Unique but effective Yoga concept for Senior Citizens
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 8 June 2024
*एक ऐसी कहानी,जो आपको भावुक कर देगी
*एक ऐसी कहानी,जो आपको भावुक कर देगी।*
एक अट्ठाइस साल की बहुत ही बदसूरत और काली लड़की थी, उसके दाँत भी निकले थे, पर उसे अपने रंग और बदसूरती का जरा भी अफ़सोस नही था | हमेशा खुश रहती और एक नंबर की पेटू और पढ़ने लिखने में महाभोंदू भी थी |
पेटू होने की वजह से शरीर भी बेडौल हो गया था | एक खूबी उसमें यह भी थी की जहाँ रहती, हो-हो-हो कर हस्ती मुस्कुराते रहती और सबको भी हँसाते रहती |
उस नेक दिल लड़की का एक शौक भी था |
खाना बनाने का, वह खूब मन से खाना बनाती और बड़े चाव से मसाला पिसती |
खाना बनाने की किताबे खूब ध्यान लगा कर पढ़ती | टीवी रेडियो पे भी पाक कला के प्रोग्राम को बड़े मनोयोग से देखती सुनती |
जब भी उसे कोई खाना बनाना होता तो वह बड़े प्रेम से बनाती | आटा गूँथती, बड़े प्यार से गीत गुनगुनाते हुए कम आँच पे पूड़ियाँ तलती |
सब्जी चटनी खीर हो या मटर पनीर सब कुछ लाजबाब बनाती | जो भी उसके खाने को टेस्ट करता बिना तारीफ किये ना रहता | उसने पाक कला में अद्भुत और असाधारण प्रतिभा हासिल कर ली थी |
पर वह मनहूस थी उसके काले रंग और बदसूरत होने से कोई उसे प्यार न करता था पर माँ उसे बहुत प्यार करती थी | आज तक माँ ने उसे डाँटा तक नही था और वह भी माँ से बहुत प्यार करती थी |
हर बार की तरह इस बार भी आज सुबह उसकी शादी के लिए जो लोग लड़की देखने आये थे उन सबो ने खाने की बहुत तारीफ की लेकिन लड़की को देखकर नाक मुँह सिकोड़कर चले गए |
वह लड़की भी तैयार होकर किसी को बिना कुछ बताये कहीं चली गयी | शाम में जब वो लौटी तो घर का माहौल बहुत गरम था |
https://chat.whatsapp.com/FnfNiWHUoLsB1zi9REEdUr
पिता जी माँ पे बहुत गुस्सा थे बोल रहे थे पता नही कौन से पाप के बदले ये मनहूस लड़की मिली | पिता से प्रायः यह सुब सुनती थी उससे उसे कोई असर न होता था |
वह बहुत खुश खुश माँ को कुछ बताने गई और कहा " बड़ी भूख लगी है कुछ खाने को दो पहले" !
उसके हाथों में एक सर्टिफिकेट और एक चेक भी था, पर माँ भी आज बहुत गुस्से में सब्जी काट रही थी उसके तरफ देखे बिना ही बोली "तू सचमुच मनहूस है काश पैदा होते ही मर जाती तो आज ये दिन ना देखना पड़ता |
पचासों रिश्तों आये किसी ने तुझे पसंद न किया " |
उस मनहूस लड़की को माँ से ऐसी आशा ना थी उसका दिल बैठ गया और उसकी ख़ुशी उड़ गई और उदास होकर माँ से बोली " मैं सचमुच मनहूस हूँं माँ क्या मैं मर जाऊँ ?" बोलते बोलते उसका गला रुंध गया और चेहरा लाल हो गया |
माँ ने भी गुस्से में कहा "जा मर जा सबको चैन मिले" |
तभी उस मनहूस लड़की ने अपने कमरे में जाकर दरवाजा बंद कर लिया | थोड़ी देर बाद जैसे ही माँ को अपनी गलती का अहसास हुआ वो दौड़ती हुई उसके कमरे के तरफ गयी | आवाज़ देने पर भी दरवाजा जब नही खुला तो माँ ने जोर का धक्का दिया |
तेज धक्के से जैसे ही दरवाज़ा खुला माँ ने देखा सामने दुपट्टे के सहारे जीभ बाहर निकले उस मनहूस काली लड़की की लाश झूल रही थी |
वही पर एक चिट्ठी, सर्टिफिकेट और एक लाख का चेक रखा था |
चिट्ठी में लिखा था" माँ मैंने आज तक तुम्हारा कहना माना है | आज तुमने मरने को बोला ये भी मान रही | अब तुम मनहूस लड़की की माँ नही कहलाओगी |
मैंने पढ़ने की बहुत कोशिश की पर मेरे दिमाग मे कुछ जाता है नहीं, पर भगवान ने मुझे ऐसा बनाया इसमें मेरा क्या कसूर माँ ?
