Monday, 30 August 2021

 खादीग्रामोद्योग महामंडळाच्या स्वप्नांचे कौतुक’ कॉफीटेबल बूक,

लघुपटाचे प्रकाशन

 

          मुंबई, 30 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'स्वप्नांचे कौतुकया कॉफी टेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उपस्थित होते.

          राज्यातील खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांमधून यशस्वीपणे रोजगार निर्माण करणाऱ्या ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा या कॉफीटेबल बूकमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योग तसेच शेतीपूरक व्यवसायबरोबर हस्तकलानिसर्गपूरक व्यवसाय आदी ग्रामोद्योगांनी यशस्वीरित्या उभारलेले उद्योग हे नव तरुण उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरतीलअसा आशावाद श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

           ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावातसेच त्यांचे स्थलांतर थांबावे आणि ग्रामीण भागातच कामयस्वरुपी उद्योग उभा रहावा हे मंडळाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

          पुणे हातकागद संस्थेने तयार केलेले फोल्डर्सडायरी व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे श्री. देसाई यांनी अनावरण केले.

००००


 धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून धान खरेदीचे योग्य व्यवस्थापन करावे

                              - अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

 

          मुंबईदि.३०: धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

           पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात घेतली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारेमहाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

         अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणालेधानाची प्रतवारी व इतर बाबींसाठी शासनस्तरावर राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे.या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल.या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई  करण्यात येईल.पणन हंगाम 2020-2021 मध्ये अनेक महत्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले होते.ऑनलाईन सातबारा,बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सिमा सिल करणे,धानाची गुणवत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे,धानापासून तयार होणाऱ्या सिएमआरचे गुणवत्ता नियंत्रणमार्फत गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आले आहे.याप्रमाणेच आताही धान खरेदी करताना या निर्णयांची अंमलबजावणी केली जावी.

         श्री.भुजबळ म्हणालेधान खरेदी केंद्राबाबत स्थानिक यंत्रणांनी समन्वयानी काम करावे.धान खरेदी केंद्रावर कर्मचारी,ग्रेडर,वजन काटे,धान साठवणूकीसाठी गोदामे,मॉइश्च मिटर या सर्व बाबीं उपलब्ध आहेत का याचीही तपासणीही केली जावी.फक्त नोंद असलेल्या शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यात यावे.धानखरेदी केंद्राचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी धान खरेदी केंद्राबाबत  शासन स्तरावर एक मध्यवर्ती माहिती संकलन कार्यालय करता येईल का याबाबत संबधित यंत्रणांनी चाचपणी करावी.धान खरेदी केंद्रावर प्रशिक्षित ग्रेडरची नेमणूक करावी.सर्व गोदांमाचेही योग्य व्यवस्थापन करण्यात यावे तसेच कोणताही शेतकरी धान नोंदणीपासून वंचित राहता कामा नये याचीही खबरदारी घेण्यात यावी अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

          अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणालेमिलर्स सोबत करारनामे करताना त्यांना सर्व अटी व नियम यांची माहिती देण्यात यावी.जे मिलर्स केलेल्या करारनाम्यातील अटींचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मिलर्सकडून प्राप्त होणारा सिएमआरची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्रशिक्षित गुणवत्ता यंत्रणेची नेमणूक करण्यात यावी.याबाबत शासन व भारतीय अन्न महामंडळ यांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करण्यात यावे जेणेकरून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती संबधित कर्मचा-यांना देण्यात यावी, जेणेकरून गोदामाचे व्यवस्थापन या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. बारदानाच्या आवश्यकतेबाबत शासन स्तरावरून माहिती संकलित करण्यात येवून प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बारदाना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात येईल अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या.

