Tuesday, 30 January 2024

नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा

 नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी प्रमाणेच मुख्यमंत्री सचिवालयातून संनियंत्रण

 

            मुंबईदि. २९ : तरूणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. एका तरुणाला रोजगार म्हणजेत्याच्या कुटुंबांचा आनंदसमाधान. त्यामुळे नमो रोजगार अभियानांतर्गत होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी. त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयातूनच संनियंत्रण केले जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            शासन आपल्या दारी प्रमाणेच नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावेतअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            नमो महारोजगार अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढामुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिककौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताकौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्माठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेशासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले आहे. त्याचप्रमाणे नमो महारोजगार अभियानांतर्गत नागपूर येथील महारोजगार मेळावा यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे आता यापुढे होणारे महारोजगार मेळावे शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊनमेहनत घेऊन यशस्वी करणे आवश्यक आहे. एका तरूणाला रोजगार मिळालातर त्याच्या कुटुंबांलाही मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच या महारोजगार मेळाव्यात जास्तीत कंपन्यांनी यावे यासाठी प्रयत्न व्हावेत. या मेळाव्यात सहभागी तरुणांचीही कुशलनिमकुशल अशी वर्गवारीची माहितीही उपलब्ध करून देण्यात यावी. मोठ्या कंपन्यांसोबतआपले महानगरपालिकाबांधकाम क्षेत्रातील कंपन्यात्यांच्या संघटनातसेच मोठे उद्योग नोकऱ्यांचे ऑनलाईन प्लॅटफार्मसरिक्रुटमेंट कंपन्यांही यावेतअसे नियोजन करण्यात यावे.

            मंत्री श्री. लोढा यांनी देखील महारोजगार मेळावा हा महाराष्ट्र राज्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे तो यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले जावेत यासाठी समन्वयाने आणि एकजुटीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाणे हा जिल्हा कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने हा मेळावा प्रचंड यशस्वी व्हावाअसे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            बैठकीत ठाणे येथील महारोजगार मेळाव्याच्या आयोजनाचे स्थळ निश्चितीतसेच रस्तेवाहतूक सुविधा अनुषांगिक बाबींबाबत आढावा घेण्यात आला.

००००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi