Tuesday, 1 October 2024

विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 

          सांगली दि. १ : विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

          सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृहदुकानगाळेसंरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

          या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी – सुविधांयुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईखासदार धैर्यशील मानेआमदार शहाजी बापू पाटीलजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेमनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्तापोलीस अधीक्षक संदीप घुगेमाजी जि. प. सदस्य सुहास बाबरअमोल बाबरआनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

आहोत_आम्ही_पुण्यवान

 #आहोत_आम्ही_पुण्यवान


एका बातमीवर नजर पडली - आपल्या सर्वांच्याच आवडत्या - the most famous - Switzerland - स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला सहाय्य करणारे - suicide pods बनवले गेले आहेत आणि त्या पॉड मध्ये जाऊन आत्महत्या करण्यासाठी म्हणे "waiting list" आहे. ज्या वेस्टर्न जगाची, तिथल्या राहाणीमानाची भूल पाडून आपल्याला आपल्या धर्मापासून दूर केले गेले, तिथे ही अवस्था?आत्महत्या करायला रांग? आणि कुपन्स? आपसूक उद्गार निघाले - मी भारतात जन्मले, हो आहेच मी भाग्यवान! In this land, every birth and every death counts! 


त्याच आठवड्यात एका लग्नाच्या मीटिंग साठी ओपंडित (म्हणजे ओव्हर्सिज भटजी/पंडित) कडून गेले होते. मुलगी मराठी आणि मुलगा अमेरिकन. लग्न विधी समजावून सांगताना त्याला मी विचारले - तुझे पालक? म्हणतो - I have no idea, i haven't spoken with my parents for 12 odd years :O 

मी त्याला विचारले - don't you feel lonely? त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले - I do... I miss them. Then I drink and then I am okay. I want to change this and hence I decided to get married to an Indian woman. I envy you guys... मी कसंनुसं जराशी हसले - मनात तेच शब्द, तेच वाक्य - होय, होय आहोतच आम्ही भाग्यवान, पुण्यवान...


न मागता मिळालेले सुख म्हणजे भारतात जन्म! त्यातही हिंदु कुटुंबात जन्म! त्यातही धार्मिक भगवंतावर विश्वास असणाऱ्या कुटुंबात जन्म!


"सर्वेपि सुखिन: सन्तु |" अशी मागणी करणारा आपला धर्म! 

Hindus seek out life not destroy it. Hindus are the the only people who have never invaded any land. We live in perfect harmony with nature.


आपले अकरावे इंद्रिय - मन. हे मन जे आपल्या सर्व आयुष्याला आकार देते त्यावर सर्वात जास्त संस्कार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म.


"मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथीदेवो भव|" - ह्या मूल्यांवर आधारित आपली संस्कृती व धर्म!


प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर कुठली संस्कृती देऊ शकते तर ती आहे वैदिक सनातन आर्य हिंदु संस्कृती!


जीवन तर धन्य कराच पण मृत्यूही धन्य करा अशी शिकवण देणारी आपली संस्कृती!


प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक पंथात - मनाला बळकटी देणारे अध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय, उपासना - म्हणजे भारत देश!


"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" - असे सांगणारे स्वामी समर्थ...

"समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?" किंवा "आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो"- असे मनोबल वाढवणारे समर्थ रामदास स्वामी...

"शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा अवतार महादेवाचा" - हिंदु साम्राज्य प्रस्थापित करणारे राजे... 


अगणित उदाहरणे, अगणित संदेश पण उद्देश्य एकच - बाबारे, 84 लाख योनिंमधून प्रवास करून मिळालेला मनुष्य जन्म धन्य कर.


तू कुठल्याही वर्णात असशील, तू कुठल्याही आश्रमात असशील, तू श्रीमंत असशील, गरीब असशील, तू आंधळा असशील, पांगळा असशील, तरी हा मनुष्य जन्म धन्य कर. अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती कर!

अशी शिकवण देणारी आपली संस्कृती, अशा भारत देशात आम्ही जन्मलो... 

एक अक्खा जन्म कमी पडेल एवढे ज्ञान ह्या भूमीने आम्हाला दिले...


होय! आहोतच आम्ही पुण्यवान, आहोतच आम्ही भाग्यवान! 


--- 

*मृदुला बर्वे, ओपंडित*



https://www.facebook.com/aparna.kalyani.58


डॅा अपर्णाताई कल्याणी यांच्या FB Wall वरुन साभार

कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू

 कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू

          राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजूरी देण्यात आली.

          राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजारअपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजूरी देण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची विविध बाबींना मान्यता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची विविध बाबींना मान्यता

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

मुंबईदि. ३० :-  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध बाबींना मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजना नफ्यात येण्यासाठी प्रयत्न केले जावेतअशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आज देण्यात आल्या.

       मंत्रालयातील परिषद सभागृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाचे बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाराज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन यांच्यासह मजिप्राच्या दिपाली देशपांडेस्वच्छता मिशनजल जीवन मिशनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाची आयोजित आढावा बैठक झाली.

        बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तयारीतील कामांचा नियोजन आराखडापाणीपुरवठा योजनातील कामेप्रशासकीय मान्यतानिधी मंजुरीमंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येणारे विविध प्रस्ताव या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

          महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी विविध योजना तयार केल्या जातात व नंतर जिल्हा परिषदेस हस्तांतरित केल्या जातात. विविध पाणीपुरवठा योजना नफ्यात  येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणी बिलांची वसुली वेळेत होण्याची गरज असून पाणी पट्टी बिलाचे शुल्क भरले जात नसल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठा योजनांवर होतो. या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी संचालक मंडळांनी सादर केलेल्या विविध बाबींना पाणीपुरवठा मंत्री श्री पाटील यांनी मान्यता दिली.


