Thursday, 29 December 2022

हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील अतिक्रमण प्रकरणाची उपायुक्तांमार्फत चौकशी करणार

 हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील

अतिक्रमण प्रकरणाची उपायुक्तांमार्फत चौकशी करणार

मंत्री शंभूराज देसाई

 

            नागपूर, दि. २९ : हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील रहिवाशी सन १९५० पासून वास्तव्यास आहेत की अनधिकृत अतिक्रमीत आहेत याची पडताळणी करण्यात येईल. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत उपायुक्त दर्जाच्या अधिराऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येईल. त्यानंतर कोर्टाच्या निर्णयाच्या अधिन राहून निर्णय घेण्यात येईलअसे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

            सदस्य संतोष बांगर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले, या जागेवर विकास आराखड्यात आरक्षण बदलले असेल तर तपासून इथल्या लोकांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi