नमस्कार 🙏🏻 या वर्षी क्षात्रेक्य परिषदेचा अमृतमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. आपल्यापैकी इच्छुक देणगीदारांनी कृपया खालील क्रमांकावर देणगी आपल्या नाव आणि पत्त्यासहित पाठवावी.
Gpay no: 9167876135
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
नमस्कार 🙏🏻 या वर्षी क्षात्रेक्य परिषदेचा अमृतमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. आपल्यापैकी इच्छुक देणगीदारांनी कृपया खालील क्रमांकावर देणगी आपल्या नाव आणि पत्त्यासहित पाठवावी.
Gpay no: 9167876135
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ ज्येष्ठ नागरिक व
११ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान
मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या, प्रपत्र १२ ड भरलेल्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान पथकामार्फत घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात आज एकूण १०३ ज्येष्ठ नागरिक आणि ११ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
मुंबादेवी मतदारसंघात ८५ वर्षांवरील एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, त्यापैकी १०३ अर्जदारांनी, तसेच १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. या ११४ अर्जदारांचे आज गृह टपाली मतदान घेण्यात आले.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ८५ वर्षांवरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या घरपोच मतदान सुविधेचे स्वागत केले असून, टपाली मतदान पथकाचे आभार मानले आहेत.
मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमांत
जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य
मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ - मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
तसेच कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका, २०२४ मतदानाच्या दिवशी ( दि. २० नोव्हेंबर २०४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) मुद्रित माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व – प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत प्रकाशित करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरी सर्व संबंधितांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी कळवले आहे.
उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना
२० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी
मुंबई, दि. ११ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नमूद केले आहे.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’आणि ‘दिलखुलास’कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 'राज्य निवडणूक आयोगाची तयारी' याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.
एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/
यू ट्यूब - https://www.youtube.co/
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत नियोजनबद्ध तयार करण्यात आली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोई सुविधा, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम, कायदा व सुव्यवस्था, राज्यातील सर्वच घटकातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केलेली तयारी याबाबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून माहिती दिली
आचारसंहिता भंगाच्या ४६८३ तक्रारी निकाली;
४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता आजपर्यंत जप्त
मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत दि. १५ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.
*जीवनातील दिशा बदलणारे "स्वामी दत्ताअवधूत" ह्यांचे अमूल्य ग्रंथ म्हणजे "मानवी जीवनातील गूढ रहस्य".*
डोंबिवलीच्या ग्रंथालयातून पहिल्यांदाच मी ह्याचा पहिला भाग वाचण्यासाठी घेतला. अर्धे पुस्तक वाचून झाल्यानंतर मला त्या लेखकाविषयी आणि त्यांच्या लेखनाविषयी खूपच आवड निर्माण झाली. आपल्या जीवनात असेही काही गूढ रहस्य असतात.अदृश्य शक्तींचा वावर असतो. त्यांचा परिणाम काहींना होतो काहींना होत नाही. ध्यानसाधना, जप, तप या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम. याची संपूर्ण सविस्तर माहिती यात मांडली होती.
हे पुस्तक वाचताना मला खूप छान वाटत होते अजून पुढे काय असेल याचे आतुरता मनात वाटू लागली. त्यामुळे मी लगेच च ह्याची पुढील दोन भाग विकत घेतले.
पुस्तका विषयी माहिती:-
हे ऐक असे पुस्तक आहे की यात त्यांनी आत्मसिद्धी, ध्यान साधना व भारतीय गुढ विद्या . याचे सविस्तर ज्ञान त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचविले आहे. गुढ विद्ये विषयी माहिती देणारा हा ग्रंथ या ग्रंथात अनेक साधना कशा कराव्यात याची माहिती दिली असून याशिवाय योगातील रहस्यमय भाग प्रथमच प्रकाशित करण्यात आला.
या पुस्तकाचे एकूण सात भाग लेखकाने लिहिले असून प्रत्येक भागात आपल्याला नाविन्यपूर्ण अशी माहिती मिळते.हे पुस्तक वाचल्यानंतर मानवी जीवन हे गूढ शक्तीनी कसे भरलेले आहे. याचे ज्ञान होते. अदृष्ट सृष्टीची माहिती देणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.
*महत्वाचे मुद्दे :-*
1.त्यांच्या म्हणण्यानुसार अदृश्य सृष्टीमध्ये चांगले.वाईट व मध्यम असे तीन प्रकारचे आत्मे वावरत असतात. मनुष्य आपल्या कर्मानुसार जीवणात फळ भोगत असतो.
2. मनुष्याने माणुसकी सोडून कधीच वागू नये. ईश्वर भक्ती सोबतच दान व परोपकार ही करावे जेणेकरून त्याचे प्रारब्ध शुद्ध होईल.
3. ईशा, द्वेष, मस्तर करणाऱ्या मनुष्यांच्या भोवती पिशाच्च शक्तींचा वावर असतो.
4 आपल्या घरचे वातावरण नेहमी शुद्ध राहण्यासाठी होम हवन करावे. ध्यान साधना, जप, व नामस्मरण याचे अद्भुत परिणाम मनुष्याच्या आयुष्यात होत असतात. यज्ञामुळे घरात वातावरण शुद्ध होऊन देवदेवतांचा वास आपल्या घरात होतो ज्यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होते नैराश्य निघून जाते.
5. ज्या वास्तूमध्ये तीन वर्षे दिवा लावला जात नाही तेथे पिशाच्च शक्तींचा वावर होतो त्याचे दुष्परिणाम आजूबाजूच्या लोकांना जाणवू लागतात. तंत्रविद्या त्याचे दुष्परिणाम पिशाच्च, योगसाधना, ईश्वरभक्ती, जन्म मृत्यू रहस्य. ध्यानसाधने त आपल्याला येणारे अद्भुत अनुभव….
यासारखे अनेक मुद्दे या पुस्तकात लेखकाने मांडले आहे. मला तर हे पुस्तक खूपच आवडलं हे वाचताना मी अक्षरश मोहुन गेली होती. काही काही उपाय असे होते की ते करताना भीती वाटते.🙄 परंतु जे सोपे आहे ते मी नक्कीच केले जसे की होम(यज्ञ) व नामस्मरण खरंच त्यामुळे घरातील वातावरणात मला खूप फरक जाणवला….
*ज्यांना ध्यानसाधना ,ईश्वरभक्ती,प्रारब्ध ,कर्म भोग, नामस्मरण या सर्व विषयांबद्दल जाणून घेण्याची उस्तुकता आणि आवड असेल त्यांनी हे पुस्तक नक्कीच एकदा वाचावे ही विनंती.….🙂🙏*
*Cp*