मुझे सबने काली मनहूस भोंदू सब कहा, मुझे बुरा न लगा पर तुम्हारे मुँह से सुनकर मुझे बहुत बुरा लगा
मेरी प्यारी माँ और हां आज नेशनल लेवल के खाना बनाने वाली प्रतियोगिता में मुझे फर्स्ट प्राइज और एक लाख रूपए का चेक मिला और साथ में फाइव स्टार होटल में मास्टर शेफ की नौकरी भी |
और पता है माँ आज मेरी जिंदगी की सबसे खुशी का दिन था क्योंकि पहली बार वहाँ सबने मुझे कहा था
देखो ये है कितनी भाग्यशाली लड़की है ।
नोट- बेटी है तो कल है | उसका सम्मान करे |
उसे ताकत दे,
उत्साहित करें,
माँ बाप का नाम, देश का नाम रोशन करेगी।
हमारी बात कैसी लगी, आप अपनी प्रतिक्रिया इमोजी के माध्यम से जरूर दीजियेगा
धन्यवाद
*_-:~ प्रस्तुतिकरण -:~_*
*पं तरुणेश चतुर्वेदी*
*_(कुंडली विशेषज्ञ )_*
*_पं. ऋषि राज मिश्रा_*
*_(ज्योतिष आचार्य )_*
*_180 पेज की पीडीएफ,सर्वश्रेष्ठ जन्मपत्रिका पायें- अपने व्हाट्सएप पर।_*
*_दक्षिणा:~ स्वेच्छा से यथाशक्ति,प्रसन्नता व, श्रद्धापूर्व_*
*कुंडली मिलान, रत्न परामर्श,व गृह वास्तु हेतु व्हाट्सएप करें।_*
*_9811798107_*
*सीखें वैदिक ज्योतिष बेसिक पाठ्यक्रम2माह(फीस 1100/2माह-)*
*_।।जय जय श्री राम।।_*
*_।।हर हर महादेव।।*
राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप
राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप
तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस
मुंबईः दि. 8 : दिव्यांगांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सकारात्मक बदल होणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. दिव्यांगांकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शनिवारी (दि.8) मालाड, मुंबई येथे 100 दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अंदाजे वीस हजार रुपये किंमत असलेल्या स्मार्ट चष्म्यांमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, शाळेत अथवा अन्यत्र जाणे तसेच इतर दैनंदिन कामात मदत होणार आहे. या चष्म्यामध्ये लेन्स, प्रोसेसर व स्पीकरचा समावेश आहे.
जगाच्या लोकसंख्येपैकी दर आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिव्यांग असून भारताची दोन टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
दिव्यांगांची सेवा हीच नारायणाची सेवा आहे. दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी मिळाली तर ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, असे सांगून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबद्दल मानवाधिकार आयोग व हेतू चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी उभय संस्थांचे कौतुक केले.