            श्री.भुजबळ म्हणालेपणन हंगाम २०२०-२१ साठी ज्वारीबाजरीगहूमका व रागी या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व अंदाजीत उत्पादन याबाबत योग्य माहिती घेण्यात यावी. जेणेकरून केंद्र शासनास भरडधान्याच्या बाबतीतील माहिती कळविण्यात येईल. भरडधान्याची प्रत व गुणवत्ता तपासूनच खरेदी करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

 सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देणार

- महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात

 

·       गांधी जयंतीपासून मोफत घरपोच सातबारा मोहीम

         

          श्रीरामपूरदि.30 : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिलाआता 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी घेण्यात येत असल्याची घोषणा श्रीरामपूर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

          महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात म्हणालेनागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा खाते उतारा थेट शेतकऱ्यांच्या आणि खातेदाराच्या हातात देऊन आम्ही हा नव्या स्वरूपातील सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत. याशिवाय पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची काळजी घेण्याचेही महसूल यंत्रणेस स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

          राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणीसंगणकीकृत सातबाराऑनलाइन फेरफारजलदगतीने जमिनींची मोजणीसामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा नव्या स्वरुपातील सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहीत व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खातेउताराचीही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवालतलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

0000

 दिलखुलासकार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

 

          मुंबईदि. 30 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची  'नियम पाळा,कोरोना टाळाया विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर बुधवार दि. 1 सप्टेंबर आणि  गुरूवार दि.2  व शुक्रवार दि.3 सप्टेंबर 2021  रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.  निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          राज्यातील लसीकरणाची सद्यस्थितीतिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे असलेले नियोजन,डोअर टू डोअर लसीकरण,लसीकरणानंतरही घ्यावयाची काळजी,डेल्टा आणि डेल्टा प्लस हा व्हेरियंट, या आजाराचे रूग्णकोरोना प्रतिबंधात्मक उपाय याविषयी राज्यातील जनतेला केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. टोपे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

0000


 

 सोमवार

जन्माष्टमी


भगवान श्री कृष्णा बद्दल उत्कृष्ट माहिती


1) श्रीकृष्णाचा जन्म *5252 वर्षांपूर्वी झाला *

2) *जन्मतारीख *: *18 जुलै, 3228 ईसा पूर्व *

3) महिना: *श्रावण *

4) दिवस: *अष्टमी *

५) नक्षत्र: *रोहिणी *

6) दिवस: *बुधवार *

7) वेळ: *00: 00 सकाळी *

8) श्री कृष्ण *125 वर्षे, 08 महिने आणि 07 दिवस जगले. *

9) *मृत्यूची तारीख *: *18 फेब्रुवारी 3102 ईसा पूर्व*

10) जेव्हा कृष्ण * 89 वर्षांचे * होते; महायुद्ध * (कुरुक्षेत्र युद्ध) * झाले.

11) कुरुक्षेत्र * युद्धानंतर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

12) कुरुक्षेत्र युद्ध *मृगशिरा शुक्ल एकादशी, 3139 रोजी सुरु झाले होते.

12) 21 डिसेंबर 3139  ईसा पूर्व रोजी "दुपारी 3 ते संध्याकाळी 5" दरम्यान *सूर्यग्रहण होते; जयद्रथच्या मृत्यूचे कारण.*

13) भीष्म *2 फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), 3138 ईसा पूर्व *मरण पावले *


14) कृष्णाची पूजा केली जाते:

(a) कृष्ण *कन्हैया *: *मथुरा *

(b) *जगन्नाथ *:- *ओडिशा मध्ये *

(c) *विठोबा *:- *महाराष्ट्रात *

(d) *श्रीनाथ *: *राजस्थान मध्ये *

(e) *द्वारकाधीश *: *गुजरात *मध्ये

(f) *रणछोड *: *गुजरात *मध्ये

(g) *कृष्णा *: *कर्नाटकातील उडुपी *

h) *केरळमधील गुरुवायुरप्पन *


15) *पिता *: *वासुदेव *

16) *आई *: *देवकी *

17) *दत्तक पिता *:- *नंदा *

18) *दत्तक आई *: *यशोदा *

19 *मोठा भाऊ *: *

*बलराम*

20) *बहीण *: *सुभद्रा *

21) *जन्म ठिकाण *: *मथुरा *

22) *धर्मपत्नी *: *रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मण *

२३) कृष्णाने त्याच्या आयुष्यात फक्त ४ लोकांना ठार मारल्याची नोंद आहे.

