Monday, 3 February 2025

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल



 निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे 

जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. 3 : आज जैन धर्म पश्चिम आणि उत्तर भारतात दिसत असला तरी एके काळी तामिळनाडू राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तामिळ भाषेत जैन साहित्य देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तीर्थकर भगवान महावीर यांचे जीवनकार्य सर्वकाळ प्रेरणादायी असून भगवान महावीर यांच्या जीवनावर राज्यातील शाळाशाळांमधून निबंध स्पर्धा आयोजित केल्यामुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. 

भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणाक महोत्सव समितीतर्फे राज्यातील शाळांमध्ये आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. २) राजभवन मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.     

भगवान महावीरांचे जीवन त्यागमय होते असे सांगताना केवळ स्वतःसाठी जगणे पाप असून इतरांसाठी जगल्यास ईश्वर आपली काळजी वाहिल असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.  

या स्पर्धेत राज्यातील शाळांमधील १.२ कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही अतिशय उत्साहवर्धक बाब असल्याचे सांगून मुलांनी लिखाण तसेच वाचनाची सवय ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मुलांनी मोबाईल फोनवर आपला वेळ वाया न घालवता वेळेच नियोजन करून मोबाईलचा वापर करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुलांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राजभवन येथे होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अहिंसा परमो धर्म हा भगवान महावीरांचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी स्पर्धा उपयुक्त असल्याचे आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. स्पर्धेमुळे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भगवान महावीरांच्या जीवनाचे अध्ययन केले असे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. यावेळी भगवान महावीरनिर्वाण कल्याणक महोत्सव समितीचे निमंत्रक हितेंद्र मोटा उपस्थित होते. 

राज्यपालांच्या हस्ते स्पर्धेतील  विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विजेत्यांना बक्षीस रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले.  ही स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात सहकार्य केल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांचा देखील सत्कार करण्यात आला. 


इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत - ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा

 इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट;

भारत - ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा


 

मुंबई, दि. 3 : सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.  

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्रतसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी भारत आणि ब्रिटन मधील संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्याची इच्छा व्यक्त केली.

आपण इंग्लंडमधील बाथ विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती असल्याचे सांगताना उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल असे त्यांनी नमूद केले. 

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवराज एडवर्ड यांनी वर्गखोलीच्या बाहेर होत असलेले शिक्षण देखील जीवनात महत्वाचे असल्याचे सांगितले.  

भारतात क्रिकेट 'अभूतपूर्ववाढले असल्याचे नमूद करून बॅडमिंटनमधील भारताच्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले. रविवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्याच्या नाणेफेकीचा वेळी आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या अस्तित्वात असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा महोत्सवासोबतच कॉमनवेल्थ व्यवसाय महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याच्या संकल्पनेवर देखील यावेळी चर्चा झाली.

प्रिन्स एडवर्ड यांचे राज्यात स्वागत करताना भारत आणि इंग्लंड ही जगातील दोन महान लोकशाही राष्ट्रे असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

भारतीय लोकांना इतर देशांच्या तुलनेत लंडनमध्ये  'आपल्या घरासारखेवाटतेअसे सांगताना उच्च शिक्षण दोन्ही देशांमध्ये सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते असे राज्यपालांनी सांगितले.  भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणे अधिक सोपे जातेअसेही त्यांनी नमूद केले.

हरित ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्राबरोबरच भारताला इंग्लंडकडून हॉस्पिटल व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्याचा लाभ होऊ शकतोअसे राज्यपालांनी सांगितले.  इंग्लंडमधील हॉस्पिटल व्यवस्थापन प्रणाली उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण राज्यातील कुलगुरूंना इंग्लंडमधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी प्रोत्साहन देऊ असेही राज्यपालांनी सांगितले.  

भारत आज जगातील सर्वात बलशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असून आणि भारत - इंग्लंड यांच्यातील मजबूत व्यापार संबंध इतर अनेक क्षेत्रांतील संबंध बळकट करण्यास साहाय्यभूत ठरतीलअसे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतात क्रिकेटशिवाय फुटबॉल खेळ अतिशय लोकप्रिय असूनदेशात फुटबॉलला अधिक चालना देण्यासाठी इंग्लंडने भारताला मदत करावीअशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

बैठकीला ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांगड्यूक यांचे खाजगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल उपस्थित होते.

