Wednesday, 28 July 2021

 राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी

पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

 

            अलिबागदि.27 : महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहेअशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

             राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होतेत्यावेळी ते बोलत होते.

             राज्यपाल श्री. कोश्यारी पुढे म्हणालेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील.

              या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवोतुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेलअसेही ते यावेळी म्हणाले.

            यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्री.कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

             यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरेआमदार भरत गोगावलेआमदार आशिष शेलारजिल्हाधिकारी निधी चौधरीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधेअपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळउपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबेमहाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाडमहाडचे तहसिलदार सुरेश काशीदसुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टीतळीये गावाचे सरपंचदुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi