Wednesday, 4 December 2024

रामदास स्वामी यांचे क्षेत्र श्रीजांबसमर्थ येथील घागरीचा चमत्कारिक अनुभव* 🚩✍ श्री. दीपक कुळकर्णी ------------------- 🕉️

*श्री रामदास स्वामी यांचे क्षेत्र श्रीजांबसमर्थ येथील घागरीचा चमत्कारिक अनुभव* 🚩✍ श्री. दीपक कुळकर्णी ------------------- 🕉️ ------------------- १) समर्थ रामदास स्वामी चरित्रात उल्लेख असलेली हीच ती तुपाची घागर जिच्यातून आजही तूप निघते आहे. परंतु घागर रिकामी होत नाही , सध्या ही घागर श्री समर्थ ऱामदासस्वामी यांच्या जन्मस्थानी श्री क्षेत्र जांबसमर्थ; ता. घणसवंगी; जि. जालना येथील श्रीराम मंदिरात ठेवण्यात आली आहे. तिथे ह्या समर्थांनी पावन केलेल्या घागरीचे दर्शन आपणास होते. २) जांबेच्या निवासासाठी मोफत भक्तनिवास व मोफत प्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच समर्थांच्या घराण्यातील रामपंचायतन व ज्या मारोती मंदिरात समर्थांना अनुग्रह झाला ते मारोती मंदिर उपलब्ध आहे. ५ किलोमीटर वर ज्या लग्नबोहल्यावरून श्री समर्थांनी पलायन केले तो बोहला आसनगाव येथे उपलब्ध आहे. ३) रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला श्री क्षेत्र जांबसमर्थ इथ श्रीरामांचा भंडारा असतो, त्यावेळी गावात ५-६ लाख लोक जमतात, भगवान श्रीराम व श्री समर्थांचे मुर्तीरुप दर्शन घेऊन भक्त पावन होतात. गावकरी पण पाच सहा लाख लोकांच्या सेवेत तत्पर असतात, तिर्थयात्रींची राहण्याची भोजनाची स्नानाची व्यवस्था अतिशय उत्तमपणे व विनामूल्य गावकरी लोक करीत असतात. व कुठेही काहीच कमतरता दिसत नाही, हा समर्थांचा चमत्कारच ! ४) ह्या घागरीबद्दल सत्यकथा ऐकायला मिळाली ती अशी --- श्री रामदास स्वामींनी श्रीरामनवमी निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन त्याकाळी नुकतेच सुरु केले होते, श्री समर्थांच्या क्रुपेने कुठेच काही कमी पडत नव्हते, पण अचानक वरणभातावर वाढण्यासाठीचे साजुक लोणकढी तुप संपले, अर्थात श्री समर्थ रामदास स्वामी महान योगी तपस्वी व आपल्या योगसाधनेने काहीपण साध्य करणारे, त्यांनी तुप कमी पडल्याने ह्या वरील घागरीस दोर बांधुन बाजुच्या विहीरीत सोडले व घागरभर पाणी वर ओढले, व सेवेकऱ्यांना सांगितले ह्यातुन पंगतीला तुप वाढायला सुरूवात करा, सेवेकऱ्यांना पाणी तुप म्हणुन कसे वाढायचे हे कोडे पडले, समर्थांनी सेवेकऱ्यांना सांगितले माझा श्रीराम बघुन घेईल पुढे काय करायचे ते तुम्ही तुप वाढायला सुरुवात करा, सेवेकऱ्यांनी पंगतीला पाणी अर्थातच तुप वाढायला सुरुवात केली, त्या घागरीतील पाणी तुपात परिवर्तीत झाले व सगळ्या तीर्थयात्रींचे भोजन होईस्तोवर त्या घागरीतले तुप शेवटपर्यंत संपलेच नाही. शेवटी सर्व पंक्ती उठल्यावर समर्थांनी ती घागर घेतली व परत पाणी आणलेल्या विहीरीत रिकामी केली म्हणजे विहीरीचे पाणी देखील समर्थांनी विहीरीला परत केले. ५) आज सुद्धा रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला जेव्हा भंडारा असतो तो घेतल्यानंतर प्रत्येक तिर्थयात्रींना तिथे संस्थानतर्फे ह्याच घागरीतुन साधारणतः १०० ग्रॅम तुप मोफत वाटप केले जाते. आश्चर्य म्हणजे घागरीतले तुप संपतच नाही, हा चमत्कार आपण स्वतः अष्टमीच्या दिवशी तिथे उभे उपस्थित राहुन बघु शकता. अवर्णनीय, नेत्रदीपक, चमत्कारिक सोहळा असतो. प्रत्येकाने ह्या सोहोळ्याचा लाभ घ्यावा अशी मी आग्रहपुर्वक विनंती करीत आहे. ६) श्री समर्थांच्या ह्या चमत्कारिक घागरीची माहिती, श्री क्षेत्र जांबसमर्थ इथल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठातील ट्रस्टचे २४ तास सेवेकरी असणारे श्री स्वप्नील रामदासी ह्यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना मला त्यांच्याकडून मिळाली, त्याबद्दल श्री स्वप्नील रामदासींचे आम्ही आभारी आहोत. *साभार:* श्री स्वप्नील रामदासी, श्री क्षेत्र जांबसमर्थ. भ्रमणध्वनी: 9146519609 *जय जय रघुवीर समर्थ* 🚩 *"श्रीराम समर्थ"* 🚩

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे

 पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी

३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. ३ : राज्यांतर्गत अन्नधान्यकडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनामिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍तीमनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन  अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना राबविण्यात येत आहे.

      पिकस्‍पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुकाजिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारीगहूहरभराकरडई व जवस  या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके - ज्वारीगहूहरभराकरडई व जवस (एकूण ०५ पिके)

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन७/१२८-अ चा उताराजात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा.

      रब्‍बी  हंगामामध्ये ज्वारीगहूहरभराकरडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. तालुकास्तरजिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.

तालुका पातळी :  पहिले बक्षिस पाच हजार रुपयेदुसरे बक्षिस तीन हजार रुपयेतिसरे बक्षिस दोन हजार रुपये.

जिल्हा पातळी  : पहिले बक्षिस दहा हजार रुपयेदुसरे बक्षिस सात हजार रुपयेतिसरे बक्षिस  पाच हजार रुपये

राज्य पातळी : पहिले बक्षिस ५० हजार रुपयेदुसरे बक्षिस ४० हजार रुपयेतिसरे बक्षिस  ३० हजार रुपये

 नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावेअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी  शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावातसेच महाराष्ट्र  शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील QR कोड स्कॅन करावा.


                   

image.png

शासन निर्णय                                       


image.png


बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची

 बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य

शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची

- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 

मुंबई, दि. ३ : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिकम्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवाशिक्षण व कौशल्य प्रशिक्षणनोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावाअसे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.          

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्यया विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रासह आसामओडिशाप. बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेलअसे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

 पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना तसेच पर्यावरण योद्ध्यांना त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली. पर्यावरण विषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रम राबविण्याची विनंती केली.

महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

0000

 

Maharashtra Governor releases UNICEF 

State of World's Children Report

 

Mumbai, 3rd Dec : Maharashtra Governor  C. P. Radhakrishnan released the UNICEF 'State of the World's Children Report – 2024 : The Future of Childhood in a Changing World' in presence of two young climate champions at Raj Bhavan Mumbai on Mon (2 Dec). 

This year’s report presents a perspective on how three major factors - demographic changes, climate and environmental crises, and breakthrough technologies - are likely to impact children’s lives by 2050 and beyond.

Chief of UNICEF Maharashtra Sanjay Singh, UNICEF officers Yusuf Kabir and Swati Mahapatra and climate champions Gurpreet Kaur and Pooja Vishwakarma were present.


केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

 केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT)  शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई दि. ३ : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT)  शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती  जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखडराज्यपाल सी.पी.राधाकृष्णनकेंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानकेंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूरभारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव तथा महानिदेशक डॉ.हिमांशु पाठक तसेच संस्थेचे पदाधिकारीकृषी तज्ज्ञसंशोधक व इतर मान्यवर उपस्थित होते.

 केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) १९२४ मध्ये स्थापन झाली. ही संस्था कापूस क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करते.


Tuesday, 3 December 2024

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ड्राय डे’ जाहीर

 

मुंबईदि. ३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशीविदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेतअसे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            या आदेशानुसारराज्य उत्पादन शुल्कचे  डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्याई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईलअसेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.


सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी

 सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश

देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी

 

मुंबईदि. ३ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यानमहापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिकमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराजगृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंगसामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेकोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुखमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरभदंत डॉ.राहुल बोधीसंबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीबाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजनस्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहेवैद्यकीय सुविधाराहण्याची सुविधावाहतूक व्यवस्थामदत आणि समन्वय कक्षसुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाहीयाची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावीअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहेत्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेतअशा सुचनाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.

माजी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, दरवर्षी चांगली सुविधा देण्यात येते. यावर्षीही कोणतीही कमतरता राहणार नाहीयासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजनआरोग्यपाणीस्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्याव्यात. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमलात आणाव्यात. संवेदनशीलता ठेवून चांगल्या प्रकारे नियोजन करावे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रारंभी चैत्यभूमी परिसरात आजपर्यंत झालेल्या सोयी सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. ज्येष्ठ व्यक्तींना रांगेत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावीठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असावीयासाठी परिसरातील गुरूद्वारांना आवाहन करावेत्याचप्रमाणे रेल्वेस्थानकावरून चैत्यभूमीपर्यंत बसची शटल सेवा सुरू ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. यासह दिशादर्शक फलकरात्री पुरेशा लाईटची सुविधारेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवालेमुक्त करणेजीवरक्षक बोटींची व्यवस्थापाण्याच्या टँकर्सची व्यवस्थावैद्यकीय पथकेसमन्वय कक्ष आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.गगराणीकोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुखमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरपश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकआदींनी त्यांच्या यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. भदंत डॉ.बोधीमहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींनी शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

0000

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणी

 महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची

कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणी

 

          मुंबईदि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला.

            विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले कीचैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून अनुयायांसाठी वैद्यकीय कक्षही उभारण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) आणि परिसरात पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करीत समन्‍वय साधून कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा अनुयायांना मिळतात की नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            यावेळी कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विवेक गायकवाडबृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त  अजितकुमार आंबीसहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांना खाद्य पदार्थांच्या किटचे वाटप करण्यात आले.

*****

Featured post

Lakshvedhi