                                

*वो फिर नहीं आते

 ❗ *वो फिर नहीं आते*…


आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. ....

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का?”* अशा या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, bमनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी  हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं. 

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ?…. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. 


ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला  आशिर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेला...


त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का ? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो …..  *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं *भेटण्यापेक्षा* ती *लाभणंच* जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो. 


गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि, ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

*फूल खिलते हैं,*

*लोग मिलते हैं मगर*

*पतझड़ में जो फूल*

*मुरझा जाते हैं*

*वो बहारों के आने से* 

*खिलते नहीं*

*कुछ लोग एक रोज़*

*जो बिछड़ जाते हैं*

*वो हजारों के आने से*

*मिलते नहीं*

*उम्र भर चाहे*

*कोई पुकारा करे उनका नाम*

*वो फिर नहीं आते…*


माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. *भावनाशून्य* या जगात जगताना आपण थोडं *भावनाप्रधान* व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि.......

ही मैत्री नावाची 'नाव" अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

*आँख धोखा है,*

*क्या भरोसा है*

*दोस्तों शक दोस्ती का*

*दुश्मन है*

*अपने दिल में*

*इसे घर बनाने न दो*

*कल तड़पना पड़े*

*याद में जिनकी*

*रोक लो रूठ कर*

*उनको जाने न दो*

*बाद में प्यार के*

*चाहे भेजो हजारों सलाम*

*वो फिर नहीं आते…* 


आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना….  नसेल तर….? खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल ...नाही का...? 

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत.. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्‍या  प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत  हीच ती  सुंदर माणसं.... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

 सच लिखा है लिखा है 'गुलजार'जी ने...


*...वो फिर नही आते....*


*असं हे किशोर कुमार यांनी गायलेलं सुंदरसं गीत.....* 


*" वो फिर नही आते..."😢🙏*🙏

पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

 क्र.454

परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी

सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एम्स येथील आदिवासींच्या आरोग्यावर जागतिक परिषदेचा समारोप

पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त

आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

 

नागपूरदि. 2 :- एम्स  येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्नत्याची असलेली उत्तरेतज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठएम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाननागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी,  परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरीविद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभकुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

या  आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मुलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्यविविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषणसिकलसेल आणि मलेरिया यासारखे मुलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रशासनातर्फे अनेक विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू यात असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले.

बिलगेट्स फाउंडेशनसनफार्माआयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले. आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी  MUHS FIST-25  परिषद महत्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले कीआरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी  MUHS FIST-25    च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे.  आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25   चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले.

00000

नागपुरातील छोट्या मैदानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी देणार

 नागपुरातील छोट्या मैदानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

 

नागपूरदि.2 : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात 700 कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहेत. स्थानिक खेळाडुंना सरावासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छोट्या मैदानांचा विकास करण्यात येईल व यासाठी  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 150 कोटींचा निधी देण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीआमदार प्रवीण दटकेमाजी खासदार डॉ. विकास महात्मेमहोत्सवाचे संयोजक संदीप जोशीअर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू शितल देवीक्रिकेटपटू मोहित शर्मा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील खेळाडुंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 58 क्रीडा प्रकारात विजेत्यांना 12हजारांवर पदक प्रदान करण्यात आली आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा महोत्सवातून विदर्भातील गुणवान कलाकार व खेळाडू पुढे येत आहेत. यातून विदर्भ व नागपूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारे कलाकार व खेळाडू घडतील. शहरात ऑलिम्पीकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 700 कोटींच्या निधीतून मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाचे कार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणालेगत सात वर्षांपासून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून खेळाडुंना संधी उपलब्ध करून देणेत्यांचा व्यक्तीमत्व विकास साधणे व नैतृत्वही घडवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील क्रीडा मैदानाच्या विकासासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी दिला आहे. अजुनही छोट्या मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध व्हावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते खेळाडूप्रशिक्षक आदींना उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडा महर्षीक्रीडा प्रशिक्षकक्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शितल देवी आणि मोहित शर्मा यांनीही यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन केले. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. 12 जानेवारी 2025 पासून यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. 21 दिवस चाललेल्या महोत्सवात 58 क्रीडा प्रकारात 77 हजार 663 स्पर्धक सहभागी झाले. नागपुरातील 69 मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण दीड कोटींची बक्षीस तर 12 हजार 317 पदक प्रदान करण्यात आले.

