Tuesday, 20 May 2025

बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस' पुस्तिका उपयुक्त ठरतेय,pl share

 बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवसपुस्तिका उपयुक्त ठरतेय

– आयुक्त कैलास पगारे

मुंबईदि. १९ गरोदर माता व सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागाच्या 'एकात्मिक बालविकास सेवा योजने'अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ ही मार्गदर्शक पुस्तिका पालकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे आयुक्त कैलास पगारे यांनी व्यक्त सांगितले.

जागतिक महिला दिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बालकांच्या कुपोषणाच्या समस्येवर मात करणेबालमृत्यू दरात घट आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्त्वाचे असतात. या कालावधीत गरोदर मातांनी स्वतःची योग्य काळजी कशी घ्यावीबाळाच्या मानसिक आणि भावनिक गरजा कशा पूर्ण कराव्यातयासंदर्भात तज्ञांच्या मदतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

मूल ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. बालपणापासून योग्य संगोपन झालेतर देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत होतो, असेही श्री.पगारे यांनी सांगितले.

पुस्तिकेच्या मलपृष्ठावर माता-बाल संगोपन कार्ड’ आणि लसीकरणाबाबतची माहिती देणारा QR कोड देण्यात आला आहे. यामुळे पालकांना वेळेवर लसीकरणाची माहिती मिळू शकते. या QR कोडच्या साहाय्याने शासनाच्या योजनांची माहितीही मिळू शकते.

गरोदर स्त्रियांचे आरोग्यपोषणपूरक आहारबालकांची वाढ आणि विकास याविषयी संक्षिप्त व उपयुक्त माहिती या पुस्तिकेत देण्यात आली असूनबालकांची सशक्त पिढी घडवण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरेलअसा विश्वास पगारे यांनी व्यक्त केला.

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा

 पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरूhttps://dte.maharashtra.gov.in या

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय;

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबईदि. १९ : पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून दहावीनंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० मे २०२५ पासून सुरू होत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावाअसे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीतंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञअभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात, असेही श्री.पाटील सांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशीलवेळापत्रकनाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

मधुमक्षिका प्रेमाची*,जागतिक मधमाशी दिन*

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻

 

            *मधुमक्षिका प्रेमाची*

                                                  

           ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

        *जागतिक मधमाशी दिन*     

           ⚜️⚜️🐝⚜️⚜️

                                                                                                                              

🌹🥀🌸🔆🐝🔆🌸🥀🌹


    *पीत्वा रसं तु कटुकं मधुरं*

    *समान माधुर्यमेव*

    *जनयेन्मधुमक्षिकासौ*

    *सन्तस्तथैव*

    *समसज्जनदुर्जनानां श्रुत्वा*

    *वचः मधुरसूक्तरसं सृजन्ति*

        *जीवनात हा आदर्श ठेवलाय तो मधुमक्षिकेने. अर्थात ज्याप्रमाणे मधमाशी कडू आणि गोड रस सेवन करुनही केवळ मधुर रसच प्रदान करते तसेच संतही त्यांच्याविषयी दुर्जन कितीही वाईट बोलले, ते ऐकूनही सज्जन दुर्जनांना मधुर.. चांगलाच उपदेश करतात.*

        *मधुमक्षिका किं जनयति.. याचे उत्तर अर्थातच माधुर्यमेव.. मधुमक्षिका.*

        *मधमाशीला प्रत्यक्ष श्री  दत्तगुरुंनीही गुरु मानलेय. संत गजानन महाराजांनीही मधमाश्यांनी त्यांना डंख केल्यानंतरही त्यांच्यावर प्रेमच करायला शिकवलेय. साहित्यातही वारंवार मधमाश्यांचे उल्लेख आहेत.*      

        *आज जागतिक मधुमक्षिका दिन. युरोपातील स्लोव्हनिया देशातील अँतोन जोंसा हे जगातील पहिले मधुमक्षिका पालन तज्ञ. त्यांनी १७७१ मध्ये यावरील पुस्तक लिहले. त्याच्या कार्याची दखल घेत २०१८ पासून २० मे हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने 'जागतिक मधमाशी दिन' घोषित केला. मधुमक्षिकेचे जीवनातील महत्त्व याबद्दल जनजागृतीसाठी या दिवसाचे महत्त्व.*  

        *जागतिक मधमाशी दिन २०२५ ची थीम "मधमाशी आणि पर्यावरणाची सुरक्षा" आहे. यावर्षी मधमाशी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काय करायला हवे, यावर अधिक भर दिला जाईल.*        

