Friday, 7 June 2024

एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा यांमधील संधी अनलॉक करणे या विषयावर विशेष कार्यक्रम

 एंगेज महाराष्ट्र’  रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग

माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा

यांमधील संधी अनलॉक करणे या विषयावर विशेष कार्यक्रम

 

  मुंबईदि.7 : देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासनउद्योग विभागअसोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने(Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सव्ह्रिसेस ऑर्पोच्युनिटीज,  हा आगामी संवादात्मक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंन्द्र सिंह कुशवाह  यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.  हा  कार्यक्रम मंगळवार,11 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता ग्रँड बॉलरूम, द लीला पॅलेस, बंगळुरू येथे आयोजित केलेला आहे.

उदयोन्मुख माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा (ITES) क्षेत्रातील, महाराष्ट्राचे उत्कृष्ट स्थान आणि भरीव गुंतवणुकीच्या संधी यांचा प्रचार व प्रसार करून त्याद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र हे भारतामधील आर्थिकदृष्ट्या प्रबळ राज्य म्हणून ओळखले जात असून व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, विस्तृत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि अनुकूल भौगोलिक स्थान यामुळे आयटी उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. गुंतवणूक आणि नाविन्यतेसाठी  पूरक व  सक्षम व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध आहे.

देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठीराज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ,  श्री. कुशवाह  यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम सहभागींना महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल.महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यासर्व उद्योजकगुंतवणूकदार व कॉर्पोरेट हाऊसेस यांना महत्त्वपूर्ण अशा  संवादात्मक कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती उद्योग संचालनालयामार्फत देण्यात आली आहे.

0000 


 

Gearing up for Roadshow on Engage Maharashtra:

Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities

            Mumbai Date 7  : Government of Maharashtra, Industries Department in Association with the Associated Chambers of Commerce and Industry of India (ASSOCHAM) is excited to announce an upcoming interactive session titled "Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities." The session is scheduled for Tuesday, 11th June 2024, at 10:00 AM at the Grand Ballroom, The Leela Palace, Bengaluru.

            This high-profile event aims to showcase Maharashtra's vibrant economic landscape and its substantial investment prospects, particularly in the emerging Information Technology (IT) and IT-Enabled Services (ITES) sectors. Maharashtra, known as India's powerhouse State, offers a conducive business environment, extensive infrastructure, a skilled workforce, and a strategic geographical position, making it an attractive destination for investors in the IT industry.

            A distinguished delegation from the Government of Maharashtra, led by Shri Deependra Singh Kushwah, IAS, Development Commissioner Industries, will be present to engage with industry and business leaders. This session provides a unique platform for participants to explore and capitalize on the dynamic opportunities available within Maharashtra's IT sector.

            Extending  a warm invitation to all industry members to join this interactive session and discover the vast business opportunities that Maharashtra has to offer. We look forward to grand participation in this significant event.

            The Government of Maharashtra is committed to fostering a robust business environment that encourages investment and innovation. With its progressive policies and initiatives, the State continues to be a leading destination for businesses across various sectors.

0000

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

 खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा

बी-बियाणेखते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

 

            मुंबई दि. ७ : यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने 24 लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरीत केले असून आणखी 6 लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे. तर उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरीत केले जाईलअसे नियोजन केले जात असल्याची माहिती, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खतेबियाणे उपलब्धतेबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदनकृषी आयुक्त रावसाहेब भागडेगुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटीलबी-बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गोंदवलेमहाबीजचे श्री.कलंत्रीकृषी विद्यापीठांचे बियाणे विभाग प्रमुखमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी श्री.मुंडे म्हणाले की, सध्या राज्यशासनाने खते व कृषी निविष्ठा यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी कायदे प्रस्तावित केले आहे. हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित आहेत. सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री श्री .मुंडे यांनी दिले.

