Thursday, 4 July 2024

आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही

 आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या

ठेवीदारांना ठेवींच्या परताव्यासाठी कार्यवाही

- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. 4 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले कीआदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या. पतसंस्थेच्या लेखा परीक्षण आणि विशेष अहवालात अपहारगैरव्यवहारफसवणूकविनाकारण कॅश क्रेडिट  कर्जवाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या. याप्रकरणी ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत सहकार विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांपैकी ३ मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे. त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            यावेळी सदस्य प्रकाश सोळंकेबबनराव लोणीकरनारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

000

Dadi दादी हैं

 


कोल्हापूर जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 

        कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी व हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव असे 24 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.97 टीएमसी, तुळशी 1.47 टीएमसी, वारणा 13.26 टीएमसी, दूधगंगा 5.86 टीएमसी, कासारी 1.01 टीएमसी, कडवी 1.37 टीएमसी, कुंभी 0.96 टीएमसी, पाटगाव 1.82 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 0.71 टीएमसी, जंगमहट्टी 0.61 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.76 टीएमसी, आंबेआहोळ 0.91 टीएमसी, सर्फनाला 0.12 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.12 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.4 फूट, सुर्वे 25.4 फूट, रुई 55 फूट, इचलकरंजी 52 फूट, तेरवाड 45.9 फूट, शिरोळ 36 फूट, नृसिंहवाडी 33 फूट, राजापूर 22.9 फूट तर नजीकच्या सांगली  10.9 फूट व अंकली 14.2 फूट अशी आहे.

***

 

 

आजरा येथे 64.8 मिमी पाऊस

 

   कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक 64.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1 मिमी, शिरोळ -0.5 मिमी, पन्हाळा- 13 मिमी, शाहुवाडी- 19.6 मिमी, राधानगरी- 40.6 मिमी, गगनबावडा- 63.8 मिमी, करवीर- 3.6 मिमी, कागल- 6.3 मिमी, गडहिंग्लज- 17.8 मिमी, भुदरगड- 55 मिमी, आजरा- 64.8 मिमी, चंदगड- 58.9 मिमी, असा एकूण 22.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

***

श्री दत्त गुरू क्या पादुकांचे अलभ्य दर्षण

 


माँ कामाख्या देवी (गुवाहाटी, असम)* माँ का चेहरा 15 साल में सिर्फ़ एक बार ही दिखाई देता है


 *माँ कामाख्या देवी (गुवाहाटी, असम)* माँ का चेहरा 15 साल में सिर्फ़ एक बार ही दिखाई देता है। बाकी समय उनका चेहरा हमेशा फूलों से ढका रहता है। माँ की आँखों को देखने के लिए इसे देखें, जो किसी भी इंसान की तरह तत्-रूपम हैं। 🙏🏻🙏🙏

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि

 वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींच्या मदतीबाबत शासन गंभीर असून पीक नुकसान भरपाई मर्यादा 6000 वरून 50 हजार रुपये करण्यात आली तर वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आता 25 लक्ष रुपये मदत शासनाकडून दिली जात असून वनांचे संरक्षणपर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्यागावाकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील अशी माहिती वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत देत,  वनविभागाने स्थापन केलेल्या आमदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका समित्यांमध्ये झालेल्या निर्णयाचीसुचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईलअसे आश्वासन देखील ना. मुनगंटीवार यांनी सभागृहात दिले.

 

आमदार रणधीर सावरकरएड. आशिष जयस्वालअतुल बेनके इत्यादी सदस्यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ना. मुनगंटीवार उत्तर देत होते.  रानडुक्कर व रोहींमुळे होणारे नुकसान या संदर्भात बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले कीरानडुक्कर व रोहीना मारण्याचे अनुमती शासनाने यापूर्वीच दिलेली आहे. वनविभागाशी संबंधित समस्याअडचणी यावर वनविभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय असावा म्हणून 2019 मध्ये आमदारांच्या अध्यक्ष झाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आमदार महोदयांनी बैठक घेऊन कामामध्ये तिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्याला दंडित करण्याचा नियम देखील केला आहेअसे ना. मुनगंटीवार म्हणाले. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कुंपण करण्याची योजना वनविभागाने प्रस्तावित केलेली आहे; 28, 499 लाभार्थिंची ऑनलाइन नोंदणी झाली असून  वनवृत्ताच्या आसपासबफर झोनच्या जवळील गावांना कुंपण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 हजार रुपये "डिबीटी" मार्फत देण्यात येत आहेत. एक लक्ष लाभार्थी या योजनेसाठी अपेक्षित आहे असे स्पष्ट करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना 30 दिवसात नुकसान भरपाई देण्याचा कायदा केला असून,सॉफ्टवेअर केले आहे असे सांगितले.