        *मधमाशी जिचे अस्तित्व पुरातन काळापासून आहे. मधमाश्या आहेत तोवरच हे चराचर आहे. मधमाशी हा ६ पाय आणि दोन पंख असणारा किटक. ७ जाती ४४ उपजाती असलेला. त्यांच्या एका पोळ्यात.. वसाहतीत २० ते ८० हजार मधमाश्या असतात. सामुदायिक एकात्मतेने जीवन कसे जगावे हे सांगणारे हे पोळे. यामध्ये असते एक राणी माशी.. ड्रोन म्हणून फिरणारे नर आणि इतर हजारो कामकरी मधमाश्या. अत्यंत निष्ठेने कधीच आळस न करता काम करणाऱ्या या प्रामाणिक मधमाश्या.* 

        *'थेंबे थेंबे तळे साचे' चे उदाहरण म्हणजे मधमाश्यांचे पोळे. एक एक लहानसा जीव. एकदिलाने.. एकनिष्ठेने.. समर्पणाने सामुहीक कार्य कसे करावे.. अमृत संचय कसा करावा याचा मानवासाठी आदर्श ठेवतो. संचयाचे महत्त्व मोठे. जीवनात धन संचयासाठीही हा आदर्श.*

        *मधमाश्यां परागीभवन होते ज्या मुळे नैसर्गिकरित्या २५ ते ३०% वनस्पती.. शेती उत्पादनात वाढ होते. मधमाश्यांचे शुद्ध मध आणि मेण प्राप्त होते. मेणाचे अनेक उपयोग होतात. मध हे अत्यंत गुणकारी आयुर्वेदीय औषध. मधाला गोडवा आहेच पण अनेक रोगावर मधप्राशन उपकारक. रक्तदाब.. लठ्ठपणा दूर करणारे.*

        *मधाची जगभरातील मागणी लक्षात घेता मधमाश्या पालन हा शेतीसाठी पूरक व्यवसाय झाला आहे. यासाठी मधुमक्षिका पालन वर्ग.. प्रशिक्षण वर्ग देशभर कार्यरत आहे. अत्यल्प खर्चात सुरू होणारा हा पोटव्यवसाय शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देत आहे. शेतीलगत पेट्या ठेवून मधमाश्या पालन केले जातेय. या मधमाश्यामुळे इतर कोणत्याही किटकनाशके.. खताशिवाय शेती उत्पन्न वाढतेय.*   

        *महाराष्ट्रात सर्व कृषी विद्यापीठे खादी ग्रामोद्योगसह मधमाश्यांचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आणि मधपेटीसह व्यवस्था करुन पीक वाढीसह रोजगार.. व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहेत.* 

        *महाराष्ट्रात मांघर, पाटगाव या गावांची मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. डहाणू, भंडारवाडी, बोरझर, काककडधाबा, चाकोरे, उडदावणे, महाबळेश्वर आमझरी यांची मधाचे गाव म्हणून निवड झाली असून लवकरच २१ गावेही समाविष्ट  होत मधु पर्यटन वाढ होत मोठ्या प्रमाणात व्यवसाय.. रोजगार वाढ होणार आहे.*

        *लोकांना आणि मधमाश्यांना इजा न होवू देता मधाचे पोळे सुरक्षितपणे काढून देणाऱ्या समाजसेवकांची नावे ग्रामपंचायत ते मनपा लोकांना भविष्यात उपलब्ध करुन देत या मधुर कार्यात हातभार लावतील.*

        *आम्हांला शुद्ध.. भरपूर अन्नधान्य, फळे देण्यासाठी मदत करणाऱ्या या अमृतमय मधमाश्या पालनाकडे आज जगाचे लक्ष वेधले जाते. आपणही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मधुमक्षिकेवर प्रेम करायला शिकू या. मधमाशीचे सर्वोत्तम गुण सांगणारे हे बालगीत.*


🌹⚜️🌸🥀🐝🥀🌸⚜️🌹


  *उठुनि सकाळी ती मधमाशी*

  *जाते की मध मिळवायासी*

  *थेंबे थेंबे साठवी त्यासी*

  *उद्योगी मोठी मधमाशी*


  *आळस तिजला ठाऊक नाही*

  *सर्व दिवस ती खपते पाहीं*

  *थंडी ऊन म्हणेना कांहीं*

  *उद्योगी मोठी मधमाशी*


  *गोड गोड मध निपटुनि घेते*

  *थोडा म्हणुनी मुळीं न रुसते*

  *साठवुनी तो जपुनि ठेविते*

  *उद्योगी मोठी मधमाशी*


  *थोडाही गुण मिळता घ्यावा*

  *साठा त्याचा नित्य करावा*

  *कोणालाही तो शिकवावा*

  *ठेवा हे चित्ती*

  

🌹🎼🌹🔆🐝🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : पारंपारिक*  ✍️

  *संगीत : नंदू घोलप*   

  *स्वर : कविता पौडवाल*

   

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *२०.०५.२०२५*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा

 विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा

-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. १९ : विलेपार्ले मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय संबधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावेतअसे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार पराग अळवणीसचिव संदीप देशमुखमुख्य अभियंता रामा मिटकरउप सचिव चं. द. तरंगेअवर सचिव दुर्गाप्रसाद मैलावरम आदी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणालेउपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांसंदर्भात विभागाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी. तसेच भूखंड क्रमांक १८७नगर योजनाविलेपार्ले (पूर्व) या भूखंडावरील योजनेमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावीअशा सूचनाही राज्यमंत्री श्री. भोयर यांनी दिल्या.

