसीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते. एकता, शिस्त, देशभक्ती, आरोग्य आदी विषयांचे शिक्षण देणाऱ्या या अभ्यासक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, यासाठी २०१३ मध्ये सर्व प्रथम याला वैकल्पिक विषय म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर कारण्यात आला होता परंतु आता 'नवीन शिक्षण धोरणा'चा आधार घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबतचे परिपत्रक काढले असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.
श्री. केदार म्हणाले, आता राज्यातील एनसीसी संचालकांवर याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात येणार आहे.
एनसीसीचा अभ्यासक्रम सहा सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. यात थेअरीसाठी सहा सत्रांमध्ये आठ क्रेडिट, प्रात्यक्षिकांसाठी सहा क्रेडिट तर दोन कॅम्पसाठी १० क्रेडिट देण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, व्यायाम याचबरोबर नकाशा वाचन, शस्त्र प्रशिक्षण, समाजसेवा आदीचे शिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्र शासन
ReplyDeleteमहसूल, वने आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग
मंत्रालय, मुंबई – ४०००३२
क्र. डीएमयू/ २०२० /सीआर.९२/आप.व्यव.-१ दि. १८ एप्रिल २०२१
आदेश
ब्रेक द चेन अंतर्गत संवेदनशील ठिकाणहून प्रवास सुरू करताना
साथरोग नियंत्रण कायदा १८९७ च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत राज्यात कोविड विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी आणि कोविड १९च्या विषाणूचे नवे प्रकार राज्यात येण्यापासून थांबवण्याच्या दृष्टीने खालील राज्ये प्रवास सुरू करण्यासाठी संवेदनशील ठिकाणे म्हणून जाहीर करत आहेत.
१. केरळ
२. गोवा
३. राजस्थान
४. गुजरात
५. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र
६. उत्तराखंड
ही सर्व ठिकाणं हे आदेश जारी केल्याच्या तारखेपासून प्रवास सुरू करण्यासाठी संवेदनशील ठिकाणं समजण्यात येतील आणि हे आदेश कोविड १९ ही अधिसूचित आपत्ती आहे तोवर लागू राहतील.
माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या नावे आणि आदेशानुसार
१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची मागणी मान्य केल्याबद्दल
ReplyDeleteआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मानले आभार
मुंबई, दि. १९ : देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण करण्याच्या केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत करून आभार मानले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आभार मानले आहेत.
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीक कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. त्यामुळे बाधीतांमध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करावे, अशी मागणी सातत्याने केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. राज्याने केलेल्या या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत असून युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोरोनाला रोखणे शक्य होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
ब्रेक दि चेन अंतर्गत सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी
ReplyDeleteमानक कार्य प्रक्रिया (एस ओ पी)
साथरोग कायदा १८९७, कलम दोन अनुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी अनुसार काही निर्देश जारी करण्यात येत आहेत. हे निर्देश संपूर्ण महाराष्ट्रभर सदर सूचना जाहीर झाल्याच्या दिनांकापासून अमलात येतील.
सूक्ष्म कंटेनमेंट क्षेत्रासाठी एस ओ पी
उद्देश –कोविड-१९ संसर्गजन्य रोग असल्या कारणाने त्याच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोविड रुग्णांचे अलगीकरण व विलगीकरण सारखे उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. परंतु जर स्थानिक प्रशासनाला असे वाटले की, जास्त लोकांना कोविड-१९ चा संसर्ग झालेला आहे आणि ते एकाच ठिकाणी राहणारे आहेत आणि कधीकधी संसर्ग प्रकट होत नाही किंवा कधीकधी लक्षण नसलेले रुग्णही इतरांपर्यंत कोविड-१९ चे विषाणू पसरवू शकतात तर त्याच्या नियंत्रणासाठी पाऊले उचलावी लागतील. सदर एस पी चा मुख्य उद्देश कंटेनमेंट झोन मध्ये संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय योजने हा आहे. त्याचप्रमाणे हा प्रसार आणखीण वाढता कामा नये हा एस ओ पी मागील मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी काही ठिकाणी कंटेनमेंट झोन बनविण्यात आले असून ब्रेक द चेन आणि प्रसार वाढण्यावर या मुळे नियंत्रण मिळविता येईल.
२ - व्याख्या
अ. मायक्रो कंटेनमेंट झोन (एम सी झेड) किंवा सूक्ष्म कंटेनमेंट झोन म्हणजे स्थानिक आपत्ती प्रशासन (डी एम ए) मार्फत घोषित क्षेत्राची निर्धारित सीमा.
ब. डी एम ए मार्फत कोणताही पूर्वग्रह न ठेवता खालील गोष्टींचे नियमन व पालन केले जाईल.
१ - कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेत पाचपेक्षा जास्त कोविडचे रुग्ण आढळल्यास जे की त्या गृहनिर्माण संस्था/ इमारतीतले रहिवासी आहेत, त्या इमारतीला मायक्रो किंवा सूक्ष्म कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येईल. जर त्या संस्थेमध्ये एकापेक्षा जास्त इमारती असतील तर डी एम ए हा निर्णय घेतील की, सगळे केसेस एका क्षेत्रातील आहे किंवा नाही आणि त्या अनुसार एस ओ पी ची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. त्या क्षेत्राला एम सी झेड घोषित करण्यात येईल. स्थानिक प्रशासन विविध प्रकरणांच्या आधारे योग्य निर्णय घेईल. या बहु-इमारत क्षेत्रातल्या एका इमारतीलाही एम सी झेड घोषित करण्यात आले तर सामायिक उपयुक्त गोष्टींवर निर्बंध लादला जाईल.
2 - ज्या क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त सोसायटी असतील किंवा त्याच्या भौगोलिक क्षेत्र जास्त असेल, डी एम ए ला तिथल्या एम सी झेड बद्दल निर्णय घेता येईल व अमलात आणले जाईल.
३ - परिमिती नियंत्रण
अ- स्थानिक डी एम ए ला या क्षेत्राच्या बाहेर ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतील अशा ठिकाणी चिन्ह लावावे लागतील.
ब - स्थानिक डी एम ए यांना एम सी झेड साठी स्पष्टपणे प्रवेश आणि निर्गमन केंद्र निर्देशीत कराव्या लागतील. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा येण्या किंवा जाण्यासाठी उपयोग करता येणार नाही.
क - सदर क्षेत्रात आतून बाहेर किंवा बाहेरून आत येणाऱ्या कोणालाही पूर्णपणे तपासल्याशिवाय येणे जाणे प्रतिबंधित राहील. फक्त वैद्यकीय आणि आपत्कालीन स्थिती मध्येच येता जाता येईल.
ड -इतर क्षेत्रांच्या तुलनेत डी एम ए ला क्षेत्रात जास्त निर्बंध लादण्यास परवानगी असेल. त्याचप्रमाणे त्या कार्यक्षेत्रात ते एम सी झेड साठी आवश्यक सेवा प्रतिबंधित करू शकतात.
ई -डी एम ए सूक्ष्म कंटेनमेंट झोन मध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांचा काटेकोरपणे तपास करू शकतात. फक्त केर कचरा उचलणारे स्वच्छता कर्मचारी यांना परवानगी दिली जाऊ शकते. (पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या घरातून कचरा वेगळा ठेवून स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल) केवळ काही अपवादात्मक स्थितीत परवानगी मिळू शकेल.
४. सुक्ष्म कंटेनमेंट झोनमध्ये काय करावे
अ - स्थानिक प्रशासनाने सगळ्या एम सी झेड आणि त्यांच्या सीमारेषा याबद्दल जाहीर प्रसिद्धी करावी.
ब -गृहनिर्माण संस्थेला सॅनीटायझर, तापमान मापन यंत्र इत्यादी प्रवेशद्वारावर उपलब्ध करावे लागतील.
क -लिफ्ट आणि एलीवेटर वारंवार सॅनीटाइज करावे.
ड- सर्व संदिग्ध रुग्ण, लक्षणे नसलेले रुग्ण आणि हाय रिस्क प्रकरणात दिशानिर्देश प्रमाणे तपासणी करावी.
ई- दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सगळ्या पुष्टी झालेल्या प्रकरणांचे वैद्यकीय व्यवस्थापन करावे. डी एम ए यांनी रहिवाश्याबद्दल टेलीकन्सल्टेशन आणि वैद्यकीय सल्लागारांच्या सल्यानुसार पुढील उपचार करावे. त्याचप्रमाणे गृह अलगीकरण झालेल्या एम सी झेड मधील रुग्णांसाठी ही वैद्यकीय सेवा निर्धारित करावी.
फ -भौतिक अंतर, गृह विलगीकरण, गृह अलगीकरण याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
Continue. .
ReplyDeleteज -स्थानिक डी एम ए हे स्थानिक स्थिती अनुसार आणखीण एस ओ पी ची तरतूद करू शकतात. त्यासाठी ते एखादा विशेष क्षेत्र किंवा सर्व एम सी झेड साठी सदर अतिरिक्त तरतूद घोषित करू शकतात.
एच -सोसायटीच्या अवतीभवतीच्या क्षेत्राला रोज स्वच्छ करून सॅनीटाइज करावे आणि हे नियमितपणे केले जावे.
आय- स्थानिक डी एम ए आणि एम सी झेड मधील रहिवाशांवर वरील सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात येत असल्याची संयुक्तपणे खात्री करावी लागेल. त्याचप्रमाणे डी एम ए, एम सी झेड च्या प्रवाशांना काही विशेष कार्य करण्यासाठी ही, जर ते कोविड-१९ पसरलेल्या क्षेत्रासाठी आवश्यक असेल, मार्गदर्शक करू शकतात.
5 दंड
जर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला असे समजले की, एम सी झेड मधील रहिवाशी हे जाणून-बुजून नियमांचे पालन करत नाही किंवा त्यांची वागणूक कोविड योग्य अनुपालन नाही, तर त्यांच्या विरोधात दहा हजार रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. यावरती ही जर काही लोक मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अतिरिक्त दंड लावला जाऊ शकतो.
२- दूध, औषधी किंवा इतर आवश्यक वस्तू ई-कॉमर्स च्या माध्यमाने येत असतील तर त्यांना गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य द्वार किंवा लॉबीमध्ये एका ठिकाणी जमवले जावे. बाहेरच्या व्यक्तींचे या ठिकाणी आवागमन असल्याने या क्षेत्राला वारंवार सॅनीटाईज करावे.
३- घरेलू कामगार, खाजगी सहाय्यक, वाहन चालक यांना डी एम ए परवानगी नाकारू शकतात. परंतु जर ते त्याच एम सी झेड क्षेत्रातले रहिवासी असेल आणि त्या क्षेत्राच्या बाहेर त्यांचा वावर नसेल, तर त्यांना डी एम ए परवानगी देऊ शकते.
४- खाजगी सुरक्षा सेवकांना येणे जाण्याची परवानगी असेल परंतु त्यांना सोसायटीतर्फे पी पी ई देणे अनिवार्य असेल. हे खाजगी सुरक्षा सेवक डिलेवरी आणणाऱ्या लोकांसोबत वार्तालाप करू शकतात. जर आवश्यक वाटल्यास डी एम ए यावरती आणखीण निर्बंध लादू शकतात.
५- एम सी झेड मधील जलतरण तलाव, जिम आणि सामायिक क्षेत्र बंद असेल आणि याचे काटेकोर पालन केले जाईल.
६ -गृहनिर्माण संस्थेतील पाळीव प्राण्यांसाठी वैद्यकीय सहाय्यतेची आवश्यकता असल्यास ती आवश्यक सेवेमध्ये गृहीत धरण्यात येईल. यासाठी ही डी एम ए हे विशेष नियम घोषित करतील.
एम सी झेड क्षेत्राच्या आत किंवा बाहेर सर्व वाहनांची रहदारी, सार्वजनिक वाहतूक आणि व्यक्ती आवागमन वर पूर्णपणे निर्बंध असेल. जर कोणी व्यक्ती एम सी झेड च्या बाहेर जात असतील तर यांची सुरक्षा रक्षक किंवा अन्य नियुक्त व्यक्ति नोंद घेईल.
जी वरील जबाबदारीही स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची संयुक्त जबाबदारी असेल. स्थानिक प्रशासन वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कृती दल बनवून त्याची मदत घेऊ शकतात.
जर डी एम ए ला असे आढळले की, एम सी झेड मधील काही लोकांनी कोविड-१९ नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे संसर्ग पसरला आहे तर त्यांच्याकडून सर्व खर्चाची पूर्तता करून घेतली जाईल. त्याचप्रमाणे जो काही दंड डी एम ए लावतील, तो त्यांना भरणा अनिवार्य असेल.
६- मायक्रो कंटेनमेंट झोन हे सामान्य क्षेत्र घोषित करणेसंबंधी सूचना
स्थानिक डी एम ए द्वारा दहा दिवसानंतर एम सी झेड ला सामान्य क्षेत्र या अटींवर घोषित केले जाऊ शकते की, तिथे कोणत्याही नवीन कोरोना प्रकरण मागील पाच दिवसात आढळलेला नसावा, अशी सुचना घोषित होईपर्यंत त्या क्षेत्राला एम सी झेड म्हणूनच गृहीत धरण्यात येईल, असे आदेश मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केले आहेत.
श्रीरामनवमी उत्सव साजरा
ReplyDeleteकरण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 20 : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा.
दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादीचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी. मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण. वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
0000
महावीर जयंती उत्सव साजरा
करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई दि. 20- संपूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा 25 एप्रिल रोजी महावीर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून महसुल व वन तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या 13 एप्रिल च्या आदेशांमधील तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. . कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
महावीर जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
श्रीरामनवमी उत्सव साजरा
ReplyDeleteकरण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 20 : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा.
दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादीचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी. मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण. वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
0000
महावीर जयंती उत्सव साजरा
करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई दि. 20- संपूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा 25 एप्रिल रोजी महावीर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून महसुल व वन तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या 13 एप्रिल च्या आदेशांमधील तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. . कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
महावीर जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
श्रीरामनवमी उत्सव साजरा
ReplyDeleteकरण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 20 : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा.
दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादीचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी. मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण. वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
0000
महावीर जयंती उत्सव साजरा
करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई दि. 20- संपूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा 25 एप्रिल रोजी महावीर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून महसुल व वन तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या 13 एप्रिल च्या आदेशांमधील तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. . कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
महावीर जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
कुठल्याही परिस्थितीत जनतेला निकृष्ट धान्य वितरण होता कामा नये, अन्नधान्य वितरणावर काटेकोरपणे लक्ष द्यावे
ReplyDelete- छगन भुजबळ
· राज्यातील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 20 : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व गरजू आणि सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण सर्वांची असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि अन्नधान्य वितरणासंदर्भात विभागाचे अधिकारी व राज्याच्या सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत आज मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
मोफत शिवभोजन थाळी देत असताना ती नागरिकांना राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार पार्सल स्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर पार्सल स्वरूपात मिळणारे अन्न हे निकृष्ट स्वरूपाचे तर नाही ना याची खातरजमा देखील अधिकाऱ्यांनी करायला हवी त्याचप्रमाणे यामध्ये कोरोनाचे नियम व स्वच्छता ठेवली जात आहे का आणि अनियमितता किंवा गैरप्रकार होत नाही ना यावर देखील सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देश श्री. भुजबळ यांनी आज दिले.
यावेळी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात अतिशय जबाबदारीने सर्वांना वागावे लागणार आहे. राज्यात निर्बंधांच्या काळात ज्या विभागांवर महत्वाची जबाबदारी असते त्यापैकी एक अन्न धान्य वितरण विभाग आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला वेळेत आणि नियोजनबद्ध असा अन्नधान्याचा पुरवठा झालाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने मोफत अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातल्या 7 कोटी लोकांना धान्य मोफत देणार आहोत. ज्या लाभार्थ्यांनी योजना चालू होण्याचा अगोदर धान्य घेतले आहे त्यांना पुढील महिन्यात लाभ मिळायला हवा. कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरीत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे श्री. भुजबळ यांनी सांगितले. ज्या ठिकाणावरून तक्रारी येतील त्या सर्व तक्रारींची देखील शहानिशा करण्यात आली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
राज्यातील अनेक रेशनिंग दुकानदारांनी ऑनलाईन पद्धतीला विरोध केला आहे, अंगठा दुकानात येऊन प्रत्येक व्यक्ती लावते त्यामुळे कोविड संक्रमण होत असल्याची राशन दुकानदारांची चिंता आहे. मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार ही यंत्रणा चालू राहणार आहे.मागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने ही प्रणाली बंद केली होती पण यावर केंद्र सरकारने प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे केंद्राची परवानगी असेल तरच ही पद्धत बंद करता येईल, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात या संकटाच्या काळात कुठेही अन्नधान्यांची आणि वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी, असे कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश श्री. भुजबळ यांनी दिले.
गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला धानभरडाईचा प्रश्न छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांने मार्गी लागला आहे. त्याचा आढावा भुजबळ यांनी घेतला विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मिलींग पूर्ण क्षमतेने चालू झाली आहे का याची माहिती श्री भुजबळ यांनी घेतली.
या बैठकीत विभागाचे सहसचिव श्रीमती चारुशीला तांबेकर, सहसचिव सुधीर तुंगार, वैधमापन नियंत्रक रविंद्र सिंघल, वित्तीय सल्लागार व उपसचिव अभय धांडे, सर्व उपायुक्त पुरवठा, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्न धान्य वितरण अधिकारी उपस्थित होते.
वनविभागातील पदांच्या सरळसेवा भरतीत
ReplyDeleteवनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा
तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
• वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी 5 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव
• सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी 10 टक्के आरक्षण
• वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी 5 टक्क्याऐवजी 10 टक्के आरक्षण
मुंबई, दि. 20: वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदांवर वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावेत, असे निर्देश वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. यामुळे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यानुसार वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी 5 टक्के आरक्षणाची तर सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी 10 टक्के आरक्षणाची नव्याने तरतूद करण्यासह वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी 5 टक्क्याऐवजी 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वन विभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदभरतीच्या शैक्षणिक अर्हतेसंदर्भात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. महसूल व वन विभागाचे सह सचिव (वने) अतुल कोदे, राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मीक) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) विकास गुप्ता, उप वनसंरक्षक (मानव संसाधन), (नागपूर) श्रीमती श्रीलक्ष्मी अनाबथुला, वन विभागाचे कक्ष अधिकारी अनिल धस, अशोक लक्कस तसेच वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र वन सेवेतील पदांच्या सरळसेवा भरतीमध्ये वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांना प्राधान्य मिळण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनास शिफारस करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसींची माहिती यावेळी श्री. भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
राज्यात सध्या वनरक्षकांची शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) उत्तीर्ण अशी असली तरी यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी व इतर विषयातील पदवीधर देखील भाग घेतात व त्यांची निवडही होते. तरी वनरक्षक संवर्गाकरिता होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी इच्छूक वनशास्त्र पदवीधारकांकरिता 5 टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. परंतु योग्य वनशास्त्र पदविधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) यांनी पुढील 10 दिवसामध्ये या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.
वनक्षेत्रपाल गट- ब संवर्गात पदभरतीमध्ये वनशास्त्र पदवीधारक यांच्यासाठी सध्या असलेल्या 5 टक्के आरक्षणामध्ये वाढ करून 10 टक्के करण्यात यावे. परंतु योग्य वनशास्त्र पदविधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील. त्याअनुषंगाने सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत पुढील आठ दिवसामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा.
तसेच सहायक वनसंरक्षक गट-अ संवर्गात पदभरतीमध्ये वनशास्त्र पदवीधारकांसाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यावी. परंतु योग्य वनशास्त्र पदविधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील. या प्रस्तावास सामान्य प्रशासन विभागाची मान्यता प्राप्त झाली असून पुढील आठ दिवसामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही श्री. भरणे यांनी यावेळी दिले.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
ReplyDeleteखाजगी संस्थांमधून करता येणार यूपीएससीची तयारी
100 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा ते मुलाखत पर्यंतचे घेता येणार प्रशिक्षण
- आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी
मुंबई, दि. 20 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी नामवंत संस्थामधून पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने नवीन योजना जाहीर केली आहे. यामध्ये 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना दिल्ली अथवा महाराष्ट्रातील संस्थांमध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेता येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिली.
श्री. पाडवी म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे संघ लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आदिवासी विद्यार्थी हे अति दुर्गम भागात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. तशाही परिस्थितीत ते शिक्षण घेतात. परंतु योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये ते पात्र ठरू शकत नाहीत. पर्यायाने उत्तीर्ण होण्याऱ्या उमेदवारांमध्ये अनुसूचित जमातीचे उमेदवारांचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व युपीएससीच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी म्हणून अनुसूचित जमातीच्या गुणवत्ताधारक उमेदवारांना बार्टी, पुणे या संस्थेच्या धर्तीवर दिल्ली वा महाराष्ट्रातील नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षांसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत यूपीएससीच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखती च्या तयारीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाने निवडलेल्या दिल्ली किंवा महाराष्ट्रातील खाजगी नामवंत संस्थांमधून परीक्षेची तयारी करता येणार आहे. या योजनेकरिता वार्षिक एकूण रु. ४ कोटी ०९ लाख ०६ हजार खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे श्री. पाडवी यांनी सांगितले.
अशी असेल प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया :-
● महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व सदर प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या व नमूद सर्व साधारण पात्रता पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील.
● याकरिता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत सर्वदूर पोहोचणाऱ्या तसेच सर्वाधिक खपाच्या महत्वाच्या दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात येईल.
● जर उमेदवारांची संख्या १०० पेक्षा जास्त असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका तयार केली जाईल व प्रवेश परीक्षा घेऊन गुणानुक्रमे निवड यादी व प्रतीक्षा यादी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्तरावरून प्रकाशित केली जाईल.