(i) * चानूर *; पैलवान

(ii) * कंस *; त्याचे मामा

(iii) & (iv) * शिशुपाल आणि दंतवक्र *; त्याचे चुलत भाऊ.

24) जीवन त्यांना अजिबात योग्य नव्हते. त्याची *आई *उग्रा कुळातील *होती, आणि *वडील * *यादव कुळातील, .

25) श्याम वर्णीय. संपूर्ण गोकुळ गाव त्यांना; *कान्हा* म्हणून बोलवायचे.काळा, लहान आणि दत्तक असल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली गेली आणि त्याची छेड काढण्यात आली. त्याचे बालपण जीवघेण्या परिस्थितीने घडले.

26) *'दुष्काळ' आणि "जंगली लांडग्यांचा धोका" त्यांना वयाच्या 9 व्या वर्षी 'गोकुळ' वरून 'वृंदावन' मध्ये हलवले

27) तो 10 वर्षे 8 महिने *पर्यंत वृंदावनात राहिले. त्याने मथुरा येथे वयाच्या 10 वर्षे आणि 8 महिन्यांच्या वयात आपल्याच काकांना ठार मारले, त्यानंतर त्याने आपल्या आई आणि वडिलांना सोडले.

२)) ते पुन्हा कधीही वृंदावनात परत ले नाही.

29) सिंधू राजाच्या धमकीमुळे त्याला मथुरेहून द्वारकाला स्थलांतर करावे लागले; कला यावना.*

30) त्याने गोमंतक टेकडीवर (आता गोवा) 'वैनाथेय' जमातींच्या मदतीने जरासंधाचा पराभव केला. *

31) त्याने *द्वारकाची पुनर्बांधणी केली *.

३२) त्यानंतर ते १ age ~ १ age वयाचे शालेय शिक्षण सुरू करण्यासाठी * उज्जैन येथील सांदीपनीच्या आश्रमात गेले.

33) त्याला आफ्रिकेतील समुद्री चाच्यांशी लढावे लागले आणि त्याच्या शिक्षकांच्या मुलाला सोडवावे लागले; पुनारदत्त*; प्रभासाजवळ * कोणाचे अपहरण झाले होते; गुजरातमधील समुद्री बंदर.

34) शिक्षणानंतर त्याला वनवासच्या आत्ये भावांच्या नशिबाची माहिती मिळाली. '' वॅक्स हाऊस '' मध्ये तो त्यांच्या मदतीला आला आणि नंतर त्याच्या आत्ये भावांनी * द्रौपदीशी लग्न केले. * या गाथेत त्यांची भूमिका प्रचंड होती.

३५) मग, त्याने आपल्या आत्ये भावांना इंद्रप्रस्थ आणि त्यांचे राज्य स्थापन करण्यास मदत केली.


36) त्याने *द्रौपदीला लाजिरवाण्यापासून वाचवले. *


३)) तो त्याच्या आत्ये भावांना त्यांच्या वनवासात उभा राहिला.

38) तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि *त्यांना कुरुक्षेत्र युद्ध जिंकून दिले. *


३)) त्याने *आपले प्रिय शहर पाहिले, द्वारका वाहून गेला. *

40) त्याला जवळच्या जंगलात * एका शिकारीने (जरा नावाने) ठार केले.

41) त्याने कधीही चमत्कार केले नाहीत, त्याचे आयुष्य यशस्वी नव्हते. असा एकही क्षण नव्हता जेव्हा तो आयुष्यभर शांत होता. प्रत्येक वळणावर त्याला आव्हाने आणि त्याहूनही मोठी आव्हाने होती.

