Saturday, 1 February 2025

यह बजट लक्ष्मी के कदम आम घरों तक लाने वाला बजट है देशभर के मध्यवर्गीयों को बड़ा राहत

 यह बजट लक्ष्मी के कदम आम घरों तक लाने वाला बजट है

देशभर के मध्यवर्गीयों को बड़ा राहत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 1 फरवरी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज घोषित केंद्रीय बजट को लक्ष्मी के कदम आम घरों तक लाने वाला बजट बताया। उन्होंने कहा कि आज हर घर में दिवाली और दशहरा की भावना उत्पन्न हुई होगी क्योंकि 12 लाख रुपये तक की आय पर आयकर की छूट दी गई हैजिससे आम लोगों को बड़ा राहत मिला है। इस बजट से यह महसूस हो रहा है कि प्रत्येक घर में खुशी की लहर दौड़ रही है। शिंदे ने इसे समाज के हर वर्ग को न्याय देने वाला बजट बताया।

उन्होंने कहा कि केंद्र सरकार ने आज तक प्रस्तुत किए गए सभी बजटों में सबसे क्रांतिकारी निर्णय लिया है। 12 लाख रुपये तक की आय को करमुक्त करने और स्टैंडर्ड डिडक्शन की सीमा को 75 हजार रुपये तक बढ़ाने जैसे फैसले से देशभर के करोड़ों मध्यवर्गीय नागरिकों को बड़ा राहत मिली है।

देश का आठवां बजट पेश करते हुए केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकसित भारत के सपने को साकार करने के लिए रोडमैप प्रस्तुत किया है। आयकर में दी गई बड़ी छूट से देश के मध्यवर्गीयगरीब और कमजोर वर्गों को मजबूत किया गया है और उनके विकास में अहम भूमिका को रेखांकित किया गया हैऐसा उपमुख्यमंत्री शिंदे ने कहा।

महिलाओं और किसानों पर विशेष ध्यान देते हुएकृत्रिम बुद्धिमत्ता जैसी तकनीकों पर जोररोजगार सृजन और आत्मनिर्भर भारत की दिशा में ठोस कदम उठाने पर भी जोर दिया गया है। उन्होंने कहा कि इस बजट में समावेशी विकास पर ध्यान केंद्रित किया गया है।

केंद्रीय वित्त मंत्री ने इस बजट भाषण में नए आयकर विधेयक की घोषणा की हैजिससे कर संरचना में सरलता आएगी और सामान्य करदाताओं को न्याय मिलेगा। 12 लाख रुपये तक की आय पर कोई कर न लगाने का निर्णयमध्यवर्गीय करदाताओं के लिए एक बड़ा राहत देने वाला कदम है।

टीडीएस में किराए की सीमा बढ़ानेवरिष्ठ नागरिकों के लिए टीडीएस की सीमा एक लाख रुपये तक बढ़ाने और कर रिटर्न न भरने वालों के लिए चार साल तक सीमा बढ़ाने जैसे फैसले करदाताओं को राहत देने वाले हैं।

धान्य कृषि योजना से किसानों के घर में सचमुच समृद्धि आएगीकिसान क्रेडिट कार्ड की सीमा बढ़ानेकृषि क्षेत्र में तकनीकी उपयोग बढ़ाने से गुणवत्ता वाले उत्पादन में महत्वपूर्ण वृद्धि होगी।

स्टार्टअप्स के लिए क्रेडिट सीमा बढ़ाने और छोटे व सूक्ष्म उद्योगों को आसानी से पूंजी उपलब्ध कराने के निर्णय से उन्हें बड़ा समर्थन मिलेगा। महिलाओं के कौशल विकास प्रशिक्षण और विशेषकर पिछड़े वर्ग की महिलाओं के लिए नए रोजगार और उद्योग योजना से गरीब महिलाएं आत्मनिर्भर बन सकेंगी।

आईआईटी की संख्या बढ़ानेकृत्रिम बुद्धिमत्ता के लिए तीन केंद्र स्थापित करनेयुवाओं के कौशल विकास पर जोरसभी सरकारी माध्यमिक स्कूलों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में ब्रॉडबैंड सेवा50 लाख स्कूलों में अटल टिंकरिंग लैब्स जैसी योजनाओं से आधुनिक तकनीकी का लाभ आम आदमी तक पहुंचेगा।

 

शहरी मजदूरों के जीवन स्तर को बढ़ाने के लिए योजनाएं भी गरीब वर्ग को शक्ति प्रदान करेंगी। देश में तेजी से शहरीकरण हो रहा हैऐसे में शहरों के विकास के लिए अलग से अर्बन चैलेंज फंड की घोषणा क्रांतिकारी होगी।

00000

This Union Budget is Brings Prosperity to Every Household

Central Government Provides Big Relief to the Middle Class across the Country

Deputy Chief Minister Eknath Shinde

 

Mumbai, 1st February: Deputy Chief Minister Eknath Shinde has expressed that the Union Budget presented today is one that brings prosperity to every household. With the income tax exemption up to ₹12 lakh, the general public has received a major relief, creating Happiness like Diwali and Dussehra in every home, he said. He further emphasized that this budget reflects a sense of overwhelming joy for households across the country. In his reaction to the budget, he stated that it is a comprehensive budget that ensures justice for all sections of society.