● या निवड यादीतील प्रथम १०० प्रशिक्षणार्थीची या योजनेखाली निवड केली जाईल. जास्त अर्ज आल्यास परीक्षा घेऊन 100 जणांची निवड केली जाईल.
● प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येईल.
प्रशिक्षणार्थीना मिळणार या सोयी-सुविधा
● दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असल्यास प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दर महिन्यास रु. 12 हजार इतके विद्यावेतन देण्यात येईल.
● महाराष्ट्रातील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असल्यास प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दर महिन्यास रु. 8 हजार इतके विद्यावेतन देण्यात येईल.
● पुस्तक खरेदी करीता प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास एकदाच रुपये 14 हजार देण्यात येईल.
● दिल्लीतील केंद्रावर प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जाण्याकरिता व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी दोन हजार इतकी रक्कम प्रवास भत्ता व प्रवास खर्च म्हणून प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात डिबीटीद्वारे वर्ग करण्यात येईल.
याशिवाय इतर अटींची पूर्तता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. या योजनेची अंमलबजावणी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत करण्यात येणार असून प्रशिक्षणसंस्थांची निवड यादी (empanelment) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ
राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना
ReplyDeleteसानुग्रह अनुदान जाहीर
- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
मुंबई, दि.20 : राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.
राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.
या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी "सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल," असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. श्री. परब यांनी केले.
🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩
ReplyDelete🌻 *आनंदी पहाट* 🌻
*श्रीराम नवरात्राची*
*शरयुतीरी रम्य अयोध्या नगरीतून*
⚜🚩⚜🌸🙏🌸⚜🚩⚜
*या सृष्टीच्या कालगणनेत भारतीय संस्कृतीने चार युगे आहेत असे मानलेय. प्रत्येकच युगात देव वृत्ती आणि दानवी प्रवृत्तीही. या दोघांच्या युद्धात नेहेमीच जेव्हा दानवी प्रवृत्ती प्रबळ होतात, तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी भगवंताने अवतार घेतलाय. सज्जन शक्तीचे संरक्षण केलेय. शत्रूचा पराभव करतानाही श्रीराम अवताराने जगापुढे जगण्याचा आदर्श निर्माण केलाय, म्हणूनच प्रभू श्रीराम हे देशाचे आराध्य दैवत आहेत.*
*प्रभू श्रीराम कुटुंबवत्सल राजपुत्र. श्रीरामाचे चरित्र हे जगासाठी सदैव आश्वासक आहे. या श्रीरामाच्या कथां या नित्य नूतन आनंद देणाऱ्या आदर्शवादी. या श्रीराम चरित्राचे सामर्थ्य असे की, त्यामधील कथा विमनस्क.. खचलेल्या.. पराभूत मनाला उभारी देतात. आदर्शवादी विचार मनात चैतन्य निर्माण करतात.*
*त्रेतायुगात भारतभूवर अयोध्या नगरीतील इक्ष्वाकू कुळातील राजा दशरथाचे सुपुत्र म्हणजे प्रभू श्रीराम. अयोध्या ही दुथडी भरून वाहणाऱ्या शरयू तीरावरची ही संपन्न नगरी.*
*'गीत रामायण' हे ईश्वरी संकेताने आणि कृपेनेच गदिमा.. बाबूजींकडून आमच्यासाठी निर्माण झालेय. गदिमांच्या दिव्यदृष्टीने अयोध्या नगरीतील विशाल वास्तू, सुंदर समांतर रस्ते.. त्यावर चालणारे रथ, हत्ती, पथीक यांची लगबग बघितली. घरांवर रत्नतोरणे होती तर अवतीभवती रम्य उपवने.. सर्वत्र नृत्य.. गायन.. मृदुंग वीणांचा झंकार सुरु होता. ह्या नगरातील स्त्रिया पतिव्रता होत्या तर पुरुषही परमेश्वर भक्तीत रममाण होते.*
*हा दशरथ राजाही न्यायी, धर्मशील, प्रजाहितदक्ष. इथे ना कुणी नास्तिक ना अधर्मी. पण राजाला एक दुःख होते ते म्हणजे तीनही राण्यांकडून पुत्रप्राप्ती नव्हती. ही सारी सुखे समोर हजर असतांनाही या शल्यामुळे ती झाकोळली गेली होती. जनसामान्य असो वा बलाढ्य राजा यांच्या भावनांशी साधर्म्य सांगणारे हे गीत..*
*रामायणातून सतत एक संदेश मिळतो की काळाच्या उदरात काय दडलय हे कुणालाच कळत नाही. जे गदिमांनी दिव्य दृष्टीने अनुभवले, तेवढ्याच उत्कट भावनेने बाबूजींनीही त्यांना प्राप्त दैवी आशिर्वादाने संगीतबद्ध केलेय..*
*क्रमशः..*
🌹⚜️🌸🏹🛕🏹🌸⚜️🌹
*_सरयू तीरावरी अयोध्या_*
*_मनुनिर्मित नगरी_*
*_त्या नगरीच्या विशालतेवर_*
*_उभ्या राहिल्या वास्तू सुंदर_*
*_मधुन वाहती मार्ग समांतर_*
*_रथ, वाजी, गज, पथिक चालती,_*
*_नटुनी त्यांच्यावरी_*
*_घराघरावर रत्नतोरणे_*
*_अवती भवती रम्य उपवने_*
*_त्यांत रंगती नृत्य गायने_*
*_मृदंग वीणा नित्य नादती,_*
*_अलका नगरीपरी_*
*_स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक_*
*_पुत्र उपजती निजकुल दीपक_*
*_नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक_*
*_अतृप्तीचा कुठे न वावर,_*
*_नगरी, घरी, अंतरी_*
*_इक्ष्वाकू-कुल कीर्ती भूषण_*
*_राजा दशरथ धर्मपरायण_*
*_त्या नगरीचे करीतो रक्षण_*
*_गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा,_*
*_सूर्य जसा संगरी_*
*_दशरथास त्या तिघी भार्या_*
*_सुवंशजा त्या सुमुखी आर्या_*
*_सिद्ध पतीच्या सेवाकार्या_*
*_बहुश्रुता त्या रूपशालिनी,_*
*_अतुलप्रभा सुंदरी_*
*_तिघी स्त्रियांच्या प्रीतसंगमी_*
*_तिन्ही लोकीचे सुख ये धामी_*
*_एक उणे पण गृहस्थाश्रमी_*
*_पुत्रोदय पण अजुनी नव्हता,_*
*_प्रीतीच्या अंबरी_*
*_शल्य एक ते कौसल्येसी_*
*_दिसे सुमित्रा सदा उदासी_*
*_कैक कैकयी करी नवसासी_*
*_दशरथासही व्यथा एक ती,_*
*_छळीते अभ्यंतरी_*
*_राजसौख्य ते सौख्य जनांचे_*
*_एकच चिंतन लक्ष मनांचे_*
*_काय काज या सौख्य धनाचे_*
*_कल्पतरूला फूल नसे का?_*
*_वसंत सरला तरी_*
🌷🌿🥀🌸🌼🌸🥀🌿🌷
*गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
*संगीत आणि स्वर : सुधीर फडके*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*Il श्रीराम जयराम जय जय राम ll*
*!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*१७.०४.२०२१*
🌻☘🌺🔆🌻🔆🌺☘🌻
*विनोबा पाॅझिटिव्ह*
ReplyDeleteकरोना हे सायकॉलॉजिकल युद्ध आहे आणि सध्या तरी हे युद्ध शत्रू जिंकत आहे असे भासत आहे.
मनाच्या अंधारकोठडीतून बाहेर कसे पडावे...
विनोबांना इंग्रजानी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली, ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन येई. जिथे प्रकाशही नाही अशा या कोठडीत ते खचतील, त्यांची प्रकृती खालावेल आणि निराश होऊन ते माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती. पण जसजसे दिवसांमागून दिवस जायला लागले तसतसे विनोबा अजून तजेलदार, सशक्त दिसू लागले, हे पाहून तो जेलरही अचंबित झाला.
विनोबांनी काही संकल्प आणि त्यांचं २४ तासांचं नियोजन केलं होतं. आपल्या कोठडीची लांबी मोजून ते रोज जितके मैल चालत होते, तेवढे अंतर काढून खोलीतल्या खोलीत चालायला त्यांनी सुरुवात केली. याशिवाय त्यांनी नियमित ध्यानधारणेची वेळही वाढवली. जे पहारेकरी त्यांच्यासाठी रोज जेवण घेऊन यायचे, त्यांच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्यांना योग्य सल्ला द्यायचे. त्यामुळे त्या जेलमधले इतर पहारेकरीही आपापली गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागले. त्यांचा सायंकाळचा वेळ समस्या निवारणातच जाऊ लागला. जे काही कच्चं भरड अन्न मिळायचं तेही विनोबा समाधानाने व्यवस्थित चावून खायचे. रोजचा व्यायाम तर होताच. त्यांना झोपही शांत लागत होती.
सायंकाळी इतकी लोकं त्यांच्याकडे येत आहेत हे बघून इंग्रज जेलरही थक्क झाला. एकदा तर त्यानेच स्वतः विनोबांशी संवाद साधला आणि मग त्याने विनोबांना रोजच जेलमध्ये सभा घेता यावी म्हणून वेगळी स्वतंत्र जागा दिली.
यापुढे जाऊन विनोबांसाठी काही पुस्तकं मागावून घेतली. आणि नंतर जेलमध्येच कैद्यांसाठी विनोबांचे गीता प्रवचनांचे वर्ग सुरू झाले.
हे सगळं किती थक्क करणारं आहे...
आज आपल्याला तर अंधाऱ्या कोठडीत नाही, घरात रहायचंय. आपल्याबरोबर आपले नातलग आहेत, मनोरंजनासाठी असंख्य साधनं आहेत, कित्येक पर्याय आहेत. विनोबांसारखं सकारात्मकतेने विचार करणारं फक्त मन हवं आहे, नाही का?
35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी अर्थसहाय्य
ReplyDeleteसामाजिक न्याय विभागांतर्गत 5 योजनांसाठी
सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 22 : कोरोनाच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या काळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील 35 लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी 1 हजार 428 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या 5 योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत जारी करण्यात आला असून, त्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) 330 कोटी रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) 60 कोटी रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) 45 कोटी, श्रावणबाळ योजना (सर्वसाधारण) - 660 कोटी रुपये, श्रावणबाळ योजना (अनु. जाती) 120 कोटी रुपये, श्रावणबाळ योजना (अनु.जमाती) - 90 कोटी रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना -110 कोटी रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना - 12 कोटी रुपये आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना - 1.50 कोटी रुपये असे एकूण 1 हजार 428 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. पुढील दोन तीन दिवसात तातडीने हा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात यावा, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यात लागू निर्बंधांमुळे होणाऱ्या परिस्थितीत या योजनांमधील राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
००००
18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातुन मोफत लस देण्यात यावी
ReplyDelete- आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. 22 एप्रिल (प्रतिनिधी)
18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. यातील 50% लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. देशातील अनेक मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सद्यस्थितीतील टाळेबंदी लावण्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन दोन आठवडे टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारने आता तरी मदत करावी असेही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
पहिल्या टाळेबंदी नंतर महाराष्ट्र सरकारने कुठलंही पॅकेज अथवा मदत ही सर्वसामान्य माणसाला केली नव्हती त्यामुळे अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात आपली अकार्यक्षमता न दाखवता सर्व बाबी लक्षात घेऊन 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने आपल्या कोट्यातून मोफत लस द्यावी अशी आग्रही मागणी आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून "रायगड जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली" कार्यान्वित
ReplyDeleteएका क्लिकवर मिळणार जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्स ची माहिती
जरुर भेट द्या raigad.gov.in या वेबसाईटला
अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर रुग्णांना कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडस् ची,तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती होण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांची ही गरज तातडीने लक्षात घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.gov.in या वेबसाईटवर www.covid19raigad.in ही url लिंक संलग्न केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडस् ची संख्या व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ समजू शकणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या शासकीय वेबसाईटवर जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या करोना उपाययोजनांबाबतची, शासन निर्णयाची, विविध शासकीय आदेशांची इत्यंभूत माहितीही उपलब्ध आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, वरिष्ठ तांत्रिक संचालक व जिल्हा सूचना- विज्ञान अधिकारी चिन्ता मणि मिश्रा, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी केले आहे.
।। मोठी बातमी अपडेट*
ReplyDelete💁♂️ *बँकाच्या वेळेत बदल झालेत ! - प्रत्येकाने वाचा खूप महत्वाचे अपडेट*
🧐 महाराष्ट्रात बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे - आता राष्ट्रीयकृत बँका सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत, म्हणजे दररोज फक्त 4 तास बँकिंग सुविधा देतील
⏲️ तर या याकाळात फक्त चार प्रकारच्या सेवा दिल्या जातील - यामध्ये रोकड जमा करणे, रोख रक्कम काढणे, धनादेशांचे क्लिअरिंग, पैसे पाठविणे आणि सरकारी व्यवहारचा समावेश आहे
💁♂️ *दरम्यान बँका संध्याकाळी* - चार वाजता बंद होतील - आवश्यक असल्यास, हा आदेश पुढेही सुरू ठेवला जाईल - असेही यामध्ये सांगण्यात आले आहे
😱 राज्यस्तरीय बँकर्स समिती समन्वयक ब्रिजेश कुमार , यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे - तर हे नवे बदल आज 23 एप्रिलपासून , ते 15 मेपर्यंत लागू असतील
📌 *बँकाच्या वेळेत बदल होत आहेत* - हि माहिती सर्व सामान्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
🪀
कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर
ReplyDeleteप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश
· मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत 5 किलो अतिरिक्त धान्य
· राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहून केली होती.
आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांसाठी मोफत 5 किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याने ती सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील केंद्र सरकारशी चर्चा करण्याची विनंती केली होती. श्री. पवार यांनी देखील या पत्राचा तातडीने विचार करत केंद्र सरकारशी चर्चा केली आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1 लाख 40 हजार मेट्रिक टन तांदळाची तर 2 लाख 40 हजार मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या 7 कोटी लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहचवू शकतो असे श्री. भुजबळ यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आज केंद्र सरकारने घोषीत केल्याप्रमाणे देशात 80 कोटी नागरिकांना मे आणि जून महिन्यांमध्ये 5 किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे. अन्न, सुरक्षा योजनेच्या राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.
कोरोना काळात जारी कराव्या लागलेल्या कठोर निर्बंधांमुळे अनेक नागरीकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी भुजबळांनी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे भुजबळांनी केंद्र सरकार आणि या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार शरद पवार यांचे आभार मानले आहेत.
ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा प्रशिक्षणाचा शुभारंभ
ReplyDeleteज्येष्ठ नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे
- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 23 : समाजात ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वाढत असून त्यांची काळजी घेण्याची व्यवस्था, आधार आणि सेवा उपलब्ध करुन देणे ही गरज आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा ही केवळ सेवा, करुणा या दृष्टीकोनातून पाहण्याची बाब नसून भविष्यात एक मोठा सेवा उद्योग (सर्व्हिस इंडस्ट्री) यातून उभा राहणार आहे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रिजनल सिसोर्स ट्रेनिंग सेंटर (आरआरटीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा प्रशिक्षणाच्या ऑनलाईन शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, आरआरटीसीच्या अध्यक्षा आणि माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, राज्य कोविड टास्क र्फोर्सच्या सदस्य आणि माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, आरती ड्रग्ज लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील, शुश्रुषा हॉस्पिटलच्या माजी अधीष्ठाता डॉ. रेखा भातखंडे, इकोइंग हेल्दी एजिंगच्या श्रीमती अमृता पाटील यावेळी उपस्थित होत्या.
उपसभापती डॉ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, जागतिकीकरण, उदारीकरणानंतर मोठ्या प्रमाणात युवा वर्ग शिक्षणासाठी परदेशात जाऊन तेथेच स्थायिक व्हायला लागला. देशातही कुटुंबे चौकोनी, त्रिकोनी असा बदल झाला. त्यामुळे शहरांमध्ये ज्येष्ठांची काळजी घेण्यात अडचणी यायला लागल्या असून ‘ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा’ ही एक चांगली संकल्पना असून समाजातील मोठी गरज बनली आहे. भविष्यात यात व्यवसायिक पद्धतीने काम करणारे उद्योगही पुढे येऊ शकतील.
त्या पुढे म्हणाल्या की, सध्याच्या कोरोना परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्रकर्षाने समोर आले आहेत. माविम आणि आरआरटीसीने त्यांच्या रुग्णसेवेची आवश्यकता लक्षात घेऊन प्रशिक्षित आणि व्यावसायिक महिला रुग्णसेवक घडवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. ज्येष्ठ नागरिकांचा दिनक्रम सुखा समाधानाने कसा जाईल हे पाहणे रुग्णसेवकाचे काम आहे. शहरांमध्ये निवासी वृद्धाश्रमांबरोबच अल्पकालिन वृद्धाश्रमांचीही गरज भासू लागली आहे. जोडीने राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच एकाकी ज्येष्ठ नागरिकांना ज्याप्रमाणे रुग्णसेवकांच्या सेवेची आवश्यकता लागते; त्याचप्रमाणे छोट्या कुटुंबातील सदस्यांना बाहेरगावी जायचे असल्यास ज्येष्ठ नागरिकांनाही काही वेळा पंधरा-वीस दिवसांसाठी अल्पकालिन वृद्धाश्रमात ठेवण्याची गरज भासते. अशा वृद्धाश्रमातील प्रशिक्षित रुग्णसेवकांना रोजगाराची संधी मिळू शकते, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.continue
Continue माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे यावेळी म्हणाल्या, महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी माविम काम करत असून सुमारे साडेसोळा लाख महिलांचे संघटन उभे राहिले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची तसेच महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन हे प्रशिक्षण हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईला जवळ असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील महिलांची निवड केली असून दोन सत्रात प्रत्येकी 20 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाईल. पुढील काळात राज्यातही असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू. सध्या कोरोना परिस्थितीमुळे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार असून पुढील काळात प्रात्यक्षिक प्रशिक्षण प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) घेण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विशेष म्हणजे या सर्व प्रशिक्षणार्थींना रोजगार, नोकरीची संधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ReplyDeleteॲड. निर्मला सामंत प्रभावळकर म्हणाल्या की, उपलब्ध माहितीनुसार सध्या देशात सुमारे 11 कोटी ज्येष्ठ नागरीक असून पुढील 15-20 वर्षात ही संख्या 25 कोटीच्या घरात जाईल असा अंदाज आहे. एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये ज्येष्ठांची काळजी घेणे सोपे जाते. परंतु, शहरीकरण, रोजगारासाठी स्थलांतर यामुळे ज्येष्ठ नागरिक एकाकी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन हे रुग्णसेवा प्रशिक्षण देण्याची संकल्पना पुढे आली.
डॉ. शुभा राऊळ यांनी ज्येष्ठांची आपुलकी आणि व्यवसायिक अशा दोन्ही बाबींची सांगड घालत रुग्णसेवकांनी सेवा करण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठांना मानसिक आधार देणे गरजेचे असून त्यांचे छंद जपण्यात, लसीकरण, आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी रुग्णसेवकांनी काम करावे, असे त्या म्हणाल्या.
श्रीमती सविता मालपेकर यांनी ज्येष्ठांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून कोरोना कालावधीमध्ये नाट्य- चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नागरिकांना आधाराची गरज असल्याचे सांगितले. त्यावर उपसभापती ॲड. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ कलावंतांची यादी करण्याची सूचना केली. तसेच त्या अनुषंगाने काही मदत करता येईल का यादृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
श्रीमती श्रद्धा जोशी यांनी माविमने कोविड काळात सदस्य महिलांना रोजगार मिळवून देण्यासह या महिलांच्या माध्यमातून मास्कनिर्मिती, धान्य बँक, अल्पदराने भाजीविक्री, शिवभोजन थाळी केंद्रांचे संचालन समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. कोरोना नंतरच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन हे प्रशिक्षण हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अमृता पाटील यांनी रुग्णसेवा अभ्यासक्रमाच्या स्वरुपाची माहिती दिली. सामाजिक जाणिवेतून या प्रशिक्षासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.
डॉ. रेखा भातखंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक श्रीमती उत्तरा मोने यांनी केले.
००००
हनुमान जयंती साधेपणाने घरीच साजरी करावी
ReplyDeleteगृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 23 : हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी दि. 27 एप्रिल, 2021 रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाने केले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
कोरोना स्थितीत सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. 13 एप्रिल, 2021 च्या आदेशामधील मुद्दा क्र. 1,2,7 व 10 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. कोरोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत.
कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका,<span style="font-size: 12.0pt; font-f
ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे
ReplyDeleteप्रश्न १ - डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का?
उत्तर - होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित आहे.
प्रश्न २ - कोणत्या श्रेणीतील लोकांना लोकल ट्रेन चा वापर करता येईल?
उत्तर - फक्त सरकारी कर्मचारी/ अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना लोकल ट्रेन चा वापर करण्याची परवानगी असेल. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मुभा नसेल. शासनाच्या आदेशाप्रमाणे अपवादात्मक स्थितीत सूट दिलेल्या आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लोकल ट्रेन ने प्रवास करता येणार नाही. शासन म्हणजे स्थानिक शासन/ एम सी जी एम, टी एम सी इतर महामंडळे, जिल्हा परिषद, शासकीय प्रशासन, वैधानिक आयोग आणि एजन्सी.
प्रश्न ३ - निर्यात करणारे एकक कार्य करू शकतात का?
उत्तर - निर्यात करणाऱ्या एककांना फक्त चालू निर्यात संबंधी वचनबद्धता पूर्ण करण्याच्या मर्यादेपर्यंत कार्य करण्याची अनुमती असेल. तसेच पूर्वी तयार झालेले मालाची निर्यात करता येईल. या मालाच्या वाहतुकीला सुद्धा सूट देण्यात आली आहे परंतु निर्यात साठी माल तयार करण्याची परवानगी फक्त अश्या युनिटना असेल, की ज्यांना 13 एप्रिल 20 21 च्या आदेशा मध्ये सवलत देण्यात आली आहे.