स्मार्ट चष्मे खरेदीसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच इतर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या संकेतस्थळाचे यावेळी अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात 75 दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देखील प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शिवकुमार डिगे व न्या.अभय आहुजा, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड (नि.) व हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगर जिल्हा तसेच हेतू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
000
Maha Governor presents AI assisted Smart
Glasses to Visually Impaired children
Maharashtra Governor Ramesh Bais presented the AI assisted Smart Glasses to 100 visually impaired children at a programme held at Malad, Mumbai on Saturday (8 Jun).
The programme was organised by the Maharashtra State Human Rights Commission in association with the District Legal Service Authority - Mumbai Suburban District and the Hetu Charitable Trust.
The Governor felicitated the Minister for Skill Development Mangal Prabhat Lodha and other donors for supporting the purchase of AI assisted Smart Glasses for the visually impaired persons. The website of Hetu Charitable Trust was also launched on the occasion.
Supreme Court Judge Justice Sandeep Mehta, Bombay High Court judges Justice Shivkumar Dighe and Justice Abhay Ahuja, Chairman of Maharashtra State Human Rights Commission Justice (Retd) K.K. Tated and Secretary of Hetu Charitable Trust Rikhabchand Jain were prominent among those present.
000
वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात
*वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:
1. जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.
2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.
6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.
8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.
9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.
10. संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.
● वरचेवर मित्रांच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे ,वेळ खर्च करा
● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.
● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?
● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!
● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .
● मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा
● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा
● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .
● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.
● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?
तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.
● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा
● आणी हो, तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
● मित्र नसतील तर
तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.
● त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा मुक्त दाद द्या
म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...
● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!
● क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका..!
● संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांचा सामना करा..!
● डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण ....
● काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत ....
*!! मित्र जपा मैत्री जपा!!*
डा.अरुण इंगळे, लोकदिप ट्रस्ट ,पुणे...
*_जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.*
💐🌹🙏🌹🌷
राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान
प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी : राज्यपाल
मुंबई 08 : विसाव्या शतकात शोध लागलेली प्लास्टिक बहुगुणी वस्तू असून आज दैनंदिन जीवनापासून अनेक क्षेत्रांत प्लास्टिकचा वापर अनिवार्य झाला आहे. भारतीय प्लास्टिक उद्योगाने जगातील अनेक बाजारपेठा काबीज केल्या असून या उद्योगाने संशोधन, नाविन्यता व उत्कृष्टतेच्या माध्यमातून 'ब्रँड इंडिया' निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे 'प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार' राज्यपाल बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7 जून) नेसको, गोरेगाव मुंबई येथे प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एम. पी. तापडिया, यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. कौन्सिलचे माजी अध्यक्ष अरविंद गोयंका यांना विशेष सन्मान देण्यात आला. एकूण 75 प्लास्टिक निर्यातदारांना पुरस्कार' देण्यात आले.
मध्य पूर्वेतील युद्धजन्य स्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी होत असताना भारताची अर्थव्यवस्था तेजीने वाढत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. प्लॅस्टिक उद्योग 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देत असल्याचे नमूद करून प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने राज्यातील विविध विद्यापीठांशी सहकार्य स्थापित करावे तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील उद्योग आणि रोजगाराच्या संधींबद्दल अवगत करावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
जगातील अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारताचा संशोधन आणि नावीन्यतेवरील खर्च खूपच कमी आहे असे सांगून प्लास्टिक उद्योगाने संशोधन आणि नवनिर्मितीवर अधिक भर द्यावा, असे राज्यपालांनी सांगितले.
प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, उपाध्यक्ष विक्रम भादुरिया व कार्यकारी संचालक श्रीबाश दासमोहपात्रा, प्लास्टिक क्षेत्रातील उद्योजक, आंतरराष्ट्रीय खरीददार व निर्यातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
Maharashtra Governor honour top Plastics Exporters with Excellence Awards
Maharashtra Governor Ramesh Bais presented the Export Excellence Awards of the Plastics Export Promotion Council (PLEXCONCIL) to ७५ plastics exporters at an awards function held at NESCO, Goregaon Mumbai on Fri (७ Jun).