०००००

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावा

 अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी

 समुपदेशन कार्यक्रम घ्यावा

-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबईदि.१९:- अतिरिक्त  ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुदेशन कार्यक्रम घ्यावाअसे  शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले.

राज्यातील प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस  संचालक (माध्यमिक) श्री. पालकरसंचालक (प्राथमिक) श्री. गोसावीशिक्षण उपसंचालक संदीप संगवेमुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितलेमुंबईत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत समायोजन होण्यासाठी महापालिका व शिक्षण विभागाने एकत्रित बैठक घ्यावी. पती - पत्नी शिक्षक समायोजन संदर्भातील प्रकरणे वेगळी कळवावीत.

या बैठकीत शिक्षक संघटनांनी अतिरिक्त शिक्षक समायोजनअतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन यासह शिक्षकांच्या समस्या मांडल्या. शिक्षक संघटनांनी मांडलेल्या शिक्षकांच्या समस्या सकारात्मकतेने सोडवल्या जातील असेराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

०००००

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

 गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या

संतहुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

 

मुंबईदि. 19 : महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्‍यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड् आशिष शेलार यांनी सांगितले..

महाराष्ट्राच्या सामाजिकसांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संतमहापुरुषहुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास उलगडणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 21 मे पर्यंत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढामहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.

या चित्रप्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या मुख्यमंत्री व लोकनेत्यांपर्यंतच्या ऐतिहासिक वाटचालीचे दर्शन घडते. या प्रदर्शनात संत परंपरासमाजसुधारणा चळवळीसंयुक्त महाराष्ट्र आंदोलनतसेच विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या माध्यमातून वैभवशाली परंपरेचा गौरव

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले कीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असूनमहाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे. राज्यातील जनतेला गौरवशाली महाराष्ट्राची माहिती मिळावी यासाठी हे चित्र प्रदर्शन जिल्ह्यात फिरत्या वाहनाद्वारे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी सांगितले.

अनेक संत-महापुरुषांचे कार्यसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्मेमहाराष्ट्र स्थापनेनंतर राज्याच्या प्रगतीसाठी कार्यरत मुख्यमंत्र्यांचे कार्य भित्तीचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे  छत्रपती शिवाजी महाराजसार्वजनिक सत्यधर्म स्थापणारे महात्मा फुलेसामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजसंविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्यसमताबंधूता ही मूल्ये देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरअध्यात्माच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे संत बसवेश्वर, संत सावता माळीसंत नामदेवसंत मुक्ताबाईसंत नरहरी सोनारसंत चोखामेळासंत कान्होपात्रा यांच्या कार्याची माहिती सांगणारी भित्तीचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐतिहासिक लढ्याला सलाम करणारे गर्जा महाराष्ट्र या दालनाअंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटीलप्रबेाधनकार ठाकरेआचार्य अत्रेशाहीर शेख जैनू चांद यासह अनेक हुतात्मांच्या माहितीद्वारे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास उलगडला आहे. तसेच समाजसुधारकतत्वचिंतकगायकलेखकखेळाडू आणि उद्योजक अशा दिग्गजांची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री ज्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले अशा सर्व मुख्यमंत्री आणि लोकनेत्यांची माहितीही या प्रदर्शनाद्वारे पहावयास मिळणार आहे.

000

राज्याचे 'पार्किंग' धोरण लवकरच आणणार

 राज्याचे 'पार्किंगधोरण लवकरच आणणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १९  : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी 'एकात्मिक पार्किंग धोरणआणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री  ‌प्रताप सरनाईक यांनी दिली.

या संदर्भात मंत्रालयात आयोजित मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये श्री. सरनाईक बोलत होते. बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह  एम.एम.आर.डी.ए. मधील सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेएकात्मिक पार्किंग धोरण आणण्याआधी  अंमलबजावणी दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये. यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये  वाहतूक कोंडी समस्येने उग्र रूप धारण केले आहेत्या महापालिका आयुक्तांच्या सूचनाअभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेलतर  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये ते प्रभावीपणे राबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविले असल्याचेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईलअसे  श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले कीप्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईलअशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार वाहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीतरस्ते मोकळे करावेत. विकास आणि सुविधासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर  महापालिकांनी स्वीकारावेजेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईलअसेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले.

००००

Featured post

Lakshvedhi