42) त्याने *प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येकाचा जबाबदारीच्या भावनेने सामना केला आणि तरीही तो अटळ राहिला. *


43) तो एकमेव व्यक्ती आहे, ज्याला भूतकाळ आणि भविष्य माहित होते; तरीही तो नेहमी त्या वर्तमान क्षणी जगला.*


44) तो आणि त्याचे जीवन खरोखरच *प्रत्येक मनुष्यासाठी एक उदाहरण आहे. *


*जय श्री कृष्ण*

 जरूर वाचा...

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, "भाजी घ्यायची का मावशी?"

आई आतून नेहमी सारखी ओरडली, "काय आहे भाजीला?"


"गवार हाय, तंबाटी, पालक,...." एवढे बोलताच आई म्हणाली, "थांब आले"


दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, "पालक कसा?"


रुपयाची गड्डी - भाजीवाली

पन्नास पैशाला दे, चार घेते - आई

नाय जमणार मावशी - भाजीवाली

मग राहुदे - आई


भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. "बारा आण्याला दिन - भाजीवाली

नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते - आई

नाय जमणार - भाजीवाली

आणि पुन्हा गेली


थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तीला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तीला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, "जेवली का नाही?"


नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेउन , मग सैपाक, मग जेवण - भाजीवाली


थांब जरा. बस इथं. मी आणते." म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळ दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.


मला राहवलं नाही. मी आईला विचारले, "तु एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तीला खायला दिले."*


आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले...


व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये

 राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करतांना

स्थानिकांसाठी रोजगार संधी

                                                                                                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       गुंतवणूकदारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

            मुंबई दिनांक 26: राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्येसाधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील,  हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या आरखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतीलया माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी राज्यशासन गुंतवणूकदाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाहीही यावेळी दिली.

            एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरु असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचात्या प्रगतीस पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दै. लोकसत्ताने इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह 2021 चे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देसाईउद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरेसीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही नरेंद्रनलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरयांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.

            स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथे उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केले जाईल असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  दै. लोकसत्ताने अतिशय गरजेच्यावेळी या परिसंवादाचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कोरोनाच्या आजच्या संकटकाळात आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असलो तरी आपल्यासमोर यातून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत त्यापैकी एक रोजीरोटीचे आहे. महाराष्ट्राने या आव्हानाचे संधीत रुपांतर करतांना कोरोनाच्या काळातही उद्योग व्यवसायांना दिलासा देण्याचे काम केल्याचे व अनेक नवनवीन उपक्रम सुरु केल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, आज कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला  दिसत असतांना आपण हळुहळु काही गोष्टी सुरु केल्या आहेत. हा मधला काळ मागे वळून पाहण्यासाठीचा आहे. आपण काय केले आणि काय केले पाहिजे या धोरणात्मक बाबींच्या निश्चितीसाठी हा वेळ उपयोगी लावला जात असून महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी  आपलेपणाची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपल्यापैकी काही जणांची जन्मभूमी आहे पण अनेकांची कर्मभूमीही आहे.  या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्राला आपलं समजून या राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून काम करावे अशी अपेक्षाही श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.

            राज्यात उद्योगस्नेही वातावरणाची निर्मिती करण्याला शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना देण्यात येत असलेल्या सुविधांची तसेच यासंबंधाने घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. एक खिडकी योजनाउद्योग मित्रांची नियुक्तीकुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणेवीजेचे दर कमी करणे यासारख्या विषयांवरही शासन काम करत आहे परंतु असे निर्णय घेतांना राज्याचा समतोल विकास होईल याकडेही लक्ष द्यावे लागतेसर्वसामान्य नागरिकांसह अनेक क्षेत्रांकडेही लक्ष देणे गरजेचे असते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

            मुख्यमंत्र्यांनी पर्यटनक्षेत्रात अमाप रोजगार संधी दडल्या असल्याचे सांगतांना पर्यटनक्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती दिली. काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत असून त्याकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कोरोना कालावधीत सक्षम नेतृत्व - उद्योगमंत्री सुभाष देसाई

            मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये राज्याला सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करणारे नेतृत्व दिले असे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            श्री देसाई म्हणालेजीवन वाचविण्याचे लक्ष आपल्यासमोर आहे. अचानक टाळेबंदी जाहीर झाल्यानंतरच राज्यातील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात आले आणि राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यात आले.