The Governor presented the Lifetime Achievement Award to M P Taparia, Chairman of Supreme Industries and a special award to former Chairman of PLEXCONCIL Arvind Goenka.
Chairman of the Plastics Export Promotion Council Hemant Minocha, Vice Chairman Vikram Bhaduria, Executive Director Sribash Dasmohapatra, captains of plastics industry, international buyers, exporters and other stakeholders in the plastics industry were present.
000
🙏🏻🙏🏻*आई**🙏🏻🙏🏻
*🙏🏻🙏🏻*आई**🙏🏻🙏🏻
लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली. वयात आलेला तरुण मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो. त्याची प्रेयसी त्याचे तिच्यावरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याला अट घालते की तुझ्या आईचे हृदय मला घेऊन ये. आई कुठलीही तक्रार न करता मुलासाठी मरावयास तयार होते. तिचे ते काढलेले हृदय घेऊन मुलगा प्रेयसीच्या घराकडे धावत जात असतो रस्त्यात ठेचकाळतो, पडतो तेव्हा हातातल्या हृदयातून शब्द येतात " बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना? " ही कथा जरी काल्पनिक असली तरी आईच्या ओतप्रोत प्रेमाची महती सांगणारी आहे. जवळच्या नात्यांमधले सर्वात निरपेक्ष नाते म्हणजे आई आणि मुलाचे आणि म्हणूनच विविध भाषांमधल्या अक्षर साहित्यात आणि काव्यात अशी एखादीच भाषा असेल ज्या भाषेत आईबाबतचे लिखाण नाही. परमेश्वर प्रत्येक माणसापर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली. "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही " हे मराठी चित्रपटातील गीताचे शब्द आपल्या मनाला भिडतात. महाविद्यालयीन जीवनात असताना मैक्सिम गोर्की या रशियन भाषेच्या कवीची आई नावाची जगप्रसिद्ध कादंबरी वाचनात आली होती जीचे १०० च्या वर भाषांमध्ये भाषांतर झाले. आई मुलासाठी आयुष्यभर करत असलेल्या त्यागामुळे राष्ट्राला पितृभूमी न म्हणता मातृभूमी म्हणत असावेत. कळायला, समजायला लागल्यानंतर कानावर रेडिओवरचे आईविषयीच्या काव्याचे लता दीदींचे मन व्याकूळ करणारे स्वर कानावर पडायचे. आई जिवंत असताना ती नजरेसमोर असल्याने तिची महती कधीच लक्षात येत नाही.पण आई सोडून गेली की आईच्या पश्चात तिच्या बद्दलच्या आठवणी आठवतात, व्याकूळ करतात आणि आपल्या अख्ख्या आयुष्याला सर्वत्र व्यापून सुद्धा त्या उरतातच. तीच ही आईच्या आठवणीची कविता.
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिन्धु आई !
बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायी(?) ।
तू माय, लेकरूं मी; तू गाय, वासरूं मी;
ताटातुटी जहाली आता कसे करूं मी ?।
गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन् राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना ?॥१॥
आई तू मला या जगात मला एकटा टाकून सोडून गेलीस. गायीची आणि वासराची ताटातूट होते तसं माझं झालं आहे. कृष्णाला गोकुळात एकटं टाकून जेव्हा यशोदा दूर निघून जाते तेव्हा कितीतरी वेळ कृष्ण भुकेला राहतो असे माझे झालेले आहे. असा कुठला उपाय मी करू की त्यामुळे तू परत येशील.
