सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना
महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १२६/१८-स
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई ४०००३२.
दिनांक: २ जानेवारी, २०१९
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी चळवळीचा मोठा वाटा आहे. परंतु मागी काही वर्षामध्ये नवीन सहकारी संस्थांची नोंदणी व सदर संस्थांचे नवीन प्रकल्प सुरु होण्याची प्रक्रिया खूपच मंदावली असल्याचे निदर्शनास आले आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांनी आपली उद्दीष्टे व त्या अनुषंगाने काळाची आव्हाने पेलण्याची आवश्यकता विचारात घेऊन सहकाराच्या माध्यमातून काही प्रकल्प राबविणे आवश्यक आहे, जेणेकरुन शेतकरी सभासद/आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग ते ग्राहक यांच्यामध्ये असणारी मध्यस्थांची साखळी कमी होईल. पर्यायाने उत्पादक ते ग्राहक यांचात किफायतशीर व प्रत्यक्ष व्यवहार होऊ शकेल.
राज्यामध्ये सद्य:स्थितीत अटल महापणन विकास अभियांनातर्गत ५००० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सक्षमीकरण करण्याची कार्यवाही सन २०१६ पासून सुरु आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थाशिवाय पणन, प्रक्रिया, सेवा च अन्य प्रकारच्या सहकारी संस्थांनीही व्यवसायाभिमुख प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. Vision 2030 मध्ये नमूद केल्याप्रमाणे व केंद्र शासनाचे Strategy for New India @ 75 मधील कृषी विषयक क्षेत्राबाबत निश्चित केलेली उद्दिष्ट्ये विचारात घेता सहकारी संस्थांचे व्यवसाय/ प्रकल्प कार्यान्वित करुन पर्यायाने व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थासाठी, नवीन योजना सुरु करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सहकाराच्या विकासासाठी कार्यरत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने अशा प्रकारच्या सहकारी संस्थाच्या व्यावसायिकतेला चालना देण्यासाठी योजनेचे प्रारूप शासनास सादर केले आहे. त्या आधारे राज्य शासनाने ग्रामीण विकासास सहाय्यभूत ठरणाया, सहकारी संस्थाच्या कृषी व कृषीपुरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय:
मंत्रीमंडळाच्या दि. १८.११.२०१८ रोजी झालेल्या बैठकीत सहकार संस्थाच्या व्यवसाय/प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना ही नवीन योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ३. सहकारी संस्थाच्या व्यवसायवृध्दीसाठी अटल अर्थसहाय्य योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे असेल.
योजनेची उद्दीष्टे
1. शेतकयांच्या शेतमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे.
ii. शेतमाल उत्पादनांतून शेतकयांचा नफा वाढविण्यासाठी तसेच शेतकयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागत शेतमालावर प्रक्रिया व विक्री करावी यास प्रोत्साहन देणे.
No comments:
Post a Comment