प्रश्न ४ - सर्व बँकांना 15 टक्के उपस्थिती वर काम करता येईल का?
उत्तर - होय. १३ एप्रिल २०२१ च्या राज्य शासनाच्या आदेशानुसार कलम पाच अंतर्गत बँका
सूट देण्यात आलेल्या वर्गात सामील आहेत. म्हणून सर्व बँकांना 15 टक्के क्षमतेनिशी काम करता येईल, (किंवा 5, जो कोणता जास्त असेल)
प्रश्न ५ – टॅक्सी किंवा रिक्षाची सेवा कोण कोण घेऊ शकतात?
उत्तर – अ. राज्य शासनाच्या १३ एप्रिल २०२१ च्या आदेशानुसार ज्या लोकांना आवश्यक किंवा सवलत वर्गात सामील करण्यात आले आहे आणि तदनंतर सुधारित आदेशाची समाविष्ट करण्यात आले आहे.
ब. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती करिता.
क. १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये रास्त कारणासाठी, जसे की परीक्षा, विमानतळाला येणे-जाणे, लांब पल्ल्याचे रेल गाड्या व बस स्थानक/
प्रश्न ६ - आंतर जिल्हा प्रवाशाला परवानगी आहे का?
उत्तर - बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या व्यतिरिक्त खाजगी कार व इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल परंतु प्रवासासाठी अतिशय आवश्यक कारण असावे. यामध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील मयत लोक, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या आणि बसेस मार्फत प्रवास करू शकतात. परंतु आदेशा मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना गृह विलगीकरण व्हावे लागतील.
प्रश्न ७ - सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यागतांची परवानगी असेल का?
उत्तर - परवानगी नसेल. परंतु नोंदणी करण्यासाठी नागरिकांना मुभा असेल आणि ते पूर्व नियुक्ती सह निबंधक कार्यालयात जाऊ शकतात. या कार्यालयांनी अर्ज करून डी एम ए कडून परवानगी मिळविली नसेल तर त्यांना फक्त 15 टक्के हजेरी सह कार्य करता येईल.
प्रश्न ८ - शाळा /महाविद्यालय /विद्यापीठ?
उत्तर - शाळा /महाविद्यालय व विद्यापीठ बंद करण्यात आले आहे. परंतु संबंधित शाळा/ महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे प्रशासनाला आवश्यकता असल्यास ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिसरात पाचारण करू शकतात. परंतु फक्त पंधरा टक्के हजेरी सह. (किंवा 5, जो कोणता जास्त
प्रश्न ९ - सक्तीचे आर टी पी सी आर, आर ए टी किंवा ट्रू नेट चाचणी कोणासाठी अनिवार्य असेल?
ReplyDeleteउत्तर - आर टी पी सी आर चाचणी आर ए टी चाचणी परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचारी, अधिकार्यांसाठी अनिवार्य असेल. उदाहरणार्थ अधीक्षक, पर्यवेक्षक इत्यादी. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी लग्न समारंभ असेल त्या हॉलच्या कर्मचाऱ्यांना. यात वेटर, केटरर इत्यादींचा समावेश असेल. होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी यापुढे ते आवश्यक राहणार नाही. त्याचप्रमाणे 13 एप्रिल 20 21 च्या आदेशा मध्ये आवश्यक नसलेल्या अधिकारी कर्मचारी व इतर लोकांना ही चाचणी आवश्यक नसेल.
प्रश्न १० - होम डिलिव्हरी ही फक्त ई-कॉमर्स च्या व्यक्तींकडे करावी किंवा कोणीही करू शकतात?
उत्तर - अस्थापने द्वारा अधिकृतरित्या जबाबदारी दिलेल्या व्यक्तींना होम डिलिव्हरी करण्याची मुभा असेल, मग ते एखाद्या ई-कॉमर्स कंपनीचे असतील किंवा नसतील. परंतु या लोकांना नेहमी सिद्ध करावं लागेल की, ते होम डिलिव्हरी कुठे करत आहेत.
प्रश्न ११ - जर एखादी व्यक्ती रास्त कारण नसताना (किंवा वैद्यकीय आपत्काल, मृत्यू) प्रवास करताना आढळून आल्यास त्याला दंड ठोठावला जाईल. कोणते प्राधिकरण दंडा आकारतील आणि जर तो/ ती दंड भरू शकत नसेल तर पुढे कोणती कारवाई केली जाईल? त्यांचे वाहन जप्त केले जाईल किंवा कसे?
उत्तर - स्थानिक डी एम ए, घटना कमांडर आणि त्यांनी अधिकृत केलेल्या कोणालाही दंड आकारता येईल. जर एखादी व्यक्ती दंड भरण्यात असमर्थ असेल तर मोटर वाहन कायदा किंवा बी पी ए सारख्या कायद्याअंतर्गत कारवाई केली जावी.
प्रश्न १२ - आंतरजिल्हा प्रवासा बाबत पोलिसांनी तपासाव्याच्या कोणत्याही पुराव्याचा उल्लेख नाही की ज्याच्या आधारे पोलीस त्या व्यक्तीस जिल्ह्याबाहेर जाऊ देतील?
उत्तर - प्रवासासाठी स्वीकारहर्य असलेल्या कारणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सध्या या स्थितीला पास प्रणाली निर्धारीत करण्यात आलेली नाही. रास्त पुरावे स्वीकारले जातील. प्रवासाचे कारण वाजवी असतानासुद्धा आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची चूक करू शकतो, याची जबाबदारी अंमलबजावणी करणार्या एजन्सी वर देण्यात आली आहे.
प्रश्न १३ - गृह विलगीकरण, सूक्ष्म कंटेनमेंट झोन यांच्या अमलबजावणी संबंधी स्पष्टता नाही. स्पष्टीकरण दिले जाऊ शकते का?
उत्तर - सूक्ष्म कंटेनमेंट बद्दल दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वात पुरेशी माहिती देण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक डी एम ए पुढील पावले उचलू शकतात. जर एस डी एम ए यांचे आदेश एखाद्या मुद्द्याबद्दल दिलेले नसतील तर स्थानिक डी एम ए ला त्यावर स्थानिक परिस्थिती अनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे. यात जर एखाद्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करायचे असल्यास एस डी एन ए यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.
प्रश्न १४ - 20 एप्रिल 21 च्या आदेशाप्रमाणे होम डिलिव्हरी रात्री आठ पर्यंत करता येईल हे नियम झोमॅटो आणि स्विंगी यांच्यासाठी ही लागू असेल का?
ReplyDeleteउत्तर - त्या आदेशा प्रमाणे स्थानिक डी एम ए ला या वेळेत विस्तार करण्याचे अधिकार आहेत. कोणत्याही विशेष वाणिज्यिक संघटनेसाठी एखादा नियम नसावा. एक सारखी सेवा पुरविणाऱ्या सर्व स्थापना एक सारखी वेळ मर्यादा दिलेली असेल.
प्रश्न १५ - शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम बद्दल काही आदेश?
उत्तर - ही मंजूर रजा नाही. 85 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी घरातून काम करावे. विविध विभागांनी ऑफिस तसेच टॅली- मीटिंग प्रणाली स्वीकारावी.
प्रश्न १६ - वकील आणि लीपिकांसाठी दिलेल्या प्रवासाच्या परवानगी मध्ये संदिग्धता आहे. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकांवरती बार आणि त्यांच्या लिपिकांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे.
उत्तर - वकिलांचे कार्यालय आवश्यक सेवेचा भाग म्हणून उघडे असतील आणि म्हणून प्रवास हा रास्त कारणासाठी असल्याचे गृहीत धरले जाईल. परंतु त्यांना लोकल ट्रेन, मेट्रो किंवा मोनो रेल ने प्रवासाची मुभा नसेल. ते खाजगी कार, टॅक्सी किंवा खाजगी व सार्वजनिक बस ने प्रवास करू शकतात.
प्रश्न १७ -एखाद्या शहरामध्ये अडकलेली व्यक्ती व्यक्तिगत कारने आपल्या घरी जाऊ शकते का? व्यापारासाठी आंतर जिल्हा प्रवासाला परवानगी असेल का? विमान बुकिंग केलेल्या प्रवासी महाराष्ट्राच्या विविध शहरातून मुंबई विमानतळाला कॅब ने जाऊ शकतात का?
उत्तर – १- इतर राज्यांमध्ये अडकलेले लोक विमानाद्वारे किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या किंवा बसेस किंवा टॅक्सी किंवा सार्वजनिक वाहतूक द्वारे येऊ शकतात.
२- व्यापारासाठी आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी नाही.
३- याला परवानगी तेव्हाच दिली जाईल जेव्हा हे सिद्ध होईल की त्यांच्या मूळ शहरात विमानतळ नाही आणि टॅक्सी मध्ये असलेल्या प्रत्येक प्रवाशाकडे बोर्डिंग पास असेल. अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने याची शहानिशा करावी आणि एखादी व्यक्ती दुरुपयोग करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी.
अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर
ReplyDeleteकर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
- धनंजय मुंडे
दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील
अनुदानित शाळांतील 11 हजार 58 कर्मचाऱ्यांना होणार लाभ
मुंबई, दि. 23 : सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील 4 हजार 899 शिक्षक आणि 6 हजार 159 शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 11 हजार 58 कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील 11 हजार 58 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.
त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय व वित्त विभागाने समन्वय साधून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने आज 23 एप्रिल रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील 11 हजार 58 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने, राज्यभरातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी श्री. धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत.
दरम्यान 11 हजार 58 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासूनचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
*‼️ प्लेटलेट्स म्हणजे काय ? ‼️*
ReplyDelete➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्लेटलेट्स म्हणजे काय ?* हा प्रश्न अनेकांना पडतो. बरेच वेळेस आपल्याला ताप येतो, डेंगू मलेरिया टाइफाइड कॅन्सर इत्यादी आजारांमध्ये आपल्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते,
तरी डॉक्टर निदान करून आपल्याला सांगतात की तुम्हाला यांना प्लेटलेट द्यावा लागेल त्यावेळेस आपल्याला प्लेट विषयी प्लेटलेट विषयी थोडीशी माहिती मिळते.
हिमोग्लोबिन,प्लाझ्मा प्रमाणे प्लेटलेट्स हा देखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं महत्त्वाचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच आकाराने चपटे असल्यामुळे एखाद्या प्लेट प्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.
रक्तामध्ये प्रामुख्याने तीन घटक असतात. लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारण पणे ५-९ दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
*प्लेटलेट्सचं कार्य*:
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
*प्लेटलेट्सची संख्या* :
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या १.५ लाख ते ४.५ लाख असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.
संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास शरीराच्या कुठल्याही भागातून रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
*प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं* :
* डेंग्यू, मलेरियाचा ताप
* अनुवंशिक आजार
* केमोथेरपी
*संख्या कमी झाल्यास* :
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे २-३ दिवसांचा ताप आल्यास, त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाय योजना करावी.
*प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास* :
* लसूण खाऊ नये.
* अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
* अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
* दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
* सुऱ्या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
* बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
* त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
*प्लेटलेट्स वाढवण्यासाठी* :
* जर शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.continue
मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना
ReplyDeleteमुंबई, दि. 28 : आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस रेल्वे स्थानकावर कामगार विभागामार्फत चाइल्डलाईन या अशासकीय संस्था व पिरॉमिल ग्रुपच्या सहकार्यातुन सहाय्यता कक्षामार्फत नाष्टा पाकिटे व पाणी इत्यादी गरजेच्या वस्तुचे स्थलांतरीत कामगारांना वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कामगार उप आयुक्त संकेत कानडे, सहाय्यक कामगार आयुक्त सुनिता म्हैसकर व सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कावले उपस्थित होते.
मुंबई शहराच्या कामगार उप आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, अपर कामगार आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्याकरीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकारी यांचे दुरध्वनी/मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल याबाबतची माहिती सोशल मिडियाद्वारे प्रसिध्दी करण्यात आली आहे.
आठवड्यातील 7 ही दिवस हे कार्यान्वीत आहे. या कक्षामार्फत नोडल अधिकारी यांच्याकडील प्राप्त तक्रारी तसेच कार्यालयास प्राप्त होणा-या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात येते.
बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन व रात्रीचे भोजन देण्यात येत आहे. शासनाने दि. 22 एप्रिल, 2021 रोजी नोंदित बांधकाम कामगारांकरीता रु.1500/- प्रत्येकी आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सी.एस.टी, बॉम्बे सेंट्रल, दादर, या प्रमुख रेल्वेस्थानकांवर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांना स्थलांतरीत कामगारांची माहिती घेऊन त्यांना सहाय्यता करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याबाबतचे बॅनर रेल्वे स्थानकाचे दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उद्या
ReplyDeleteउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. 28 : केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या दि. 29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करण्यात येणार आहे, असे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
000
कामगारांच्या समस्या निवारणासाठी
नोडल अधिकारी नियुक्त
मुंबई, दि. 28 : कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारीं संबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय व मुंबई शहर कार्यालयाकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नोडल अधिकारी यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधीतांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे.
नोडल अधिकारी यांची माहिती : सतिश तोटावार, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 9960613756, ई-मेल adclkokandivision@gmail.com. मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी, भ्रमणध्वनी क्र. 8451846222, प्रविण जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 8329695218, ई-मेल dyclmumbaicity gmail.com कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई (मुंबई मुख्यालय) मुंबई शहर कार्यालय, मुंबई
सर्व जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याची राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना
ReplyDeleteमुंबई, दि. 28 : कोरोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २७) भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉस संस्थेने अधिक सक्रियतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मास्क वाटप, कोरोनाविषयक जनजागृती, लसीकरण आदी कार्यात रेडक्रॉस संस्थेने सहभागी होण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी भारतीय रेडक्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे महासचिव तेहमुरस्प सकलोथ यांनी संस्थेतर्फे राज्यात केल्या जात असलेल्या कार्याची राज्यपालांना माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष होमी खुस्रोखान हे देखील यावेळी उपस्थित होते.
**
Governor Koshyari asks Red Cross Society to work more actively for COVID-19 relief work
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari asked the Maharashtra Branch of Indian Red Cross society to work more actively across all districts of Maharashtra during the ongoing situation arisen by the second wave of COVID-19 pandemic.
Addressing the office bearers of the Maharashtra Branch of India Red Cross Society on Tuesday (27th), the Governor said volunteers of the State Red Cross may participate in works such as distribution of masks, creation of awareness about prevention of Corona Virus Disease and also in the vaccination programme.
General Secretary of the Maharashtra Branch of the Indian Red Cross Society Tehmurasp Sakloth apprised the Governor of the work being done by the Maharashtra Branch in various districts of the State. Vice Chairman Homi Khusrokhan was also present.
अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त*
ReplyDelete*___________________________*
*१) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.*
*२) मूत्रपिंड तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.*
*३) पित्ताशय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही ११ चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.*
*४) लहान आतडे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.*
*५) मोठे आतडे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.*
*६) फुफ्फुसे तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.*
*७) यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.*
*८) हृदय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.*
*९) स्वादुपिंड तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात.*
*१०) तुमचे डोळे तेव्हा घाबरतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता. आणि____*
*११) तुमचा मेंदू तेव्हा घाबरतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.*
*तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या आणि त्यांना घाबरवू नका.*
*हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही म्हणून ह्यांची काळजी घ्या.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*गरज नसतांना मास्क*_
_*वापरण्याचे धोके*_
मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे. जर ते आपण अधिक काळ वापरल्यास.
1. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
2.मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो.
3.तुम्हांला अशक्तपणा जाणवू लागतो.
4.परिणामी मृत्यू ही ओढवण्याची संभावना बळावते.
*उपाय / सल्ला*
अ.)तुम्ही जेव्हा एकटे असाल मास्क तेव्हा विनाकारण मास्क परिधान करू नका.मी बऱ्याचदा असे पाहतो की,बरेचसे लोक वातानुकूलित (A.C.)कारमध्ये सुद्धा मास्क परिधान करतात. याला काय म्हणावे अज्ञान किंवा निरक्षरता?
ब) शक्यतो घरी मास्क वापरू नये.
क) गर्दीच्या ठिकाणी किंवा जेथे एक किंवा अधिक लोक एकमेकांच्या खूपच जवळ संपर्कात येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी मास्क वापरावे.
ड) जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा मास्कचा उपयोग कमीत कमी करा.
*सुरक्षित राहा*
ही माहिती फक्त तुमच्याप्रत मर्यादित ठेवू नका तर ती तुमच्या कुटुंबातील सदस्य व मित्र परिवारांना देखील पाठवा.
*डाँ. जयवंत लेले -: कस्तुरबा हाँस्पिटल मुंबई.*
कोरोना संकटात प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करावे
ReplyDelete-- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
· विद्यापीठांनी जनजागृती कार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे
मुंबई, दि. 27 : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक गंभीर असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी तसेच संलग्न महाविद्यालयांनी आघाडीवर राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील विद्यापीठांना केली.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच एनसीसी कॅडेटस यांच्या सोबतच विद्यार्थी संघटनांना देखील रक्तदानासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची सूचना करताना कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या कार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी विद्यापीठांना केली.
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृश्य माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व कुलगुरूंनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी केलेली कार्यवाही तसेच भावी योजनांबद्दल राज्यपालांना माहिती दिली.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सध्याचा काळ शिक्षण क्षेत्राकरिता आव्हानात्मक आहे. सर्व विद्यापीठे आपापले अभ्यासक्रम व परीक्षा दूरस्थ पद्धतीने घेत आहेत. मात्र समाजाच्या आणि देशाच्या देखील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यापीठांचे देखील समाजाला या कठीण प्रसंगी मदत करणे नैतिक कर्तव्य आहे. विद्यापीठांनी प्रशासनाला आपणहून मदत करून प्रशासनावरील ताण कमी करण्यास मदत करावी.
अजूनही सर्व लोक मास्कचा वापर करीत नसल्यामुळे दररोज हजारो लोकांना दंड होत आहे. याकरिता महाविद्यालय व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना जनजागृतीच्या कार्यात सहभागी करून घ्यावे. जनजागृतीमुळे देखील अनेक जीव वाचतील.
कोरोना निवारण कार्यासाठी विद्यापीठांनी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी मिळविण्याचे दृष्टीने योजना तयार कराव्या अशीही सूचना राज्यपालांनी केली.
मास्क तयार करणे, मास्क वितरण करणे यांसारख्या कामासोबतच विद्यापीठांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून गरजू व्यक्तींसाठी रक्त संकलन करावे. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गोरगरीब व्यक्तींच्या भोजनासाठी देखील विद्यापीठांनी अन्नधान्य वितरण करावे.
राज्यातील बहुतांशी विद्यापीठांनी आपापली विद्यार्थी वसतिगृहे व अतिथीगृहे विलगीकरणासाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिली असल्याची माहिती यावेळी कुलगुरूंनी राज्यपालांना दिली. अठरा वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विद्यापीठांनी महाविद्यालयांच्या सहकार्याने योजना तयार केल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राणवायू निर्मिती यंत्रणा कार्यान्वित करीत असल्याची माहिती कुलगुरू नितीन करमळकर यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाने आपल्या अखत्यारीतील महाविद्यालयांचे लसीकरणाच्या दृष्टीने गट तयार केले असून महाविद्यालयांना ऑक्सिमीटर व थर्मामीटर देण्यात येणार असल्याचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
0000
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या
ReplyDeleteमुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध
मुंबई, दि. 27 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 21 एप्रिल ते 19 जून 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.
याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, एस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.
000
21 वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुलांनाही कोरोनाच्या पार्श्वभुमीवर
अनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्यावी
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची महिला व बाल विकास विभागास सूचना
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर 21 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाही अनुरक्षण गृहात राहण्यास मुभा देण्याची सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिला व बाल विकास विभागास पत्राद्वारे केली आहे.
अनुरक्षण गृहात राहणाऱ्या ज्या मुला-मुलींचे वय 21 वर्ष पूर्ण झाले आहे अशा मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची मुभा नसते. ही मुलेमुली या परिस्थितीतून सुद्धा बाहेर पडून चांगले जॉब आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह चालवत असतात.
सध्या राज्यात येरवडा अनुरक्षण गृहात 100 मुलांच्या राहण्याची व्यवस्था आहे. मात्र सध्या येथे 18 मुले राहत आहेत. तर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर येथील प्रत्येक अनुरक्षण गृहाची 100 मुलांची क्षमता आहे. या ठिकाणीही क्षमतेपेक्षा कमी मुले आहेत. यामुळे सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ज्या मुलांनी रोजगार गमाविलेला आहे अथवा जे गरजू आहेत अशा 21 वर्षापुढील अनाथ मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक संस्था आणि अनाथ मुलांकडून करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रातील कामगारांना आणि गरजूंना आर्थिक आणि धान्याची मदत करण्यात आली त्याअनुषंगाने अनुरक्षण गृहातून बाहेर पडलेल्या मुलांना लॉकडाऊन स्थिती सुरळीत होईपर्यंत यथायोग्य आर्थिक व धान्याची मदत देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यात यावा.
ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा कुटुंबांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेशन देण्याचा निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे या मुलांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे या तरुणांना रेशनकार्ड द्यावे. तसेच अनाथ ओळखपत्र असलेल्या मुलांना थेट मोफत रेशन देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
000
अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत...ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत
ReplyDeleteभर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस अल्वारेंगा...
अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते ,,भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस अल्वारेंगा...
जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे.एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र!
जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५०० किलोहुन अधिक मासळी पकडली. दोघेही खूप खुश होते.
पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. अचानक भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरजोरात पाऊस कोसळू लागला. त्यांनी लगबगीने किनारा गाठायचा प्रयत्न केला. पण वादळामध्ये रस्ताच सापडत नव्हता. जोरदार पावसामुळे किनारा दिसायचा बंद झाला आणि त्यांची बोट खोल समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली. हे वादळ पुढे ५ दिवस तसेच सुरु राहिले.
वादळामुळे बोटीला खूपच मार बसला. बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली, मोटर वाहून गेली. त्यांनी रेडिओवरून स्वतःच्या मालकाशी संपर्क करायचा प्रयत्न केला. पण त्यांचे अचूक स्थान निश्चित न करता आल्यामुळे आणि वादळ दीर्घकाळ टिकल्यामुळे बचाव पथक माघारी परतले. दोन्ही मच्छिमार समुद्रामध्ये बुडून मृत्यू पावले असतील असा समज करून त्यांनी शोधकार्य थांबविले.
बोटीवर असलेले खाद्य अवघ्या काहीच दिवसांत संपले. पावसाचे पाणी साठवून त्यांनी ते प्यायला सुरुवात केली. खूप दिवस पाऊस न पडल्यास त्यांना स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माश्यांचे रक्त पिऊन दिवस ढकलावे लागायचे. ( समुद्राच्या पाण्याचा एक थेंब म्हणजे 0.001 ग्रॅम मीठ. आपले शरीर या सोडियमला सहन करण्याइतपत सक्षम नसते. मूत्रपिंडावर दबाव येऊन ते निकामी होण्याची शक्यता , मज्जासंस्थेचा नाश, अंतर्गत अवयवांना विषबाधा, निर्जलीकरण अशा अनेक शक्यता असतात त्यामुळे अत्यन्त संकटात सुद्धा हे पाणी माणूस पिऊ शकत नाही ) जोस अल्वारगेन्गा हा एक तरबेज मच्छिमार होता. मासे, कासव आणि समुद्रपक्षी ह्यांना तो अगदी शिताफीने पकडायचा.
तासामागून तास जाऊ लागले, दिवसामागून दिवस जाऊ लागले, महिन्यांमागून महिने सरू लागले पण त्याना किनारा काही सापडत नव्हता. कोणतीही बोट किंवा विमान पण दृष्टीपथात पडत नव्हते आणि जरी पडले तरी सगळी उपकरणे खराब झाल्यामुळे संपर्क करता येत नव्हता. एव्हाना दोघांनाही कळून चुकले होते कि आता परत घरी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. या अथांग समुद्रामध्येच भरकटत असताना एखाद्या दिवशी मृत्यू कवटाळेल अशी अगतिक परिस्थिती निर्माण झालेली होती
जोस स्वतःला दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचा पण कॉर्डोबा मात्र निराशेच्या गर्तेत लोटला जात होता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होत होता. ४ महिने समुद्रामध्ये अडकून पडल्यामुळे आणि रोज रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला आणि त्याने खाणेपिणे सोडून दिले. काही दिवसांमध्ये त्याचा भुक आणि निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला.
आपल्या सहकाऱ्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला जबर मानसिक धक्का बसला. त्याने कॉर्डोबाचा मृतदेह ५-६ दिवस तसाच ठेवला. काय करावे त्याला सुचेना. त्याच्या मनात पण आता आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याने मनाशी काही तरी दृढनिश्चय केला आणि सहकाऱ्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला.
पुढे अजून ७ - ८ महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता. तब्बल ४३८ दिवसानंतर त्याला पहिल्यांदा आशेचे किरण दिसू लागले. समोरच मार्शल बेटाचा किनारा दिसत होता. लगबगीने तो किनाऱ्यावर पोचला आणि तेथील एका झोपडीचे दार ठोठावले. झोपडीतील माणसांना सुरुवातीला तो जे सांगत होता त्यावर विश्वास बसेना. पण नंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली.
.
ReplyDeleteContinue -
मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क 9650 किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता.
अश्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारगेन्गाने भरकटलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये सर्वांत जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम केला आणि जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे पण सिद्ध केले.
आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये मश्गुल असल्याने जीवन मरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा कविता आणि मनोरंजनाचा विषय किंवा फारतर चित्रपटाचा विषय असू शकतो. त्यामुळे साधे-साधे अडचणीचे प्रसंगसुद्धा आपण अत्यन्त आक्रस्ताळेपणाने किंवा चीडचीड करत हाताळतो. सहज आणि संघर्षरहित जीवनाची इतकी सवय आपण स्वतःला लावून घेतली आहे की घरात भाजीपाला नसेल , किराण्यातला एखादी वस्तू सम्पली असेल तरी आपण कासावीस होतो. कोरोना सारख्या संकटाने घरात बंदिस्त झालेले अनेक आत्मे लहानसहान गोष्टींसाठी तळमळतांना पाहिलं की अशा गोष्टींची आठवण होते. जर जोस अल्वरेंगा त्या बोट मध्ये 438 दिवस जिवंत राहू शकतो, तर हे लॉकडाऊन 15 दिवसांवर गेलंय. आपल्या कडे अन्न पाण्याचा स्त्रोत पण आहे. मग घरात बसून जगायला काय हरकत आहे.
असो...!! हसत जगा, मजेत जगा, आणि घरात रहा..
स्त्रोत: गूगल : The Incredible story of Alvarenga- Who Survived 438 Days Adrift In The Pacific.
जान बचीं,
ReplyDeleteलाखों गये..
शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच.
तिघांनीही प्रत्येकाच्या गळ्याशी चाकू लावून पैशांची मागणी केली. पत्नीने आपल्या पतीच्या गळ्याला लावलेला चाकू पाहून, 'त्यांना मारु नका, पाहिजे ते घेऊन जा.' अशी कपाट उघडून त्यांना विनंती केली. त्या तिघांनी या तिघांना बाथरुममध्ये कोंडले. कोंडताना भिंतीवरील घड्याळ काढून त्यांच्या हातात दिले व म्हणाले, 'मोजून दहा मिनिटे अजिबात बाहेर यायचं नाही. आलात तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही.' सुमारे वीस मिनिटांनी हे तिघे बाथरुममधून बाहेर आले. तोपर्यंत त्या तीन चोरांनी हिरे, सोने, खडे असलेल्या बारा अंगठ्या, कानातील रिंग, हिऱ्याची रिंग, मोत्यांचा चोकर, दोन हार, सोनसाखळी, मंगळसूत्र, दोन ब्रेसलेट, ५ लेडिज घड्याळे, ५ चांदीची काॅईन, रोख ७० हजार रुपये व एक हजार युएस डाॅलर असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
बाथरूममधून बाहेर आल्यावर त्या दाम्पत्याने आपल्या मुलाशी संपर्क साधून घडलेला प्रसंग त्याला सांगितला. पत्नीने पोलीसांकडे फिर्याद दिल्यानंतर त्या चोरांचा तपास सुरु झाला आहे.
ही शहरातील एक प्रातिनिधीक घटना आहे. शहरातील गर्दीपासून दूर रहाण्यासाठी अशा अनेक सोसायट्यांमधून माणसं माणसांपासून 'अलिप्त' राहू लागली. बंगला मोठा, रहाणारे दोघं तिघंच. बहुतेक दोघेही पती-पत्नी वयस्कर. कामाला एखादा नोकर किंवा स्वयंपाक करणारी बाई. मुलं परदेशात स्थायिक झालेली. त्यांचा व्हिडिओ काॅलवरुनच संपर्क. प्रत्यक्ष गाठभेट वर्षा दोन वर्षांनी एकदाच, तीही धावती. अशी अनेक वृद्ध जोडपी प्रभात रोड, सिंध सोसायटी, कोथरूड, बावधन, कल्याणीनगर, वारजे, धायरी, उंड्री, कोरेगाव पार्क परिसरात रहात आहेत.
उच्च मध्यमवर्गीय पती-पत्नी पन्नाशी गाठेपर्यंत स्वतंत्र बंगल्याचं स्वप्न साकारतात. एव्हाना त्यांची मुलं शिक्षण पूर्ण करुन परदेशात काही वर्षांसाठी शिकायला जातात, तिथेच त्यांना चांगली नोकरी मिळते. आई-वडिलांना मुलाच्या लग्नाचे वेध लागतात. आॅनलाईन लग्नाचं स्थळ शोधून एकदाचं घाईघाईत, भारतात लग्न उरकून दोघेही परदेशात जातात. त्यांच्या आई-बाबा होण्याच्या वेळी हे दोघे त्यांच्याकडे सहा महिन्यांसाठी जातात. आजोबा आजी होऊन, पुन्हा भारतात परततात. नातवंडांना मांडीवर खेळवण्याऐवजी, मोबाईलवरून त्यांच्याशी बोलत राहतात.
दोघांनाही निवृत्त झाल्यानंतर, मोठ्या बंगल्यातील रिकाम्या खोल्या खायला उठतात. ज्यांच्यासाठी बंगला बांधला, त्यांच्याशिवाय येणारा एकेक दिवस ढकलतात. आयुष्यभर एकेका वस्तूंची केलेली खरेदी, काही स्वप्नं उराशी बाळगून केलेली असते. भरजरी साड्यांनी भरलेले कपाट असते. कधी सूनबाई त्यातील एखादी साडी हौसेने नेसेल असं वाटत असतं, तर तिला साडीपेक्षा जीन्सवर टी शर्ट सोयीस्कर वाटत असतो.
जमेल तेव्हा गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी करुन कपाटातील लाॅकर भरलेला असतो. कधी सणासुदीला दागिने घालून मिरवायची स्वप्नं अधुरीच राहतात. वयोमानानुसार शुगर व बीपीने दोघांनाही गाठलेले असते. गोळ्या, औषधं, टेस्ट, चेकअप महिन्याला होत असतो.
असं सुरळीत चालू असताना, एखादे दिवशी चोरी होते आणि घरातल्या मौल्यवान चीजवस्तू जातात. हातात काहीही न राहता फक्त जीव वाचल्याचे समाधान रहाते...
परवा व्हाॅटसअपवर सुवर्णा निंबाळकर यांनी पाठवलेला 'गरज' नावाचा लेख, माझ्या वाचनात आला, तो आजच्या पिढीला विचार करायला लावणारा आहे...
त्यात लिहिलं होतं की, एकाच्या आईचं ९५ व्या वर्षी निधन झालं. वडील आधीच गेले होते. ६५ वर्षांच्या त्यांच्या सहजीवनाचा विस्तार म्हणजे तीन मुली व दोन मुलं. आठ-दहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाच्या स्वतंत्र बेडरुम, कपाटे, भरपूर कपडे. एखाद्या कार्यप्रसंगी शंभर माणसं जेवतील एवढी भांडी. हौसेने तीर्थयात्रा, पर्यटनाच्या वेळी आठवण म्हणून खरेदी केलेल्या शोभेच्या वस्तू. शिवाय आधीच्या पिढ्यांचे ऐवज, सामान व वस्तू.
आताच्या घडीला मुलं, मुली त्यांच्या संसारात मग्न. आईपश्चात रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न!.
Continue
जान बचीं,
ReplyDeleteलाखों गये..
Continue
कपाटातील पांचशेंच्या वर साड्या आता कोणी स्विकारायला तयार नाही. शंभर माणसांच्या स्वयंपाकाची उस्तवार आता कोणी करणार नाही. जुनं अवाढव्य फर्निचर कुणाच्याही घरात मावणार नाही. किंमती शोभेच्या वस्तूंची काळजी घेणारं कोणीही नाही. मोठाले दागिने घालून मिरवणे, सांभाळणे आता सुरक्षित राहिले नाही. अडगळी साफ करायला तेवढी शारिरीक क्षमता नाही.
असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर जेवढे चांगले, ते गरजू संसारांना व सेवाभावी संस्थांना देण्यात आले. आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली.
असे करता करता त्या संसाराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली.
या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सहन करावा लागला.
ज्या पिढीने हे सगळं जमविण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले, ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. त्यानंतर हे सांभाळण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही.
तेव्हा आता यापुढे तरी, लागेल तेवढेच खरेदी करावे. आपल्यानंतर उपयोगी पडेल म्हणून जादा खरेदी करु नये. संसार सुटसुटीत करावा.
'किमान गरजांची जीवनशैली' ही काळानुसार अत्यावश्यक गरज आहे...
© - सुरेश नावडकर २८-४-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
विश्वास नावाची गोळी व कोरोना.. by Dr. Sameer gahane, MBBS.
ReplyDeleteआजकाल कोरोना ने थैमान मांडला आहे..डाॅ. म्हणुन काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे..
काही रुग्णांचा सिटी स्कोर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवु लागले.. आपोआप..
माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते बिना आॅक्सिजन , बिना हाॅस्पिटल ला जाता बरे झाले..
ते कसे बरे झाले ह्याच उत्तर डॉक्टरांकडे किंवा विज्ञानाकडे नाही..
.. ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट मला दिसली की ही सर्व लोक सकारात्मक होती..म्हणजे आहेत .. भरपुर सकारात्मकता .. ह्या लोकांचा हा विश्वास होता की ते बरे होणारच.. मला ह्यातुन बरे व्हायचच आहे..
व चमत्कार झाला..
ज्या लोकांना मानवी शरीर व त्याच्या क्षमता कळतात , त्यांच्यासाठी हे नवीन नाही.. हा चमत्कार नाही, मनाच्या प्रचंड शक्तीचा एक नमुना आहे.. मानवी शरीर जगातल्या कोणत्याही आजाराला स्वतःहून बरे करू शकतो असे काहींचे मत आहे.. किंवा त्या शक्तीची जाणीव व्हावी... व हे 1000% सत्य आहे..
असे कितीतरी न बरे होणारे आजार विश्वासाच्या बळावर बरे झालेले आहेत.. असे कितीतरी कॅन्सर पेशन्ट आहेत. की ज्यांना डाॅ नी सांगितल की म्रुत्यु समोरच्या ५-६ महीन्यात अटळ आहे..पण नंतर ६ महीन्यांनी चेक केल तर कॅन्सर चा नामोनिशान नव्हता..
प्रत्येक गोष्ट ही मानवी ज्ञानाच्या चौकटीतच बसेल अस नाही.. वैद्यकीय ज्ञानाला बरयाचश्या सिमा आहेत व त्यात बघितल तर मानवी शरीर आजही अनभिन्न आहेत..
Continue. मानवी शरीर स्वतःच एक डाॅक्टर आहे.. जगातला सर्वात मोठा व सर्वात उत्तम डाॅक्टर.. आपल्या शरीरात / आपल्या रक्तात एक अशी फौज असते की जी सतत कोणत्याही आजाराशी झगडत राहते.. हे वाचता वाचताच शरीराने लाखों विषाणु किंवा जिवाणुचा खात्मा केला असेल.. आपल्या शरीरात नेहमी केमिकल रिअॅक्शन सुरु राहतात.. जे आपण प्राणावायु नाकावाटे घेतो ते त्याच मुळ आहे.. ते नसानसात पोहोचत.. प्रत्येक पेशिला भेटत..
ReplyDeleteकमीत कमी 30,000,000,000,000 ( 30 लाख कोटी ) इतक्या पेशींना .. किंवा त्यापेक्षाही जास्त..
औषध नेमक काय करत.. एक तर ते ह्या शरीरात चालणारया केमिकल रीअॅक्शन ला कमी करते किंवा वाढवते. सगळ गणीत ह्या दोन गोष्टीवर चालत.. ते वेगळ अस स्वतःहुन काही करत नाही.. औषध अस वेगळी जादु करत नाही.. शेवटी जे करायच ते शरीर करत..
आपले विचार हे ह्या सगळ्या पेशिंवर राज्य करतात..
जर आपण मन आपण आनंदी केल तर आपोआप शरीरात चांगल्या केमिकल रीअॅक्शन घडुन येतात.. व आपल्याला चांगल वाटायला लागत..
जेव्हा चांगला विचार करतो , तेव्हा शरीरात हॅप्पी हाॅर्मोन स्त्रवतात व आपल्याला चांगला वाटत.. जेव्हा आपण वाईट विचार करतो किंवा घाबरतो तेव्हा एकदम त्याच्या विरुद्ध होत..
आपली रोगप्रतिकार शक्ती ही इतकी प्रभावी आहे.... व रोगप्रतिकार शक्ती व विचारांचा खुप जवळचा संबंध आहे.. ह्या कठीण वेळी आपण ह्या संबंधाचा कसा वापर करु शकतो हे महत्वाच आहे..
थोडक्यात सांगायच तर आपल शरीर अम्रुतही बनवु शकते व विषही..
आत्तापर्यंत कोणत्याच वैज्ञानिकांना हे गणीत पुर्णपणे समजलेले नाही.. जरी माणुस चंद्रावर जरी पोहोचला असला तरी तो मानवी शरीराचे गुढ रहस्य आहेत ,त्याच्या जवळपासही पोहोचलेला नाही..
तर कोरोनावर येतो..
१०० पैकी ९५ लोकांना काहीच होणार नाही.. पण नुसत्या भितीमुळे त्यांना लक्षणे दिसायला लागतिल.. कारण आपण जसा विचार केला तस आपल्या अंसख्य पेशी ला क्षणात खर वाटायला लागेल.. व तशी लक्षणे आपोआपच जाणवु लागतिल.. त्यामुळे जरी थोडा त्रास जाणविला तर घाबरु नका..अजिबात घाबरु नका.. ताप आला तर घाबरु नका..आपल शरीर त्या बाहेरील शत्रुशी भांडत आहे.. व त्यामुळे चिंता करु नका.. शरीराचे कोरोना विरुद्ध प्रयत्न सुरु आहेत हे समजून घ्या..
जर दोन- तिन दिवसानंतर सुद्धा ताप उघडला नाहीच..लक्षणे कमी झालीच नाहीत.. तर मग औषध घ्या.. ते पण न घाबरता..
घाबरलात तर कोरोना राहिला बाजूला, तुमचं स्वतःच शरीरच शरीरात विष तैयार करेल.. त्यामुळे शांत राहा..
आपल्या कडे ह्या सर्वांवर जगातील सर्वात प्रभावी औषध आहे, आपला स्वतःचा विश्वास.. त्याच्या बळावर आपण कसे बरे होऊ शकतो हे पुढे सांगतो..
आपण आपल्या विश्वास नावाच्या शक्तीला वापरु शकतो.. आपल शरीराल फक्त तसे आदेश द्यायचे आहेत.. मग सगळ त्याच्यावर सोपवा...
डाॅवर विश्वास ठेवाच कारण मी स्वतःच डाॅक्टर आहे .. त्यामुळे हे सांगतोय.. डाॅक्टर वर अविश्वास दाखवु नका.. पण समोरचा डाॅक्टर हा शिकलेला असावा.. आजकाल योग्य डीग्री नसतांना सुद्धा लोक स्वतःला डाॅक्टर म्हणवुन घेतात.. किंवा ज्याच ज्ञान नाही ते दुसरयांच बघुन औषध देतात.. त्यांच्यापासुन सुद्धा सावधान..
पण सर्वात महत्वाच म्हणजे आपल शरीर स्वतःच एक डाॅक्टर आहे.. फक्त त्याला योग्य तो आदेश हवा.. त्याला योग्य तो आदेश द्यायचा.. सकारात्मता द्यायची..
काही गोष्टी सांगतो .. त्याचा अवलंब करा..
_ तुमच्या आवडीची गाणी ऐका.. जेणेकरुन तुमच मन प्रसन्न राहील..
- तुम्हाला कोरोना ची कितीही लक्षणे असली , औषध उपचार सुरु असला.. तरी अजिबात घाबरु नका..
- मनातल्या मनात स्वतःला हे सांगत राहा की मी नक्की नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मला काहीही झालेल नाही.continue
राहील..
ReplyDelete- तुम्हाला कोरोना ची कितीही लक्षणे असली , औषध उपचार सुरु असला.. तरी अजिबात घाबरु नका..
- मनातल्या मनात स्वतःला हे सांगत राहा की मी नक्की नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मला काहीही झालेल नाही..
- कोरोना झाला असेल किंवा नसेल .. श्वसनाचे व्यायाम करा. अनुलोम , विलोम ( कमीत कमी ४ मिनिट ).. ओम चा जाप हा कमीत कमी २५ दा तरी करा ( दिवसातुन ३-४ दा )..
- ज्यांना कोरोना झाला असेल त्यांना आवर्जुन फोन करा.. त्यांना सांगा की तु नक्की बरा होशीलच...कारण १०० पैकी ९० -९५ लोक बर होत आहेत...
- जरी कुणी आयुर्वेदीक काढा ने कोरोना बरा होतो अस सांगत असेल तर ते घेण्यास सुद्धा हरकत नाही.. ( त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.. विश्वास ठेवा..विश्वास स्वतःच एक औषध आहे.. .. .. )..
- भुक लागत नसेल तरी स्वत:ला हे सांगा की मला ह्या ह्या वेळी चांगल पोटभर जेवायच आहे.. तशी कल्पना करा ..की मी जेवत आहे.. पोटभर जेवत आहे..
- चांगल पोष्टीक अन्न खा.. वरण , पोळी, भात , भाजी, नारळ पाणी ( दिवसातुन ४-५ ग्लास ),फळांचा ज्युस/दुध, लिंबुपाणी, अंडी .. तुम्हाला जी भाजी आवडते , जे आवडत ते वेगवेगळे पदार्थ आवर्जुन खा..ते पदार्थ पोष्टीक असावेत..
- चांगली आनंदी झोप घ्या.. झोप सुद्धा औषधाच काम करते..अजिबात चिंता करायची नाही.. शांत झोप घ्यायची मित्रांनो.. उद्याच उद्या बघुया..
- ज्यांना कोरोना झालेला आहे ..त्यांनी परत परत कागदावर , वहीवर , मोबाईलवर लिहा की मी बरा होईन , मला काही एक झालेल नाही आहे.. जेणेकरुन तुमच्या ते मनाला मान्य होईल.. कमीत कमी १० दा तरी हे लिहा.. खाली टाईमपास करत असाल तर हे करा.. परत परत लिहा , परत परत टाईप करा.. एकच वाक्य..