देशी गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान

 देशी गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान

 

        मुंबईदि. ३० : भारतीय संस्कृतीत गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे,देशी  गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.  मंत्री श्री. विखे पाटील यांनी सर्व मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

        गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिनप्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

        देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थानआयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.

        राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणीलालकंधारीपश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लारउत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिकवैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून  देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली. राज्यात देशी गायीला विशेष दर्जा दिल्याने देशी गायीच्या गोवंश संवर्धनास प्रोत्साहन मिळणार आहे.

देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान

        राज्यातील गो शाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिनप्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यानेहा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. २०१९ मधील २० व्या पशु गणनेनुसार देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९व्या पशुगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

महिला स्वावलंबी होण्यासाठी शासनाचे पाठबळ मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करणार

 महिला स्वावलंबी होण्यासाठी शासनाचे पाठबळ

मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करणार

- पालकमंत्री दीपक केसरकर

 

          मुंबई दि. ३० : पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन महिलांकरिता रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या अनुषंगाने मुंबई शहरातील महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करुन स्वावलंबी होता यावे यासाठी आवश्यक ते पाठबळ दिले जात असून महिलांसाठी उद्योग केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

          मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामहिला सशक्तीकरण योजना याबरोबरच महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरिता येथील षण्मुखानंद सभागृहात मुंबई शहर जिल्हा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांना विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

          यावेळी बोलताना मंत्री श्री. केसरकर म्हणालेमुंबईत महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी विविध उपक्रम सुरू केले जात आहेत. कोळीवाड्यांमध्ये फूड कोर्टच्या माध्यमातून कोळी भगिनींच्या हाताला काम मिळत आहे. रात्री रिकाम्या असणाऱ्या रस्त्यांवर त्या त्या भागामध्ये प्रचलित पदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत विविध ठिकाणी महिला दिवाळीचा फराळ बनवून विक्री करू शकतील याचे देखील नियोजन करण्यात येत आहे. महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

          राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणेत्यांचे आर्थिकसामाजिक पुनर्वसन करणेमहिलांना स्वावलंबीआत्मनिर्भर करणेत्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे आणि त्यांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण अंतर्गत शासन स्तरांवर विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर महिलांचे आरोग्य व आहारलखपती दीदी आणि आर्थिक साक्षरता याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले.

          राज्यामध्ये मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरात आतापर्यंत ४ लाख २४ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून लाभ हस्तांतरणासाठी ३ लाख ९६ हजार ४९१ अर्ज शासनास पाठविण्यात आले आहेत. त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहेअशी माहितीही यावेळी देण्यात आली.

          मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना करून देण्यामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या संबंधित अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

          या कार्यक्रमास आमदार कॅ. तमिल सेलवनकालिदास कोळंबकरश्रीमती यामिनी जाधवराज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाहक्षेत्रनिहाय समिती अध्यक्ष अतुल शाहअजय पाटीलमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादवउपजिल्हाधिकारी गणेश सांगळेजिल्हा नियोजन अधिकारी जी.बी. सुपेकरमहिला व बालविकास अधिकारी शोभा शेलारबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) प्राची जांभेकर यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी

 हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी

- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ

          मुंबईदि. ३० : हर घर दुर्गा हे अभियान देशासाठी प्रेरणादायी आहे. देशातील तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठीत्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल.कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल  व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

          कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवातकुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था नामकरण आणि कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये एचपी कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटरचे उद्घाटन या विविध कार्यक्रमासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढासचिव गणेश पाटीलकौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगेकौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकरव्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश सूर्यवंशीराजस्थान रजपूत समाजाचे मुंबईचे अध्यक्ष भावेर सिंग राणावतसुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. श्याम अग्रवालअभिनेत्री अदा शर्मा यांची उपस्थिती होती.

          लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, महाराष्ट्राच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाने आज एक महत्त्वपूर्ण अभियान सुरू केले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कालावधीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहे त्यामुळे आर्थिक, सामाजिक बदल घडणार आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. नोबेल पुरस्कार मिळवत आहेतकंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर महिला कार्यरत आहेत‌. जर त्यांना  हर घर दुर्गा या अभियानातून स्वसंरक्षणाचे धडे मिळाले तर समाजात अमुलाग्र बदल होतील. हर घर दुर्गा हे एक सशक्त अभियान आहे. यामुळे युवतींच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. हे अभियान पुढे संपूर्ण देशात जाईल  हर घर दुर्गा अभियानातून महिलांच्या कौशल्य भर पडणार आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या अनेक वाटा देखील खुल्या होतील. संपूर्ण महाराष्ट्रात हर घर दुर्गा या अभियानातून एक नवा विचार घराघरात पोहचेल

          लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला म्हणाले, राज्यातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात आले आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये एचपी कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले असून यामुळे कुशल मनुष्यबळ तयार होवून देशाचा विकास होईल असेही  लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला म्हणाले.

          कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीहर घर दुर्गा हे अभियान मुलींना त्यांचे स्वसंरक्षण करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा पुढाकार आहे. हे अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील मुलींसाठी आहे.  या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक नवरात्री मंडळाने हर घर दुर्गा कार्यक्रमाचे आयोजन करून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या अभियानामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये वर्षभर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींव्यतिरिक्त इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतातअसे मंत्री श्री. लोढा म्हणाले.

          यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे पत्रकार योगिता साळवीकिल्ले संवर्धनासाठी संतोष हासुरकरलहू लाडमुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनारविवेक चंदालिया यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

          यावेळी अभिनेत्री आदर्श शर्मा यांनी युवतींना स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगणारे प्रात्यक्षिक देखील सादर केले.

*****

Featured post

Lakshvedhi