राज्यात नवे उद्योग राज्यात

            राज्यातील प्रस्थापित उद्योगांसोबतच नवे उद्योग राज्यात सुरू होत असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, आयुष्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाने औषधी वनस्पतीवर आधारीत उद्योग कुडाळ येथे सुरू होत आहे. नासिक येथे रिलायन्सची जैविक विज्ञानावर आधारित संशोधनासाठी साडेपाच कोटीची गुंतवणूक झाली आहेयवतमाळ येथे 60 हजार 500 कोटी रूपयांचा विटाल ग्रुपचा वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याचबरोबर गेल इंडिया ‘ ने अलिबाग जवळ सिएनजी व इंधन निर्मितीच्या प्रकल्पाची सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

            ऑक्सिजन क्षेत्रात सक्षम होण्यासाठी प्राणवायु निर्मीतीचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आतापर्यंत सुमारे 60 कंपन्यांची भूखंड मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुर्गम भागांत काम करू इच्छिणाऱ्या उद्योगांवर दिडशे टक्के परतावा देण्यात येणार असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले.

            तळेगाव पार्क जवळ इलेक्ट्रॉनिक्स पार्क तयार होत आहे,राज्यात डेटा सेंटर तयार होत आहेमिहान मध्ये एअरबस प्रकल्प येऊ घातला आहेऔरंगाबादमध्ये बिडकीन येथे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे.त्याचप्रमाणे राष्ट्राच्या सकल उत्पन्नात भर टाकणारा मोठा असा सेवा उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी अनेक मोठे उद्योग राज्यात येण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचा उद्योग विभाग सज्ज आहे.

            खादी ग्रामोद्योगमहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून तयार होणारे ग्रामिण कलावंतांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तुंना फ्लिपकार्ट, ॲमेझॉनइकाई सारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून दिली आहे.

            राज्यातील 60 टक्के नागरिक हे 35 वर्षाखालील आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. यासाठी महाजॉब पोर्टल सारख्या माध्यमातून रोजगारासाठी सहकार्य करण्यात येते. राज्य हे खऱ्या अर्थाने मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. असेही उद्योगमंत्री म्हणाले.

रोजगार निर्मितीसह प्राण वाचविणारा विभाग - अदिती तटकरे

            राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवण्याबरोबरच ऑक्सिजन निर्मीती करून लोकांचे प्राण वाचविण्याचे काम उद्योग विभागाने केले आहे.असे उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, राज्यात टाळेबंदी असतांना देखील उद्योगक्षेत्र अहोरत कार्यरत होते. आरोग्यविभागाच्या बरोबरीनेच कोविड रुग्णांसाठी उद्योग विभाग आणि उद्योजकांनी कार्य केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही राज्यावर उद्योजकांनी विश्वास ठेवला आणि ५६ सामंजस्य करारआणि सुमारे १ लाख ३० हजार कोटीची गुंतवणूक राज्यात झाली. राज्यातील औद्योगिक विकासात महिलांचे योगदान वाढावे यासाठी विशेष प्रोत्साहन देणारी योजना राज्यातर्फे राबविली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचाऔद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी लोकसत्ताच्या वतीने इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली जात आहे. या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे.

            देशातील औद्योगिक उत्पादनाच्या 15 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास 40 टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर सात दशके महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य केले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. कोरोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या याचा आढावा या कार्यक्रमात घेतला जाणार आहे.

००००

 

Featured post

Lakshvedhi