_ आजकाल समाजमाध्यम , न्युज नकारात्मकता जास्त पसरवत आहेत... पण ते जे सांगत आहेत.. ते अर्धसत्य आहे..हजार पैकी ५ लोक ह्यांना त्रास आहे.. तर ते हे कधीच दाखविणार नाही की ९९५ लोक स्वस्थ आहेत.. त्यामुळे ते बघणे टाळा.. ते तुम्हाला व तुमच्या शरीराला विष तैयार करण्यासाठी मजबुर करत आहेत..
- डोळ बंद करा.. व १० मिनिट तरी बस श्वासावर लक्ष ठेवा...श्वास येत आहे, श्वास जात आहे.. बस इतकीच अनुभुती . बाकी सगळ त्या क्षणासाठी विसरुन जा... कोणता मनात विचार नाही.. कोणता मनात आस नाही... कोणती मनात भिती नाही.. आपल्या स्वतःला त्या श्वासाला समर्पित करा.. जेव्हाही तुम्हाला घाबरल्या सारख वाटेल.. तेव्हा तेव्हा हे करा.. तुम्ही हे झोपुन सुद्धा ,बेडवर सुद्धा करु शकता.. हे तुमच्या आंतरिक मनापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आहे.ह्याचा हजारो -लाखो पटीने फायदा होईल.. ( कमीत कमी 5 दिवस तरी नियमित करा, नियमितपणे केल्यास तुमचं पूर्ण जीवन बदलून जाईल ह्याची शास्वती देतो.. )..
- योग्य डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.. स्वत:हुन किंवा मेडीकल शाॅप वाल्याच्या सल्ल्यावरुन औषध घेवु नका.. जरी तुम्हाला नावे माहीत असतील तरी.. डाॅ नी दिलेल्या सुचनांच पालन करा.. औषध वेळेवर घ्या..
व एक शेवटचं.. 10-15 दिवस कोरोनाचे संपले की तुम्हाला काहीही होणार नाही.. आपल्या शरीराने कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकलेले आहे, पण ह्या युद्धात आपल थोडं काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे काही दिवस थोडा अशक्तपणा राहील.. त्याची काळजी अजिबात करू नका.. परत तेच पोष्टिक आहार व सकारात्मक विचारांची संगत.. काही दिवसात तुमचं शरीर अधिसारखंच सुदृढ होईल..
मित्रांनो , मन व मनाची शक्ती अथांग आहे.. चला ह्या शक्तीचा कोरोना ला पळविण्यासाठी उपयोग करुया..जस काही लोकांनी शेवटच्या क्षणी सुद्धा आतंरीक उर्जेच्या बळावर कोरोनावर मात केली , तसच आपण करुया..
जे कुणी वाचत असेल किंवा जो कुणी ह्या वेळी त्रासात असेल.. विश्वातिल समस्त चांगल्या शक्तींना मी ह्या क्षणी प्रार्थना करतो की त्या सर्वांची दु:ख दुर व्हावी..त्यांचा आजार बरा व्हावा..
लवकरात लवकर बरे व्हा.. तुम्ही बरे होणारच.. अंह, अजिबात घाबरायच नाही.. थोड दोन क्षणासाठी हसा बघु..
कोरोना , दो दिन की बात है दोस्त.. जिंदगी अभी बाकी है.. बहुत सी जंग अभी फतेह करनी है.. ये तो बस एक मामुली जंग है.. हिम्मत नही हारना है.. हमे जितना हमे..हम जरुर जितेंगे..
-
by Dr. Sameer Gahane , MBBS ..
(तुम्हाला वाटल की हे कुणाला तरी उपयोगी पडेल..तर नक्की शेयर करा.. फक्त मजकुर बदलु नका..व्याकरणाच्या काही चुका असतील, please ignore that 🙏 )..
Donations for corona till now.....
ReplyDeleteTATA: 1500 crore
ITC: 150 crore
Hindustan unilever: 100 crore
Anil agarwal (vedanta): 100 crore
Hero cycle: 100 crore
Bajaj group: 100 crore
Shirdi temple: 51 crore
BCCI: 51 crore
CRPF: 33 crore
Akshay Kumar, actor: 25 crore
Sun pharma: 25 crore
OLA: 20 crore
Paytm: 5 crore + handwash
Mukesh ambani: 500 crore + hospital
Adani Group 500 crore
Anand Mahindra: Hotels + ventilator
Prabhas , actor: 4 crore
Nadella (microsoft): 2 cr.
Anita dongre: 1.5 crore
Allu arjun:. 1.25 crore
Ram charan: 1.40 crore
Somnath temple trust: 1 crore
Pawan kalyan, actor: 1 crore
Mahesh Babu,actor: 1 crore
Chiranjivi, actor: 1 crore
Hema Malini, actor: 1 crore
Bala Krishna, actor:1 crore
Jr NTR, actor:75 lakhs
Suresh raina , cricketer: 52 lakhs
Sachin Tendulkar, cricketer: 52 lakhs
Sunny deol: 50 lakh
Kapil sharma: 50 lakh
Rajnikant: actor :50 lakh
Sourav ganguli: 50 lakh
Almost all Govt employes : 1-5 days of their salary.
And many more respected legends, still pouring
Your favorite companies contribute to the Prime Minister's Disaster Relief Fund to fight the corona virus in India.
Subway: 00
Pizza Hut: 00
Dominos: 00
McDonald: 00
Burger King: 00
Barista: 00
Barbecue Nation: 00
KFC: 00
Flipkart: 00
Amazon: 00
Myntra: 00
Rediff: 00
Snapdeal: 00
Hyundai: 00
Honda:00
KIA: 00
Volkswagon:00
M. Suzuki:00(Surprising)
BMW: 00
Audi:00
Mercedes:00
Do you understand the meaning of Swadeshi?
Only our family stands beside us in the time of needy But all these days we love to make foreign companies earn. At least after this lock down pls only encourage Indian company products so that our GDP will increase and India will bounce back faster than any other country.
Share this message as much as possible till it reaches every true Indian
Jai Bharath
🙏🏻🙏🏻
कोणत्याही कोरोना पेंशन्ट च्या नातेवाईकांना रेमिडिसिव्हर हे इंजेक्शनची गरज लागत असेल तर ब्लैक ने विकणा-या टोळी कडून 30 ते 35 हजारात घेऊ नका,2 दिवसात कंपनी स्वता: पेंशन्ट जिथे ॲडमिट आहे तिथे पाठवेल ते पण mrp 2800 रूपये मध्ये सर्वांना शेअर करून लोकांचा जीव वाचवण्याचं सर्वांत मोठं पुण्य करा🙏🏻माणुसकी धर्म वाढवावा
ReplyDeleteसिप्ला कंपनीचा टोल फ्री नंबर आहे 8657311088 (24 Hrs). ज्या पेशंटला Rendemsivir ह्या इंजेक्शन ची गरज असेल त्या पेशंटला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पुरवठा केला जाईल . मध्ये कोणीही डीलर / डिस्ट्रिब्युटर / हॉस्पिटल असणार नाहीत . यामुळे काळाबाजार करणार्यांना चाप बसेल .जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहोचावा .
ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेचा राज्यात ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ
ReplyDeleteगृह विलगीकरणातील कोरोना रुग्णही घेताहेत आरोग्य सल्ला
मुंबई, दि. ३० : राज्यात गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज किमान ३०० रुग्ण त्याद्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ हजार ८९१ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरणात असलेले रुग्ण देखील या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात गेल्यावर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय उपचार आणि सल्ला मिळावा यासाठी १३ एप्रिल २०२० रोजी ऑनलाईन ई-संजीवनी सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला संकेतस्थळावरून ही सेवा घेण्याची सोय उपलब्ध होती त्यानंतर त्याचे मोबाईल ॲपही विकसीत करण्यात आल्याने त्याच्या वापरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
ई-संजीवनी ओपीडी सेवा मोफत आहे. या माध्यमातून सामान्य तसेच तज्ञ ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या अॅप्लिकेशन मध्ये करण्यात आली आहे. दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी या सेवेमार्फत रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्लामसलत करतात. दररोज सकाळी ९.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५.०० यावेळेत ही सेवा घेता येते. रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि चॅटचा वापर करून घरबसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आजाराबाबत सल्ला घेता येतो.
ई-संजीवनी ओपीडी सेवेमार्फत रुग्णांना सल्ला दिल्यानंतर एसएमएसद्वारे ई-प्रिस्क्रिप्शन रूग्णांना प्राप्त होते. त्याद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधे घेऊ शकतात. ई-संजीवनी ओपीडी सेवेचा वापर घेणे करीता रुग्ण esanjeevaniopd.in या संकेत स्थळाला भेट देऊन डॉक्टरांशी सवांद साधू शकतात. तसेच अँन्ड्रॉईड मोबाइल धारक गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन “esanjeevani OPD National Telconsultation Service” या नावाने देण्यात आलेले अॅप्लिकेशन डाउनलोड करून त्याचा लाभ घेऊ शकतात.
खावटी अनुदान योजनेचा अनुदान वितरणाचा
ReplyDeleteमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ
-आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी
मुंबई, दि. ३० : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जमातीसाठी जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत खावटी अनुदान योजनेचा निधी वितरणांचा शुभारंभ उद्या, शनिवारी १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी यांनी दिली आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमाती सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या कोरोना मदत पॅकेज अंतर्गत या निधीचे वाटप उद्या, महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार आहे.
श्री. पाडवी म्हणाले की, कोविड १९ च्या साथरोगामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसलेल्या राज्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदत पुरवण्याची खावटी योजना पुर्नजीवित करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि किराणा वस्तुचे वितरण असे या योजनेचे स्वरूप आहे.
दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या निधीचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित राहणार आहेत.
अशी आहे खावटी योजना
1) आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन 2013 नंतर बंद झाली होती. या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी 'खावटी अनुदान योजना' सुरु केली.
2) या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख पैसे देण्यात येणार असून यासाठी सुमारे 486 कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.
3) प्रति कुटूंब एकूण 4 हजार रुपये देण्यात येणार असून त्यापैकी 2 हजार रुपये पात्र लाभार्थी कुटूंबाना बँक खात्यात 'थेट लाभ हस्तांतरण' (DBT) या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
4) उर्वरित रु. 2 हजार किंमतीच्या किराणा वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिर्ची पावडर, मीठ, चहा पत्ती या वस्तूंचा समावेश आहे.
5) या योजनेत पहिल्यांदाच अति मागास प्रवर्गातील कातकरी, माडीया, कोलाम यांचा समावेश केला आहे.
कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा
ReplyDeleteसंस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची 2 वर्षे राहता येणार
- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई, दि.30 : बाल न्याय अधिनियमात 'बालक' या संज्ञेसाठी नमूद वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थातून बाहेर पडावे लागू शकणाऱ्या बालकांना सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील तरतुदींनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार, संकटग्रस्त व अत्याचारित बालकांना पोलीस, स्वयंसेवी संस्था, पालक यांच्याकडून बाल कल्याण समितीमार्फत बालगृहात प्रवेश दिला जातो. या योजनेंतर्गत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा पुरवल्या जातात. तसेच पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात.
बालगृहातून बाहेर पडूनही ज्या अनाथ, निराधार मुलांना संस्थात्मक काळजीची आवश्यकता आहे अशा मुलांसाठी अनुरक्षणगृह योजना 18 ते 21 वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येते. त्याअंतर्गत निरीक्षण / बालगृहातील मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी असलेल्या निराधार निराश्रित बालकास अन्न, वस्त्र, निवारा आदी मूलभूत सोयीसुविधांसह त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने शालेय व व्यावसायिक प्रशिक्षण या अनुरक्षण सुविधा दिल्या जातात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा कालावधी दोन वर्षांनी वाढवण्याची तरतूद आहे.
तथापि, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थांमधून(बालगृह /निरीक्षणगृह/अनुरक्षणगृह) बाहेर पडल्यानंतर शासनाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रोजगार मिळवून समाजात स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या बऱ्याचश्या मुलांचे रोजगार कोरोना आपत्ती काळात हीरावले गेले असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती.ज्यांचे पालकत्व अगदीच अल्प वयात शासनाने स्वीकारून त्यांना सक्षम बनवले होते, त्या मुलांना मात्र या आपत्तीने परत रस्त्यावर येण्याची वेळ आणली. ही बाब ओळखून अशा मुलांना आधार देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने अशा बालकाना आपल्या अनुरक्षण गृहात दाखल करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.म्हणजेच त्यांचे पालकत्व पुन्हा शासनाने घेतले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने अनाथाना न्याय मिळणार आहे.
"कोरोनाचे संकट लक्षात घेऊन अनुरक्षण गृहांमधून 21 वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडावे लागणारी मुले आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थांमधून बाहेर पडलेली मुले; ज्यांनी अनुरक्षण सेवेचा लाभ घेतलेला असो अथवा नसो अशा सर्व मुलांना अनुरक्षण गृहातील अनुरक्षण सेवा देण्यासाठीची वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करून अशा मुलांना वयाच्या 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत अनुरक्षण सेवेचा लाभ उपलब्ध करण्यास मान्यता देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. राज्य शासन बालकांच्या संरक्षणाची व जीविताची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. निरीक्षणगृहे, बालगृहे, अनुरक्षण गृहातील बालकांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करत चिंतामुक्त होऊन अभ्यास, प्रशिक्षणावर भर देऊन स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे" अशी प्रतिक्रिया मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
0000
*टाइमबँक*
ReplyDeleteस्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून रिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले... काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.
मला *टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुदृढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा वृध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा वृध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुदृढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या वृध्दांना सेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते, सामाजिक कल्याण विभागाच्या !!. त्याच्या घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास वृध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी वृध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.
एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरच पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक*हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य *स्वीस* नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रसृत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त *शासनानेच* करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे वृध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या वृध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ शकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने वृध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय वृध्दांचे भवितव्य उज्वल असेल.
*बघा विचार करुन*
*"सोडलेल्या" दोन हातांपेक्षा "जोडलेल्या " दोन हातांमध्ये खुप "सामर्थ्य" असतें ...*
ReplyDelete*"परिस्थिती" हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा "मनस्थिती बदलेल व परिस्थितीही ..*
😊** *शुभ प्रभात* **😊
बद्धकोष्ठता व त्यावर उपाय
ReplyDelete*घरी रहा... सुरक्षित रहा...*
अनियमित दैनंदिनी क्रम आणि खाण्याच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे ही एक साधारण बाब आहे. जेवण्यानंतर बसून राहणे आणि रात्रीच्या जेवण्यानंतर सरळ झोपणे. या सारख्या सवयी बद्धकोष्ठतेसाठी जवाबदार आहेत. जर आपणास देखील हा त्रास होतो तर आम्ही काही उपाय देत आहोत.
◆ सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि काळं मीठ टाकून प्या. असे केल्याने पोट स्वच्छ होईलच त्याच बरोबर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होईल.
◆ बद्धकोष्ठतेसाठी मध खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. ह्याचा नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.
◆ सकाळी उठल्यावर दररोज अनोश्यापोटी 4 ते 5 काजू, तेवढेच मनुके बरोबर खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. याव्यतिरिक्त रात्री झोपण्याआधी 6 ते 7 मनुके खाल्ल्याने आराम मिळतो.
◆ दररोज रात्री हरड किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, त्याच बरोबर पोटामध्ये गॅस तयार होत नाही.
*आमच्या आयुर्वेदिक समुहात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करून आपला पूर्ण परीचय(नाव) द्यावा.*
https://wa.link/ybiik9
◆ बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून झोपताना एरंडेल तेल कोमट दुधामध्ये मिसळून पिऊ शकता. ह्याने पोट तर साफ होतेच. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
◆ इसबगोलची भूशी बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. आपण ह्याला रात्री झोपताना पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर देखील घेऊ शकता.
◆ फळांमधील पेरू आणि पपई बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्याचे सेवन आपण कधीही करू शकता. हे खाल्ल्याने पोटाचा त्रास तर दूर होतोच, त्वचा देखील सुंदर होते.
◆ बेदाणे काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या व्यतिरिक्त अंजीर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.
◆ पालक देखील बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी एक चांगला पर्याय आहे. दररोज पालकाच्या रसाला आपल्या दैनंदिनी मध्ये घेऊन बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवू शकता, त्याच बरोबर पालकाची भाजी देखील आरोग्यासाठी चांगली असते. पण जर आपल्याला स्टोनचा त्रास असल्यास पालक सेवन करणे टाळावे.
◆ बद्धकोष्ठता टाळण्यासाठी नियमाने व्यायाम आणि योग करणे फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त नेहमी गरिष्ठ आहाराचे सेवन करणे टाळावे.
या व्यतिरिक्त बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घेणे.
*या माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वैयक्तिक आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!!*
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
स्वदेशी अन्न खा स्वस्थ रहा"
ReplyDelete(भारतीय अन्नघटक)
अनेक वर्षे *बदाम* चा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, *‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’* असे काय पोषण या बदामांतून मिळते जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही ? बदामांतून मिळणाऱ्या *रक्तवर्धक लोहाचे* प्रमाण आहे *५.०९ मि. ग्रॅ*.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *तीळांतून* त्याहून अधिक म्हणजे *९.३ मि.ग्रॅ*. आणि *हळिवांमधून* तर तब्बल *१०० मि. ग्रॅ.* लोह मिळते.
बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले *कलिंगडाच्या बियां* मधून मिळतात. *तीळां* तून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. *शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ.* आणि *तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ*.!
हाडांना पोषक असलेले *कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ.*, तर *तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.!* महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे ? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत !
अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ?
प्रचारामध्ये *किवी* आणि *सफरचंदामधून* मिळणाऱ्या *‘क’ जीवनसत्त्वाच्या* अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C) किती मिळते ?? *सफरचंदामधून मिळते केवळ १ मि. ग्रॅ.!* परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे * ८ ते १० मि.ग्रॅ. तर *किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ.*. त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *भारतीय फळांमधून* कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते.
जसे- *चिंच १०८ मि. ग्रॅ.,*
*काजू फळ १८० मि. ग्रॅ.*,
*पेरू २१२ मि. ग्रॅ*. आणि
*आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.*
रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक आणि प्रजनन क्षमता संवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता *किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.*
ब्रोकोलीमधून काय मिळते ?*
ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही ? *कोथीबीर (४८०० मायक्रो ग्रॅम),*
*अळू-पान (५९२० मायक्रो ग्रॅम)* आणि *माठ (८३४० मायक्रो ग्रॅम)* यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी *(६२३ मायक्रो ग्रॅम)* *बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून* मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक *फॉलिक अॅसिड* ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम)* कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते. विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. *मगं लोक का खरेदी करतात ब्रोकोली ?*
५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी continue
Continue. *भारतीयांना ओट्सची गरजच काय ?*
ReplyDeleteओट्ससारखे अमेरिकेमध्ये *घोडे व डूकरांचा खुराक* म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे ? ज्या देशात *तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव पिकतात त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे ?* महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. *ओट्सपेक्षा (३६१)* अधिक आरोग्यदायी उष्मांक *बाजरीतून (३८९)* मिळतात. *ओट्सहून (११)* अधिक चोथा *बाजरीमधून (११.३)* मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी *कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह* आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.
*तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत.* जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, डोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत:नैसर्गिक स्वरूपात.
*याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते.* ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. *आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल.* ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच नाही का ?
*गुण सांगता.. दोषांचे काय/?*
याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे *ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी* आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. *सफरचंदाने होणारा मलावरोध* आणि मलावरोधजन्य विकृती, शरिरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फॅटी अॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार या सर्व आरोग्य संकटांकडे भारतीयांनी कानाडोळा करावा काय ?
*आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्य धोके का सांगितले जात नाहीत ?*
त्याला आर्थिक बाजु सुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.
आजमितीस *भारतीयांना एक कोटी १७लाख टन खाद्यतेल* लागते. त्यातला केवळ *०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह* तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.
Continue.आज जग जवळ आले आहे. त्यामुळे *वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल हे नक्की. आयुर्वेदानुसार जो आहार देशसात्म्य आहे अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.*
ReplyDeleteअजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की, *याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.*
यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.
यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.
ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते प्रत्येक वेळी बदलतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तो सुध्दा आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या आपल्या भारतीय देशवासीयांनी?
(संदर्भ: नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)share by geeta
भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड 19
ReplyDeleteविशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत
मुंबई, दि. 1 :- कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री .
कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
🌕🙏🌹 *धम्म प्रभात* 🌹🙏🌕
ReplyDelete*१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
राष्ट्रनिर्माता, भारतरत्न, अर्थतज्ञ, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला व विशेष करून कामगार वर्गाला काय दिलं?
१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा
२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( labour welfare fund
१०. निर्वाह निधी (provident fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (women labour protection act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा ( indian statistical law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (technical training scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (central technical power board)
२२. विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
२३. राज्य विभागणी आयोग (state division commission)
२४. मध्यवर्ती जलसिंचन आयोग
२५. अर्थव्यवस्थेची तरतूद (provision of finance commission)वित्त आयोग!
२६. नदी जोड प्रकल्प
२७. दामोदर खोरे प्रकल्प
२८. हिराकुंड धरण
२९. भाक्रा-नांगल धरण
३०. सोनेक नदी प्रकल्प
३१. भारतीय रिझर्व्ह बँक
*आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण भारत देशाला एकराष्ट्र, एकसंघ बांधणारे संविधान....*
Salute to
राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
🙏🌹 *भवतु सब्ब् मंगलम्* 🌹🙏
🙏बोध कथा🙏 एक काळरात्री वादळात एक घटना घडली.झाडावरचं एक घरटं अचानक खाली पडलं. दोघजण सारे शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. शेवटी सर्व शक्ती एकटवून चिमणा चिमणीला म्हणाला. सखे जास्त विचार करू नकोस उद्या सकाळी बोलूया. चिमणी समजूतदार पणे बोलली:-चालेल. ती काळरात्र संपण्याची दोघे वाट बघत बसून राहीले. सकाळ झाली स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला,निघू या आता! पुन्हा नव्यानं काड्या आणूया. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा:-अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे. तर घरट नव्यानं बांधण आपल कर्म आहे.आणि मदतीची वाट बघायला काय आपण माणसं थोडीच आहोत! चल सखे निघू या. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली............ यालाच म्हणायचं खरं जगण... 🙏🙏लॉकडाऊन नंतर आपण ही असेच तयार होऊ या. जे काही गेल त्याचा जास्त विचार न करता. परत नव्या उमेदीने झेप घेवू या. येणारे दिवस आपलेच आहेत. फक्त आपण झेप घ्यायला विसरता कामा नये. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हे ही दिवस जातील .