             बी बियाण्यांची चढ्या भावाने विक्रीकृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावीयासाठी शासनाचा व्हाट्सॲप क्रमांक 24 तासात सक्रीय करून शेतकऱ्यांना कळविण्याचे निर्देश श्री. मुंडे यांनी दिले .

            दरम्यान राज्यात विशिष्ट कंपन्यांच्या बियाण्यांची मागणी केली जाणेसाठेबाजी याबाबतच्या उपाययोजना देखील  सुचवल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानकापूस-सोयाबीन योजना व अन्य योजनांच्या तसेच महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आले असूनकुठेही त्याची टंचाई भासणार नाहीअसे नियोजन करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्रीकृत्रिम टंचाईबोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईलअसेही श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय.ए.कुंदन यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खतेबियाणे उपलब्धतेबाबतची माहिती आढावा सादर केली.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2024 ची 8.96 टक्के दराने परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2024 ची

8.96 टक्के दराने परतफेड

 

            मुंबईदि. 7 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.96 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची जुलै 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह 9 जुलै 2024 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईलअसे वित्त विभागाने कळविले आहे.

           या कर्जावर 9 जुलै 2024 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल.

            दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास अथवा त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी8.96 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या

प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

 

              मुंबई दि.७ :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असूनमातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक,आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत,असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

             जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी पात्रतानिकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी मातंग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावेयापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

            मातंग समाजातील व तत्सम बारा पोट जातीतील त्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलाशैक्षणिक दाखला/टी-सीआधार कार्डपॅन कार्डमतदान कार्डपासपोर्ट साईज फोटो दोनउत्पन्नाचा दाखला (रु.३ लाख रूपयांच्या आत) इत्यादीसह अर्ज करावा.

            प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्थेसाठी :- सदर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची नोंदणी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. या प्रशिक्षणासाठी अदा करावयाची प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील. त्या शिवाय या संस्थेची प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही. या पात्र संस्थाचालकांनी नियम व अटीशर्तीनुसार प्रस्ताव https://www.slasdc.org या प्रणालीवर सादर करण्यात यावा. ही प्रशिक्षण संस्था मुंबई शहर व उपनगर  जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

              ३० जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळजिल्हा कार्यालय,मुंबई शहर उपनगर रूम नंबर ३३गृहनिर्माण भवनकलानगरवांद्रे (पू.) मुंबई ४०००५१ येथे स्वीकारले जाणार आहेत. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळेल.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी

शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता

 - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

            मुंबई, दि. 7 : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वंकष प्रयत्नांसह शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

            सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फोरमच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नाफी रिसर्च सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुझेलिया इमाऐव्हारशियन फेडरेशन नॉर्दन अफेअर्स उपाध्यक्ष गॅलीनो कैरेलोव्हानवाह एनजी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक हिंद अल नक्बीव्ही. के. कंपनीच्या उपाध्यक्ष ऐलोना इसागुलोव्हा,सीबूरच्या व्यवस्थापकीय संचालक मरीना मेडव्हेडेव्हाअणु उद्योग महिला संघटना संस्थापक अॅलेक्झाड्रोया बिकव्हेल फार्मच्या अध्यक्ष ल्यूड मिला शेरबाकोव्हा,केंद्रीय आरोग्य व जैविक यंत्रणा रशिया तात्याना याकोलेव्हा आणि गेम्स ऑफ द फ्यूचर्सच्या उपसंचालक ॲना खारमास यांनी "बहू केंद्रीय जागतिक अर्थ व्यवस्थेकडे संक्रमण अंतर्गत विकास धोरणाचा स्त्रियांचा आर्थिक सक्षमीकरणावरील परिणाम" या विषयावरील जागतिक परिसंवादात सहभाग नोंदविला.

            डॉ.गोऱ्हे म्हणाल्या कीस्त्रियांच्या आर्थिक उन्नतीसाठी व दारिद्रयनिर्मूलनासाठी जागतिकीकरणाचा प्रभाव मोठा आहे. महिलांना संधी उपलब्धता मिळण्यासाठी व त्यांचे ध्येय पूर्तता होण्यासाठो वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम व कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन यांची भूमिका महत्वाची आहे.

            कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमनने तयार करुन दिलेल्या कृती आराखडयावर जगभरातील सर्व राष्ट्रांना आपले उत्तर सादर करावे लागते. त्यामुळे यास अत्यंत महत्व आहे. स्त्रियांच्या राजकारणातील वाढत्या सहभागामुळे त्यांचे सक्षमीकरण होण्यास अधिक मदत मिळते.

            शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिलांचा वाढता सहभाग असणे महत्वाचे आहेलिंग समभाव व आर्थिक सक्षमीकरण यास प्रोत्साहन देणेमानवी तस्करीलैंगिक छळ यास प्रतिबंध करणे व बाल हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे. या बाबतीत रशियामध्ये चांगले प्रयत्न झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र विधानपरिषदविधानसभा आणि सेंट पीटर्सबर्ग येथील विधिमंडळ यांच्यात झालेला सामंजस्य करार या दृष्टीने महत्वाचा आहे.

            भारतात स्टार्ट अप उद्योगाचे प्रमाण वाढत आहे. तसेच हस्त कला व कृषी क्षेत्रातही प्रगती होत आहे. याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेले नुकसान सर्वात जास्त स्त्रियांना सहन करावे लागतेही वस्तूस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन, महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी

 सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे

भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन,

महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 

            मुंबई, दि. ७ : जागतिकस्तरावर नव्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत भारत-रशिया संबंधांना अतिशय महत्त्व आहे. विकासतंत्रज्ञानबाजारपेठसेवाउद्योगऊर्जाबांधकामवाहतूकसांस्कृतिक आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रात सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम – २०२४ च्या माध्यमातून उद्योग-व्यापाराच्या विपुल संधी निर्माण होतील. महाराष्ट्र हे भारतातील औद्योगिक दृष्टीने अग्रगण्य राज्य असल्याने या व्यापारसंधी उभय देशांना लाभदायक ठरतीलयात मुंबईचे स्थान आणखी महत्वपूर्ण राहील, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या संकल्पनेनुसार येथे आयोजित सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम - २०२४ मध्ये 'रशिया - भारतया विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. याप्रसंगी अन्य मान्यवर आंतरराष्ट्रीय वक्त्यांबरोबरच भारताचे रशियातील राजदूत विनयकुमार उपस्थित होते.

            भारत-रशिया मैत्री संबंध हे काल कसोटीवर सिध्द झालेले आणि परस्पर विश्वाससहकार्यसामंजस्य हा मुख्य आधार असलेले असे आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष माननीय श्री. पुतिन आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील परस्पर स्नेहसंबंध हे नेहमीच जागतिक शांतता आणि विकास यांना प्राधान्य देणारे ठरले आहेत. या फोरममुळे जागतिकस्तरावर सशक्त यंत्रणा उभी राहिली आहे ज्यातील सत्रात मला निमंत्रित करण्यात आले हा माझा बहुमान समजतोअसे यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री.नार्वेकर म्हणाले.

            रशियन नवउद्यमींना भारतातील सतत विस्तारणाऱ्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे भारतातील उद्योजकांना देखील रशियातील उद्योग विस्ताराच्या संधी खुणावत आहेत. या फोरमच्या माध्यमातून दोन्हीकडील उद्योजकांना त्यासाठी उचित मार्गदर्शनाचा लाभ मिळावा. उभयपक्षी व्यापार हा २०२५ पर्यत आणखी पुढचे उद्दिष्ट गाठेल, असे संकेत दिसत आहेतअसेही विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.


*बारिश 🌨️का पाणी 💧 जमा करणे का आफ्रिका देश का अनोखा तरिका...*


 *बारिश 🌨️का पाणी 💧 जमा करणे का आफ्रिका देश का अनोखा तरिका...*

Featured post

Lakshvedhi