तान्ह्यास दूर ठेवी- पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शान्त राहे ।
नैष्ठुर्य त्या सतीचें तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचें सामीप्य साधण्याते ॥२॥
गाईपासून वासरू दूर असले तरी केवळ त्याच्या आठवणीने तिचा पान्हा वाहत असतो पण इथे तर आई नाही. सती जाण्यासाठी स्वतः होऊन अग्नीत प्रवेश करून जी शांत चित्ताने अविचल राहते त्या पतिव्रता सतीचे नैष्ठुर्य म्हणजे निष्ठुर वाटणारे मनाचे निश्र्चयात्मक रूप तू दाखवलेस. आई केवळ हृदयस्थ परमेश्वराच्या सन्निध म्हणजे जवळ जाण्यासाठी.
नाही जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची ।
चित्तीं तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका ॥३॥
आई तुझ्या पश्चात माझी काही आबाळ झाली असे देखील नाही पण तरीदेखील तुझी उणीव मला क्षणोक्षणी आणि पावलोपावली जाचत होती. मनामध्ये तुझी आठवण येत असताना, तू काही केल्या नजरेसमोर येत नव्हतीस पण तरीही तू मला पुन्हा हवी आहेस हा माझा हट्ट माझं मन काही केल्या सोडायला तयार नाही.
विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राहीं ।
सारें मिळे परन्तु आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्तीं माझ्या अखण्ड पेटे ॥४॥
आई तुझ्या पश्चात ज्याला लौकिकार्थाने मोठा झाला असे म्हणतात असा मी खरोखर मोठा झालो, उच्च विद्या विभूषित झालो, गर्भश्रीमंत झालो, समाजात मला प्रतिष्ठा लाभली हे सगळे मिळूनसुद्धा मी पोरकाच राहिलो ग!!सारे काही मिळून सुद्धा आईची पुनर्भेट होत नाही त्यामुळे माझ्या मनात विचार कल्लोळांच्या चिंतेची चिताच अखंड पेटलेली आहे.
आई,तुझ्या वियोगें ब्रह्माण्ड आठवे गे !
कैलास सोडुनी ये ऊल्केसमान वेगें ।
किंव्वा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ॥५॥
तुझ्या वियोगामुळे ब्रह्मांड आठवते . मला माहिती आहे तू नक्कीच परमेश्वराच्या पायाशी कैलास पर्वतावर आहेस. परंतु तारांगणातील उल्का जशी वेगाने पृथ्वीवर येते तशी तू मला भेटण्यासाठी ये किंवा तुझा विदेह म्हणजे देह नसलेला आत्मा माझ्या सभोवती फिरतही असेल आणि माझ्यावर अव्यक्त न दिसणाऱ्या अशा तीर्थ स्वरूपाच्या अश्रूधारांची तू बरसात करत असशील.
ही भूक पोरक्याची होई न शान्त आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांहीं ।
वाटे ईथूनि जावें, तूझ्यापुढे निजावें,
नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें ॥६॥
आई तुझ्या पश्चात मी पोरका झालो आणि इतरांचे आईवरचे वात्सल्य बघून माझी तुझ्या प्रेमाची भूक शांतच होत नाही. असं वाटतं इथलं सारे सोडून निघून जावे. तुझ्या डोळ्यात डोळे घालून हसावे, बोलावे, तुझ्या मनात शिरावे.
वक्षीं तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोकें,
देईल शान्तवाया हृत्स्पन्द मन्द झोके ?।
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी ॥७॥
आई तुझ्या वक्षावर स्थिरपणे डोके ठेवून तुझ्या हृदयाचे शांत शांत मंद ठोके ऐकत माझे मन केव्हा झोके घेईल? तू पुन्हा एकदा जन्म घे आणि मलाही तुझ्या पोटीच जन्माला येऊ दे. परमेश्वरा, ही माझी एक मोठी आस खोटी ठरू नये ही प्रार्थना!!
मनाला व्याकूळ करणारे या गाण्याचे स्वर जेव्हा कानी पडतात, तेव्हा गर्भात नऊ महिने आणि त्या नंतर जिवंत असेस्तोवर आपली सगळी काळजी घेणारी आई साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. गाय जेव्हा तिला लुचणाऱ्या वासराला प्रेमाने चाटते तेव्हा तिच्यातील आई वासरावर जीव टाकत असते. वासरू दूर गेले की गाय हंबरते. कदाचित म्हणूनच तिला गोमाता म्हणत असावेत. आई ही अशीच असते. आपल्या प्रत्येकाच्या मनात आईबद्दलच्या आठवणी सदैव व्यापून असतात.आपल्या आईच्या आठवणी शब्दांत उतरवणारे हे काव्य आहे.
कवी माधव ज्युलियन यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी हे सुंदर काव्य लिहिले आहे. कवी कै.माधवराव पटवर्धन यांचा जन्म बडोद्यामध्ये २१ जानेवारी १८९४ साली झाला. त्यांनी फारसी आणि इंग्रजी साहित्यामध्ये BA आणि MA या पदव्या मिळवल्या. फारसी भाषेचे ते प्रकांड पंडित आणि त्यामुळेच MA ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सुमारे ११ वर्ष कोल्हापुरातील राजाराम कॉलेज येथे फारसी भाषा शिकवायचे काम केले. त्यांनी १९२६ साली फारसी - मराठी शब्दकोश लिहिला. छंदोरचना हा त्यांचा पीएचडी चा प्रबंध जर्मनी मधील विद्यापीठात त्यांनी सादर केला. त्यांच्या 'छंदोरचना' या पुस्तकामुळे मुंबई विद्यापीठाची त्यांना डॉक्टरेट मिळाली. मराठी साहित्यासाठी डॉक्टरेट मिळवणारे भारतातील ते पहिलेच साहित्यिक. १९३६ साली ते जळगाव येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मराठी काव्य हे पंतकवी आणि संतकवी पुरतेच मर्यादित होते. परंतु केशवसुत, भा. रा. तांबे आणि माधवराव पटवर्धन अशा कवींनी प्रेम काव्ये मराठी साहित्यात लिहायला सुरुवात केली. आईची आठवण हे त्यांचे वरील काव्य 'गजलांजली' या पुस्तकातील आहे. त्यांनी 'खंडकाव्य' नावाचे २३४ श्लोकांचे पुस्तक देखील लिहीले. सामाजिक सुधारणांचा उद्देशाने त्यांनी 'सुधारक' नावाचे पुस्तक देखील लिहिले. इंग्रजी भाषेतले कवी शेले यांच्या ज्युलियन आणि मडालो या कवितेवरून त्यांनी ज्युलियन असे टोपण नाव धारण केले. परंतु पुण्यात त्यांचा ज्युलियन नावाच्या मुली बरोबर प्रेमभंग झाला म्हणून तिची आठवण म्हणून माधव ज्युलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती प्रसिद्ध होती. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धन यांना देण्यात येते. १९२० च्या दशकात पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळातर्फे कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत या कवींमध्ये कवी कै.माधव ज्युलियन अग्रेसर होते.
माधव ज्युलियन यांचे हे करुण काव्य संगीतकार कै. वसंत प्रभू यांनी सारंग रागात संगीतबद्ध केले आणि कै. लता दीदींनी आपल्या सुस्वरात या कवितेचे अजरामर गीत केले. आजही या गाण्याचे स्वर कानी पडले की मनात आईच्या आठवणी जाग्या होतात.
