Thursday, 11 January 2024

मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय

 मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा वार्षिक योजनांचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्रराज्य शासनाच्या योजनांसह डीपीसीचा निधी उपयोगात आणावा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

            मुंबईदि. 10 :- मराठवाड्यात आकांक्षित तालुक्यांची संख्या जास्त असून काही जिल्हे मानव विकास निर्देशांकात मागे आहेत. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या विकासातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यामुळे मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रमनीती आयोगाच्या योजनाराज्य शासनाच्या योजना यांच्या माध्यमातून मिळणारा निधी प्राथम्याने वापरावा. त्यानंतर जिल्ह्याच्या गरजेनुसार लोकप्रतिनिधींच्या शिफारशींप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी उपयोगात आणावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज मराठवाड्यातील ८ आणि उत्तर महाराष्ट्रातील ५ अशाहिंगोलीछत्रपती संभाजीनगरपरभणीधाराशीवनांदेडलातूरजालनाबीडनाशिकधुळेजळगावअहमदनगरनंदुरबार या १३ जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस नांदेडलातूर आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनबीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेधाराशीवचे पालकमंत्री तानाजी सावंतनाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसेनंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटीलमंत्री डॉ. विजयकुमार गावितजळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलअहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलछत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेहिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारजालन्याचे पालकमंत्री अतुल सावेपरभणीचे पालकमंत्री संजय बनसोडेयांच्यासह पालक सचिव एकनाथ डवलेपराग जैननियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेतसेच संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीजिल्हाधिकारीवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेकेंद्रराज्य शासनासह जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करून राज्यातील काही जिल्ह्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी निधीचा वापर करून जिल्हा परिषद शाळाप्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विकासाचा आदर्श नमुना उभा केला आहे. इतर जिल्ह्यांनीही या मॉडेलचा अभ्यास करून आपापल्या जिल्ह्यात लोकहिताची उत्कृष्ट कामे करावीत. या माध्यमातून नागरिकांच्या जीवनातजिल्ह्याच्या विकासात सकारात्मक परिवर्तन करावे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा.

            निवडणूक आचारसंहिता कालावधीत विकासकामांसाठी निधी मंजूर करताना मर्यादा येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचे पालकमंत्रीजिल्हाधिकारी यांनी योग्य नियोजन करून जास्तीत जास्त कामे मार्गी लावावीत. जिल्ह्यांना मिळालेला निधी निर्धारित कामांवर खर्च होईल याची काळजी घ्यावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीकाही तालुकेजिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि यापुढील काळात राज्यात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाईसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी आणि राज्य आपत्ती निवारण निधीमधून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या जिल्हा नियोजन समितीमधून दुष्काळासंदर्भातील उपाययोजनांसाठी तरतूद करण्याची आवश्यकता नाही. शिक्षणआरोग्यपाणीपुरवठा यासारख्या सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवरच डीपीसीचा निधी खर्च करावाअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi