Wednesday, 25 June 2025

राज्य शासनाकडून 2021, 2022 व 2023 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

 पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

राज्य शासनाकडून 2021, 2022 व 2023 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 24 : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 - बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

या तीन वर्षाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींचे नावे पुढीलप्रमाणे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 अंतिम निकाल

अ.क्र.

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

विजेता नाव

1

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार

1 लाख रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. मंगेश वैशंपायन

               

 

अ.क्र.

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

विजेता नाव

1.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

2.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

प्रवेशिका प्राप्त नाही

3.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. विजयसिंह कौशिक

4.

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. फरहान हनीफ

5.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी)

(माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

डॉ. किरण मोघे

6.

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. गजानन उमाटे

7.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. प्रशांत चव्हाण

8.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. मनोज अहिरे

9.

समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. अल्पेश करकरे

10.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. देविदास मुळे

11.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

विभागीय पुरस्कार

12.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

(नाशिक विभाग)

 

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,

याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

श्री.फणिंद्र मंडलिक

 

13.

अनंतराव भालेराव पुरस्कार,

(औरंगाबाद आणि लातूर विभाग)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री.दत्तात्रय देशमुख

14.

आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. संजीव भागवत

15.

नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

(पुणे विभाग)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्रीमती मेधा पालकर

16.

शि. म. परांजपे पुरस्कार,

(कोकण विभाग)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्रीमती जान्हवी पाटील

17.

ग. गो. जाधव पुरस्कार,

(कोल्हापूर विभाग)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. महेश सरनाईक

18.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

श्री. अनुप गाडगे

19.

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार,

(नागपूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 अंतिम निकाल

अ.क्र.

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

विजेता नाव

1

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार

1 लाख रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

 

 

अ.क्र.

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

विजेता नाव

1.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

2.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

3.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ

 आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारनिर्वाहशैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ

          अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीयजिल्हातालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसत‍िगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यांमध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली असून शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

          महागाई निर्देशांकाचा विचार करून या भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांत कोणतीही वाढ न मिळाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आता सुधारित दरानुसार अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. नवीन सुधारित दर पुढीलप्रमाणे (सध्याचा भत्ता) :-

निर्वाह भत्ता (दरमहा) : विभागीय स्तरासाठी 1400 रूपये (800)जिल्हा स्तरासाठी 1300 रूपये (600) आणि ग्रामीण/तालुका स्तरासाठी 1000 रूपये (500) इतका भत्ता देण्यात येणार आहे. मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही 100 वरून 150 रूपये इतका वाढविण्यात आला आहे.

शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक) : इयत्ता 8 वी ते 10 वीसाठी 4500 रूपये (3200)11 वी12 वी व पदविका अभ्यासक्रमासाठी 5000 रूपये (4000)पदवी अभ्यासक्रमासाठी 5700 रूपये (4500) तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 8000 रूपये (6000) एवढा भत्ता मंजूर झाला आहे.

आहार भत्ता (दर महिना) : महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहासाठी 5000 रूपये (3500) आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी 4500 रूपये (3000) इतका भत्ता निश्चित करण्यात आला आहे.

          राज्यात 490 वसतिगृह सुरू असून त्यापैकी 284 मुलांची व 206 मुलींची वसतिगृहे आहेत. यामध्ये एकूण 58 हजार 700 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

***

कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग

 महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती20 हजार 787 कोटींची तरतूद

राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग

          राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग) प्रकल्पाला गती देण्यासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

          महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धायवतमाळहिंगोलीनांदेडपरभणीबीडलातूरधाराशिवसोलापूरसांगलीकोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुरतुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.  तसेच संतांची कर्मभूमि असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामीजोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ व परळी वैजनाथमहाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरयासह कारंजा-लाडअक्कलकोटगाणगापूरनरसोबाची वाडीऔदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे. 

          या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून 12 हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.  या निधीतून सुमारे 7 हजार 500 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असूनत्यातून पर्यटनवाहतूक व ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.


गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद

 गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात

क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. २४ : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात गावागावात क्रीडा सुविधा उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक गावात १० लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवण्यास क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजुरी दिली. राज्य क्रीडा विकास निधी सनियंत्रण समितीची बैठक क्रीडा मंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

 राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिकमाध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालये, ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे अशा सर्व शैक्षणिक संस्थास्थानिक स्वराज्य संस्थाविविध विभागांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळाआश्रमशाळावसतीगृहे यांना हे क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच एकविध खेळाच्या क्रीडा संघटनखासगी क्लबक्रीडा मंडळेयुवक मंडळमहिला मंडळे यांनाही १० लाखापर्यंतचे क्रीडा साहित्य देण्यास मान्यता देण्यात आली.

हातकणंगले व हुपरी तालुका क्रीडा संकुल संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक निधीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर धारावी येथील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलमुंबई शहर या कामामधील त्रुटी ठेकेदार कंपनीने तत्काळ दूर कराव्यात. कोणतेही काम अपूर्ण ठेऊ नये अशा सूचना क्रीडा मंत्री भरणे यांनी यावेळी दिल्या.

Featured post

Lakshvedhi