 

आ. अतुल बेनके यांनी उपस्थित केलेल्या बिबट्याच्या नसबंदी बाबत बोलताना ना. मुनगंटीवार म्हणालेबिबट्याची व वाघाची वाढती संख्या हा विषय गंभीर आहे. नसबंदी संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून राज्य वन विभागाने यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यासोबतच याविषयीचे कार्यवाहीचे डिसिएफ कडे देण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. जुन्नर क्षेत्रात बिबट सफारी घेतला असून बिबट्याच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक विचार करेल असेही त्यांनी सांगितले.

 

पर्यावरणाचेवनांचे रक्षण करणारे गावगावकरी यांना संरक्षण देण्यासाठी सरकार अनुकूल असून कारण नसताना गरीब माणूस वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात  मृत्युमुखी पडतो हे अत्यंत दुर्दैव आहेत्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्यासंदर्भात देखील सरकार अनुकूल असून याविषयी प्रस्ताव तयार करण्याचा विचार आहे असे ते शेवटी म्हणाले.

 

जाणून घ्या तीन कायद्यामुळे नागरिकांना होणारे फायदे:*

 🔷🔷🔷

*नुकतेच लागू झालेले तीन नवीन कायदे आणि त्यामुळे होणारे क्रांतिकारी बदल तुम्हाला माहित आहे का?*


इंडीयन पिनल कोड 1860 च्या जागी भारतीय न्याय संहिता 2023, इंडीयन क्रिमिनल प्रोसिजर ॲक्ट 1873 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि  इंडीयन एविडन्स ॲक्ट 1872 ऐवजी भारत साक्ष संहिता ही तीन कायदे लागू झाले आहेत. 


*जाणून घ्या तीन कायद्यामुळे नागरिकांना होणारे फायदे:*


➡️आता आपल्यावर कुठेही अन्याय झाला तरी त्याच ठिकाणच्या पोलीस स्टेशनला तक्रार देणं बंधनकारक नाही. देशात कुठेही तक्रार देता येईल. पोलिसांची मनमानी बंद!


➡️गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत 60 दिवसात तपास पूर्ण करावा लागेल आणि चार्जशीट फाईल करावी लागेल. म्हणजे खोट्या केसेस आणि खोट्या गुन्ह्यामुळे कोणाला त्रास देता येणार नाही. 


➡️न्यायाधिशांना 45 दिवसाच्या आत न्याय करावा लागेल आणि आपला निर्णय सांगावा लागेल. म्हणजे कोर्टात होणारी सामान्य माणसाची हेळसांड थांबेल. 


➡️दहशतवादाची व्याख्या करून त्याचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. त्यामुळे दहशतवाद्याला तत्काळ शिक्षा होणार. 


➡️देशात घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्या आरोपींना त्या देशातून पकडुन आणणे कायद्याने शक्य होणार. त्यामुळे भारत विरोधी जगात कुठेही लपून बसला तरी त्याच्या मुसक्या आवळल्या जाणार.


➡️देशविरोधी घोषणा देणाऱ्यांची आता खैर नाही. पूर्वी कायद्यात भरीव तरतूद नसल्यामुळे देशविरोधी गँग वारंवार राष्ट्राचा अवमान करत होती. आता गंभीर गुन्हे दाखल होतील. 


➡️सायबर घोटाळा आता गंभीर गुन्हा करण्यात आला आहे. त्यामुळे हा कायदा सायबर चोरट्यांचा काळ ठरणार.  


➡️आणि सर्वात महत्त्वाचं बदल माहितीये? खोटं बोलून, फसवून लग्न केल्यास गंभीर गुन्हा ठरणार. यामुळे *लव जिहाद* सारख्या घटनेतील आरोपींना गंभीर शिक्षेला सामोरं जावं लागेल. 


➡️नवीन भारतीय पुरावा कायद्यानुसार आता व्हॉट्सॲप, टेलीग्राम सारख्या प्लॅटफॉर्म वरील डेटा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार. 


अश्या अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह नव्या भारताचे नवीन कायदे नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. 


*ब्रिटिशांनी भारतीयांचे शोषण करण्यासाठी जे जाचक कायदे तयार केले होते ते कायदे बदलण्यासाठी तब्बल 163 वर्ष आणि स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष वाट पाहावी लागली. मोदी सरकारने या कायद्यांच्या माध्यमातून देशाला खूप मोठी देण दिली आहे.*


*या नवीन कायद्यांनी भारताचे संविधान आणि लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झाली!*


=====

Featured post

Lakshvedhi