The Central government has taken an unprecedented step in this Union Budget, by offering relief to millions of middle-class citizens across the country with revolutionary decisions regarding income tax. Exempting incomes up to ₹12 lakh from income tax and increasing the limit of standard deduction to ₹75,000 are landmark decisions, providing significant relief to the middle class and weaker sections of the society, said Deputy Chief Minister Eknath Shinde.

While presenting the eighth Union Budget of the country, Finance Minister Nirmala Sitharaman laid out a roadmap for realizing Prime Minister Narendra Modi’s dream of a developed India. With large tax exemptions, the budget strengthens the role of the middle class, poor, and marginalized sections of society in national development, he added.

The budget also focuses on women and farmers, with significant attention to technology such as Artificial Intelligence, job creation, and strong steps towards the goal of Atmanirbhar Bharat (Self-Reliant India), focusing on inclusive growth, Shinde further stated.

In her budget speech, Finance Minister Sitharaman also announced a new income tax bill that aims to simplify the tax structure and ensure fair treatment for ordinary taxpayers. The exemption of income tax up to ₹12 lakh is a major relief for middle-class taxpayers, Deputy Chief Minister Shinde remarked.

Other important announcements include increasing the TDS exemption on rent, raising the TDS limit for senior citizens to ₹1 lakh, and extending the deadline for tax returns for taxpayers who have not filed them for up to four years. These measures are designed to ease the tax burden on citizens, said Shinde.

The Dhan Dhanya Krishi Yojna (Grains and Agriculture Scheme) will bring prosperity to farmers' homes. The decision to increase the credit limit for Kisan Credit Cards, along with the increased use of technology in agriculture, is expected to significantly improve the quality and quantity of agricultural production. The increase in credit limits for startups and micro, small, and medium enterprises (MSMEs) will provide significant financial aid to them, he stated.

The new schemes for women's skill development, particularly targeting women from backward classes for self-employment and entrepreneurship, will empower women to stand on their own feet.

Increased investments in IITs, the establishment of three AI centers in the country, broadband services to all government schools and primary health centers, and setting up 50 lakh Atal Tinkering Labs will ensure that the benefits of modern technology reach the grassroots level, Shinde explained.

Additionally, a new urban challenge fund will be set up to aid in urban development, catering to the rapid urbanization in the country. The scheme for improving the lives of urban workers will also benefit the poor and marginalized communities.

The introduction of improvements in the ease of doing business and the removal of custom duties on 36 life-saving drugs, including those for cancer, will provide affordable medications to poor patients. Furthermore, the announcement of 10,000 new medical seats will enable more students to pursue medical education, Shinde added.


अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प... देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

 हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प...

देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 1: आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेलकारण 12 लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्याना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून छप्पर फाड के मिळाल्याची भावना घरोघरी व्यक्त होत असावी असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. केंद्र सरकारने आजपर्यंत देशात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कुणीही कधीही घेतला नाही असा न भूतो न भविष्यती असा निर्णय आयकाराच्या बाबतीत घेऊन देशातल्या करोडो मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे आणि स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा 75 हजार रुपयांपर्यंत वाढवणे या क्रांतिकारी घोषणेसह नव्या करप्रणालीत मोठे बदल केल्यामुळे देशभरातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

देशाचा आठवा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत साकार करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे. आयकरातील मोठ्या सवलतीमुळे देशातल्या मध्यमवर्गीयगरीबदुर्बल यांना मोठे बळ देऊन देशाच्या विकासामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महिला आणि शेतकरी यांच्याकडे विशेष लक्ष देतानाकृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानावर भररोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं या अर्थसंकल्पात टाकून सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात नव्या आयकर विधेयकाची घोषणा केली आहे. यामुळे कराच्या संपूर्ण रचनेत सुलभता आणून सर्वसामान्य करदात्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 12 लाख उत्पन्नापर्यंत कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. टीडीएसमधील घर भाड्याची मर्यादा वाढवणेज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा एक लाखांवर नेणं तसेच कर परतावा न भरलेल्यांसाठी चार वर्षांपर्यंत मर्यादा वाढविणे या गोष्टी करदात्यांना दिलासा देणाऱ्या आहेत असेही ते म्हणाले. धनधान्य कृषी योजनेमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईलकिसान क्रेडिट कार्डसाठीची लिमिट वाढविणेकृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.

स्टार्टअप्ससाठी क्रेडिट लिमिट वाढवणे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवी योजना यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आयआयटीची संख्या वाढविणे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी देशात तीन केंद्रेयुवकांच्या कौशल्य विकासावर भर,  सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा50 लाख शाळांमध्ये अटल टीकरिंग लॅब्सया गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल. शहरी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठीची योजना देखील गरीब वर्गाला बळ देईल. देशात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे त्यामुळे शहरांच्या विकास कामांसाठी स्वतंत्र अर्बन चॅलेंज फंडची केलेली घोषणा क्रांतिकारी राहील असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले कीपुढील दहा वर्षात उडान योजनेत आणखी चार कोटी प्रवाशांना सामावून घेतल्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाईसेवा कनेक्टिव्हिटी वाढेल.