ReplyDelete[5/1, 20:09] E: कोथिंबीर
ReplyDelete*घरी रहा... सुरक्षित रहा...*
जर आपल्या आहारात एक स्वस्त मिळनारी गोष्ट आहे ती म्हणजे कोथिंबीर ची पाने. आपण दररोज कोथिंबीर खातो पण विसरतो की हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटू शकते की कोथिंबीर ही केवळ आपल्या अन्नाची पूरक आहेत आणि याचा वापर फक्त सजावटी साठी केला जातो तस आणि याचा काहीच फायदा नसतो.परंतु आपण चुकीचे आहात आणि कोथिंबीर ची पाने आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे जर तुम्ही आहारातून कमी केले असतील तर आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही म्हणून आम्ही येथे आपल्याला कोथिंबीरांच्या आरोग्य फायद्यांविषयी सांगण्यासाठी आलो आहोत ज्यापैकी बर्याचजणांना माहित नाही. म्हणून, आजच्या काळात ज्यात कोथिंबीरचे फायदे आहेत ते या पोस्ट मध्ये पाहूया
◆कोथिंबीर खाण्याचे दुष्परिणाम
कोथिंबिरीची पाने बर्याच लोकांसाठी सुरक्षित आहे परंतु त्याचे बरेच दुष्परिणाम सुद्धा आहेत. कधीकधी आपल्या त्वचेवर जळजळ आणि सूज येऊ शकते. गर्भवती स्त्रियांना खूप कोथिंबीर खाणे टाळायला हवे आणि ज्या लोकांना मग्वर्ट सारख्या वनपस्तीची ऍलर्जी आहे त्यांनी कोथिंबिरीच्या पानांपासून दूर राहावे.
◆कोथिंबीर खाण्यामुळे होणारे आरोग्यदायी फायदे
जोपर्यंत आपल्याला कोथिंबिरीची ऍलर्जी आहे कि नाही ते समजत नाही तोपर्यंत, आपण आपल्या आहारात कोथिंबीर घालू नये याच्या मागे कोणतेही कारण नाही. खरं तर, कोथिंबीरीचे बरेच आरोग्य लाभ आहेत. आपल्या सकाळीच्या आहारात नित्यक्रमाने समाविष्ट करण्याची एक निरोगी सवय आपल्याला खूप उपयोगी पडू शकते , सकाळी 10-10 कोथिंबीरिची पाने प्रथम खाणे - रिकाम्या पोटावर खाणे. कोथिंबीरचे फायदे वाढवण्यासाठी लिंबूच्या काही थेंबांसहआणि काही उबदार पाण्यात घेऊन हे अनुसरण करा. आपण सामान्यतः आपल्या न्याहारी करण्यापूर्वी हे 30 मिनिटे करावे. त्या 30 मिनिटांत काहीही न पिणे किंवा खाणे टाळा.
◆ शरीरात होणाऱ्या जळजळी वर कोथिंबीरने होणारे फायदे
आपल्या सर्वांसाठी त्वचेवर जळजळ होणे ही सर्वात मोठी समस्या आहे. आपला चेहरा सुजतो आणि नंतर त्याचा परिणाम म्हणजे आपल्या त्वचेवर मुरुम. आपण या सर्वांपासून मुक्त होऊ इच्छितो. बरं, तुम्ही बर्याच उपाययोजना केल्या असतील आणि त्यापैकी कोणीही काम केले नाही, बरोबर? कारण आपण कोथिंबीर पानांचे योग्य उपाय वापरले नाही. जळजळ होणाऱ्या सिनील हा घटक कोथिंबीरच्या पानांवर असतो आणि कोथिंबीरच्या पानांमधील आणखी काही घटक पेशींना प्रेरणा देतात आणि शरीरातून जास्त प्रमाणात पाणी सोडण्यास मदत करतात. एकूणच हे सर्व आपल्याला जळजळ आणि त्वचेतील वर योग्य परिणाम करण्यास मदत करते.
*आमच्या आयुर्वेदिक समुहात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करून आपला पूर्ण परीचय(नाव) द्यावा.*
https://wa.link/ybiik9
◆ त्वचेच्या विकारांसाठी उपाय म्हणुन कोथिंबीरीचे फायदे
कोथिंबीरच्या काही गुणधर्मांची नावे : जंतुनाशक, डिटोक्सिफाय, अँटीसेप्टिक, अँटीफंगल आणि अँटिऑक्सिडेंट. बरं, ही कोथिंबिरीची पाने मध्ये असलेले गुणधर्म हे मान्य करण्यासाठी पुरेसे आहेत की कोथिंबिरीची पाने त्वचेच्या विकारांना इतर कोणत्याही सेंद्रिय पदार्थांपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतात. अँजेक्स आणि फंगल संसर्ग सारख्या त्वचेच्या विकारांना साफ करण्यासाठी अँटिऑक्सीडेंट आवश्यक असते ते कोथिंबिरीच्या पानात आहे. पुढील वेळी जेव्हा आपल्या चेहऱ्यावर मुरुम येईल तेव्हा फक्त कोथिंबीरची पाने खावे त्याने त्वचा निरोगी बनते आणि तसेच आर्थिकदृष्ट्य परवडणारे आहे .
◆कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी कोथिंबीर चे फायदे
बर्याचजणांना म्हणजेच , आपल्यापैकी बहुतेकांना हा कोथिंबिरीचा उपयोग माहित नव्हता आणि आम्हाला याची खात्री आहे. जंक फूड आणि गडबडित होणाऱ्या नाश्त्याच्या या जगात आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी जलद वाढते आणि आपण त्याबद्दल विसरून जातो आणि काळजी घेत नाही . नंतर ते आपल्याला शारीरिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतात लिनेलिक ऍसिड, ओलेइक ऍसिड, पाल्मॅटिक ऍसिड, स्टियरिक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले ऍसिड जे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम आहेत. इतर कोथिंबीरच्या पानांचा फायदा म्हणजे एचडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते जे आपल्याला धोकादायक रोगांपासून वाचविण्यात मदत करते.
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ReplyDelete!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
[5/1, 20:09] E: *करोना वायरस पॉजिटिव अगर हो तो फिटकरी के गुणों को जान लो*
*100 ग्राम फिटकरी तवे पर रखिये। पिघल जाए तो उसे ठंडा कर लीजिए। उसे तवे से उतार कर कूट कर डिब्बी में डालकर रख लें*
*यह आपकी रामबाण दवाई है जो फेंफड़े सीज हों, दमा हो या दिल कमजोर हो, बलगम हो उसे दी जा सकती है*
👉 किसी के दांत में दर्द हो तो इससे कुल्ला करो
👉 किसी घाव पर लगाओ
👉 इसे बाल्टी में डालकर उस पानी से नहाओ
👉 सब्जियां धो लो आदि
👉 यह एकमात्र ऐसा सेनिटाइजर है जिसका सेवन किया जा सकता है।
👌 *एक चुटकी फिटकरी का भुना हुआ पाउडर लें। 1चम्मच शहद लें, पांच बूंद अदरक के रस की डालें और पीड़ित को चटा दें। एक dose सुबह एक dose शाम। कुल दो दिन में चार dose.*
*फेफड़े की तमाम दिक्कतों में रामबाण दवाई है यह*
*इस दवाई ने डेथ बेड से रोगी को उठाया जब उनके फेफड़े न्यूमोनिया और बलगम से सीज हो गए थे और डाक्टर ने जवाब दे दिया था*
*अगर आप को दिक्कत ना हो तो इस मेसेज को पढकर आगे फॉरवर्ड करने की कृपा करें*
*आप का शुभ चिंतक*
*रींकेश हसमुख छेडा*
🙏बोध कथा🙏 एक काळरात्री वादळात एक घटना घडली.झाडावरचं एक घरटं अचानक खाली पडलं. दोघजण सारे शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. शेवटी सर्व शक्ती एकटवून चिमणा चिमणीला म्हणाला. सखे जास्त विचार करू नकोस उद्या सकाळी बोलूया. चिमणी समजूतदार पणे बोलली:-चालेल. ती काळरात्र संपण्याची दोघे वाट बघत बसून राहीले. सकाळ झाली स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला,निघू या आता! पुन्हा नव्यानं काड्या आणूया. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा:-अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे. तर घरट नव्यानं बांधण आपल कर्म आहे.आणि मदतीची वाट बघायला काय आपण माणसं थोडीच आहोत! चल सखे निघू या. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली............ यालाच म्हणायचं खरं जगण... 🙏🙏लॉकडाऊन नंतर आपण ही असेच तयार होऊ या. जे काही गेल त्याचा जास्त विचार न करता. परत नव्या उमेदीने झेप घेवू या. येणारे दिवस आपलेच आहेत. फक्त आपण झेप घ्यायला विसरता कामा नये. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हे ही दिवस जातील .
ReplyDeleteपिंपरी चिंचवड महापालिका चे वाय.सि.एम.हॉस्पिटल मधील एका नामांकित डॉक्टरने सदर लेख पाठविला आहे! पूर्ण वाचा,,आणि
ReplyDeleteनिश्चिंत रहा!
--------------------
*कोरोनाला अजिबात घाबरू नका!*
1)जर सुरुवातीला सुका खोकला येत असेल तर जेवणात चेंजेस करा, डाळ भात, खिचडी, इडली, उपमा, पोहे असे पदार्थ खा ज्यात जास्त तेल आणि मसाला जास्त नसेल.
२)अद्रकवाली (आले) चहा,आणि लवंग खा दिवसातून एकदा.
३)रोज रात्री दुधात हळदी टाकून प्या.
नियमित गरम पाणी प्या.
🔴 *जास्त खोकला असेल तर Tab Azee 500* 7 days चालू करा
🔴 *ऍसिडिटी होत असल्यास Omee D* 7 days 15 मिनिट जेवणा अगोदर घ्या.
🔴 *व्हिटॅमिन C साठी Tab Limcee* 15 दिवस
🔴 *ताप येत असेल तर Tab Dolo 650* जास्त ताप असेल तर तुम्ही दर 6 तासाने परत घेऊ शकत|
🔴खोकल्याच औषध चालू करा *Syp Asthakind Dx* 2 चमचे 3 वेळा
🔴दम लागत असल्यास X Ray काढा त्यामध्ये न्यूमोनिया आला तर
*Tab Tamiflu 75* 5 days
ज्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड भेटणार नाही त्यांनी हा उपचार चालू करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. कारण येणार काळ खूपच भीषण आहे की आपल्याला बेड पण भेटणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे मी अशी माहिती पाठवतोय ज्याने तुमचा त्रास वाढणार नाही. हाच कोर्स सर्व हॉस्पिटलमध्ये करतात फक्त एवढंच असत जास्त त्रास होत असेल कुणाला तर त्याला ऍडमिट करून उपचार करावे लागतात.आणि ऑक्सिजन दिवसातून 18 तास तरी द्यावा लागतो.
80% लोक घरीच बरे होतात, फक्त ज्यांना दम लागतो असे 10% लोकांना ऍडमिट करावं लागतं.
🔴तसेच काही त्रास वाढू नये म्हणून किंवा *रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथीक मेडिसिन Arsenic Alb 30 X* 6 गोळ्या मोठ्या माणसांना उपाशीपोटी द्यायच्या
आणि लहान मुलांना 3 गोळ्या द्यायच्या
3 दिवस रोज सकाळी उपाशीपोटी
आणि एक महिन्याने परत सेम डोस परत घ्यायचा.
कृपया हा लेख सर्व आपल्या गोरगरीब
जनतेसाठी सामान्यांपर्यंत पोहचू दया!
आणि आपणही संग्रही ठेवा सर्व सरकारी वा खाजगी रुग्णालयात असेच उपचार केले जातात!आणि आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर
उगाचच लाखो रुपयांची उलाढाल करून फसतो!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Fraud is going on.. If someone calls you and ask for vaccine registration, don't entertain. They ask for Aadhaar card, email nos.. and send OTP, and ask to tell you the same, as soon as you give the OTP no. Your bank account money will be emptied... as your aadhar is linked to Your bank account..
ReplyDeleteBE Careful, BE safe!
सर्व पालिकांनी ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेच पाहिजे
ReplyDeleteलहानांमधील वाढत्या संसर्गाच्या दृष्टीने रुग्णालयातील नियोजन करून ठेवा
घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयांत हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई, पुणे क्षेत्रातील पालिका आयुक्तांना महत्वपूर्ण सुचना
मुंबई दि १: सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे जेणे करून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडली नाही पाहिजे, अशा विविध महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच विविध पालिका अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कोविडचा मुकाबला करतांना इतर रोगांच्या रुग्णांना सुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लेप्टो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करताना या नॉन कोविड रुग्णांसाठी सुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी.
पहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त दिसते एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी. त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Continueयावेळी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिकेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, रुग्णांचे चाचणी अहवाल लगेच देणे, मुंबईतील वॉर्ड वॉर रूम्समार्फत नागरिकांशी संपर्क आणि समन्वय अधिक वाढविणे, लसीकरण केंद्रांची संख्या विविध माध्यमांतून वाढविणे याकरिता तत्काळ काही पाऊले उचलण्यात आली आहेत याविषयी माहिती दिली. बीकेसी येथील जम्बो केंद्राचे डॉ. राजेश डेरे यांनी देखील केंद्रातील रुग्णाच्या नातेवाईकांना मोबाईल ॲपद्वारे उपचारांविषयी सर्व अद्ययावत माहिती कशी दिली जाते त्याची माहिती दिली. एमएमआरडीए महानगर आयुक्त आरए राजीव यांनी देखील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांशी कसा नियमित संपर्क ठेवण्यात येतो ते सांगितले.
ReplyDeleteठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार पालिका आयुक्तांनी त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांनी देखील आपापल्या भागातील रुग्ण संख्या स्थिरावत आहे तरी रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याचे आव्हान कायम असून विविध सुविधा, औषधे या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यावेळी टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडीसीव्हीर, स्टीरॉइडसचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील यावेळी महत्वपूर्ण सूचना केल्या. जम्बो केंद्र किंवा फिल्ड हॉस्पिटल्स, शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणाचे सुरक्षा काळजीपूर्वक तपासून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
00000
Reply
राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ
ReplyDelete२६ जिल्ह्यांमध्ये सायंकाळी सहापर्यंत ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना दिली लस
मुंबई, दि.१: राज्यात आज १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्ह्यांतील ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.
आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्हयांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्हयांमध्ये उद्या दि.२ मे पासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.
00000
☝️ #विशेष_सूचना
ReplyDelete#आपको यदि सर्दी, खांसी, जुकाम, बुखार, साँस लेने में तकलीफ, जोड़ों में दर्द by, अत्यधिक थकावट, मांसपेशियों में अकड़न इत्यादि लक्षण आते हैं, #निम्नलिखित_बातों का पालन शुरु कर दें।
1- खुद को आइसोलेट कर लें।
2- तरल पदार्थ जैसे सूप, जूस, काढ़ा, चाय, काफी, गुनगुना पानी, गर्म दूध आदि कम से कम 4 लीटर लेने का प्रयास करें।
3- पूर्ण रूप से आराम करें और अच्छी नींद लें।
4- अपने आप को फिल्म, शार्ट फिल्म, किताब, गाना, कहानी, कविता, क्रिकेट आदि के माध्यम से व्यस्त रखें। दोस्तों से बातें करें।
5- स्नान भी गुनगुने पानी से ही करें।
6- सुबह शाम भाप की सांस लें और नमक पानी गुनगुना करके गलारा करें।
7- ठन्डे वस्तुओं से परहेज़ करें।
8- पल्स आक्सीमीटर से आक्सीजन नापते रहें 94-92 के नीचे सैचुरेसन आने पर तुरंत हेल्पलाईन पर फोन करें।
9- आक्सीमीटर न मिल पाने के स्थिति में अपने सांस को 14-18 सेकेंड के लिये रोक कर अपने को चेक करें।
10- नकारात्मक बातों और घटनाओ से दूर रहें।
फेमिली डॉक्टर से सम्पर्क करके निम्नलिखित दवाओ को शुरु कर दें।
1- पैरासिटामोल 650mg सुबह दोपहर रात
2- एज़िथ्रोमाइसिन 500mg रोज़ दिन में एक बार
3- डाक्सी 100 mg सुबह शाम
4- आइवरमेक्टीन 12 mg तीन दिन तक रोज़ एक गोली फिर सप्ताह में एक बार
5- विटामिन सी (Limcee/ Vitcee) 500 mg सुबह शाम चूसना है।
6- विटामिन D3 60K सप्ताह में एक बार
7- मोन्टेमैक-एल या मोन्टेयर एलसी एक सुबह एक शाम
8- एवियान एल सी एक सुबह एक शाम
इतना करिये और RTPCR करवाइये.. जब तक 3-4 दिन में रिपोर्ट आएगी हो सकता आपकी तीन चौथाई बीमारी समाप्त हो चुकी होगी...
(पॉजिटिव से नेगेटिव हुए लोंगो से निष्कर्ष के बाद ये जानकारी)
सूचना समाप्त
कॉपी/पेस्ट करिये,,, कोई भी तस्वीर लगाइये,,, ज्यादा से ज्यादा लोंगो तक भेजिए।🙏
सभी देशवासियों के कुशलमंगल की कामना 🙏🌹
नमस्कार 🙏
अब आगे आपका काम शुरू होता है....
धन्यवाद
नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या
ReplyDeleteअधिक जागरूक राहून समन्वयाने काम करा
--------------------------
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई दि २ : येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बैठकीचे संचालन केले.
यावेळी कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विभाग, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती दिली तसेच सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान विभागाने पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळत राहील तसेच त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल याची काळजी घ्यावी. मासेमारी बोटींशी या काळात संपर्क असावा व त्यांना देखील सूचना मिळत राहतील ते पहावे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याची काळजी घ्यावी.
तिवरेसारखी दुर्घटना घडू नये म्हणून सावध राहावे
गेल्या वेळेस तिवरे धरणाची दुर्घटना घडली होती. यंदा सबंधित सर्व यंत्रणांनी देखील मातीच्या धरणांची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी. तसेच, आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील सावध करावे आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. गेल्या वर्षी देखील पावसाळ्याच्या काळात पालघर मध्ये लहान लहान भूकंपांची मालिका सुरु झाली होती हे पाहता तेथील यंत्रणेने देखील सावध राहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रारंभी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सादरीकरण केले गेल्या वर्षी विभागात ३१७३ मिमी पाऊस झाला होता असे सांगितले. विभागात ३७१ पूर प्रवण आणि २२३ दरडग्रस्त गावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु झाले असून ते २४ तास सुरु राहणार आहेत. याशिवाय जीवरक्षक बोटी, जॅकेट व इतर सामुग्री उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तुकडी चिपळूण येथे तैनात ठेवण्यासाठी विनंती केली आहे, मॉक ड्रील झाले असून निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसची नुकसान भरपाई १०० टक्के दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
चार ठिकाणी लवकरच नवीन रडार
यावेळी बोलताना हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण व अचूक होऊ शकेल अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा. पण २०१७ पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नुकसान केले. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मेमध्ये जास्त असतो असे सांगून होसाळीकर यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे शक्य झाल्याची माहिती दिली.
*उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात. घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू*
ReplyDeleteमुंबई :‘कोरोना’ (Coronavirus) रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
खासगी रूग्णालये एकेका (Coronavirus) रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.
सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड (Coronavirus) रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती.
अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.
या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.
या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.
*खासगी रूग्णालयांसाठी बंधनकारक केलेले दर*
सध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड ( Coronavirus ) रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.
*एका दिवसांत आदेश जारी*
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांनी एका दिवसांत स्वतः टाईप करून या आदेशाचा तब्बल १८ पानांचा मसुदा तयार केला. वांद्र्यावरून स्वतः गाडी चालवत ते आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्याकडे गेले. त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर रात्री शिंदे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.
🙏🙏जाहीर आवाहन🙏🙏
हिच ती पोस्ट जी संपुर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली आहे...आपल्यासाठी परत टाकत आहे...!
मला खात्री आहे कि माझ्या या प्रयत्नाचा गरजूंना नक्कीच फायदा होईल.
आपल्याला नम्र विनंती आहे कि सदरची माहीती आपण आपल्या फेसबुक,व्हाटस अप,इन्स्टाग्राम,मेसेंजर, अकाऊंट वर व्हायरल,शेअर करावी. आपल्या ओळखीच्या मंडळींना फोनवरुन ही माहीती द्यावी ही कळकळीची प्रार्थना!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला नम्र
-डॉ.सुधीर क्षीरसागर
9822094196
राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दिलासादायक निर्णय
ReplyDelete· कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही
· दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट
मुंबई, दि. 3: दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी तिष्ठत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याचा निर्णयही श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश आज जारी करण्यात आले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळवले आहे.
राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत विविध कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देत घरातून कामकाजाची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापनांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशित करण्यात आले आहे. असे करताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
किमान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आता तरी खाजगी शाळांच्या फी मध्ये 50 टक्के सवलत देणारा निर्णय घेऊन तात्काळ वटहुकूम काढा
ReplyDelete- आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी.