०००००

एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*

 अप्रतिम लिहिलंय  *सुधीर मोघेंनी...*


*एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*...."☺️


आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला ,

मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाई पर्यंत काम आलं...मग ते घरचं असो नाहीतर दारचं....

*बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात...*

75 वर्षाच्या म्हातारीने पण *भाजी तरी चिरुन द्यावी* अशी घरातल्यांची अपेक्षा असते....

हि सत्य परिस्थिती आहे.....

*आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत* हे रहाणारच......

त्यामुळे *हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो*...ती मरेपर्यंत करावी लागणार...

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच *आपल्या सत्तरीतही* करावा लागणार....

" *मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील" *हि *खोटी स्वप्न आहेत*😌....

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी ..

" *आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव*.."

असं म्हटलं कि *झालं*...

*पुन्हा सगळं चक्र चालु*..


आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी....,❓🤔


पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल..

*जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का* ??

तर नाही.....

*परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं.*....


मी हे स्विकारलय.... *खुप अंतरंगातुन* आणि आनंदाने....


*माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते*🌝..... खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली.....🧘‍♀️.


*सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं* तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते *आणि रात्री दहा वाजता* ही...👍

आदल्या दिवशी *कितीही कष्ट झालेले असु देत*....दुसरा दिवस हा *नवाच* असतो....


*काहीच नाही लागत* हो...

हे सगळं करायला🙏.....

*रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा*...

छान आपल्या *छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा* घ्या🏡..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा...🪴🌳.

*आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या*👩‍❤️‍👩..

इतकं भारी वाटतं ना....

अहाहा....🤗.

सकाळी उठल की ब्रश करायच्या आधीच रेडिओ📸 लागतो माझा...

*अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून* ब्रश केला....ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त...आल्याचा चहा पित.... *खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना* 

*कि भारी वाटतंं*👌👍.....


*रोज मस्त तयार व्हा*....

आलटुन पालटुन स्वतःवर *वेगवेगळे प्रयोग करत* रहा😊....

कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले.....

कधी ड्रेस...*कधी साडी*....

कधी केस मोकळे...*कधी बांधलेले*....

*कधी हि* टिकली तर कधी ती....

*सगळं ट्राय करत रहा....नवं नवं नवं नवं*...

रोज नवं.....

*रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे*....


स्वतःला बदललं कि.... आजुबाजुला *आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल*........तुमच्याही नकळत......

आणि *तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या* वाटु लागाल......


मी *तर याच्याही पार पुढची पायरी* गाठलेली आहे....

*माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात*....😃काय माहित काय झालंय त्या कानांना....😃


*आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी* असते....

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते.....


*जे जसं आहे....ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते*...

कुणी आलाच समोर कि.." *आलास का बाबा*..बरं झालं ..म्हणायचं... *पुढे चालायचं*....

अजगरा सारखी...*सगळी परिस्थिती* गिळंकृत करायची....😃


*माहीत आहे मला*...

*सोपं नाहीये*....


*पण मी तर स्विकारले आहे*...

*आणि एकदम खुश आहे*....

आणि म्हणुनच रोज म्हणते....


" *एकाच या जन्मी जणु*...

*फिरुनी नवी जन्मेन मी*...

*हरवेन मी हरपेन मी*..

*तरीही मला लाभेन मी*....."🙏

बारा ज्योतर्लिंगां


 

Featured post

Lakshvedhi