येत्या दहा-पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत.
सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे,
पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,
फुलं देवासाठी तोडणारे,
रोज पूजा करणारे,
मंदिरात एखादी फेरी मारणारे,
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे,
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे,
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे,
पाहूणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहूणाचार करणारे,
पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे,
आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे,
अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे,
भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे),
व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे,
जूना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे,
उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे,
फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे,
खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे.
असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या. कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.
समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल.
त्यानंतर फक्त राहील स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रीम अगत्य !!!!!
सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे,
पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,
फुलं देवासाठी तोडणारे,
रोज पूजा करणारे,
मंदिरात एखादी फेरी मारणारे,
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे,
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे,
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे,
पाहूणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहूणाचार करणारे,
पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे,
आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे,
अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे,
भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे),
व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे,
जूना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे,
उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे,
फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे,
खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे.
असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या. कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.
समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल.
त्यानंतर फक्त राहील स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रीम अगत्य !!!!!
No comments:
Post a Comment