मुंबई, दि. 4 मे (प्रतिनिधी)
कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश शाळा बंद असताना सुद्धा खाजगी शिक्षण संस्थांकडून बस फी, लॅब फी, टर्म फी, उपक्रम फी, जिम फी, क्रीडा फी, शालेय फी यांची सक्तीने वसुली करण्याचे सत्र अद्याप थांबले नसून, हे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत ऑनलाइन वर्ग सुरू असल्यामुळे शाळा चालविण्यास कमी खर्च येतो त्यामुळे खाजगी शाळांनी सक्तीची फी वसुली थांबवून फी कमी करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे किमान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आता तरी खाजगी शाळांच्या फी मध्ये 50 टक्के सवलत देणारा निर्णय घेऊन तात्काळ त्याबाबतीतला वटहुकूम काढावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी देशातील गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनी तेथील कायद्यात सुधारणा करून विद्यार्थांना फी मध्ये ५० टक्यांपेक्षा अधिकची सुट दिली आहे.
महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थांची फी कमी करण्यासाठी केवळ शासन निर्णय न काढता महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 मध्ये सुधारणा करून 50 टक्के फी सवलत द्यावी अशी मागणी मी सभागृहात व सभागृहाच्या बाहेर वारंवार केली. या संदर्भात अनेक पालक संघटनानी आंदोलन व उपोषण करून सुद्धा महाविकास आघाडी सरकारने शिक्षण सम्राट धार्जिणे निर्णय घेतले. फी कमी करणे तर सोडाच परंतु सक्तीची फी वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे काम सुद्धा महाविकास आघाडी सरकारने केले नाही. यापूर्वी उच्च न्यायालयाने सुद्धा सक्तीची फी वसुली थांबवून फी कमी करण्यासंदर्भात विचार केला जावा अशी सूचना केली होती परंतु त्याकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केले. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सम्राटांच्या फायद्याचा विचार सोडून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तात्काळ कायद्यात सुधारणा करावी अशी आग्रही मागणी सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
नमस्कार , श्री अर्चनम अध्यात्मिक परिवारा तर्फे आपले स्वागत .
ReplyDeleteआपण नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल असं समजून , आपणांस कळविण्यात येते की दिनांक - ५ - ५- २०२१ पासुन संध्या ५ ते ६ ह्या वेळेत ऑनलाईन माध्यमातून संस्कार वर्ग प्रारंभ होणार असुन , वयोगट - ४ ते १२वर्षे असलेल्या पाल्यांना सहभागी होता येणार आहे.
संस्कार वर्गात आपला पाल्य काय शिकणार ?
प्रारंभिक श्लोक -
नित्यनियमित श्लोक-
विविध स्तोत्रे -
शुर वीरांच्या साहसी कथा -
भारतीय वैज्ञानिक माहिती -
सामान्य ज्ञानासह इतर ही ज्ञान ,समाज , संस्कृती अश्या अनेक गोष्टी ह्या वर्गात आपल्या आपल्याला शिकता येणार आहे .
(आपल्या परिचीत , नातेवाईक यांना ही ह्या उपक्रमात सहभागी करून घ्यावे)
एक राजा ने दो लोगों को *मौत की सजा* सुनाई...उन दोनों में से एक यह जानता था कि राजा को अपने *घोड़े से बहुत प्यार है।*
ReplyDeleteउसने राजा से कहा कि यदि मेरी *जान बख्श दी जाए* तो मैं एक साल में उनके *घोड़े को उड़ना* सिखा दूँगा।
यह सुनकर राजा खुश हो गया कि वह दुनिया के *पहले उड़ने वाले घोड़े की सवारी* कर सकता है।
दूसरे कैदी ने अपने मित्र की ओर अविश्वास की नजर से देखा और बोला, तुम जानते हो कि *कोई भी घोड़ा उड़ नहीं सकता!!*
फिर, तुमने इस तरह पागलपन की बात सोची भी कैसे ?
ऐसा करके तुम सिर्फ़, अपनी *मौत को एक साल के लिए टाल रहे हो।*
पहला कैदी बोला, ऐसी बात नहीं है... मैंने दरअसल *खुद को स्वतंत्रता के चार मौके* दिए हैं... कैसे,
•पहली बात, *राजा एक साल के भीतर मर सकता है !*
•दूसरी बात, *मैं मर सकता हूं !*
•तीसरी बात, *घोड़ा मर सकता है !*
•चौथी बात, *हो सकता है मैं घोड़े को उड़ना सिखा ही दूं !!!*
*मॉरल ऑफ द स्टोरी:*
*बुरी से बुरी परिस्थितियों में भी आशा* नहीं छोड़नी चाहिए...क्योंकि,
√ रिकवरी रेट बढ़ रहा हैं,
√ पॉज़िटिवीटी रेट घट रहा हैं,
√ बिस्तर बढ़ रहे हैं,
√ आक़्सिजन बढ़ रही है,
√ इंजेक्शन का *बड़ा उत्पादन* शुरू हो गया है,
√ वैक्सीन आ गई है !!
*धेर्य रखें.... हम जीत रहें हैं।*
आत्मविश्वास बनाए रखना है और हर हाल में सकारात्मक रहना है...
रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना
ReplyDeleteई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता नाही
मुंबई दि. 4. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानांमधून अन्नधान्याचे वितरण करतांना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी त्यांचे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटप करण्याची सुविधा 1 मे, 2021 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र लाभार्थ्याने स्वत: रास्तभाव दुकानात उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार एक देश एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य वितरण करताना लाभार्थ्यांचे आधार प्रमाणित करुनच ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरित करण्यात येणार आहे .
मागील 3 ते 6 महिन्यात ज्या लाभार्थ्यांनी अन्न धान्याची उचल केलेली नाही अशा लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांवर अन्नधान्याचे वाटप झाल्याचे तसेच मागील 3 महिन्यांच्या धान्य वितरणाच्या सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात धान्याचे वितरण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रास्तभाव दुकानांची तपासणी करण्याच्या सूचनाही क्षेत्रिय निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत
राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे सुमारे 7.00 कोटी लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील 40 लाख एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वत:चे आधार प्रमाणित करुन ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येते.
बेकायदेशीररित्या दत्तक देणे - घेणे कायद्याने गुन्हा
ReplyDeleteकोविडमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या
असहायपणाचा फायदा घेणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई
- महिला व बालविकास विभागाचा इशारा
▪️अनाथ बालकांच्या मदतीसाठी विशेष मदत कक्ष स्थापन
▪️दत्तक विधान कायदेशीर प्रक्रियेनुसारच
मुंबई, दि. 4: कोविड-19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना समाजासाठी घातक आणि गंभीर गुन्ह्याच्या असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल; असे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या विशेष हेल्पलाईनवर, सारा महाराष्ट्रच्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) 8329041531 क्रमांकावर अथवा आज स्थापन करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केले आहे.
कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविड-19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यू मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.
एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात असून बालके दत्तकास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे- देणे वा खरेदी-विक्री केली करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार कठोर कारवाई कारवाईस पात्र आहे.
राज्यात कोठेही कोविड-19 च्या अथवा इतर कोणत्याही कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्र (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) च्या 8329041531 या क्रमांकावर कळवावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात द्यावे. त्याची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. त्याशिवाय विशेष मदत कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.
विशेष मदत कक्ष स्थापन
अनाथ बालकांना संकट काळात मदत मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रेन (इंडिया) च्या संयुक्त विद्यमाने विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मदत कक्षाचे भ्रमणध्वनी क्र. 8308992222 आणि 7400015518 वर सकाळी 8 वा. ते रात्री 8 वा. या कालावधीत संपर्क साधावा. कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी या हेल्पलाईनवर संपर्क करण्यात यावा. तसेच बालकांसाठी यापूर्वी सुरू असलेली 1098 ही हेल्पलाईन आणि सारा- महाराष्ट्र च्या भ्रमणध्वनी क्र. 8329041531 वरही संपर्क साधल्यास मदत उपलब्ध होईल.
दत्तक विधान प्रक्रियेची माहिती 'कारा'च्या संकेतस्थळावर
बालक दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळवले आहे.
कोविड-19 मदत आयात माल
ReplyDeleteदानदात्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’
मुंबई, दि. 5 : राज्यात कोविड-19 या आजाराचा प्रसार होत असतांनाच, राज्य शासन व त्यांच्या संलग्न संस्था तसेच राज्य शासनाच्या अधिकृत संस्था किंवा वैधानिक संस्था यासाठी मदत पुरविण्याचे कार्य करित आहेत. यासाठी बाहेरिल देशातून कोविड-19 साठी मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. विनामुल्य आयात केलेल्या मदतकाऱ्याचा अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी राज्यशासनाने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
‘कोविड-19 रिलिफ आयटम’ सवलतीच्या उद्देशाने विनामूल्य आयातीची सोय करत असल्यास, त्यांना परदेशातून आयात केलेल्या विशिष्ट कोविड -19 मदत साहित्याच्या आयातीवर आयजीएसटी ची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहे.
प्रशासकीय पुढाकाराचा जास्तीत जास्त परिणाम घडविण्यासाठी आणि कोविड दरम्यान त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रमांक - (022) 22028616/22023584 तसेच ई-मेल didci@maharashtra.gov.in असा आहे.
‘कोविड रिलीफ आयटमच्या’ आयातीसाठी कागदपत्रे सादर केल्यानंतर काही अटींच्या आधारे नोडल अधिकारी सवलत प्रमाणपत्र देतील. यात 1.संस्थेचे नोंदणीप्रमाणपत्र, 2.चलन/खरेदी बील,
3.पॅकींग लिस्ट, 4. कार्गो तपशील, 5. देणगीदाराचे घोषणापत्र सादर करावयाचे आहेत.
संबंधितांना सर्व तपशीलांसह आपला अर्ज didci@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठविण्यात यावे.
अशा आहेत अटी :-
• सदरची वस्तू विनामूल्य आयात केली जाऊ शकते आणि भारतात कोठेही विनामूल्य वितरण करण्यास अधिकृत केले जाऊ शकते.
• आयातदाराने सीमाशुल्कांकडून वस्तू मंजूर होण्यापूर्वी त्या नोडल ऑथॉरिटीकडून माल कोविड रिलिफसाठी विनामूल्य वितरणासाठी आहे असे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे .
• आयात झाल्यानंतर आयातदार, महाराष्ट्र राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांकडे आयात करण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत आयात केलेल्या वस्तूंचे तपशील व त्या विनामूल्य वितरीत केल्याबाबत समर्थनीय कागदपत्रांच्या पुराव्यांसह एका स्टेटमेंट मध्ये सादर करावयाचे आहे जेणेकरुन ते प्रमाणित करुन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविले जाईल.
या कागदपत्रांची व अटींची पूर्तता करण्याबाबत काही अडचणी असल्यास उद्योग उप संचालक अजयकुमार पाटील, यांच्याशी 9930410922 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन उद्योग संचालनालयाने केले आहे.
"Nodal Officer" appointed for Maharashtra, to facilitate imported donated material for COVID-19 Pandemic
ReplyDeleteMumbai date 5 : Central Government has decided exemption in IGST to facilitates import free of cost for the purpose of Covid relief by a State Government or any entity, relief agency or statutory body authorized in this regard by any State Government. To drive maximum impact of this administrative initiative and to ensure the seamless flow of assistance to mitigate suffering during Covid Pandemic , Dr. Harshdeep Kamble, I.A.S., Development Commissioner of Industries is appointed as a Nodal Officer by State Government. Contact no. of Nodal Officer is (022) 22028616/22023584 & E-mail ID is didci@maharashtra.gov.in
The nodal officer would issue the authorization certificate for import of Covid relief item after verification of following documents and fulfillment of following conditions:-
1. Certificate of registration of the organization
2. Invoice / Purchase Bill
3. Packing list
4. Cargo details
5. Declaration of Donor
All concerned requested to send their application with above details on email didci@maharashtra.gov.in
Conditions:-.
1) The said good can be imported free of cost and authorized to distribute free anywhere in India.
2) The importer shall, before clearance of goods from Customs, produce a certificate from the said nodal authorities that goods are meant for free distribution for Covid Relief.
3) After Imports, Importer shall produce, to the Nodal Officer of The Maharashtra State within a period of six months from the date of importation or within such extended period not exceeding nine months, a simple statement containing details of goods imported and distributed free of cost with the supporting documentary evidence to the nodal authority of the State Government first so as to certify that and sent to concern authorities.
If there are any difficulties in fulfilling the above documents and conditions, you can contact Shri. Ajaykumar Patil, Deputy Director of Industries, Directorate of Industries on mobile no. 9930410922.
The above administrative activities of the government should be given maximum publicity.
*दुसरे हृदय*
ReplyDelete🚶♂️🚶♂️ चालत रहा 🚶♂️🚶♂️
आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.
सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.
हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.
पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.
होय.
खर आहे.
आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.
हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.
रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात.
हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात.
जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.
पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.
त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.
ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत.
आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे.
या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात.
आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.
घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.
आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.
रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात.
आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या ( DVT, deep vein thrombosis ) होण्याची शक्यता वाढते.
म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते.
एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते.
याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात.
त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.
जर पोटरितील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात.
झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते.
पाय जड होणे,
थकवा,
पाय ठसठसणे,
घोट्यात सूज,
फुगलेल्या पायाच्या नसा,
पायात अचानक चमक येवून दुखणे,
खाज येणे,
चमडीचा रंग बदलणे,
पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.
थोडक्यात - चालत रहा, शक्य असल्यास धावत रहा.
निरोगी आणि सुदृढ रहा.
कृपया हा मेसेज इतरांना ही पाठवा.
डॉ. लुईस प्रिवोष्टी.
MD.
Ek salute. 👆👆👆
ReplyDelete*कलियुगातील राम सीता*
आज कोपरगाव येथून येत असताना रोडच्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यानं मी त्या बेकारी दिसणा या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं तर ते नको म्हणालं मग मी त्यांना शंभर रुपये देऊ केले तर तेसुद्धा नको म्हणाले मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का म्हणताय मग सुरू झालं त्यांचा जीवनपट ते बावीसशे किलोमीटरचा प्रवास करून आता द्वारकाला स्वत च्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे एक वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टर क्टरांनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर क्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल म्हणून मी आईच्या शब्दांसाठी पदयात्रा करतोय मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने तुम्ही मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून ती निघाली मग मी ते पंचवीस टक्के हिंदी पंच्याहत्तर टक्के इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्धी ऐकून सुन्न झाली त्यांनी लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सात वष्रे खगोलशास्त्र यावर पीएचडी केली तर त्यांच्या बायकोने मनोविकारशास्त्र या विषयावर लंडन येथे पीएचडी केली एवढं शिकवणसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नाही नाहीतर आपल्याकडे दहावी पास भावालासुद्धा छाती ताणून हिंडतो एवढंच नाही तर मी सी रंगराजन गव्हर्नर यांच्याबरोबर तसेच कल्पना चावला यांच्याबरोबर काम व मैत्रीचे संबंध होते तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंध ट्रस्टला देऊन टाकतात सध्या ते सोशल मीडियापासून लांब राहतात रोडच्या कडेने जाणारा प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं नाही एखादं जोडपं हे आपल्या आईच्या शब्दांसाठी प्रभू राम व्हायला तयार होतो आणि आपल्या पतीसोबत कोणी सीतासुद्धा होतं म्हणूनच आज भेटलेली माणसे कलियुगातील मी तर राम सीता समजतो आम्ही जवळजवळ एक तास त्यांच्याशी गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले अहंकार गळून गेला आणि वाटलं की आपण उगाचच खोट्या फुशारकी वर जगतो त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शुन्य आहोत हा पायी प्रवास बघून थक्क झालो प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोहोचायला एक महिना लागेल त्यांचे नाव डॉ देव उपाध्याय व डॉ सरोज उपाध्याय .
आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता
ReplyDelete१६ हजार पदे तातडीने भरणार
-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ६ : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
१०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाचे १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्व पदे भरल्यानंतर त्याच निश्चित सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर जाणवेल, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
0000
*हरणाचा* पळण्याचा वेग ताशी *९०* किमी तर *वाघाचा* वेग ताशी *६०* किमी... असतो.
ReplyDeleteतरीपण वाघ हरणाची शिकार करतो.
कारण हरणाच्या मनात *भिती* असते कि आपण वाघापेक्षा *कमजोर* आहोत व हीच भिती त्याला वांरवार मागे पाहण्यास भाग पाडते...
त्यात त्यांचा *वेग व मनोबल* कमी होते.
तो वाघाची *शिकार* होतो...!
कोरोनाच पण तसच आहे.
*कोरोना* पेक्षा आपली *रोग प्रतिकार शक्ती* किती तरी पटीने *जास्त* असताना केवळ *भिती* मुळे आपलं *मनोबल व वेग* कमी झाला.
परिणामी काही *मृत्यू* झाले.
तेव्हा *घाबरू* नका...!
काळजी घेत आपण हे युद्ध जिंकूच...!!!
🙏😷🙏😷🙏😷🙏
💕 *आपला जिव्हाळा कायम राहो*💕
*काळजी घ्या स्वतःची व कुटुंबाची*
!! *सुरक्षित रहा*!!
🙏🏻
लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता
ReplyDeleteराज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार
-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 7 : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:
· राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.
· विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.
· रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला.
· महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
· महाराष्ट्रात रशियातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे.
· जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे
ReplyDeleteमुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात वाटप सुरू
मुंबई दि. 7 . कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार माहे एप्रिल 2021 व मे 2021 या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण सुरू आहे.
तसेच कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना माहे मे 2021 व जून 2021 करीता अनुज्ञेय असलेले नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येईल. त्यानुसार माहे मे 2021 करीताचे मोफत अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2021 महिन्यात मोफत धान्य घेतले नाही. त्यांना माहे मे 2021 मध्ये दुप्पट धान्य मोफत मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये याकरीता आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत शिधावाटप यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांनी एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.
मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरिता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. तसेच अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करुन घ्यावे, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, कैलास पगारे यांनी केले आहे.
*गारंटी आप दोबारा जरूर पढ़ोगे*
ReplyDelete*बहुत आराम से पढ़िएगा,मज़ा अंत में आएगा। प्रश्नों का संकलन बहुत ही सुन्दर ढंग से किया गया है !!*
*1.* क्षेत्रफल की दृष्टि से राजस्थान का देश में कौन सा स्थान है ?
*2.* मोदी सरकार का यह कौनसा कार्यकाल है ?
*3.* कितने चम्मच से एक टेबल स्पून बनता है ?
*4.* हिन्दू पुराणों में कितने वेद होते हैं ?
*5.* राष्ट्रपति का कार्यकाल कितने वर्ष का होता है ?
*6.* भारत की तुलना में और कितने देशों का क्षेत्रफल बड़ा है ?
*7.* पानी का Ph. मान क्या होता है ?
*8.* सौर मण्डल में कुल कितने ग्रह हैं ?
*9.* संविधान की कौन सी अनुसूची प्रथम संशोधन द्वारा शामिल की गई ?
*10.* कितने मिलीमीटर का एक सेंटीमीटर बनता है ?
*11.* एक फुटबॉल टीम में कितने खिलाड़ी होते हैं ?
*12.* कितने इंच का एक फीट होता है ?
*13.* उद्देश्य प्रस्ताव दिसम्बर की किस तारीख को प्रस्तुत किया गया था ?
*14.* लोकसभा में पारित बजट को राज्यसभा कितने दिनों तक रोक सकती है ?
*15.* एक समय का वाहन कर कितने वर्षों के लिए वैध होता है ?
*16.* शटल कॉक में कितने पंख होते हैं ?
*17.* भारतीय मुद्रा में कितनी भाषाएँ छपी होती हैं ?
*18.* महाभारत में कुल कितने अध्याय हैं ?
*19.* वाक् एवं अभिव्यक्ति की स्वतंत्रता का अधिकार संविधान के किस अनुच्छेद में है ?
*20.* टी -20 क्रिकेट में प्रति टीम कितने ओवर होते हैं ?
*21.* महात्मा गाँधी ने दक्षिण अफ्रीका में कुल कितने वर्ष गुजारे थे ?
*22.* भारत के संविधान में मूलतः कितने भाग हैं ?
*23.* मानव शरीर में कुल कितने जोड़ी गुणसूत्र (क्रोमोजोम) होते हैं ?
*24.* एक अशोक चक्र में कुल कितनी लाइन्स होती हैं ?
*25.* M.L.A. बनने के लिए कम से कम कितने वर्ष आयु की अनिवार्यता होती है ?
*.....उत्तर....*
सभी प्रश्नों के उत्तर उनके *"क्रमांक"* ही हैं।
🙏बहुत ही सुन्दर 🙏धन्यवाद 🙏
. *आयुष्यभराची प्रतिष्ठा*💫⭐✨
ReplyDeleteमहाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी
परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी
वाद घालण्यास सुरुवात केली.
गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म
यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने
तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले.
ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
*रुक्मिणीने विचारले..*
*कोणते पाप.?*
कृष्ण म्हणाला.
जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.
*रुक्मिणीने विचारले.*
*मग कर्णाचे काय.?*
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात
कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला
व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण
अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर
त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.
*तात्पर्य :-*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!
*चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.*😇
*🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏻*🌷🌷
*जिभेचा व्यायाम करा आणि "अल्झायमर" दूर करा.*(स्मरणशक्ती जाणारा आजार)
ReplyDelete● वयाच्या 50 व्या नंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार. परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि, कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल. एक दिवस, माझ्या मुलाने मला सांगितले की त्याच्या एका डॉक्टर मित्राने त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.
अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...
1 शरीराचे वजन संतुलित ठेवणे
2 रक्तदाब संतुलित ठेवणे
3 मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे
4 दमा कमी करणे
5 जवळची दृष्टी चांगली करणे
6 कान गुंजने कमी करणे
7 घसा कमी खराब होणे
8 खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे
9 झोप चांगली लागणे
*व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे....*
दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा:
आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे उजवीकडे हलवा.
मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून,माझ्या आठवण शक्तीमधे सुधारणा झाली.
माझे डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही आहेत ...
1 जवळचे नीट दिसायला लागले
२ शरीर संतुलन राहायला लागले
3. तब्येत व्यवस्थित राहणे
4. चांगले पचन
5. सर्दी खोकला कमी होणे
मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.
टिप
जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते...
वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे. जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बऱ्याचदा आपण जीभ चावतो.
जिभेचा वारंवार व्यायाम
मेंदूला उत्तेजित करेल,
आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.
वृद्ध मित्रानो,🙏
"मी हा संदेश प्राप्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव वाचवेल ... मी माझा भाग घेतला आहे, आशा आहे की आपण आपला सहभाग घेऊन मदत करू शकाल. धन्यवाद!
संकलंक:मधुकर.आनंदा प्रधान.(सेवानिवृत्त वरिष्ठ रसायन शास्त्रज्ञ वीजनिर्मिती,महाराष्ट्र शासन)
सर्व कोविड पेशंटना महात्मा फुले योजने खाली उपचार मिळणे साठी दिलासा देणारा मुंबई हायकोर्ट चे औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय अमलात आणणे साठी खालील प्रमाणे अर्ज करावा ही सर्व रुग्ण ग्राहकांना नम्र विनंती. ( सोबत PIL No 49/2020 order dated 7/5/2021)
ReplyDeleteप्रति
मा जिल्हाधिकारी साहेब ,
( अध्यक्ष , जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती , महात्मा ज्यो. फुले जनआरोग्य योजना )
जिल्हा --------
संदर्भ - मा. उच्च न्यायालय जनहित याचिका नं. 49/2020 अन्वये कोरोना ग्रस्ताना लाभ मिळणेबाबत ..
महोदय ,
मी अर्जदार श्री .................. रा ........... ता .............जि. ........ असून माझे नातेवाईक ( आई , वडील , भाऊ , बहीण , आजी किवां स्वतः ) ...........या शहरातील .............हॉस्पिटल मध्ये भरती होते. सदरील हॉस्पिटल हे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ आहे . भरती झाल्यानंतर या योजनेत मोफत उपचार मिळण्याकरिता प्रयत्न केला असता रुग्णालय प्रशासन व या योजनेच्या आरोग्यमित्र यांनी दाद दिली नाही . आमच्या रुग्णाचा जीव वाचविणे आद्य कर्तव्य समजून उसणवारी/ कर्ज घेऊन आर्थिक ऐपत नसतांना रुग्णालयाचे बिल भरणा केले आहे . आमच्या रुग्णाच्या उपचाराची रक्कम रु .............. अक्षरी ..................रुपये हॉस्पिटलमध्ये भरणा केली आहे .आम्ही दि 23.05.20 च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थी असून आमची शिधापत्रिका केशरी / पिवळी असून जिचा क्र. ........ आहे. तसेच लाभार्थ्यांचा आधार कार्ड नं. ........... आहे. पात्र लाभार्थी असताना देखील बिल भरून घेण्यात आल्यामुळे भरणा केलेल्या रकमेची प्रतिपूर्ती ( रक्कम वापस ) मिळावी. ह्या संबंधित मा. उच्च न्यायालयात (औरंगाबाद खंडपीठ )जनहित याचिका क्र. 49/20 अन्वये मा.उच्च न्यायालयाने दि 07.05.21 रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार व सनियंत्रण समितीकडे दाद मागण्याचा आदेश पारित केला आहे . मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे या उद्देशाने मी रुग्णाचे आधार कार्ड , शिधापत्रिका व रुग्णालयात भरणा केलेल्या बिलाच्या प्रति सादर करत असून आम्ही भरलेल्या रकमेचा परतावा मिळावा हि विनंती .
सोबत - मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत, जिल्हाधिकारी अखत्यारीत समिती,व योग्य कागदपत्रे .
आपला अर्जदार
श्री -................
रा .......... ता .......... जि. .
मोबाइल-..............असा अर्ज आपापल्या जिल्हा अधिकारी यांच्या कडे करावा आणि शासकीय अधिकारी यांना रुग्णासाठी काम करणेस मदत करावी तसेच आपल्या गरीब जनतेला महात्मा गांधी जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा.
विजय सागर
अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर
634, सदाशिव पेठ, पुणे 411030.
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात
ReplyDeleteड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी
मुंबई, दि. 10 : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 4 मे ते 2 जून 2021 या कालावधी दरम्यान ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे
*★पक्ष्यांपासून शिकण्यासारखे★*
ReplyDelete🦜१. ते रात्री काही खात नाहीत.
🦜२. रात्री फिरत नाहीत
🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.
🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.
तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात, बरोबर घेऊन
जात नाहीत..!!
🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.
🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.
🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.
🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.
🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.
🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.
🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.
🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.
🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.
*खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल...*
🙏🙏
प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.
ReplyDelete🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.
🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
🎾 पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
🎾पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो
Continue. चरबी कमी करा
ReplyDelete> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
ReplyDelete> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.
2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो.
3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.
४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.
५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.
६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.
७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.
९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.
१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.
११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.
१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.
ReplyDelete१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.
▪नोट :-▪
मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
१) आवळा २) चिकु ३) भेंडी
४) पालक ५) गोबी ६) काकडी
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
यांनी पाठवले आहे..!!!
🌴 आरोग्य वार्ता🌴
"पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.
जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!
मसाले बनवा घरच्या घरी🏚*
ReplyDelete*1) गोडा मसाला🎱* (काळा मसाला)
साहित्य :- धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम.
*कृती :-🥥*
खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या.🥥 तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.
*2) पंजाबी गरम मसाला👳🏻♂👳🏻♀*
*साहित्य 😗
1 टी🥄 स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.
*कृती 😗 जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या. *टीप -* हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.
*3) कांदा लसूण मसाला* 🥥🍚🥜
*साहित्य 😗
2 ते 3 कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 150 ग्रॅम धणे, 150 ग्रॅम सुक्या मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 2 हळकुंडे, 1 टी स्पून लवंगा, 10-12 तमालपत्रे, 10 मसाला वेलदोडे, 1 टी स्पून काळे मिरे, 5 टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम बाद्यान, 5 ग्रॅम नागकेशर, 5 टी स्पून खसखस व 100 ग्रॅम तीळ.
*कृती 😗
वरील सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरवर बारीक करा. (विविध प्रकारच्या रस्साभाज्या व मांसाहारी पदार्थांसाठी उपयोगी.)
*4) स्पेशल गरम मसाला*
साहित्य :- पाव किलो काळे मिरे, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 4-5 हिरवे वेलदोडे, 2 ग्रॅम दगडफूल, अर्धे जायफळ, 2 ते 3 बाद्यान (बदामफुले).
कृती :- सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या व पूड करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
*5) मालवणी मसाला*
साहित्य :- अर्धा किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम जायपत्री, 5 ग्रॅम शहाजिरे.
कृती :- सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा.
*6) कोकणी मसाला*
साहित्य : - पाव किलो लाल सुक्या मिरच्या, पाव किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम लवंगा, जिरे, काळे मिरे, मोहरी, प्रत्येकी 5 ग्रॅम दालचिनी, जायपत्री, शहाजिरे, मेथीदाणे, अर्धी वाटी खसखस, अर्धे जायफळ, 25 ग्रॅम बडीशेप.
*कृती :- 🍿*
वरील सर्व साहित्य कोरडेच भाजा व बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा.
*7) कच्चा मसाला🍱🍕*
साहित्य :- अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे, 5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.
कृती :- सर्व साहित्य कच्चेच मिक्सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.
*8)🍵 चहाचा मसाला☕*
साहित्य :- 150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ.
*कृती :-🍿* वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्सरवर बारीक करा.
*9) दूध मसाला🥛*
*साहित्य :- 🍵*
बदाम 50 ग्रॅम, पिस्ते 50 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, 15-20〽 केशराच्या काड्या, अर्धे जायफळ, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पूड.
कृती :- वरील साहित्याची बारीक पूड करा व दूध, बासुंदी, खीर, श्रीखंड इ. पदार्थांसाठी वापरा.
10) *सांबार मसाला🍛*
ReplyDeleteसाहित्य :- धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे.
कृती :- प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.
11) *🍔पावभाजी मसाला🍞*
साहित्य :- लाल सुक्या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम, 15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा, 7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून, काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून, सुंठ पावडर 2 टी स्पून.
*कृती :-🍯🥙*
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा.
राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षांवरील नागरिकांना देणार दुसरा डोस : आरोग्यमंत्री राजेश टोपे
ReplyDeleteम्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या
१ लाख व्हायल्स राज्य शासन खरेदी करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 11 : राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स राज्य शासन खरेदी करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री श्री. टोपे बोलत होते. आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे असे :
• राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते.
• सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोवीशिल्डचा देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहेत.
• महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
• ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात प्रयत्न केले जात असून विविध जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त पीएसए यंत्र खरेदीचे कार्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
• इथेनॉल प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग उस्मानाबाद येथील धाराशीव साखर कारखान्याने केला असून या कारखान्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दररोज ४ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाली आहे. त्याद्वारे दररोज ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पुरविता येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
• राज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नुतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन मेडीकल असोशिएशनच्या माध्यमातून याबाबत मागणी करण्यात आली होती.
• मधुमेह नियंत्रीत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेले इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकीनकडे मागणी नोंदविण्यात आली असून तीन दिवसांची निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रीया केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
माहे मे-2021 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA)
ReplyDeleteपात्र शिधापत्रिकाधारकांना दोन वेळा मोफत अन्नधान्य मिळणार
मुंबई, दि. 11 : माहे मे-2021 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना मा. मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यतंर्गत व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून असे दोन वेळा मोफत अन्नधान्य मिळणार असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई चे कैलास पगारे यांनी दिली.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहायाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थींना दिनांक १० मे २०२१ पर्यंत माहे एप्रिल २०२१ व मे २०२१ या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत असून आतापर्यंत ७१०१ मे.टन तांदूळ आणि १०५१७ मे. टन इतक्या अन्नधान्याचे ५१% शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण पूर्ण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभादींना माहे मे २०२१ व जून २०२१ करीता अनुज्ञेय असलेले नियमीत अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति सदस्य प्रति महा ५ किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत मे महिन्याकरीता ५२३९ मे. टन तांदूळ व ३५६१ मे. टन गहू इतक्या अन्नधान्याचे २२% शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण करण्यात आले आहे.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थींनी एक देश एक रेशन कार्ड या योजने अंतर्गत Portability व्दारे नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.
मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थींनी एक देश एक रेशन कार्ड या योजने अंतर्गत Portability व्दारे नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.
ReplyDeleteमुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन त्यांना शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी.
उपरोक्त वितरणासंदर्भात तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२-२२८५२८१४ तसेच ई-मेल क्रमांक dycor.ho-mum@gov.in यावर तक्रार नोंदवावी.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये याकरीता आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत शिधावाटप यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टन्सिगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून प्राप्त करून घ्यावे. असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई चे कैलास पगारे यांनी केले आहे.
नीला सत्यनारायण यांचा कालच्या सकाळ मधला लेख*
ReplyDeleteअमेरिकेत "9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला,
त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. दोन विमाने
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.
"डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.
या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.
वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.
पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.
"डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.
तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.
एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.
ReplyDeleteविमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की "मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘
सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.
प्रवासी म्हणाला, "या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव 'डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे."
बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव
निधी घातला.
'डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.
दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही 'डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.
आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.
हे परत एकदा पोस्ट करण्याचे कारण म्हणजे सध्या भारतातील स्थिती आणि काही ठिकाणी अशीच लूट चालू आहे.
'डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे
Must read this story and forward to all pleas
पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना :*
ReplyDelete*THE PERFECT LIFESTYLE"*
हे पाळल्यास तुमच्यापासून आजारपण खूप लांब राहील.... आपण *स्लिम अँड फिट राहाल....*
*कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....*
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे *9.30 ते 10.00* ला झोपणे.
2. सकाळी *5.00 -5.30* अगदी *उशिरा 6* बाजता किंवा त्याच्या आत उठणे.
3. ब्रश करायच्या *आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.*
4. 10 मिनिटे *वज्रासनात* बसणे.
5. कमीत कमी फक्त *10 सूर्यनमस्कार* जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.
5. फक्त *10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे*
6. रोज न चुकता एक *आवळा किंवा आवळ्याचा रस.*
7. *8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा* (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ते 1.30 ला थोडे *हलके जेवण.*
9. ऑफिस मधेच दर *1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.*
10. संध्याकाळी *7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.*
11. कंपल्सरी *15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.*
12. 9 ते 9.30 वाजता *1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.*
★ *खबरदारी घ्या...*
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,*
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
*म्हणजे शंभर पावले चालणे....*
लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण *नंतर एक तासाने पाणी पिणे,*
*पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.*
* रोज कमीत कमी *3 लिटर पाणी प्यावे.*
* फक्त *सिजनल* फळेच खावीत.
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, *कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.*
* दररोज *डाव्याकुशीवर* झोपावे.
* सकाळी *5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.*
**एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही*
आणि
वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यांसाठीच आहेत.
Continue संकलन व् प्रसारण
ReplyDelete।।क्रीडाभारती पुणे।।
*health शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे *पोटातून* होतात, पोटात *अॅसिडीटी, कब्ज* नसला पाहिजे, पोट *स्वच्छ, साफ* तो आरोग्याचा *राजा*.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) *१६० प्रकारचे रोग ❌फक्त "मांसाहाराने" होतात हे लक्षात ठेवा.*
(४) ८० प्रकारचे आजार❓❌ *नुसत्या चहा पिण्याने* होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला *विषारी डोस* आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग *ऎल्युनियम भांडी* वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
(६) तसेच *दारू, कोल्ड्रिंक, चहा* याच्या अति सेवनाने *हदय रोग* होऊ शकतो.
(७) *मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे "सडते."*
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे *पाचनशक्ती मंद होते,* शरीर *कमजोर* होते.
(९) *केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.*
(१०) *गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते.*
गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, *डोळे कमजोर* होतात.
(११) स्नान करताना कधीही *पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका.* कारण, *पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक* येऊ शकतो. प्रथम *पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर,* पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) *उभ्याने कधीही पाणी पिऊ नये..* टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही *मीठ घेऊ नये.* त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही *जोराने शिंकू नये,* नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी *तुळशीचे पाने* खावीत, कधीच *सर्दी, ताप, मलेरिया* होणार नाही.
(१६) जेवणा नंतर रोज *जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.*
(१७) सतत कफ होत असेल, तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी *ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले,* *#बाटलीबंद, फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये# यामुळे नसानसांत* त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग *यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग* या पासून *लिंबू* आपल्याला वाचवते.
(२०) *गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.*
२२) *स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*
ReplyDelete(२३) *मातीच्या भांडयात* स्वैयपाक केल्यास *१००%* पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, *अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते.*
(२४) *गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.*
(२५) *१४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.*
(२६) खाण्यास *सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ*
त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण, हे मीठ फार *विषारी* असते.
(२७) भाजलेल्या ठिकाणी *बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी*, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) *पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.*
(२९) *खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.*
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच *हळद* लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.
(३२) *फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते.* पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) *सकाळचे भोजन राजकुमारा सारखे* तर *दुपारचे भोजन राजा सारखे* आणि *रात्रीचे भोजन भिकारयासारखे* असते व असावे.
*किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये*
*उपाय :*
*कोथींबीर बारीक, बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका, गॅस बंद करून झाकण ठेवा. (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास. ठीक १५दिवस पीत रहा. लघवीने बारीक-बारीक कण निघता-निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.*
*किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कृपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.*
*cp*
*आपणा सर्वांना सुवर्णपुष्प परिवाराच्या वतीने शुभेच्छा !*
*आपलं जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली अनमोल ठेवा आहे. त्याचा उत्तम सांभाळ करूया.*
*जनहितार्थ*
*वृद्धत्व श्रावणबाळाचे .....*
ReplyDeleteकाही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला "नॉट आऊट १०२" हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होता त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो. असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला स्नेहसावलीत आला.
एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते 'डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो?' मी म्हणालो आजोबा अजिबात काळजी करू नका इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल. त्यावर ते म्हणाले "नाही नाही डॉक्टर मला माझ्यासाठी नाही तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे कुठलाही आजार नाही तिला फक्त आताशा कमी ऐकायला येते." मी आश्चर्यचकित होऊन विचारले अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे?" त्याचे काय आहे डॉक्टर मला मागच्यावर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही. त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच आश्यर्यचकित झालो. मी सहज आजोबांना म्हणालो मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत? त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होते "अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे." हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून ,प्रसंगी त्रास सहन करून देखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पहिले कि चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते......
डॉ बालाजी आसेगावकर
स्नेहसावली केअर सेंटर औरंगाबाद.
भा-
ReplyDeleteरत सरका-
र
Government of India
वि त्त मं त्रालय/ राजस् वि भा-
ग
Ministry of Finance/ Department of Revenue
मं-
न संसाधन वि का-
स निदे शा-
लय/ Directorate of Human Resource Development
का द्रीय प्रत्यक्ष कार बो र्ड/ Central Board of Direct Taxes
गेट न०१, वि%तीय तल, ज -
हर लाल नेहरू स्टेविर्डयमं/ Gate No.-1, 2nd Floor, Jawaharlal Nehru Stadium,
नई दिदेल्ली-११०००३/ New Delhi-110003
F.No. 610/01/2021-TCB दि-
नांक: 8
th May, 2021
To
The Pr. Chief Commissioners of Income-tax (CCA)
Madam/Sir,
Subject: Appointment of dependent family members of officers/officials under the
existing Compassionate Appointment Scheme – reg. -
Kindly refer to the subject cited above.
2. The Covid-19 pandemic has wreaked havoc since it raised its head in India and
unfortunately many officers and officials of the Department have lost their lives while in service due
to this disease. The situation is even more painful where the officer/official happened to be the sole
bread earner in the family. The entire Income-tax fraternity stands in solidarity with the families of
the deceased employees.
3. In this context, it is stated that the DoPT vide O.M. No. 14014/6/94-Estt(D) dated
09.10.1988 had issued the ‘Compassionate Appointment under Central Government’ Scheme to
grant appointment on compassionate grounds to a dependent family member of a Government
servant dying in harness or who is retired on medical grounds. The Scheme has been updated
from time to time. The main object of the Scheme is to relieve the families of such Government
servants from financial destitution and to help them get over the emergency.
4. Vide letter dated 4th May 2021, Chairman, CBDT had directed for immediate processing of
Death/ Retirement benefits/ family pension papers in all cases of unfortunate demise of any officer/
staff of the Department. I am further directed to state that in all such cases the family members of
the deceased employees may also be advised about the provisions of the Compassionate
Appointment Scheme and assisted in filing application for appointment under the Scheme at the
earliest. The applications so filed may be disposed expeditiously and the Directorate of HRD may
be contacted on any issue which may enable expeditious disposal of the applications made by
family members of the deceased employees under this Scheme or for any further suggestions in
respect of the Scheme.
5. This issues with the approval of the Competent Authority.
Yours faithfully,
(Shibanka Das Biswas)
Joint Director of Income-tax (TCB)
Directorate of HRD
Copy to: Data Base Cell – with the request to upload on the website www.irsofficeronline.gov.in
भा-
ReplyDeleteरत सरका-
र
Government of India
वि त्त मं त्रालय/ राजस् वि भा-
ग
Ministry of Finance/ Department of Revenue
मं-
न संसाधन वि का-
स निदे शा-
लय/ Directorate of Human Resource Development
का द्रीय प्रत्यक्ष कार बो र्ड/ Central Board of Direct Taxes
गेट न०१, वि%तीय तल, ज -
हर लाल नेहरू स्टेविर्डयमं/ Gate No.-1, 2nd Floor, Jawaharlal Nehru Stadium,
नई दिदेल्ली-११०००३/ New Delhi-110003
F.No. 610/01/2021-TCB दि-
नांक: 8
th May, 2021
To
The Pr. Chief Commissioners of Income-tax (CCA)
Madam/Sir,
Subject: Appointment of dependent family members of officers/officials under the
existing Compassionate Appointment Scheme – reg. -
Kindly refer to the subject cited above.
2. The Covid-19 pandemic has wreaked havoc since it raised its head in India and
unfortunately many officers and officials of the Department have lost their lives while in service due
to this disease. The situation is even more painful where the officer/official happened to be the sole
bread earner in the family. The entire Income-tax fraternity stands in solidarity with the families of
the deceased employees.
3. In this context, it is stated that the DoPT vide O.M. No. 14014/6/94-Estt(D) dated
09.10.1988 had issued the ‘Compassionate Appointment under Central Government’ Scheme to
grant appointment on compassionate grounds to a dependent family member of a Government
servant dying in harness or who is retired on medical grounds. The Scheme has been updated
from time to time. The main object of the Scheme is to relieve the families of such Government
servants from financial destitution and to help them get over the emergency.
4. Vide letter dated 4th May 2021, Chairman, CBDT had directed for immediate processing of
Death/ Retirement benefits/ family pension papers in all cases of unfortunate demise of any officer/
staff of the Department. I am further directed to state that in all such cases the family members of
the deceased employees may also be advised about the provisions of the Compassionate
Appointment Scheme and assisted in filing application for appointment under the Scheme at the
earliest. The applications so filed may be disposed expeditiously and the Directorate of HRD may
be contacted on any issue which may enable expeditious disposal of the applications made by
family members of the deceased employees under this Scheme or for any further suggestions in
respect of the Scheme.
5. This issues with the approval of the Competent Authority.
Yours faithfully,
(Shibanka Das Biswas)
Joint Director of Income-tax (TCB)
Directorate of HRD
Copy to: Data Base Cell – with the request to upload on the website www.irsofficeronline.gov.in