2007 साली मला शुगर आहे असे डॉक्टरांनी सांगितले. पण मी ठाम होतो की, मी कोणतीही गोळी घेणार नाही. पण सगळ्यात जास्त जोर गोड खाणे हा होता. मी त्यावरही ठाम होतो की, मी गोड खाणे टाळणार नाही.
मग व्यायाम जोरात सुरु केला आणि वरुन गोड खाणे सुरुच होते. जेव्हा जेव्हा शुगर चेक केली तेव्हा ती काठावर असायची (यातले मोजमाप पण आपली फसवणूक आहे.) मग कधी कारल्याचे ज्यूस, कधी आयुर्वेदीक औषध असे काही काहीं करुन बघीतले. पण समोर जामुन दिसले की, कंट्रोल नाही व्हायचे. मग मला आमच्या एका नातेवाईकाने सांगितले की, पनीर फुल घेऊन बघा. शुगर राहतच नाही. एकीकडे शुगरचे डॉक्टर सांगतात की, एकदा शुगर झाली की, तो रोग नष्ट होत नाही. फक्त कंट्रोल करण्यासाठी त्या डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या का ? फक्त किती वाढली ते पाहण्यासाठी लॅब मध्ये जायचे का ? मजेशीर आहे ना सगळं.
मी काहीं दिवसापूर्वी पनीर फुलाचा प्रयोग करावा म्हणून केला. भावजयीला पण शुगर आहे आणि खूप जास्त आहे. जवळपास उपाशी पोटी 250 ते 300 मध्ये आणि जेवण करुन 450 ते 500 (डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या खाऊन). मग मी त्यांनाही हा उपाय सांगितला. त्यांनी 15 दिवस हा उपाय केला आणि नंतर कामात त्या विसरुन पण गेल्या. पण परवा त्यांनी दर महिन्याला येऊन डॉक्टरकडे रिपोर्ट करायचा तो केला. डॉक्टर परेशान शुगर नॉर्मल.
मला सांगायचा मुद्दा हा आहे की, शुगर असेल तर घाबरु नका. आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. पण हा आजार संपूर्ण नष्ट होतो. तोही फक्त 60 रुपयामध्ये. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रु. पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा करते.
कसे घ्यायचे ?
एका काचेच्या ग्लास मध्ये एक-दोन कप पाणी घ्या.
त्यामध्ये चार ते पाच फुले रात्री भिजत ठेवा
सकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या.
तीच फुले तीन दिवस परत परत वापरावी
पंधरा दिवसानंतर एकदा शुगर चेक करुन पहा.
ज्यांना खूप वर्षापासून शुगर आहे त्यांना सहा महिने हा उपाय केल्यास नंतर आयुष्यभर कधीही शुगरची गोळी लागणार नाही. हा उपाय करताना फक्त मैदा खाण्याचे टाळा. (गोड बिनधास्त खा)
आपल्या आजूबाजूला कोणीही शुगर पेशंट असेल तर त्याला हा उपाय सांगा.
पोलीओ प्रमाणे एक दिवस आपण डायबेटीस सुद्धा संपवू आणि तेही मोफत.
डॉ.हुंबरटकर ता. कणकवली. जिल्हा सिंधुदुर्ग
- 🙏🙏🙏
No comments:
Post a Comment