विद्वत्ता, तर्ककुशलता, वाक्पटुता व ठाशीव वाणी यांचा सुंदर संगम कवी कै. माधव ज्युलियन यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्या काळात अनेक मराठी कवींचे अकाली निधन झाले. बालकवी २८व्या वर्षी गेले, राम गणेश गडकरी ३४ व्या वर्षी गेले, केशव सुतांचे ३८ व्या वर्षी निधन झाले. कै.माधवराव पटवर्धन यांचे देखील वयाच्या ४५ व्या वर्षी अकाली निधन झाले. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी देखील माधवराव प्रसन्न चित्त होते असे म्हणतात. अगदी शांत मनाने व उत्सुक अंत:करणाने त्यांनी
"मृत्यो, सुंदरता तुझी तरी बघू दे,
हो सखा शेवटी"
असे म्हणत मृत्यूच्या हातात हात घालून माधवराव दिनांक २९ नोव्हेंबर १९३९ च्या रात्री हे जग सोडून गेले.. नव्हे मराठीतील उच्च विद्याविभूषित, विद्वान, व्यासंगी अशा एका भाषा प्रभूचे त्या रात्री निधन झाले. माधवरावांच्या अंत्ययात्रेला ओंकारेश्वरावर प्रचंड गर्दी झाली होती. कै.माधव ज्युलियन उर्फ माधवराव पटवर्धन यांच्या स्मृतींना शतश: वंदन!!
श्री. प्रदीप टिल्लू.
वकील, ठाणे.
९८६९२६४१७९
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा
शके १९४६
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी
शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता
- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 7 : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वंकष प्रयत्नांसह शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फोरमच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नाफी रिसर्च सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुझेलिया इमाऐव्हा, रशियन फेडरेशन नॉर्दन अफेअर्स उपाध्यक्ष गॅलीनो कैरेलोव्हा, नवाह एनजी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक हिंद अल नक्बी, व्ही. के. कंपनीच्या उपाध्यक्ष ऐलोना इसागुलोव्हा,सीबूरच्या व्यवस्थापकीय संचालक मरीना मेडव्हेडेव्हा, अणु उद्योग महिला संघटना संस्थापक अॅलेक्झाड्रोया बिक, व्हेल फार्मच्या अध्यक्ष ल्यूड मिला शेरबाकोव्हा,केंद्रीय आरोग्य व जैविक यंत्रणा रशिया तात्याना याकोलेव्हा आणि गेम्स ऑफ द फ्यूचर्सच्या उपसंचालक ॲना खारमास यांनी "बहू केंद्रीय जागतिक अर्थ व्यवस्थेकडे संक्रमण अंतर्गत विकास धोरणाचा स्त्रियांचा आर्थिक सक्षमीकरणावरील परिणाम" या विषयावरील जागतिक परिसंवादात सहभाग नोंदविला.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्रियांच्या आर्थिक उन्नतीसाठी व दारिद्रयनिर्मूलनासाठी जागतिकीकरणाचा प्रभाव मोठा आहे. महिलांना संधी उपलब्धता मिळण्यासाठी व त्यांचे ध्येय पूर्तता होण्यासाठो वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम व कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन यांची भूमिका महत्वाची आहे.
कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमनने तयार करुन दिलेल्या कृती आराखडयावर जगभरातील सर्व राष्ट्रांना आपले उत्तर सादर करावे लागते. त्यामुळे यास अत्यंत महत्व आहे. स्त्रियांच्या राजकारणातील वाढत्या सहभागामुळे त्यांचे सक्षमीकरण होण्यास अधिक मदत मिळते.
शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिलांचा वाढता सहभाग असणे महत्वाचे आहे, लिंग समभाव व आर्थिक सक्षमीकरण यास प्रोत्साहन देणे, मानवी तस्करी, लैंगिक छळ यास प्रतिबंध करणे व बाल हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे. या बाबतीत रशियामध्ये चांगले प्रयत्न झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा आणि सेंट पीटर्सबर्ग येथील विधिमंडळ यांच्यात झालेला सामंजस्य करार या दृष्टीने महत्वाचा आहे.
भारतात स्टार्ट अप उद्योगाचे प्रमाण वाढत आहे. तसेच हस्त कला व कृषी क्षेत्रातही प्रगती होत आहे. याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेले नुकसान सर्वात जास्त स्त्रियांना सहन करावे लागते, ही वस्तूस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
००००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...