Wednesday, 3 July 2024

आदित्य केअरटेकर ब्युरो*(परेल)

 *आदित्य केअरटेकर ब्युरो*(परेल)


मुंबई मध्ये ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी घरी येऊन त्यांची सेवा करण्यासाठी आता *आदित्य केअरटेकर ब्युरो*


मुंबई, ठाणे,बोरिवली, नवी मुंबई मध्ये शहरवासीयांच्या सेवेत सुरू केले आहे. 

तसेच *रूग्णसेवे मध्ये* केले जाणारी कामे


१) डाईपर बदली करणे

२) युरीन बॅग रिकामी करणे

३) आंघोळ घालणे / अंग पुसून घेणे

४) नाश्ता व जेवण बनवणे आणि भरवणे

५) वेळेवर औषधं देणं

६) व्यायाम करून घेणे (डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार)

७) वरिष्ठ नागरिकांची देखभाल

८) रुग्णसेवे मधील इतर संबंधित कामे


या करीता *12 तास, 24 तास रुग्णसेवेसाठी आया व वॉर्डबॉय मिळेल*


*आदित्य केअरटेकर ब्युरो* मध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना / रुग्णांना घरी अथवा रुग्णालयात 12 तास (दिवस/रात्र) किंवा 24 तास  तसेच दवाखान्यात रुग्णाजवळ थांबणे आणि त्यांची सेवा करणे व त्यांची पूर्णपणे काळजी घेणे अशी  *"अत्यंत वाजवी दरात" सेवा सुरु केली आहे* 


*घरी आणि हॉस्पिटल मध्ये नर्सिंग स्टाफ GNM/ANM ( स्त्री / पुरुष ) ची सेवा दिली जाते.*


आदित्य केअरटेकर ब्युरो मध्ये प्रशिक्षित असे अनुभवी कर्मचारीवर्ग आहे जो काळजीपूर्वक सेवा करेल व त्यांना आनंदी ठेवेल.


आमच्याकडील सर्व स्टाफ चे आधारकार्ड, पॅनकार्ड व आरोग्य तपासणी करुनच आम्ही सेवा पुरवितो *"तरी जास्तीत जास्त लोकांना  माहिती व्हावी यासाठी आपण आपल्या सर्व ग्रूप व आपले मित्र परिवारात हा मेसेज पाठवावा व या सेवेचा जास्तीत जास्त"* लोकांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या लोकांची खऱ्या अर्थाने काळजी घेतल्याचे समाधान मिळवावे ही नम्र विनंती. 


*ज्याना कोणालाही सेवेकरी (Care Givers) पाहिजे असल्यास खालील फोन वर संपर्क साधावा* :

 +91 7021974798 - संजय तवटे 

 +91 8291475736 - जान्हवी तवटे


*ऑफिस पत्ता:*

आदित्य केअरटेकर ब्युरो 

कोंडाजी चाळ-५, ३०/२रा मजला, जेरबाई वाडिया मार्ग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल शेजारी, रंजना हॉटेलच्या बाजूला, भोईवाडा परेल - ४०००१२


*अनुभवी आया आणि वार्डबॉय व नर्सेस (स्त्री व पुरुष) यांच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे कृपया वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा*


कृपया जास्तीत जास्त गरजु लोकांपर्यंत  मेसेज पोहचवुन गरजावंताचा आशिर्वाद घ्या

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा

 पीक विमा योजनेसाठी

शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा

 

            मुंबई, दि. २ : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची  मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

टोल फ्री क्रमांक :

१४४११ / १८००१८००४१७

 

तक्रार नोंद क्रमांक :

०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४

व्हाट्सअ‍ॅप क्रमांक: ९०८२९२१९४८

इमेल आयडी: support@csc.gov.in

00000

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

 

            मुंबईदि. 2 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

             ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून अधिकाधिक महिलांना सुलभपणे योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेतअसे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, यासंदर्भात विधानसभेत निवेदन ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती. ती 2 महिने करण्यात आली असून दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै, 2024 पासून दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

            परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

-----00000----

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश

 


सुधारित :

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश

– मंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. 2 : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्‌यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून  येत्या 30 जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहितीशालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीचालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील वस्त्रोद्योग कमिटीकडून गणवेशाच्या कापडाचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले.  त्यानुसार कापडाची खरेदी प्रक्रिया ई निविदा द्वारे राबविण्यात आली. त्यानंतर कापड पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली. पुरवठादारामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या कापडापासून विद्यार्थ्यांचे गणवेष शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आले आहे. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

            राज्यात 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले. विदर्भात 30 जून पासून शाळा सुरु झाल्या. विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश विहित कालावधीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 30 जुलैपर्यंत सर्व शाळांपर्यंत हे गणवेश पोहोचतील आणि प्रथमच येत्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतीलअशी माहितीही त्यांनी दिली. 

000

महाराष्ट्र सरकारची महाज्योती योजना

 जर आपल्या ग्रुप मधील कोणाच्या मुलाने किंवा मुलीने अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलेली असेल तर त्यांनी वरील जाहिरातीमधील फॉर्म भरावा त्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपयांचा एक मोफत टॅब मिळतो व त्या टॅब मध्ये दररोज अनलिमिटेड मोबाईल डाटा मिळतो त्या टॅबवर त्याला अकरावी सायन्स च्या सर्व विषयाचे ऑनलाइन क्लासेसचे मोफत मार्गदर्शन पण मिळते ही योजना महाराष्ट्र सरकारची महाज्योती योजना आहे


पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा

 पीक विमा योजनेसाठी

शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा

 

            मुंबई, दि. २ : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची  मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

 

            मुंबईदि. 2 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

             ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून अधिकाधिक महिलांना सुलभपणे योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेतअसे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, यासंदर्भात विधानसभेत निवेदन ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती. ती 2 महिने करण्यात आली असून दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै, 2024 पासून दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

            परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

Featured post

Lakshvedhi