हिल इन इंडिया या योजनेमुळे देशात मेडिकल टुरिझम वाढेलविशेषतः महाराष्ट्रात देखील परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून त्याचा मोठा फायदा होईल. व्यवसाय सुलभता म्हणजेच इज ऑफ डूइंग बिजनेसमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. कस्टम ड्युटीतून कॅन्सरसारख्या 36  इतरही गंभीर रोगांवरील महत्त्वाची जीवरक्षक औषधे वगळल्यामुळे गरीब रुग्णांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. मेडिकलच्या दहा हजार जागा वाढविल्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेणं शक्य होणार आहे.

शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प

 शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प"

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

 

मुंबई,दि. 1:  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची  जोड देऊन देशातील शेतकरीनोकरदारवर्ग,कष्टकरीव्यापारीउद्योजकमहिलायुवकविद्यार्थीसर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधीप्रत्येक समाज घटकाला बळ  आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन  देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प मांडला अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटीलयांनी दिली.

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 1.28 लाख करोड रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 50,067 करोड रुपये केवळ उच्च शिक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे.

मेडिकलच्या एका वर्षात 10 हजार आणि पुढील 5 वर्षात 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत.

उच्च शिक्षण विभागामध्ये डिजिटल संसाधनांची सुरुवात करण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक ही योजना राबविण्यात येणार आहे. उच्च शिक्षण संस्थांना भारतीय भाषेतील पुस्तकांची डिजिटल आवृत्ती प्रदान करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

याशिवाय आयआयटी पाटणा चा विस्तार आणि 5 नवीन आयआयटी मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. आयआयटीचे आणखी 6 हजार 500 जागा वाढवण्यात येणार आहेत. संशोधनासाठी 10 हजार फेलोशिप दिल्या जाणार आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सचा स्थापना करून पुढील 5 वर्षात 50, हजार लॅब्सची  स्थापना करण्यात येणार आहे. या अर्थसंकलपात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात  देशभरात तीन कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापित करण्याची घोषणा केली आहे. या केंद्रांचे उद्दीष्ट AI तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक ठोस पायाभूत सुविधा तयार करणे आणि उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण संशोधन करणे आहे. देशात AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी एक मजबूत पाया तयार केला आहेज्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था अधिक डिजिटल आणि तंत्रज्ञानावर आधारित होईल.असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

00000

 

राष्ट्रगीत एक व्यक्ती अनेक वाढ्ये


  •  

CBSC,ICSC मुळे पुढची पिढी 👌🏻👌🏻किती शरमेची गोष्ट आहे!!*

 *CBSC,ICSC मुळे पुढची पिढी 👌🏻👌🏻किती शरमेची गोष्ट आहे!!*


केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल

 केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासाअर्थसंकल्पाचे स्वागत

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

मुंबईदि.1  :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. 18 लाख उत्पन्नधारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे. 25 लाख उत्पन्न असलेल्यांचा कर लाख 25 हजारांनी कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजारांहून लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील 36 जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घरालाव्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार, असे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

 

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळाले.?

 केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला हे मिळाले.


 


केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले आहेत.


अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. अर्थसंकल्पात विविध वस्तू-सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या वस्तू-सेवा स्वस्त होतील. देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यानी व्यक्त केला. 


अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरिकरण, खाणकाम, अर्थ, कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महिलांच्या कौशल्याविकास प्राथम्याचा विषय आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडीट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. कापूस आणि डाळींचे उत्पादनवाढीसंदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे आहे. किसान क्रेडीट कार्डची मर्यादा 5 लाख करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. देशाला जगाचे फूड बास्केट बनविण्यात महाराष्ट्राची भूमिका प्रमुख असेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये 5 लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल. ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्वाचा असून सुमारे 1 कोटी गिगवर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय विद्यार्थी, युवक, समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत.


न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य देशाला महासत्तेकडे नेणारं महत्वाचं पाऊल आहे. शहरांमध्ये सुधारणा राबवण्यासाठी सरकार 1 लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णयही तितकचा महत्वाचा आहे. देशात 120 ठिकाणी उडान योजना राबवण्याचा त्यातून हवाई प्रवासी संख्या 4 कोटींवर नेण्याचा संकल्प आहे. हेलीपॅड आणि डोंगराळ भागात नवीन विमानतळं उभारण्यात येणार आहेत. ग्रीनफिल्ड एअरपोर्ट उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील 52 प्रमुख पर्यटनस्थळांचा विकासाचंही धोरण आहे. ही विकसित राष्ट्रासाठीची, महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी असल्याचे सांगत, देशाला विकसित भारत, आर्थिक महासत्ता बनविण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नमूर्तीसाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त

 केला.


Featured post

Lakshvedhi